(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • ममतेतील खंत

    भरल्या ह्रदयी ओल्या नयनी

    निरोप देई देवकी माता

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. //धृ//

    आकाशवाणीने बोले श्रीहरी

    देवकीचे तो येईल उदरी

    संहार करण्या दुष्टजनाचा

    ईश्र्वर अवतरे ह्या जगता //१//

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    रक्षक सारे निद्रिस्त केले

    कारागृहाचे दार उघडले

    मार्ग दिसे वसुदेवाला परि

    प्रभू शक्तीचे दर्शन धडता //२ //

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    उचलून नेई बाल प्रभूला

    नंदाघरी तो ठेवून आला

    चमत्कार तो दिसला नयनी

    खंत कशाला बाळगी आता //३//

    भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • काव्य कलश

    ही दया कुणाची झाली,

    सापडे शब्दांचा झरा,

    उपसतो जरी सतत,

    होत नसे निचरा....१,

    गोड पाणी शब्दांचे,

    ओठी अमृत वाटे,

    पेला भरता काठोकाठ,

    काव्य हृदयी उमटे....२,

    पेला पेला जमवूनी,

    कलश भरून आला,

    नाहून जाता त्यात,

    देह भान विसरला....३,

    सांडता पाणी वाहे,

    पसरते चोहीकडे,

    आस्वाद घेई जो जो,

    विसर जगाचा पडे....४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पुरुषत्व

    रस्त्याने चालताना तिच्या मागून
    ती वार्‍याची झुळूक होऊन
    माझ्या मेंदूत शिरताच
    मला तिच्या सौंदर्याची नशा चढून
    मी ढकलायला लागताच
    मला एक पुरुष सावरतो
    पुरुषी अहंकार नाव असलेला...
    मग शोधू लागतो
    माझ्यातील पुरूष
    तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा
    आणि तिच्या कपडयांवर
    जागोजागी पडलेल्या छिद्रांना
    ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण
    त्याला ह्वे तसे,
    मी तिला कधीच विचारत नाही
    त्या छिद्रांबद्दल
    कारण मला माहीत असतं
    ती छिद्रे माझ्यामुळेच झालेली आहेत...
    कधी – कधी मी माझ्या जीवनातील
    तीच अस्तित्वच नाकारून मोकळा होतो
    मग ती वादळ झाली तरी
    माझ्या मनालाही स्पर्श करीत नाही
    आणि मला माझ्या पुरुषत्वाची
    परीक्षा ही द्यावी लागत नाही...

    -- कवी – निलेश बामणे

  • मैफल

    मी काय कथू जे साहियले ते तुजला?
    डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला
    तुजवाचून सारी मैफल रंगविताना
    अश्रूत भिजवल्या मी कंठातिल ताना
    ऐश्वर्य लेऊनी महाल होता धुंद
    अंगणी ढवळे रातराणीचा गंध
    झुंबरी पेटले दीप, उजळली रात
    वर चंद्रकलेची अमृतमय बरसात
    छेडिली तार मी ... ओठी आली तान
    पायात नूपुरे हरपून गेली भान
    मी ताल सूरांचे धुंद गुंफिले शेले
    परि तुला शोधण्या सुर दिशातून फिरले
    वेदनेवरी त्या रागदारीची शाल
    लेऊन सजविले वादळ हृदयातील
    स्वर भिजून गेला तुला तिथे स्मरताना
    रसिकांनी हासुन डोलविल्या पण माना
    मी काय कथू त्या मुक्या यातना तुजला?
    डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला
    तुजवाचुन सारी मैफल रंगविताना
    अश्रूत भिजविल्या मी कंठातील ताना !

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • सूर्यास्त

    सूर्य चालला अस्ताला

    सगळं चैतन्य बरोबर घेऊन

    प्रकाशही बरोबर घेऊन

    माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ?

    मनापासून शोक सारी माणसं करत असतील का?

    असंच सगळ चैतन्य प्रकाश

    बरोबर घेऊन तो जातो

    पण केवळ आठवणीत मागे उरतो

    मागे उरतो.

