नाव-तारीख घालून माझ्या सहीचा चेक तिला दिला,
तेव्हा रकमेची मोकळी चौकट पाहून तिला झालेला
विस्मय सारायला मी म्हंटलं , "शाई संपली,
तू घालून घेशील रक्कम...?!"
मान झुकवत उमललेले मंद स्मित
लपवताना ती "हो" म्हणाली खरी , पण ते पेन
पारदर्शक होतं आणि शाई अर्ध्याहून जरा जास्तंच....!
आठवड्याभरात रुपयाची डेबिट एन्ट्री....तिच्या नावाने....
माझ्या रुपयातले लाखमोलाचे सोळा सच्चे आणे वेचून गेली...
एकाच्या उजवीकडे पाच शून्य घालताना
बहुधा तिच्याही पेनातली शाई संपली असावी.....!!
- रोहित
एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,--!!!
सोडून आले आहे मी सगळे,
आपल्यात घडलेले सारे,
माझे तुझे सारे किस्से,
खरंच मी सोडून आले,
रडले डोळे माझे,
अगदी हमसाहमशी,
तुझ्याच फक्त घरापाशी,
सोडून आले सगळे,
रुसणं, रागावणं, मनवणं
मुद्दाम जिद्दीने भेटणं,
अशा कित्येक स्मृती,
सोडून आले तुझ्या दाराशी,-!!!
एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले,
अशा सगळ्या रात्री,
सोडल्या तुझ्या दाराशी, --!!!!
अगदी अगदी बेवारशी,
जिथे सुखाचे आभाळ,
येऊन सामावत होते,
तिथे त्याला पेलणारे ,
हातच मी सोडून आले,
तुझ्या दाराशी बेवांरशी,---!!!!
त्यात काही विजाही,
येऊन भेटायच्या मला,
त्यावेळी होणारी सुखाची बरसात, सोडून आले मी तुझ्या दाराशी,--!!
मिलनाच्या वाटेवरच,
विरहाचे होते चटके,
एका अनामिक भितीने,
आसुसलेपण त्या प्रेमातले,
सोडून आले तुझ्या दाराशी,--!!!
तुझ्या दाराशी,---!!!!!
हिमगौरी कर्वे.©
ऊर्जा शोषत असतां पाणी
उकलन बिंदूवर येते
पाण्याचे रुप बदलूनी
बाष्प त्यांतून निघूं लागते
एक सिमा असे निसर्गाची
स्थित्यंतर जेव्हां घडते
एक स्थीति जावून पूर्ण
दुजामध्ये ती मिळून जाते
तपोबलाची ऊर्जा देखील
प्रभूमय ते सारे करिते
परमबिंदूचा क्षण येतां
साक्षात्कार तुम्हां घडविते
तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं
ईश्वरमय होऊन जाता
सारे परि ते तेव्हांच घडते
परम बींदूला जेव्हां पोहंचता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चकित झाले गोकूळवासी
बघून बाललीला
सांगा कोण आहे तरी कृष्ण ?
विचारी यशोदेला ।।१।।
प्रासादातील मोदक खातां
तोंड ते उघडले
मुखामध्ये मोदक नसूनी
ब्रह्मांड ते दिसले ।।२।।
उच्छाद मांडूनी कालीयाने
पाणी केले दुषित
मर्दन करण्यासाठीं त्याचे
उडी टाकी डोहात ।।३।।
पूतना असूनी राक्षसिण
स्तनांत होते विष
स्तनपान करुनी त्यानें
तीला केले कासाविस ।।४।।
खोड्या बघूनी यशोदेनें
उखळाला बांधले
उखळासहीत झाडे पाडूनी
चकीत त्यानीं केले ।।५।।
अनेक अशा लीला करुनी
अचंब्यात पाडले
बालमुर्ति तो ईश असूनी
सर्वांस गुंगविले ।।६।।
डॉ. बगवान नागापूरकर
९००४०७९८५०
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
जात हा शब्द, संस्कृत जन..जा..म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. त्यापासूनच. जन, जनता, जनक, जननी, पूर्वज, वंशज वगैरे शब्द आलेले आहेत.
निसर्गावर प्रेम केले तर तो सर्व देतो, निसर्ग हा देवासमान मनाला पाहिजे.
प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं
प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं !
प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं
प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं !
प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं
प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं !
प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं
प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग गिळणं असतं !
प्रेम म्हणजे अापल्या भावना अंतापर्यंत पाळणं असतं
प्रेम म्हणजे स्मितातून नेमका विशाद गाळणं असतं !
प्रेम म्हणजे अावडतीला परकी , पण सुखी पहाणं असतं
प्रेम म्हणजे मिळालेल्या माणसाची अावड जपणं असतं !
प्रेम म्हणजे मधुबालाचं निर्व्याज हसणं असतं
अाणि.....
प्रेम म्हणजे बायकोच अापली मधुबाला हे असणं असतं !
कवी : उदय गंगाधर सप्रेम
ठाणे
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेली कविता साभार प्रकाशित
भाळी नसता कुंकंम तुझ्या गे
विरचक्र हे हातीं आले
मरणोत्तर हा किताब मळतां
मन तुझे कां गहिवरले ?
शुर विराची अर्धांगिनी तू
युद्धभूमिवर त्यास धाडीले
ओवाळूनी निरोप देतां
मन तुझे कां गहिवरले ?
देश सेवेत कामी यावे
ब्रिद त्याचे मनी ठसविले
सांगत असतां हेच दुजांना
मन तुझे कां गहिवरले ?
सुर्वणाक्षरीं वाचून गाथा
आदर्शमार्गी पडतील पाऊले
तव रक्ताचे नाते उसळतां
मन तुझे कां गहिवरले ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti