जीवन काय आहे मला जे वाटत असे
ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१
मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी
मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२
भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत
न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३
आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती
जी भीती वाटते ती देहाची असती....४
आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे
साकारलेला सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग
नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते
अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी
सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार
आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे
कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मरूनी पडला एक प्राणी,
जंगलामधल्या नदी किनारी ।
कोल्ही कुत्री आणि गिधाडे,
ताव मारती त्या देहावरती ।।
एके काळी हेच जनावर ।
जगले इतर जीवांवरती ।।
आज गमवूनी प्राण आपला ।
तोच दुजाची भाकरी बनती ।।
निसर्गाचे चक्र कसे हे ।
चालत असते सदैव वेगे ।।
एक मारूनी जगवी दुजाला ।
हीच तयाची विशेष अंगे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
शेतकरी राजा
आहे जगाचा आधार
भुकेचा भार
त्याच्यावरी ..... १
पुण्यवान राजा
खळगी भरवी पोटाची
सार्या जगताची
एकटाच ..... २
गाळूनी घाम
त्यानं फुलवलं रानं
पिकविलं सोनं
शेतामध्ये .... ३
शेताच्या बांधाला
खातो चटणी भाकर
लागते साखर
घामामध्ये ....४
धरणीचा लेक
करी काळ्याईची सेवा
पिकवितो मेवा
जगासाठी. .... ५
करी परोपकार
ह्या सार्या जगावरी
स्वर्ग भूवरी
उतरितो ..... ६
-- कवीराज - महेश पुंड
दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले, ह्या जगावरती
रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती.....१,
धन्य जहाले वाल्मिकी व्यास, ज्यांनी ग्रंथ लिहीले
मानवातील विविधतेचे, दर्शन ते घडविले....२,
विश्वामधला प्रत्येक विषय, हाताळला दोघांनी
शोधून काढण्या काही, निराळे समर्थ नाही कुणी....३,
आद्य कवी वा लेखक म्हणूनी, मान तयांना आहे
अनुकरण ते त्यांचे करिता, पुष्प तयांना वाहे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
बालपण हे खरे जीवन
हा जीवा भावाचा
काळ हा जीवनातला
सुखसमृद्ध बालपणीचा
हा मन मौजेचा
हसणे नी खिदळणे
मंत्र सोप्पा सांगे जगण्याचा
नसे मतभेद
सारे काही असे नेक
नको राग ,लोभ,चिंता खेद
तन-मन-धन
निरागसतेचा देश
बालपण वाटे वृंदावन
छोटी शिकवण
विसरूनी जा कुशीत
बालपण हे खरे जीवन
चला गीत गाऊ
होऊनी बघू लहान
आता ना बालपणात न्हाऊ
-- सौ.माणिक शुरजोशी
कुठले नाते? खरे की खोटे?
काही कळेनासे वाटे !
बंधने तोडोनी नात्यांची,
इज्जत गेली पुर्षार्थाची !
कशी नाही रे शर्म वाटली तुला,
आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना?
जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर,
समजले मला आईच्या नशिबीचे भोग !
विश्वासावे सख्या भावावर,
पण त्यानेही केला कळस सर्वांवर !
जन्मल्याच केली असतीस हत्या तर,
निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर !
तूटले असते माझे नाते तुमच्या बरोबरचे
मुलगी आणि बहिणीचे !
काय माझ्याकडून प्रज्ञापराध झाले,
ज्याने मी अनाथ आणि पोरकी झाले !
बेअबृची लक्तरे माझ्या नावापुढे चिकटली,
आणि जीवनाची घडी विस्कटली !
देवा हात झाडूदेत स्त्रीची अब्रू लुटणाऱ्यांचे,
तरच देवा मिळेल तिला खरा ज्ञाय !
चित्र दिसूदे स्त्रीचा सन्मान करतांना,
नाहीतर लागेल सर्वांना तिची हाय !
देवा शिकव सर्व नराधमांना,
स्त्रीचा मान ठेवायला !
आणि सुरक्षा देण्याला,
नाहीतर दिसेल इतिहासाची पुनरावृत्ती होतांना !!
स्वप्नातही आणू नकोस अशी काळ-वेळ कुणावर,
नाहीतर निसर्ग कोपेल आपल्यावर !
जगदीश पटवर्धन
नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन
तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून...१,
एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई
निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही....२,
पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती
झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती....३,
शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी
आनंदाचे वलय भोवती, समाधान ते त्यास करी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अनभिज्ञ बिकट वाटा
अगतिक जिद्दी पाऊले
ध्येय खंबीर वाटसरूंचे
अथक नित्यची चालले
वळणेही, वेडी वाकडी
अंदाज, सारेच आंधळे
साथ अनामिक वाटाडा
हातात हात धरुनी चाले
साक्षी,स्पर्श त्याचे ग्वाही
निःशंक! जगती चालले
चराचरी न कुणीही एकटे
रूप श्रीचे सोबती चालले
हेच अतर्क्य, अगम्य सारे
सुखनैव! चिरंजीव राहिले
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३६.
५ - २ - २०२२.
Copyright © 2025 | Marathisrushti