    सौ. झेलम संजय टिपणीस

    अलिबाग

  • गझल – नको वागणे आज झाडाप्रमाणे

    *गझल*

    *वृत्त :- भुजंगप्रयात*

    *लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा

    नको वागणे आज झाडाप्रमाणे
    तया लोटते जग कवाडाप्रमाणे

    धनाचेच लोभी ,महाराज काही
    किती वागती ते ,लबाडाप्रमाणे

    सगेसोयरे फार लाडावले तू
    तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे

    तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे
    नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे

    कशाला कुणाशी ,अबोला धरावा
    नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे

    तुला कर्ण कोणी, उगा का म्हणावे
    तुझे दान आहे ,चिपाडाप्रमाणे

    जरा खर्च कर तू ,जगी संयमाने
    जगा भासतो तू ,घबाडाप्रमाणे

    © जयवंत वानखडे,कोरपना

  • मी आणि ती…

    vinod_9

  • मन अथांग सागर

    मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा,
    मन आवर्तनी भोवरा,
    सखोल पाणथळाचा, --||1||

    मन बिंदूंचे अवकाश,
    विस्तीर्ण मन पसरट,
    भावनांचे उठती कल्लोळ,
    अतुल आणि अलोट,--||2||

    मन पाण्याचा डोंगर,
    एकावर एक पार,
    शुभ्रतम* भासे चढ,
    *निळसर पण उतार,--||3||

    मन किरणी प्रभाव,
    झेलत साऱ्या दिनभर,
    सोनेरी कलत, झुकत,
    आभाळ उदंड त्यावर,--||4||

    मन समुद्री वादळ,
    वारे अखंड वाहत,
    जीवाची नौका चालण्या,
    शीड आत्म्याचे उभारत,--||5||

    मन माशांचे घर ,
    कधी गोंडस कधी घातक,
    उत्साही ते खळाळत,
    कल्पना-साम्राज्य पूरक,--||6||

    मन लाटेवरचे उधाण,
    संजीवनी अपार स्त्रोत,
    जीवघेण्या केव्हा तुफानात, नयनातून सागरी बरसात,--||7||

    मन तुला न कळत,
    मन मला न आकळत,
    मन मनुजा न गवसत,
    उलघाल सगळी अंतरात,--||8||

    © हिमगौरी कर्वे

  • गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या जबाबदाऱ्या

    गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ/ व्यवस्थापन समिती/ पदाधिकारी हे गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेले सभासद असतात. सदर व्यवस्थापन समिती सभासद आणि संस्था यांचे विश्वस्त (Trustee) असतात. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने गृहनिर्माण संस्थेला जर काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिक व सामूहिकरीत्या त्या नुकसानीची जबाबदार असतात. सदर लेखात खास आपणासाठी व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय असतात याची माहिती देत आहे.

  • फरक…

    घरट्यातील पिल्लं तोंड वासून वाट बघतात.
    त्या हाका दूर वर असलेल्या पक्ष्यांना ऐकू येतात...

    पखांत बळ आणून वेगाने येतात उडत उडत.
    इवल्याशा चोंचीत एकेक दाणा राहतात घालत घालत..

    मोठी होतात धडपडतात. पडतात उठतात.
    आणि पंखात बळ आले की दूर दूर उडत जातात..

    घरटं होत ओकबोक. पण हे दोघे असतात आनंदात.
    पक्षाला वाटतो अभिमान. कालवाकालव होते मात्र तिच्या काळजात...

    कधी साथीने जगतात कधी एकटेच उरतात..
    त्यांच्याही पंखातील बळ संपत आहे तरीही ते जगत असतात.....

    घरातील मुलंही अशीच आईच्या कुशीत असतात..
    बाबाच्या मेहनती वर लहानाचे मोठे होतात..

    बळ येते त्यांच्या प्रगतीच्या पंखात.
    आत्मविश्वासाने ध्येयाप्रती झेपावतात.

    सगळे असूनही म्हणतात आम्ही झालो निराधार..
    रानातल्या या पक्षांना कुणाचाही नसतो आधार...
    .
    माणसं राहतात मोठ्या सुरक्षित आणि सुखसोयीत.
    म्हणून हाच फरक आहे फक्त घरात आणि घरट्यात...

    सौ कुमुद ढवळेकर