चाफा आणि मोगरा
गंधर्व कुठले हे,
धरातलावर येऊन,
सर्वांस मोहवती खरे,
शापित म्हणू त्यांना
तर सुगंधाच्या राशी,
जो तो कुरवाळे त्यांना,
घेऊन थेट हृदयाशी, --!!!
हिमगौरी कर्वे ©
आकाशाला शब्द भिडले,
हृदयामधले ।
भाव मनीचे चेतविता,
स्फोटक बनले ।।१।।
देह जपतो हृदयाला,
सदा सर्व काळी ।
धडकन त्या हृदयाची,
असे आगळी ।।२।।
जमे भावना हलके तेथे,
एकवटूनी ।
सुरंग लागता तीच येई,
उफाळूनी ।।३।।
कंठ दाटता
जीव गुदमरे आत ।
रंग बदलती चेहऱ्यावरले,
काही क्षणात ।।४।।
उद्वेग बघूनी शरीर,
कंपीत होते ।
हृदयातील भाव जाऊनी,
मन हलके होते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तुझ्या आठवातुनी रमता, रमता
प्लॅनिंग प्लॅनिंग
करतांना आयुष्यच
जगावयाचच राहुन गेल !!
बेरीज कधी जमलीच नाही
वजाबाकीच सदैव होत गेली !!
वेळेच भान ठेवता ठेवता---
वेळच कायमची निघुन गेली !!
हंसु हंसु म्हणताना
आसवांनीच सरशी केली -----
आयुष्याचे आरेखन करता करता
बरच काही बरच काही राहुन गेल---
बरंच काही ----सारच काही
राहुन गेल ----राहुन गेल -----
मनासारख जगण्याच राहुन गेल---
स्वप्नच सार विरुन गेल विरुन गेल--
तो एक उनाड दिवस आयुष्यात
कधि आलाच नाही कधि आलाच नाही
‘करीयरच्या’ उंच जाणा-या
ग्रॉफच्या--- तळाला सुध्दां
खरं जगण्याचा मागमुसही
दिसला नाही-- दिसला नाही ---
-- भास्कर रं. पवार
८ मे २००८.
गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे
संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे
ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी
गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी
चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी
बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी
धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो
जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो
यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा
साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
जेव्हां मजला कळत होते, निद्रेत आहे मी
जागृत स्थिती असूनी मनाची, शरीर होते निकामीं ।।१।।
निद्रेमधल्या स्थितीत जाता, जाग न राही तेथे
जागेपण आणि निद्रा दोन्हीं, एकत्र न येते ।।२।।
निद्रावस्था नि जागेपणा, याहून दुजे कोणते ?
ध्यान स्थिति ही आगळी असूनी, मध्य बिंदू साधते ।।३।।
देह मनाला विश्रांती देई, ध्यान अवस्था ही
ध्यानामधली ऊर्जा सारी, ईश्वरार्पण होई ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चल सये ग झणीं,
मांडू या खेळ अंगणी,
लहान वयातली भातुकली,
धांदल बाहुलीच्या लग्नाची,--!!!
लग्न करण्या त्यांचे,
घालत होतो घाट,
धावपळ करत सगळी,
मांडायचा सर्व थाट,----!!!!
इवले इवले बाहुला बाहुली,
सुंदर गोंडस खूप छोटुकली,
मुंडावळ्या बांधून त्यांना,
उभे सगे घेऊनी हाती,--!!!
सासर माहेर सगळे मिळुनी,
अंगण जायचे गजबजुनी,
ठुमकत येई वरमाई,
नाकात झोकात नथ घालुनी,--!!!
देण्याघेण्यावरून गोष्टी,---
मात्र सगळ्या फिस्कटती,
सासरकडच्या आयाबाया,
एकदम सगळ्या रुसून' बसती, --!!
मग आजोबा मोठे ,
उगा मध्यस्थी करती,--!!!
सनई चौघडा घेऊन उभे
त्यांना कशा "खुणा" करिती,--!!!
बाहुल्या'च्या घरचे सांगती,;---
सासरकडची इटुकली पिटुकली,
म्हणती मिळेल का असा जावई,-?जरा जास्तच फणकारुनी,--!!!!
मग तोडगा मधे निघे,
आई आजी म्हणतील तसे ,
पुसावया" जाती, -सगळे,
वधू-वर' पण, इकडे एकटे,--!!!!
पाहून त्यांना हळूच असे,
मोठे आजोबा युक्ती करिती, एकत्र आणून दोघांनाही,--!!!
लग्न लावून मोकळे होती,--!!!
आज आठवते सयी,"
त्या प्रसंगाची लगीन -घाई
असे लग्न लावण्या पण,---
कुणी आजोबा उरला नाही,--!!
-- हिमगौरी कर्वे
भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...
एक भयानक रात्र अशी,
सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली,
कुणा न समजे ही खेळी ।।१।।
मध्यरात्र होऊन गेली,
वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे,
स्वप्ने रंगवीत होते ।।२।।
तोच अचानक विषारी वायू,
पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता,
श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।
कित्येक जनांचे बळी घेतले,
काळ्या काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा,
करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।
भरडून गेले सारे परि,
पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा,
मोजमाप काय असते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो,
प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा...
तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते,
साखरपुड्यात नववधू नेसते तसा...
सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो,
प्रियकर आपल्या प्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा...
शेतकर्याच्या स्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो,
प्रेयसीशीच लग्न ठरल्यावर प्रियकर होतो तसा...
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti