
‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
"मी सुद्धा चुकलो असेन",
एवढं मनात आणा!
धनुष्य मग हातातलं,
जरा संयमानंच ताणा!
बाणच हळू कानात सांगेल,
'ठेव मला भात्यात!
एवढं ऊन, एवढा पाऊस,
असणारच की नात्यात!'
वादा जवळ गप्प बसून,
संवाद करू, मारू गप्पा!
तुटण्या किंवा उसवण्याचा,
येणारच नाही टप्पा!
तेवढाच क्षण टळल्यावर
आकाश होतं साफ!
दंव होऊन गारवा देते,
तीच गरम गरम वाफ!
एक क्षण आवेगाचा,
फुटण्यापुर्वी अडवा!
डोळे सुद्धा राग बोलतात,
पापण्यांमागे दडवा!
थोडी गुदमर, थोडी घुसमट,
उंबरठ्यावर दाटेल!
राख झाली तरी चालेल,
असं वाटेल, ...पटेल!
दिवस रात्र असणारच,
तेव्हा आपण पूर्व बघू!
प्रकाशाचे वारकरीच की!
आपण उगवतीला निघू!
पहिली ठिणगी पडते तेव्हा,
विचार व्हावा पाणी!
मनात सूर जपतो तेव्हाच,
शब्द होतात गाणी!
कधीकधी आठवण्याहून,
विसरण्यातच मजा!
बेरजेपेक्षा कधीकधी ,
जोडून देते वजा!
बाकी उरणं महत्वाचं,
तेवढीच श्री शिल्लक!
कविता असेल साधी,
पण् विचार मात्र तल्लख!
संदीप खरे
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले,
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली,
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली ।
चित्र बघूनी जे मन नाचे,
पाषाणा परी स्थिर कां झाले....१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरिता पाणी,
पाण्यावरती दिसे तरंग,
हलके हलके भिजवी अंग,
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले....२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा,
अंतर्मनही माझे आपले,
लुटीत असे जो सुखद मेवा ।
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले...३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रोज थोडे तरी कार्य
केल्यावाचून राहू नकोस,
ब्रह्यांडनायक पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरु नकोस....
तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही...
पायात पाय घालून पाडवतीलही....
घाबरून त्यांना तू तुझं
उभे राहणं सोडू नकोस..
सद्गुरू पहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही...
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असंही नाही...
तू मात्र इतरांचं कौतुक
करण्यास कधी कचरु नकोस...
सद्गुरु पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुला सुद्धा मन आहे
माहीत आहे सद्गुरूला.....
पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे कमी तुला....
इतरांना भरभरून देणं
मात्र कधी सोडू नकोस ...
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
रडावंसं वाटत तेव्हा
रडून सरळ मोकळा हो...
कार्यासाठी लढावंसं वाटत तेव्हा,
लढून ही मोकळा हो....
रडण्यामध्ये मात्र तुझे
कार्य कधी विसरू नकोस
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
तुझ्या कार्याचे पुरावे
कोणाला द्यायची गरज नाही...
कुणासाठी तुला कार्य
सोडायचीही गरज नाही....
सद्गुरू संकल्पासाठी पुढे
चालणं सोडू नकोस..
सद्गुरू पाहातायेत तुला
गुरूबोध मात्र विसरू नकोस
जगाला कधीच
न पडणारी कोडी
मला पडलीच नसती ...
ती कोडी सोडविण्यात
माझ्या आयुष्याची वर्षे
खर्ची पडलीच नसती...
भूत भविष्य वर्तमानाची भुते
माझ्या मानगुटीवर
कधी बसलीच नसती...
देवाच्या अस्तित्वाचा शोध
घेण्याची गरज मला
वेड्यागत भासलीच नसती...
माझी नजर फक्त सुखावर असती
तर दुःखाची धग मला
कधी लागलीच नसती ...
प्रेमातील वासना आणि
वासनेतील मुक्ती शोधली नसती
तर मला खरे प्रेम शोधण्याची
गरज कधी जाणवलीच नसती....
भल्या भल्यानां न सुटणारी कोडी
मला सहज सुटलीच नसती
निरर्थक जीवनातील निरर्थकता
मला कधी पटलीचं नसती...
भविष्याच्या उदरात शिरण्याची
माझी हिंमत झालीच नसती
भविष्यातील कोडी मला
स्पष्ट दिसलीच नसती...
माझ्या सभोवताली स्वैराचार
बोकाळला असताना
माझी समाधी लागलीच नसती ...
मी अज्ञानी असतो तर जगाला
उत्तरे देण्याची वेळ
माझ्यावर आलीच नसती...
माझ्या मेंदूत सारी
ज्ञानाची भंडारे नसती
तर अज्ञानात माझ्या भोवती
सुखे नांदली असती...
©कवी - निलेश बामणे
निसर्ग देणं
वापरा हो जपून
आहे ते लेणं
घेणे हा हक्क
दिला आहे सर्वांना
घेतो की चक्क
किती ही हाव
सदा ओरबाडतो
नाशास वाव
ऊस चाखावा
नको चाखूस मुळ
वंश जपावा
हो रे सावध
विनाशकाली स्वत:
होशी पारध
निसर्ग जप
परहितात हित
हे असो तप
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
८८७९३3८०१९
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।
पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी...१
शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी
शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
विवंचना ती पैशाची, विसरे शरीर सौख्यापरि....२
शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी
ज्ञानीजन ते असती, अगाध ज्यांची मति
टीका करीत राहूनी, विसरती ते अडचणी
परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी....३
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
स्त्रीची ताकद तिच्या आत्मिक बळांत आहे. आत्मबळाचा शोध तिनं एकदा घेतला की मग ती कोणाचीच राहात नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितींना सामावून घेत ती आयुष्याला नवं परिमाण देते.
असंच आयुष्याला परिमाण देणार्या १३ स्त्रियांच्या अफाट कर्तृत्त्वाचा पट या पुस्तकाच्या रुपाने पुढे येत आहे.
महिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या सर्व नाटकांमध्ये एक सृजनशील सूत्र आणि नकळत जाणवणारी लय सापडते आणि हे या लिखाणाचं आणि आणि म्हणूनच सगळ्या नाट्यांचं बलस्थान ठरलं. या सगळ्याच्या पलिकडे अत्यंत खडतर आयुष्य जगत असताना, पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व असणार्या समाजात स्वत:चं माणूसपण सिध्द करत समाजासाठीच झटणार्या या सगळ्या स्त्रिया, ज्यांच्यामुळे सामान्य स्त्रियांना जगण्यासाठी बळ मिळेल.
गाथा स्त्री शक्तीची (आकाशवाणीवरील नभोनाट्ये)
लेखिका : माधवी घारपुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २००/- रुपये
पाने : १८३
उपकार करुन त्याने मन माझे जिंकिले
परि वेळ गेला निघूनी आभार ना मानले
केली नाही परतफेड उपकाराची मी
कामाचे होते वेड सतत मग्न कामी
कामाच्या मार्गांत चालता पाऊल वाट
प्रयत्न करुन कार्यांत यश साधले अर्धवट
खंत वाटली मनां आठवोनी उपकार
पश्चाताप सांगु कुणा उशीर झाला फार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया
नाते अतूट असते घे, हे समजुनिया
आठव सारे बालपण कसे गेले खेळांत
भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत
ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी
आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी
जाणीव आहे मजला संसार जीवनाची
कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची
खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने
काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी
वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची
स्वार्थी आहे रे मी काढते तुझाच आठवणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti