गंध कोष ह्दयांतरी
ओंजळीत भेट घेतो..
प्रफुल्लित शुभ्र कळ्या
अंगणात सजवितो..
गुंज चाले रात्रंदिन
सखी गुपित जाणतो..
तुझे बोल ऐकून तो
गंध गुपित ठेवतो…
उमलत्या स्वप्नांचे ही
खुलवतो रंग नवे..
सांग सखी श्रृंगारास
सजायला काय हवे?..
सुकलेल्या फुलासही
तुझा स्पर्श अलवार..
बहरल्या सुगंधात
मन वाहे वारंवार…
ओठी माझ्या स्मितहास्य
क्षणोक्षणी हा खुलला..
मन माझे गंधाळले
दारी मोगरा फुलला.
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
पर्याय म्हणून जर माझं नाव असेल,
तर माझं नसणंच जास्त खरं ठरेल.
गरज लागली की आठवण येणं,
याला प्रेम म्हणायचं धाडस नको.
तुझ्या वेळेच्या उरलेल्या क्षणात,
मी बसवलेली सोय नको.
कोणीच नसलं की आठवण येणं,
याला आपुलकीचं नाव नको.
अर्धवट हक्क, अपुरी माया,
यांनी नाती जगत नाहीत.
मी पूर्ण देतो, पूर्ण मागतो,
मधली तडजोड मला जमत नाही.
जिथे मी पहिला नाही,
तिथे मी उभाच राहत नाही.
कारण पर्याय म्हणून जगलेलं नातं,
शेवटी स्वतःशीच दगा देतं.
पर्याय म्हणून माझी निवड असेल,
तर तो अध्याय तिथेच संपलेला बरा.
आता मी थांबतो इथेच,
कारण पुढे जाण्यासारखं काही उरलेलं नाही.
नात्याला नाव न देता,
मी इथेच शून्य होतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
हरि हराचे पुजन करतो ।
दृष्य दिसे बहुत आगळे ।।
प्रभूकडूनी प्रभूची सेवा ।
सर्वजणां ही किमया न कळे ।।
शिवलिंगापुढती ध्यान लावी ।
डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।।
सुंदर सुबक चित्रामध्ये ।
व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।।
श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं ।
आत्मरुप उजळून आले ।।
शिवलिंगातील रामस्वरुप ।
एक होऊनी मग गेले ।।
कोण भक्त आणि ईश्वर कोण ? ।
भासे मनी हे अवघड कोडे ।।
परम बिंदूवर भक्ती असता ।
ईश्वर भक्त दूजा न सांपडे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।।
कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।
निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।।
मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।
विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।।
प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरवियले ।।
दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।।
विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।
मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।।
स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।
आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।।
युक्ति चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।
घारीच्या द्दष्टीतील तिक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।।
कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी श्वसानी जे हरवले ।।
नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।।
उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।
आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।।
दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।
सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।।
हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।
जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।।
मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९०४०७९८५०
ना आई ना सूनबाई होते, ना राजाची पटराणी होते !
इवल्या मायेच्या राजवाड्यात, गोड बाबांची नकटी राजकुमारी होते !!१!!
हसवून खिदळून घर सजत होते, दिवसांमागून दिस घेत होतें झोके,
झोक्यानेही भुर्रकन हिंदोळा घेतला, लग्न आकाशी तो जाऊनी ठेपला !!२!!
कन्यादानाचे त्यांसी पुण्य लाभले, मंगळसूत्राने साजरे रूपही सजले,
ललना सुंदरी सुवासिनीं नटले, किंतू अंतरपाटने अंतर दूरवर ओढले !!३!!
आईची परी पाठवणीत आश्रूंनी भिजली, बाहुली बाबांची हृदयातच निजली,
खळी गालांवरची ओठांत मिठली, मायेची ममता हुंदक्यात थटली !!४!!
मग माझ्याच घराचे बारसे जाहलें, माहेर म्हणवून पाहुणी बसवले,
हक्काच्या सदनीं पाहुणचार लडिवाळला, चार दिवसांत परतीचा निरोप गोंजारला !!५!!
माप ओलांडता लेक परके धन झालीं, नाळ कपल्याची वेदना मज तेव्हा बोचलीं,
कुठलं माहेर अन् कुठलं सासर होत? पोरकेपणात गुंफवणारी होती रेशीम गोठ !!६!!
-- कु. श्वेता काशिनाथ संकपाळ.
" गोठ " (१२/११/२०१९)
किती, कसे, कुठे शोधू तुला
अशी कुठे? तूं हरवुनी गेली...
लोचनी रूप तुझेच लाघवी
पापणी, नित्य पाणावलेली...
प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे
क्षितिजी सांजाळ थबकलेली...
निलांबरी, मोहोळ आठवांचे
निमिषात तूंच उठवूनी गेली...
हे सारे, आज कसे विसरावे
अशी कुठे गं तूच हरवून गेली..
प्रीतिवीण कां? जगणे असते
धुंद श्वासात, गंधाळते बकुळी
शीणलो तरी वाटते तुला पहावे
सांजाळलेल्या या कातरवेळी
रचना क्र. ११२
२२/८/२०२३
- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती ।
आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती ।।
यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी ।
अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी ।।
शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती ।
त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम होती ।।
खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते ।
संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते ।।
उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला ।
हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला ।।
देह असे साधन केवळ, प्रभूकडे जाण्याचे ।
साध्य होईल त्याच आधारें, इप्सित जीवनाचे ।।
खाद्यपाणी हे तर इंधन, असे शरीर यंत्राचे ।
अभावी त्याचे कसे चालेल, जीवन मग तुमचे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
WhatsApp वरुन आलेली कविता
आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!
काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!
केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल!!
शाळा एक आठवण
-- WhatsApp वरुन आलेली कविता
-- सुशांत
Copyright © 2025 | Marathisrushti