जगण्यात रोज मरतो
मरण्यास खास जगतो..
साधून संधि मीही
मनसोक्त येथ चरतो ..
उत्कर्ष का कुणाचा
पाहून आत जळतो ..
खड्ड्यात तोहि पडता
का मी हळूच हसतो..
अपघात दूर दिसता
मागे खुशाल पळतो..
-- विजयकुमार देशपांडे, सोलापूर
9011667127
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
सासरे पाव्हणं आलेत ग बाई
सासर्यांनी काय आणलंय ग बाई
सासर्यांनी आणली मिठाई
मिठाई मी खात नाही
सांगा मी येत नाही
दाराचं लॅच लावा ग बाई
गेटच्या वॉचमनला सांगा ग बाई ।।१।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
सासुबाई पाव्हण्या आल्यात ग बाई
सासुबाईंनी काय आणलंय ग बाई
सासुबाईंनी आणलीय पैठणी, पैठणी
साड्या मी नेसत नाही
सांगा मी येत नाही... दाराचं.... ।।२।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
नणंद पाहुणी आली ग बाई
नणंदेनं काय आणलंय ग बाई
नणंदेनं आणलंय रुचिरा ग बाई
स्वयंपाक मी करत नाही
सांगा मी येत नाही... दाराचं.... ।।३।।
सासरच्या वाटे गुलाब भेटे
कोण पाव्हणं आलंय ग बाई
हिरो पाहुणे आलेत ग बाई
त्यांनी काय आणलंय ग बाई
त्यांनी आणलेयं सुमो ग बाई
सुमोत मी बसते
सांगा मी निघते
पटकन् दार उघडा ग बाई
फ्रिजमधून कोल्डड्रिंक काढा ग बाई
तिचं मा़झं प्रेमप्रकरण जेव्हा
तिच्या घरी माहित पडलं
बोलणं भेटणं बंद करून तिनं
मला एक पत्र धाडलं..!!
दारात उभा राहून तिच्या मी
म्हणालो तिला चल राणी येशील का
आठ दिवसांची मुदत मिळालीय
खरंच सांग मला नेशील का...!!
एका विवाहमंडळात डायरीतली
तारीख पाहून मुहुर्त ठरला..
नातेवाईक दोघांचेही नव्हते म्हणून
मामाचा मळवट भटजीनेच भरला..!!
हळद नव्हती मेंदी नव्हती
पाचशेचा शालू शंभराचा चूडा..
जून्या ड्रेसवर मी मुंडावळ्या बांधून
तिथेच उरकला साखरपुडा...!!
दोन चार मित्र मैत्रिणी तिच्या
दोन-चार माझ्याही होत्या..
वरात अशी जंगी निघाली..
करवल्या मात्र कुठेच नव्हत्या...!!
थम्पस्अप आणि वेफर्सची
पंगत शेवटी बसली होती..
पेढ्याचा घास घेऊन डोळे पुसता पुसता
ती माझ्यासाठी हसली होती...!!
..... राजेश जगताप..
मुंबई ९८२१४३५१२९
उंचावून झेप, नको घेवू उडी
खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१
अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम
यश येई तुला, तया मध्यें ठाम...२
अनुमान काढ, आपल्या शक्तीचे
झेपेल कां ते, विचार युक्तीचे...३
निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी
निराश न होई, त्यामध्ये कुणी....४
जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता
यश असे पाठी, ज्याची जी योग्यता...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मन कुठे असत, कस ते दिसत
कधी कळलच नाही कुणा,
मात्र पावलोपावली जाणवतात,
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा !
मन इतक मोठ,
कि आभाळ त्यात माईना,
मनाच्या गाभार्यांत
अगणित भावना !
कडू-गोड आठवणींचा,
मन एक खजिना,
भावनांच्या प्रतिमेचा
तो सुंदर आईना !
चिंता-भिती-संशयाचा
मनी सतत पिंगा
भल्याबुर्या विचारांचा
तिथे भारी दंगा !
मन जस कांही
एखाद हटवादी पोर
हटकायला जाव तर
होत बंडखोर !
पण मन म्हणजे ईश्वर
मन म्हणजे मैतर
मन म्हणजे गुरु
मनांतल्या मनांत सार्यांना स्मरु !
-- सौ.अलका वढावकर
अनेक ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी शेवटी शेतकरीच नागविला जातो. त्याला कारण शेतकर्यांमध्ये एकी नाही, दूरदृष्टी नाही, हिंमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बोंबा मारण्याची शक्ती नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला तर सरकारला शेवटी झुकावेच लागेल. उत्तरप्रदेशातील शेतकर्यांनी केंद्र सरकारला भूसंपादनचा नवा कायदा तयार करण्यास भाग पाडले ते आपल्या संघटीत आंदोलनाच्या जोरावरच; किमान त्यापासून तरी इकडच्या शेतकर्यांनी धडा घ्यावा!
संथ निळेशार पाणी
लाट खोल उसळली...
जीव रंगला तुझ्यात
ओढ अशीही लागली...
थेंब थेंब बरसला
घन ओथंबून आज...
शहारली काया पुन्हा
सागराची आर्त गाज..
देह तुझाच राहिला
मनोमनी दाटे हर्ष..
किरणांची सोनछाया
जाणवितो तुझा स्पर्श..
मनामध्ये उतरावी
छाया आठवांची दाट...
बरसून मेघ आला
पुन्हा पाहण्यास वाट..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।
पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।
दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले.
Copyright © 2025 | Marathisrushti