भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लाभला जीवा निखळ मैत्र
सुखावलो सदासर्वकाळ
सुखही होते , दुःखही होते
भोगभोगले प्रारब्धाचे खेळ.....
भाळी पान्हाच मातृत्वाचा
निर्भयी आधार पितृत्वाचा
नव्हती कशाची खंतवेदना
स्पर्श निर्मली सात्विकतेचा....
अंगणीचा सडा संस्कारांचा
मीत्वास , दूर सारित राहिला
नुरली अपपर भावनां अंतरी
बीजांकुर मानवतेचा रुजला....
लागला जन्म सारा सार्थकी
जाणवला साक्षात्कार ईश्वरी
ब्रह्मातची ब्रह्मनाद ब्रह्मानंदी
गीतातुनी स्त्रवली मधुर पावरी....
रचना क्र.
१३१/१/१०/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
( 9766544908 )
जड झाला जीव आता
ओझं सोसवत नाही...
भोग भोगायचे किती आता
देवादारी बसवत नाही...!
जन्म वाया गेला राबण्यात
नाही गाव दुसरं पाहिलं..
भरल्या गोकूळ घराचं
सपान मनात राहिलं..!
वाट एकटा चालला
तिला जोडीला घेतलं..
एक नातं विश्वासाचं
त्याच्या जिवावर बेतलं...!!
.... राजेश जगताप, मुंबई
९८२१४३५१२९.
शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी ।
अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।।१।।
शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास ।
ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।। २।।
पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची ।
शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।।३।।
देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर ।
समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।। ४।।
शोधामध्यें चिंतन करतां, ध्यान परी लागते ।
समाधी स्थितीत येतां प्राण, अनंतात मिसळते ।।५।।
नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे ।
विश्वमंडळ तोच असतां, शोधू तयास कोठे ? ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे,
खिडकी मधूनी वाहे, मंद मंद वारे ।।१।।
तोच अचानक तेथे, चिमणी एक आली,
मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली ।।२।।
जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला,
काय घडले भोवती, कानोसा तो घेतला ।।३।।
माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती,
बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती ।।४।।
मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे,
तगमग देखूनी तिची, कांहीं न कळे ।।५।।
भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती,
‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’ ।।६।।
केविलवाणी बघूनी, भूतदया ही आली,
काय हवे तिजला, या अवचित वेळी ।।७।।
जेंव्हां बसे माळांवरी, ओरड वाढत होती,
हालचालीतील बैचेनी, काही सुचवित होती ।।८।।
आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो,
विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो ।।९।।
धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला,
छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला ।।१०।।
जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य,
चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य ।।११।।
चाहूल माझी लागता, सावध परि झाला,
छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला ।।१२।।
काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी,
घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी ।।१३।।
आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली,
मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली ।।१४।।
भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती,
यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती ।।१५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmai.com
हात जेव्हां हे जळाया लागले
रंग दुनियेचे कळाया लागले .
ठाकतां संकट, पळाल्या वल्गना
पायही मागे पळाया लागले .
जग दगा देताच, देती नयनही
रोखलें, तरिही गळाया लागले .
पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें
येथलें येथें फळाया लागलें .
शुभ्र वसनें, डाग वर इवलाहि ना
आंतुनी पण मन मळाया लागलें .
पीठ खाण्यां सज्ज कुत्रे राजसी
बावळे आंधळे, दळाया लागले .
संधिसाधू भरत भरपूरच खिसे
बघुन तृषितां मळमळाया लागलें .
मिट्ट रजनी, मोजके अंधुक दिवे
हाय ! तेही काजळाया लागले .
-- सुभाष स. नाईक
सांताक्रुझ, मुंबई.
फोन : 022-26105365.
मोबाईल : 9869002126.
विचारांची उठती वादळे ।
अशांत होते चित्त सदा ।।
आवर घालण्या चंचल मना ।
अपयशी झालो अनेकदां ।।
विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।
नदीकांठच्या किनारीं गेलो ।।
वटवृक्षाचे छायेखाली ।
चौरस आसनावरी बसलो ।।
डोळे मिटूनी शांत बसतां ।
अवचित घटना घडली ।।
विचारांतले दुःख जाऊनी ।
आनंदी भावना येऊं लागली ।।
एक साधूजन ध्यान लावीत ।
बसत होता त्या आसनावरी ।।
पावित्र्याची वलये फिरती ।
आसन दिसले रिकामें जरी ।।
वातावरणाची ही किमया ।
अनुभवते प्रखरतेनें ।।
शुद्ध अशुद्ध विचार येती ।
सभोवतालच्या जाणिवेने ।।
डॉ. बगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti