(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते

    विविध आणि विविध महिमा विविध थोर पुरुषांनी गायींचे महत्व वर्णन करणारे जे जे लिहिले आहे. त्यांचे एकपात्र संकलन गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते या पुस्तकात प्रा. विजय यंगलवार यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. नचिकेत प्रकाशन प्रा. विजय यंगलवार किंमत : 40 रू

  • ५ जून, “दिन जागतिक पर्यावरणाचा” !

    दरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे.

  • गाण्याचा पहिला परदेश दौरा

    आत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती.

  • किती गुरु जीवनात, महत्त्व त्यांचे जाणावे,

    किती गुरु जीवनात,महत्त्व त्यांचे जाणावे,
    सामोरी गुरु कित्येक
    त्यांचे मोल ओळखावे,--!!!

    आई-बाप श्रेष्ठ गुरु असती,
    निसर्ग त्याखालोखाल,
    मित्र आणि अनुभव सांगती,
    चरित्र आणि वाटचाल,--!!!

    कोण कसा आहे कळते,
    पाहून संगत त्याची,
    मित्रांचे स्थान अढळ,
    तेच मानसिकता घडवती,--!!!

    आई-बाप जन्मदाते,
    सुखदुःखातील मोठे वाटेकरी, नतमस्तकआपण रहावे,
    जगताना परोपरी,--!!!

    निसर्ग शिकवतो मूकपणे,
    ते आपण समजून घ्यावे,
    लहान पान सांगते,
    असावे कसे जगणे,--!!!

    अनुभवाकडून गुरु म्हणुनी,
    कित्येक धडेच मिळती,
    मौलिक ठरे सरतेशेवटी,
    अनुभवाची मोठी शिदोरी,--!!!

    अंधारातून प्रकाशाकडे,
    फक्त गुरुच ना नेतो,
    गुरुविना जीवन सारे,
    असा अंधारी चाचपडतो,--!!!

    ग्रंथही मोठे गुरु असती,
    ज्ञानाचे अपार भांडार,
    झुकून सर्वांना नमन ,
    क्षणात येता त्यांचा विचार,--!!!

    ‌. हिमगौरी कर्वे.©

  • तो माझा कृष्णसखा

    निळ्या जळी, काष्ठी, पाषाणी,
    मज मेघ:श्याम दिसे,
    ऐहिक जीवनी वावरताना,
    रंग निळसर भासत असे,--!!
    निळा काळा शाम तो,
    वाजवी मधुर बासरी,
    जिथे असेन तिथे मी,
    हरवून बसते परोपरी,--!!!
    राधिका मी त्याची,
    तो माझा कृष्णसखा,
    जिथे जाईन तिथे तो,
    बनत असे पाठीराखा,--!!!
    नावेत बसुनी चालले ,
    या तीरावरून त्या तीरी,
    यमुनाही डचमळे सारखी, माझ्यासारखी उलघाल उरी,--!! मधुसूदनाचे प्रतिबिंब,
    पाहते मी पाण्यात खाली,
    त्यातच माझे मुख दिसे,
    प्रतिमा एकरुपच झाली,--!!!
    प्रवास हा प्रेममय,
    ओढ त्याची विचक्षण,
    हृदये दोन परंतु,
    एकच आहे तनमन, --!!!
    सावळ्याची होता भेट,
    अद्वैताचाच साक्षात्कार,
    कोण राधा,कोणता कृष्ण, जगासकोडेवाटे फार,-!!

    हिमगौरी कर्वे

  • मला विठ्ठलाचा विरह सोसवेना

    अजूनी दिसेना पंढरीचा राणा

    मला विठ्ठलाचा विरह सोसवेना ।।

    बुवा-साधु-स्वामी यांचे पाय वंदिले मी

    पुराजी नि पंडित यांचे पंथ धुंडले मी

    परी विठ्ठलाच्या दारीं कुणी पोंचवेना ।।

    पांडुरंगभेटीपुढती खुजे सप्तस्वर्ग

    दुबल मी, दुर्गम दुष्कर नरजीवनमार्ग

    पदोपदीं सहा रिपूंची रोखतसे सेना ।।

    अंधच मी, पाहिन कैसे सुंदर तें ध्यान ?

    मूढ पुरा , गूढ सारें परब्रह्मज्ञान

    ध्यास असुनीही विषयपाश तोडवेना ।।

    -- सुभाष स. नाईक

    पंढरीचा राणा

  • कवीची श्रीमंती

    खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार ।

    शिकला सवरला परि न जाणला संसार ।।

    पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी ।

    घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।

    वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता ।

    कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।

    सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची ।

    श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची ।।

    व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे ।

    ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • अनुराग

    “अनुराग” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.

  • स्वच्छन्द

    चला तोडूया या कोषाला
    मुक्त करूया सुरवंटाला
    अंतरंगातुन घेऊ उर्मी
    उडुदे स्वच्छन्द फुलपाखराला
    होऊ सोबती मीच मजला
    नकोशी गर्दी हवी कशाला
    एकले आपण येती जाती
    कशास क्षणिक कुणी धुंडाळा
    ठेऊन साक्षी परमात्म्याला
    सोड भार वाही चरणाला
    पंखा कुठे रे चिंता उद्याची
    घास चोची देई चाऱ्याला
    नको गाठोडी भविष्याला
    गाठ बसे, सुटेना जीवाला
    तू मी सारे येरझारे प्रवासी
    सुखे जगू दे या आत्म्याला!!
    -- वर्षा कदम.
  • वास्तव

    वास्तव! हे प्रतिबिंब अंतरीचे
    तेही तरळते तुझ्याच लोचनी
    तरीही कां? हे रुसणे फुगणे
    नको त्रागा उगा, घे समजुनी
    पाहिले किती? उनपावसाळे
    सत्यता! ती जाण नां जीवनी
    ओल्या मातीत, जिरते पाणी
    प्रीत! रुजते कोवळ्याच मनी
    हिरव्या प्रीतवेली फुलती फुले
    सुगंधा! तीच दरवळते जीवनी
    मनी, ही सारी साक्षात प्रचिती
    आत्म्यास! मन:शांती जीवनी
    --वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ६७
    १ - ३ - २०२२.