नियोजनाच्या लागून मागें,
भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून,
चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती,
भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता,
जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते,
वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां,
मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता,
यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड,
साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गौरी, अभाव्या अहंकारा, अग्निज्वाला.. अनेकशस्त्रहस्ता ईतकी सामर्थ्यशाली असूनही दक्षाच्या अपमानामुळे यज्ञकुंडात समिधे सारखी जळत..राहीली.. उमा-पार्वती ..तीचा उद्वेग कवितेतून मांडायचा प्रयत्न मी केलाय .. मागच्या वर्षी केलेली कविता थोडी वाढवली आहे .. चंद्रचूडासाठी पुन्हा गौरी, अपर्णा
दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता ।
तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता ।। १
शुश्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा ।
शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।। २
पाझर फुटण्या प्रेमाचा , भाव लागती एक वटूनी ।
उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी ।। ३
दया प्रेम या भावांमध्ये, दडला आहे ईश्वर तो ।
मनांत येता हेच भाव , दर्शन त्याचे घडवूनी जातो ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।
पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी...१
शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी
शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
विवंचना ती पैशाची, विसरे शरिर सौख्यापरि....२
शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी
ज्ञानीजन ते असती, अगाध त्यांची मति
टीका करित राहूनी, विसरती ते अडचणी
परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी....३
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
मी बसलोही
क्षीण तुझा कर करीं घेउनी
सुखावलोही .
नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
काय व्हायचें होतें
‘उद्या’च येथुन कायमचें तुज
दूर ज़ायचें होतें.
- सुभाष स. नाईक
किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये,
वाट पाहताना जीव थकला,
मन चिंतातूर आतमध्ये,---
सारखे हे काळीज उले,
चंद्र उगवे हा डोईवरी,---
का सवतीने वाट अडवली,
मोहात पाडत तुला सत्वरी,--!!!
कितीक दिन होऊन गेले,
ना निरोप कसला संदेश,
तू गेल्यावर भोवताली,
वाटे हा परकाच प्रदेश ,--!!!
भोवती आहेत नाती सारी,
आवडते ही मज सासुरवाडी,
राम नाही पण त्यात कुठला ,
एकली भासते मी संसारी,--!!!
रामरगाडा अवती असता,
सांगाया कोणास जावे ,
दुःख तुझ्या विरहाचे रे,
कोणापाशी मोकळे बोलावे,--!!!
आता येईल जीवा बेचैनी,
कसे त्यास रमवावे,
डोळे लावून बसू किती,
दूर तू त्या परागणी,--!!!
नसते तुला कधीच चिंता,
घरच्या आपल्या माणसांची,
ते सगळे मात्र जीव टाकती,
कशी तुझी बेपर्वा वृत्ती,--!!!
मनमोर माझा नाचेल खरा,
जेव्हा कधी येशील तू ,--
इतरांसाठी असेल ग्रीष्म, माझ्यासाठी फुलेल ऋतू --!!!
हिमगौरी कर्वे.©
हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो,स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या,
गोऱ्या रंगावरी आमुच्या,
जनहो नका हो भाळू,
टपोरेआकार पाहुनी,
मोहून नका हो हाताळू,
कौमार्य फुलते आमचे,
दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद,
मगच उमलेल फूल हे सुंदर ,
येईल मोगऱ्याला बहर,
स्पर्श न करता नेत्रसुख घेता,
घ्या हो आमुचा आस्वाद,
किती थोडे आमचे जीवन,--
बघता बघता येते मरण,--!!
फुलून कोमेजणे केवळ,
एवढेच काम या धरतीवर,
अशा अल्प जीवनात,
भरून राहतो सुगंधात,
आमचा असून वाटतो,
येईल त्याला या जगात,
स्त्रीच्या लाडके आम्ही ,
नका पुरुष हो इतके जळू*,
आमच्या सुगंधेभारुन, त्याही प्रेम लागतील करू,--
फुले मोगऱ्याची देऊनी,
आपल्या प्रेमा पटवती,-!
असे मिलन घडवतो,
अहो,भाग्यवानकिती,?
हिमगौरी कर्वे.©
जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं
विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।।
बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना
देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।।
काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती
परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।।
प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी
पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti