किती पाहुणे उडून येती,
या देशातून त्या देशात,
स्थलांतर त्यांचे असे पाहुनी,
चकित होतो आपण मनात,--!!
हजारोंची संख्या त्यांची,
एकरंगी नि एकढंगी,
सारखेच सगळे दिसती,
सारख्याच त्यांच्या ढबी,--!!!
आभाळातून उडताना,
बहुतेकांना ना थकवा,
हे पाहुणे असती वेगळे,--
वेळेवरती-- आपुल्या गावा,--!!!
आगळेपण त्यांचे उठून दिसे,--!!!
किती पिढ्या गेल्या तरी,
हजारो वर्षे येती ते,
दरवर्षी परिपाठ असे,--
मार्ग त्यांना कसे सापडती,
कोण दिशादर्शक म्हणे,? --!!!
कोण त्यांना घड्याळ दाखवी,
नि कोण त्यांचे मार्गदर्शक,
ऋतू त्यांना कसे समजती,
कसे ठेवती दिवसांचा हिशोब,--?
सामान कुठले ना बरोबर,
ना कुठले साहित्य सवे, आत्मविश्वास केवळ घेऊन ,
प्रवास आपुला करती बरवे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी
काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या कुणीतरी....१
शून्यामधले कितीकजण, शून्यची सारे अवतीभवती
परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती....२
आज हवे त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती
सहानुभूतीचा शब्द, निर्माण करील सहनशक्ति....३
क्षीण होता दृष्टी, दिसेल कां धडपड
श्रवणदोष येण्यापूर्वी, ऐकून घे दु:खी ओरड...४
चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू
संगे जावून जाण त्यांचा, जगण्यामधला हेतू...५
जेव्हां असशील विंवचनेत, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती
कोण जगतो कसा काय , जाणून घेण्या सवड कुणा ती...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली
चित्र बघूनी नाचे मन जे
पाषाणा परी स्थिर कां झाले....१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरीता पाणी
पाण्यावरती दिसे तरंग
हलके हलके भिजवी अंग
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले....२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा
अंतर्मनही माझे आपले
लुटीत असे जो सुखद मेवा
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले...३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मी अजूनही तुझ्याच आठवात दंगतो
बेजार, प्रीतभावनांनाही कुरवाळीतो
मिटलेल्या पापणीतही अस्तित्व तुझे
तरीही लोभस चराचरी तुला शोधितो
गुलाब, जाईजुई, बकुळ, मोगरा चाफा
तुझ्याच स्मृतीतुनी,अजूनही दरवळतो
सृष्टीत साऱ्या हिरवळलेले चैतन्य तुझे
पाहता, भावनांचा बहार उमाळून येतो
अवखळ निर्झर,तुझ्या ओल्या स्मृतींचा
माझ्याच भाबड्या अंतरातुनी पाझरतो
आज सामोरी झाकोळलेले हे तारांगण
तरीही, मी तुझ्याच आठवासंगे जगतो
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १८.
१७ - १ - २०२२.
मराठवाडा – बीड परिसरात गत आठ-दहा वर्षानंतरच्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी निसर्गाने पुढाकार घेतला. ही रचना त्या रचनाकर्त्यास, निसर्गास अर्पण ….
पाऊस कधी मला समजलाच नाही.
किचकीचणाऱ्या डबक्यात,
मिचमीचणाऱ्या दिव्यात
कडाडणाऱ्या ढगात
कसला आलाय रोमांच.
पण
झुलणाऱ्या पानांत
मातीच्या तहानलेल्या सुवासात
निरागस टपोऱ्या थेंबांत
पाऊस कधी मी बघितलाच नाही.
आणि जेव्हा उधळली बरसात
गहिऱ्या प्रेमात
अबोल स्पर्शात
मनातल्या वादळात
गच्च डोळ्यांत,
पाऊस तेवढा चांगला पुन्हा कधी मला समजलाच नाही.
-- कल्याणी
हात जेव्हां हे जळाया लागले
रंग दुनियेचे कळाया लागले .
ठाकतां संकट, पळाल्या वल्गना
पायही मागे पळाया लागले .
जग दगा देताच, देती नयनही
रोखलें, तरिही गळाया लागले .
पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें
येथलें येथें फळाया लागलें .
शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना
आंतुनी पण मन मळाया लागलें .
पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी
बावळे आंधळे, दळाया लागले .
संधिसाधू भरत भरपूरच खिसे
बघुन तृषितां मळमळाया लागलें .
मिट्ट रजनी, मोजके अंधुक दिवे
हाय ! तेही काजळाया लागले .
-- सुभाष स. नाईक
सांताक्रुझ, मुंबई.
फोन : 022-26105365.
मोबाईल : 9869002126.
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti