(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चंद्रडाग

    हे शशिधरा तूं प्रेमळ सखा साऱ्या विश्वाचा

    सौंदर्याचे प्रतिक असूनी राजा तूं नभाचा

    लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी काजळ लावी तुला

    काही वेडे त्यास समजती तू डागाळला

    डाग कसला तुम्ही मानतां प्रेमामध्ये तो

    दोन मनांतील पवित्र नाते हे आम्हीं विसरतो

    समजूं शकतो नीती बंधन समाज रचनेचे

    बळजबरीच्या कृत्यास तुम्ही म्हणावे पापाचे

    गुरू पत्नीशीं प्रेम करिता लौकिक गेला तो

    दोघांची साथ ती मिळतां गुन्हा कसा होतो ?

    एक दिशेने प्रेम साधतां अर्धवट राही

    दोघांमधली मनाची ओढ ती समाधान देई

    'नीती मार्गे' कुणी म्हणतील चंद्रकृत्य चुकले

    प्रेमाच्या परि अथांग सागरी तळांत ते बुडाले

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • रसिक श्रेष्ठ

    कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि

    जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी

    भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं

    भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी

    भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा

    परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा

    शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक

    कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी जुळवणूक

    कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे

    खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • क्षण सोन्याचा

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..

  • तन्मयतेत आनंद – प्रभू

    सतत गुंतलो आहो सारे

    शोध घेण्यास त्या 'आनंदाला'

    युगानूयुगे प्रयत्न होतो

    मिळवण्यासाठींच प्रभूला...१

    बाह्य जगाचे सुख आगळे

    लागले सारे त्याच्या पाठीं

    'देह सुख' अंतीम वाटे,

    खरा 'आनंद' देण्यापोटी...२

    'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'

    समजूत झाली ही कांहींना

    लेखक, कवी, साहीत्यिक हे

    पाठ त्याची कांहीं सोडीना...३,

    साधू संत हे थोर महात्मे

    आनंद शोधूती 'विश्रमांत'

    'ध्यान' लावून एक मनानें

    शांत होवूनी डूबती त्यांत...४,

    आनंदची 'मोक्ष' असून

    ध्येय साऱ्यांचे त्याजकडे

    मार्ग सर्वांचे वेगळे असून

    'तन्मयता' खेची प्रभूकडे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • रडणे

    रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते
    कारण प्रत्येक वेळी मी शस्त्र उचलू शकत नव्हतो,
    रडणे या साठी सुद्धा आवश्यक होते
    कारण प्रत्येक वेळी क्रांति होणार नव्हती,
    ****
    रडणे ऐकले की
    मन निश्चिन्त झाले
    प्रसव वेदनेने थकलेल्या शरीरात,
    रडणे ऐकले की
    चूल सारवताना बाळणअंतीच्या
    छातीतून दूध पाझरले
    ******
    रडणे असते साक्षी
    संयोग-वियोग
    जीवन-मरण
    मान-अपमान
    दुःख-सुख
    ग्लानि-पश्चाताप
    करुणा-क्षमा
    व्यष्टि-समष्टि
    प्रारब्ध आणि अंत या साठी
    ******
    रडले की
    नदी बनते पुण्यसलिला
    आकाश बनते दयानिधि
    मेघ बनतात अमृत
    पृथ्वी बनते उर्वरा
    वृक्षा वर उतरते नवे जीवन
    फुलाना मिळतात नवे रंग

    *****

    रडणे विसरले की
    पत्थर बनतात
    मनुष्य हृदय,
    ती भरली जातात काळोखाने
    हिंसा पेटून उठते
    सर्वत्र उठतात चीत्कार
    थर थर कापते सृष्टि

    *****

    रडणे असले की
    जीवन असते स्निग्ध
    देत राहते धाडस
    उगवते साहस
    रुजवले जाते अंकुर क्षमाशीलतेचे
    इतिहासाने जरी बनवले राजे महाराजे
    तरी ते प्रेताच्या
    ठिगारावर अश्रु ढाळतात
    *******

    स्त्री ला सांगितलेल्या कल्पित मिथकात
    ती कथा सर्वात करुण आहे
    ज्या मध्ये तिच्या रडन्याने
    अश्रु बनतात मोती
    आज पर्यंत ती माळ गुम्फुन स्त्री मिरवत आहे
    पुरुष ती 'नकली आहे ' सांगत
    त्या माळीची इच्छा बाळगत आहे

    ****
    रडणे आहे
    सर्वांत सुंदर रचना
    आपल्या अश्रुनी धुतली जातात
    आपला आत्मा

    रडणे
    या साठी आवश्यक आहे की
    मरण्याची इच्छा
    अनेक तुकडयात जगत राहते

    ****

    (मूळ हिंदी कविता 'रोना' - उपासना झा)
    मराठी अनुवाद- विजय नगरकर

  • शिकवण समुद्राची

    समुद्राने मला एक गोष्ट शिकवली,
    काही लाटा जवळ येतात फक्त दूर जाण्यासाठी.

    किनाऱ्यावर अलगद स्पर्श करून,
    आठवणींचे शिंपले मनात ठेवण्यासाठी.

    त्या येतात जणू कायमच्या सोबतीला,
    स्वप्नांच्या वाळूत नावे कोरण्यासाठी.
    पण भरती ओसरून गेल्यावर कळते,
    त्या होत्या फक्त निरोप देण्यासाठी.

    समुद्र मात्र शांत उभा असतो,
    विरहाचे गूढ अलगद उलगडण्यासाठी.
    कारण प्रत्येक भेट ही मुक्काम नसते,
    काही नाती असतात फक्त शिकवण देण्यासाठी.

    म्हणून आता लाटांवर राग नाही,
    त्यांच्या जाण्याची खंतही नाही.
    त्या आल्या, मनाला स्पर्शून गेल्या,
    आणि मला स्वतःलाच भेटायला शिकवून गेल्या.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • सदृढ शरिरी चिंतन

    योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची
    अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची

    जोम असतां शरिरीं तुमच्या, करिता देहासाठीं
    वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, प्रभू चिंतना पोटीं

    गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां
    एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां

    दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें
    त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा प्रभूचे मार्गे

    सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त
    मिळणाऱ्या त्या ऊर्जेला तुम्हीं, खर्च करा चिंतनांत

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • विनम्रता

    लीन दीन ती होऊन पुढती,
    झुकली होती त्यावेळी ।
    हात पुढे आणि नजर खालती,
    ज्यांत दिसे करूणा सगळी ।।१।।

    लाचार बनूनी पोटासाठी,
    हिंडे वणवण उन्हांत सारी ।
    वादळ वारा आणिक पाऊस,
    संगत घेवून फिरे बिचारी ।।२।।

    मदतीचा हात दिसे,
    जागृत होता भूतदया ।
    जनसामान्यात असती
    मानवतेतील ही माया ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • प्राण ज्योत

    दिवा होता छोटासा, एक मजकडे ।

    इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे ।।

    तळांत होती योजना, तेल सांठवण्याची ।

    शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची ।।

    छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन ।

    मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी ।।

    देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे ।

    प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे ।।

    केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं ।

    व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ।।

    ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं ।

    तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०