(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • आमचे खेळ

    बागेतील तारका –

  • खरे श्रीमंत

    आनंद मोजता येत नाही
    जवळ असलेल्या नोटांमध्ये
    श्रीमंती मोजता येत नाही
    आलिशान फ्लॅटच्या भव्यतेमध्ये

    किती ही पैसा असला
    तरी तो कमीच भासतो
    दुसऱ्याचा महाल बघून
    आपला फ्लॅट छोटा वाटतो

    दुःख भोगल्यावर कळतं
    की सुख काय असतं
    दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की कळतं
    आपण खरं तर किती श्रीमंत असतो

    -- दिप्ती गोगटे

  • तुझ्या मिठीत सख्या

    तुझ्या मिठीत सख्या
    मी बेधुंद जराशी व्हावी
    स्पंदने हलकेच अधरी
    अंतरात उलघाल व्हावी
    घेशील मज तू कवेत जेव्हा
    चांदण सडा अंगणी बरसला
    लाजेल मी अलगद गाली तेव्हा
    तू ही सख्या हलकेच मोहरला
    स्पर्शीले तन आल्हाद तू
    बहरल्या रोमांचित खुणा
    ओठ ओठांनी टिपले तू
    साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा
    अलवार मिठीत तुझ्या
    वेढून घे अलगद तू मजला
    स्पर्श मलमली गुंतून मोहक
    मखमली उरतील भावस्पर्शी खुणा
    नकोच शब्द तेव्हा काही
    शहारे तन पुन्हा पुन्हा
    सोडून येते मी वाट वेगळी
    गंधाळते मी तुझ्यात तेव्हा
    वाट तुझी पाहता सख्या
    चंद्र टिपूर आकाशी सजला
    तारकांच्या नभांगणात रंगला
    दोन मनाचा गंधित अत्तरी केवडा
    -- स्वाती ठोंबरे.
  • हिशोबातील शिल्लक

    हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं ।

    जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं ।।

    घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण ।

    प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण ।।

    कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता ।

    उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता ।।

    कधी काळचा निवांतपणा, घालविला दुजाच्या सेवेत ।

    पुण्य राहिले शिल्लकीमध्ये, वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • पुनर्जन्म

    संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
    आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।

    फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।।
    त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।

    उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।।
    वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।

    कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।।
    वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।

    आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।।
    शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।

    भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।।
    बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।

    कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।।
    नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।

    ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।।
    पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • झोपडी ते टॉवर

    माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर
    अन्‍ वाढली आता माझी पॉवर...
    लिफ्टने आता मी होणार लिफ्ट
    गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट...
    टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश
    इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश...
    चुरगळले कपडे आता होणार हद्दपार
    सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार...
    एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर
    मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर...
    मुंबई होणार आता झोपडी मुक्त
    उरलेल्या मराठी माणसाला करून फस्त...

    © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)

  • काळ

    गेले ज्यांचे जीव तडफडून
    कशी होईल याची भरपाई
    जीव जपला जो जीव लावून
    गेला निघून तो ऑक्सिजनपाई

    किती होणार अशा दुर्दैवी घटना
    कधी थांबणार मृत्यूचे तांडव
    कुठे गेली मुले आटवून पाना
    तर इथे सर्वत्र गळती आसवं

    दुःख झेलण्या मजबूत माती
    विसरण्या सारे खुले आकाश
    दूर राहिली ती नाती गोती
    दिवस व रात्र झाले भकास

    वेळ कोणावर नको यायला
    आता कंपते सारे शरीर
    काळानेच जर घातला घाला
    तर मग कुठे मिळेल आधार

    रा. ना. जाधव, परळी वैजनाथ

  • एका निवांत समयी

     

  • ओंकारस्वरूप

    तनमन हृदयी एकची ब्रह्माण्डनायक

  • त्या काजळ रात्री

    त्या काजळ रात्री
    पाऊस बरसत होता,
    घन व्याकुळ मी अशी
    श्वास तो कोंडत होता..
    आरक्त डोळ्यांत अश्रूंचा
    बांध आल्हाद साचला होता,
    पापणी आड अश्रूंचा थेंब
    मिटून हलकेच डोळ्यांत होता..
    कळले होते मला अंतिम
    श्वास माझे त्या वळणावरी,
    जाणार हा देह सोडून
    लांब दूर जग हे सोडुनी..
    परी मन तयार न होते
    त्या अंतिम कातर क्षणी,
    देव देतो जन्म अन मृत्यू
    ऋणानुबंध असतात उरुनी..
    किती आठवणीत जीव
    व्याकुळ भावुक होतो,
    जाणारा अचानक जातो
    जीव दुःखात हलकेच बुडतो..
    जगरहाटी ही न चुकली
    कुणाला जन्माला येउनी,
    मरणं आहे अंतिम खरे
    सत्य न चुकले कुणाला कधी..
    मरणं वाटेवर ह्या असेल
    मी ही अनामिक उभी,
    कधी जाईल जीव क्षणात माझा
    उरतील माघारी शब्दांची कहाणी..
    ध्यास असतो शब्दांचा
    कवी असतो काव्य जगुनी,
    जन्म मरणाच्या फेऱ्यात या
    काव्य राहते ओळख कवीची..
    -- स्वाती ठोंबरे.