बागेतील तारका –
आनंद मोजता येत नाही
जवळ असलेल्या नोटांमध्ये
श्रीमंती मोजता येत नाही
आलिशान फ्लॅटच्या भव्यतेमध्ये
किती ही पैसा असला
तरी तो कमीच भासतो
दुसऱ्याचा महाल बघून
आपला फ्लॅट छोटा वाटतो
दुःख भोगल्यावर कळतं
की सुख काय असतं
दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की कळतं
आपण खरं तर किती श्रीमंत असतो
-- दिप्ती गोगटे
हिशोबाची वही घेवूनी बसलो, हिशोब करण्यासाठीं ।
जमाखार्च तो करित होतो, जीवनाच्या सरत्या काठीं ।।
घोड दौड ती चालूं असतां, सुख दु:खानी भरले क्षण ।
प्रसंग कांहीं असेही गेले, सदैव त्याची राही आठवण ।।
कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता ।
उपयोग नव्हता त्याचा कांहीं, जग सोडूनी देह जाता ।।
कधी काळचा निवांतपणा, घालविला दुजाच्या सेवेत ।
पुण्य राहिले शिल्लकीमध्ये, वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर
अन् वाढली आता माझी पॉवर...
लिफ्टने आता मी होणार लिफ्ट
गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट...
टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश
इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश...
चुरगळले कपडे आता होणार हद्दपार
सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार...
एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर
मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर...
मुंबई होणार आता झोपडी मुक्त
उरलेल्या मराठी माणसाला करून फस्त...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
गेले ज्यांचे जीव तडफडून
कशी होईल याची भरपाई
जीव जपला जो जीव लावून
गेला निघून तो ऑक्सिजनपाई
किती होणार अशा दुर्दैवी घटना
कधी थांबणार मृत्यूचे तांडव
कुठे गेली मुले आटवून पाना
तर इथे सर्वत्र गळती आसवं
दुःख झेलण्या मजबूत माती
विसरण्या सारे खुले आकाश
दूर राहिली ती नाती गोती
दिवस व रात्र झाले भकास
वेळ कोणावर नको यायला
आता कंपते सारे शरीर
काळानेच जर घातला घाला
तर मग कुठे मिळेल आधार
रा. ना. जाधव, परळी वैजनाथ
तनमन हृदयी एकची ब्रह्माण्डनायक
Copyright © 2025 | Marathisrushti