(१)
पुरी फुगली टम टम
तळ तळ तळली भजी
उकड उकड बटाटे भाजी
पुरी-भाजी नी छानछान भजी
(२)
गोल गोल गिरकी घेई
भिर भिर भिंगरी बाई
फिर फिर फिरे भोवरा
टक्कर टक्कर भिंतीला देई
(३)
लाल-लाल चुटूक स्ट्रॉबेरी
लुस लुशित पिवळी केळी
चटक मटक ब्ल्यू बेरी
खा खा खाऊ जांभळं जांभळी
(४)
चला चला लवकर चला
खेळ खेळाया मैदानी पळा
फटक फटके मारू छक्के चौके
धाव धाव धावा काढाया पळा
(५)
गणांचा गणपती हा गुणपती
गजानना तुच की रे गजपती
विनायका तू विघ्नाधिपती
महोदरा,लंबोदरा रे एकदंती
-- सौ.माणिक शरजोशी
नाशिक
बापू,
आजही तु दिलेल्या टोपीच्या,
झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले,
नासके विचार वाहू लागतात ना
तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या
मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते....!!!
बापु,
तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे,
पण जव्हाबी तेह्यनं तुलं,
मारायचा प्रयत्न केला नं,
तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा
पुनर्जिवीत झालास...!!!
वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं,
मारायचा खुप प्रयत्न केला,
टोप्यांना वेगवेगळे रंगही दिले,
तरी पण त्या जहाल विखारांतुन तु,
चकाकुनच निघालास....!!!
बापु
आजही तुह्या सत्य,अहिंसेच्या विचारावरच
हि पृथ्वी तगुन आहे....!!!
जव्हा तेह्यनं तुव्हा बापच काढला नं,
तव्हा तं मव्हबी डोकं भनकु लागलं,
पण तुह्याच विचारानं,
मह्या डोक्यातीलं आग शांत केली...!!!
बापु भलेही तेह्यनं तुही हत्या,
बंदुकिच्या गोळीनं केली असेल
पण तुह्या विचारांची हत्या,
ते कोणत्या बंदुकीनं करतीलं...?
बापु,
तेह्यनं धर्माची अफु लोकांना चारली,
तुह्या सत्याच्या प्रयोगावरही टिका केली,
तुव्ह लंगोट काढुन वस्त्रहरण करू पाह्यलं,
तुव्हा बापबी काढला अन विचारांचा,
विखारी सापबी तुह्यावरं सोडला,
तरी तु टस का मस झाला नाहीस,
भलेही तेह्यनं कपटानं तुह्या शरीरावर
गोळ्या झाडल्या असतीलं रे,
अन तुही “हे राम!” म्हणत,
धारातीर्थी पडला असशीलं...
पण तुह्या विचारांतला “राम”
ते कव्हाच मारू शकणार नाहीतं.....!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
तिच्या फाटलेल्या, फाडलेल्या अथवा फाडून घेतलेल्या जीन्समधून तिच्या गोऱ्या मांडया दिसत होत्या...
पुरुषांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पण त्या नजरेत वासना नव्हती एक प्रश्न होता...
हिला भीक लागलेय की भिकेचे डोहाळे लागलेत...
फक्त गोंदलेल गोंदण दिसावं म्हणून ती काय काय दाखवत होती...न बोललेलं बर ...
मग म्हणणार पुरुषांच्या नजरेत वासना आहे...
मला वाटत पुरुषांनी आपल्या डोळ्यावर आता असा चष्मा लावावा ज्यातून फक्त कपडे दिसतील ...
मग असा चष्मा लावणाऱ्यानाच बायका आज सभ्य समजतील...
ती म्हणत होती जणू मी माझ्या कपड्यांना आवर घालणार नाही तुम्ही तुमच्या नजरेतील वासनेला आवर घाला...
माझी नजर मग तिच्या मांड्यावरून तिच्या चेहऱ्यावर गेली ...
पाहतो तर काय ही तर तीच मुलगी होती आपल्यासमोर चड्डीत फिरणारी...
आता तर मी तो चष्मा लावणारच...
कवी - निलेश बामणे
कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला।
कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥
सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला ।
धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना।
नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।।
जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे।
सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे।
गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।।
राजनितीचे सुत्र नवे मग विश्वपटावर मांडियले
अखंड भारत पाहीन डोळा शब्द कृतीतुन अवतरले।
सेल्युकस मग सिमेवरती काही मिनिटांत लोळविला॥३॥
कसे नियंत्रित राखावे या राष्ट्राला मग एकवटुन।
सुत्रबध्द ते केले सारे ज्ञान आपुले ग्रंथातुन।
अलौकिक तो अजुनी आहे ग्रंथ जगातील ठरलेला॥४॥
- रणजित हिर्लेकर
मुसळधार वर्षा चालली,
एक सप्ताह होऊन गेला,
पडझड दिसली चोहीकडे,
भरुन वाहे नदी-नाला ।।१।।
काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?
हानीच दिसली ज्यांत खरी,
निसर्गाच्या लहरीपणानें,
चिंतीत झाली अनेक बिचारी ।।२।।
दूरदृष्टी माझी मर्यादेतच,
विचार तिजला अल्प घटकांचा,
विश्वचालक काळजी करि,
साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय.
खंत वाटली मनास
कळला नसे व्यवहार ।
शिकला सवरला
नाही जाणला संसार ।।१।।
पुढेच गेले सगे सोयरे
आणिक सारी मित्रमंडळी ।
घरे बांघूनी धन कमविले
श्रीमंत झाली सगळी ।।२।।
वेड्यापरी बसून कोपरी
रचित होता कविता ।
कुटुंबीय म्हणती त्याला
कां फुका हा वेळ दवडीता ।।३।।
सग्यांच्या उंच महाली
बैठक जमली सर्व जणांची ।
श्रेष्ठ पदीचा मान देवूनी
कौतुके झाली कवितांची ।। ४।।
व्यवहारी निर्धन जरी तो
विराजमान मनीं दुजांचे ।
ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे
गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तुझे नी माझे कसले नाते
अजून मला ते कळले नाही
एकदा तरी तुज पाहिल्यावीना
मजला काही करमत नाही ।
ऊजाडताच दिवस नवीन
रोज नव्याने तुला पाहतो
रम्य त्या गत आठवणीने
का पुन्हा रोमांचित होतो ।
आता तरी तू सांग मजला
काय आहे आपुले नाते
का आजही तव आठवणीने
मन माझे ग मोहीत होते ।
सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
दि. ३ आक्टोंबर २०१८
Copyright © 2025 | Marathisrushti