साथ तुझी सुटणार नाही….
ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. ‘लेबर किसान पार्टी हिंदुस्थान’ या संघटनेने हा दिवस पाळला होता. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
वाट कुणाची बघतो आम्हीं, ठावूक असते ते सर्वांना
मृत्यू हा तर अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा....१,
आगमनाचा काळ तयाचा, कल्पनेनें ठरविला जातो
अचूक जरी ते शक्य नसले, विचार त्यावरी करिता येतो...२,
जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो
जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो...३,
तन मनाला सुख देवूनी, जीवन काल वाढविती कांहीं
सद्उपयोग तो केला जावा, हीच इच्छा सदैव राही...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हलके हलके निशा जावूनी, उषेचे ते आगमन होई
निद्रेमधल्या गर्भामध्यें, रवि किरणांची चाहूल येई...१,
त्या किरणांचे कर पसरती, नयना वरल्या पाकळ्यावरी
ऊब मिळता मग किरणांची, नयन पुष्पें फुलती सत्वरी...२,
जागविती ते घालवूनी धुंदी, चैत्यन्यमय जीवन करी
हा जादूचा तो स्पर्श असूनी, न भासे ही किमया दुजापरी...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४९७९८५०
जाई जुईच्या वेलींच्या हा सुंदर पसरला वास
लागली मला घरा जाण्याची आस
आईचा तो नाजूक हात
पित्याचा तो निर्मळ सहवास
जीवनाच्या साथीला क्षितीचा हव्यास
जीवन म्हणजे एक ध्यास
जीवन म्हणजे एक भास
जीवन म्हणजे शिक्षणाची आहे रास
पण आईबाबाशिवाय जीवनात नाही काही खास
भाग्यश्री सतीश प्रधान
अलिबाग
आज हे आकाश मजला, थोटके का भासते ।
झेप घेण्या पंख फूटतां, हाती येईल काय ते ?
उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते ।
चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ?
अथांग सागर खोल जरी , डूबकी घ्यावी वाटते ।
जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते?
काव्य सरिता वाहात आहे, ज्ञान गंगोत्री भासते ।
केवळ कविता चार रचूनी, त्यात डूबनें शक्य कां ते?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@Gmail.com
जीवनात अमुच्या हर घडीला
रोज नवे प्रश्र उभे राहिले
शोधण्यात त्या प्रश्र्नांचे उत्तर
आयुष्य व्यर्थ की हो चालले ।
कैक प्रश्र्नांना नसते ऊत्तर
का प्रश्र्नच त्यांचे असते ऊत्तर
प्रश्र्नांना ज्या नव्हते ऊत्तर
अनुत्तरित ते सदैव राहिले ।
नारी पोटी असे जन्म नराचा
तोची काळ होई का त्या नारीचा
लुटता ईज्जत कुणा बालीकांची
काळीज का नाही कुणाचे फाटले ।
माता भगीनी म्हणून पुजन करीती
भाषणातून अती कौतुक करीती
घालताना त्यांच्या अब्रूवर घाला
का दु:ख ना त्यांना कधी जाहले ।
सुरेश काळे
मो. ९८६०३०७७५२
सातारा
५ अॉगस्ट २०१८
Copyright © 2025 | Marathisrushti