(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अजाणतेतील अपमान

    स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।

    चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।

    कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।

    कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।

    पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।

    काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।

    फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।

    विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।

    अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।

    नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।

    चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।

    शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।

    खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून

    निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।

    पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।

    शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।

    अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।

    प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • भरताचा जाब

    ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
    कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।

    आम्ही बंधू चौघेजण,
    झालो एका पिंडातून,
    कसा येईल भाव परका ?
    असतां एकची जीव, चार शरीरीं
    कैकयीला भरत विचारी ।।१।।

    वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
    आदर्श जीवन रघूवंशाचे,
    कसली शंका मनांत होती ?
    पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
    कैकयीला भरत विचारी ।।२।।

    सर्व जणांचे प्राण होता,
    जगणे कठीण झाले आतां,
    रोष कशाला घेसी त्याचे,
    अकारण ते आपल्या शिरावरी ?
    कैकयीला भरत विचारी ।।३।।

    --डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • क्षण मुक्तीचा

    तपसाधना करूनी मिळवी,
    सत्वगुणाची शक्ती अंगी ।
    त्याच शक्तीच्या जोरावरती,
    स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।।

    शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,
    सारे सुख आणि भोग भोंवतीं ।
    परिणामी तो फेकला जाऊनी,
    पुनरपी येई याच भूवरती ।।

    एक दया दाखवी ईश्वर,
    वातावरणी देऊनी संधी ।
    जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,
    कमविले पुण्य ज्याने आधी ।।

    चक्र खेळ हा चाले सदैव,
    स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा ।
    अंतिम ध्येय तेच ठरते,
    मिळविणे क्षण तो मुक्तीचा ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • स्वच्छन्द

    चला तोडूया या कोषाला
    मुक्त करूया सुरवंटाला
    अंतरंगातुन घेऊ उर्मी
    उडुदे स्वच्छन्द फुलपाखराला
    होऊ सोबती मीच मजला
    नकोशी गर्दी हवी कशाला
    एकले आपण येती जाती
    कशास क्षणिक कुणी धुंडाळा
    ठेऊन साक्षी परमात्म्याला
    सोड भार वाही चरणाला
    पंखा कुठे रे चिंता उद्याची
    घास चोची देई चाऱ्याला
    नको गाठोडी भविष्याला
    गाठ बसे, सुटेना जीवाला
    तू मी सारे येरझारे प्रवासी
    सुखे जगू दे या आत्म्याला!!
    -- वर्षा कदम.
  • इये मुंबईचिये नगरी .. मध्यरंग (सन – १९९५)

    मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा हा मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला.व्यवस्थापन सल्लागार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. त्यांचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात.

  • उपचार सारे

    हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही
    नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही

    गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही
    भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही

    विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही
    बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही

    शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही
    विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही.

    आण्यांचे व्यवहार सारे त्यात मनाचा व्यापार नाही
    सगळे केवळ उपचार त्यात जीवनाचे सार नाही

    संपन्नतेचे पेटारे मुबलक त्यात समाधानाची चादर नाही
    आपुलकीच्या शोधात फिरणाऱ्या अंतरात्म्याचा आदर नाही

    - यतीन सामंत

  • वठलेल्या वडाला मोह

    वठलेल्या वडाला मोह
    आम्रतरुचा झाला आहे
    काष्ठवत फांद्यांवर पर्ण
    पिसारा फुलून आहे..
    मनातील सारे न कळून आहे
    प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे
    दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे
    वठलेला वड आज फकीर आहे..
    न कळत्या दुःखाना वेदनेची
    अस्पष्ट करुण किनार आहे
    मरणाची वाट जवळ येईल कधीही
    अंतरात दुःख विरजून अनामिक आहे..
    आम्रतरुचा झोका मदमस्त
    एकाकी वड उन्मळून आहे
    मोहाच्या मिठीत अलगद
    पालापाचोळा मन व्यथित आहे..
    सांज गूढ सावल्यांना
    क्षितिजाची आस आहे
    न कळत्या मनातला मोहर
    का पुन्हा एकाकी दुःखी आहे..
    दूर कुठे गातो फकीर गाणे
    बोल त्याचे अंतरी ठाव आहे
    सगळेच अर्थ न उलगडतात
    शब्दांचे खेळ काव्यांत बहरुन आहे..
    मोहरल्या आम्रतरुच्या प्रेमात
    वठलेला वड एकांती आहे
    स्वार्थ न कसला गंधाचा तो
    आम्रतरुचा मोह मन फुलून आहे..
    उन्मळून पडेल वड एकाकी
    सावलीत पांथस्थ न कोण आहे
    वडाचे दुःख मिटून हलकेच
    मोहरणाऱ्या आम्रतरुत आहे
    न सोसवतो वारा बेफाम
    न वादळ सोसते आहे
    पर्णाचे दुःख अंतरी आल्हाद
    वेगळे दुःख पाचोळ्याचे आहे..
    प्रत्येक शब्दांचे अर्थ भावार्थ
    वेगवेगळे वेढून काव्यांत आहे
    विस्तीर्ण वडाचे दुःख एकाकी
    मोहरल्या आम्रतरुत अव्यक्त आहे..
    -- स्वाती ठोंबरे.
  • आशिर्वाद

    घक्के देऊन आली धरणीकंप करुन
    भावना मनीं चमकली बनेल ही महान ।।

    बालपणाची मुर्ति गोंडस तुझें भाव
    तेज चेहऱ्यावरती घेती मनाचे ठाव ।।

    शाळेतील जीवन दाखवी मार्ग विजयाचे
    सर्वामध्यें चमकून प्रमाण मिळे यशाचे ।।

    एकाग्रचित्त करुनी मिळवलेस तूं यश
    प्रतिष्ठा टिकवूनी असेच जा सावकाश ।।

    विजे सारखी चमकूनी झेप घे नभांत
    प्रकाशमान होऊनी यशस्वी हो जीवनांत ।।

    एका गोष्टीची जाण असावी तुझ्या मनीं
    मिळण्यास हा मान पाठीराखे आहेत इतर कुणी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू

    ( ही कविता प्राणवायुला समर्पित !)

    इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू ।
    जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।।

    लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे ।
    प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।।

    इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा ।
    जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।।

    एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक ।
    भयसूचक त्या घंटा नीचा आता तरी त्या ऐक ।।

    मरणानंतर सरणासाठी उरली नाहीत झाडे ।
    नरकयातना दिल्या तयांना कशी पेटतील हाडे ?

    -- डॉ .श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
    ९४२३८७५८०६

    ही कविता नावासह सर्वत्र पाठवायलाच हवी !

  • दान दयाघनाचे

    हितगुज तुझिया मनीचे
    मी सारे ओळखून आहे
    छान मधाळ बोलतेस तूं
    मी सारे ओळखून आहे।।

    मी कां? धरु मौन आता
    बावरल्या,काळजात या
    तुझी अव्यक्त भावप्रिती
    मी आज ओळखून आहे।।

    प्रियतमे! नकोस गं लाजु
    प्रीतीच! सार्थक जन्मांचे
    एक अलौकीक सुखानंद
    त्या दयाघनाचे दान आहे।।

    -- विगसातपुते (विगसा)

    9766544908

    रचना क्र २२.