हे घनश्यामा श्रीकृष्णा
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना ।।धृ।।
बोटे फिरवूनी मुरलीवरी
सप्तसुरांची वर्षा करी
सर्वा नाचवी तालावरी
रंगून जाती हे श्रीहरी
बोटांमधली किमया तुझी, नाहीं कळली कुणा ।।१।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
बोटांत बोटे गुंतवी
राधेला तूं नाचवी
गोपींना तूं गुंगवी
गोपांना तू खेळवी
कशी लागते ओढ तुझी, कळले नाही सर्वाना ।।२।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
पर्वत उचलूनी बोटावरी
वष्टी पासूनी रक्षण करी
नाचूं लागूनी गोकूळपुरी
तुझ्या भोवती ताल धरी
वाहूनी नयनांतील झरे, व्यक्त होई प्रेम भावना ।।३।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
प्रसंग पडतां रणीं
सुदर्शन फिरे बोटातूनी
रक्षण करण्या सज्जनीं
आलास तूं धावूनी
शब्द भावना अपुरी पडतां, वाट फुटे अश्रुना ।।४।।
कोणती जादू तुझ्यां हातीं सांग रे मनमोहना
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,
गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,
खेच बसता वाढत गेला, होता गुंता
उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,
दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,
वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,
दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
निसर्ग हा हिरवळलेला
पुण्यस्रोत शुभ्र जलाचा....
दरीदरीतुनी झेपावतो
उंच धबधबा डोंगरीचा....
निळ्यानिळ्या अंबरी
धुसर पांघर धुक्याचा....
रंग कोवळे सप्तरंगले
धुंद सुगंध मृदगंधाचा....
सांजाळल्या सांजवेळी
पापणीत भास तृप्तीचा....
समोर वाहते कृष्णामाई
साक्षात्कार जणू गंगौघाचा....
रचना क्र. ९२
३१/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हल्ली का कोणास जाणे
सभोवताली पडत असतो
पाऊस बातम्यांचा
फक्त आत्महत्येच्या...
त्या बातम्यांचा तर होत
नाही ना परिणाम
रिकाम्या मेंदूवर
त्रासलेल्या माणसांच्या...
समस्या, दुःख, विरह
आणि वेदना कधी नव्हत्या
त्या तर सोबतीच होत्या
युगानुयुगे मानवाच्या...
नात्यातील गुंता भ्रम असतो
आणि प्रेम असते माया
आयुष्यात काहीच नसते
वजनाचे आपल्या जिवाच्या...
© कवी - निलेश बामणे ( ND.)
दिनांक - २ ऑक्टोबर २०२१
क्षणक्षण, आनंदे जगुनी घ्यावे
अजाण,अनभिज्ञ क्षण जीवनी
अशाश्वत,असे भाकीत क्षणांचे
सदैव! सतर्क रहावे या जीवनी।।
भाळीच्या, विधीलिखीत घटना
जे घडणारे, ते सारे घडुनी जाते
विवेकी मानवतेचा तर्क असावा
वास्तवतेला, समजुनी घेता येते।।
भिरभिरे, कालचक्र जन्ममृत्युचे
झाले, गेले, सारे विसरुनी जाते
अलगदी काळ, सावरे दुःखाला
संयमे, सहज जीवन जगता येते।।
निर्मळी! सहवासाच्या सदिछ्या
जीवास, सावरती क्षणाक्षणाला
गतजन्मांचेच,सारे आपुले सुकृत
स्मरावे! सातत्याने अनामिकाला।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३०.
१ - २ - २०२२.
जात असता गाडी मधूनी,
दुर्घटना ती घडली,
अचानकपणे एक दुचाकी,
आम्हा पुढे धडकली ।।१।।
प्रयत्न होऊनी योग्य असे,
थोडक्यात निभावले,
वखवखलेल्या काळालाही,
निराश व्हावे लागले ।।२।।
घिरट्या घालीत काळ आला,
झडप घातली त्याने,
वेळ आली नव्हती म्हणूनी,
बचावलो नशिबाने ।।३।।
अपमान झाला होता त्याचा,
सुडाने तो पेटला,
थोड्याशाच अंतरी जावूनी,
दुजाच बळी घेतला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जाई जुईचं अलगद बहरण
की मंद निशिगंधाच दरवळण,
गुलाबाच टवटवीत होणं की
प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं..
विसरून जा भूतकाळ तो,
नजर ठेवूनी भविष्यावरी,
वर्तमानी राहून प्रवाही,
जीवन सारे यशस्वी करी ।।१।।
व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,
उगाळता गत आठवणी,
खीळ पडेल उत्साहाते,
अपयश आले हे जाणूनी ।।२।।
ज्ञान जगाचे मिळूनी तुला,
जन्म जहाला आजच खरा,
अनुभवी नव बालक तूं,
वाहून नेई जीवन धुरा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti