मुळ गझल "मोहसीन नक्वी" यांची आणि "गुलाम अली" यांनी गायलेली सुंदर रचना .
मी मराठीत सरळ सरळ रूपांतर केले . बघा आवडते का ?
इतनी मुद्दत बाद मिले हो
किन सोचों में गुम रहते हो
( किती दिवसानंतर भेटते तू गं
कोणत्या विचारात डुबते तू गं)
तेज़ हवा ने मुझसे पूछा,
रेत पे क्या लिखते रहते हो
( वावटळीने मला विचारले
वाळूवर काय असं लिहते तू गं ?)
कौनसी बात है तुम में ऐसी
इतने अच्छे क्यों लगते हो
( कोणती जादू तुझ्यात अशी ?
एवढी सुंदर का दिसते तू गं)
हमसे न पूछो हिज्र के किस्से
अपनी कहो, अब तुम कैसे हो
( मला नको विचारु विरहाच्या गोष्टी
तुझं सांग, आता कशी असते तू गं?)
-- श्रीकांत पेटकर (कौशल)
९७६९२१३९१३
जे जे मजला हवेच होते,
मिळवित गेलो यत्न करूनी,
चालत असता जेव्हा पडलो,
उठलो होतो धीर धरूनी ।।१।।
आतंरिक ती शक्ती माझी,
पुन्हा पुन्हा तो मार्ग दाखवी,
शरिराला ती जोम देवूनी,
वाटेवरती चालत ठेवी ।।२।।
निराश मन हे कंपीत राही,
विश्वालासा तडे देवूनी,
दु:ख भावना उचंबळता,
देह जाई तेथे हादरूनी ।।३।।
परि विवेक हा जागृत होता,
विश्लेषण जो करित राही,
सुख, दु:खाचा अर्थ लावूनी,
मनास तेव्हा धीरच देई ।।४।।
गिळून घेता अपयश सारे,
खंत वाटली कधी न त्याची,
समज आली मनास ही की,
चूक असावी मार्ग निवडीची ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही
प्रेम कविता
बंधन मुक्तीसाठीं असतां,
बंधनात ते पाडी
कर्मफळाचे एक अंग ते,
टिपे दुसरे बाकी ।।१।।
साध्य करण्या जीवन ध्येय,
देह लागतो साधन म्हणूनी,
सद्उपयोग करूनी घेतां,
साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।।
हिशोब तुमचा चुकून जाता,
तोच देह बनतो मारक,
विनाश करीतो मागें लागतां,
मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।।
बंधन पडते आत्म्याभोंवती,
शरिरांतल्या वासने पायी,
वासनेच्या आहारी जातां,
बंधनास ती बळकटी येई ।।४।।
तपसाधनेचे कष्ट करूनी,
देह करीतो आत्म्यास मुक्त,
देहाचे बंधन पडते,
जेव्हां बनतो वासनायुक्त ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सोडत नसतो केव्हाही, निसर्ग आपुल्या मर्यादा,
चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा १
साधूबाबा महाराज कित्येक आहेत ह्या जगती
नांव घेवूनी प्रभूचे चमत्कार दाखविती २
अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा
चमत्कार दाखविण्यामध्ये हात नसतो प्रभूचा ३
तो महान असूनी क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी
प्रेमभावना घेण्या कशास पडेल कष्टी ४
नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या भोंदूनी,
दु:खींचे शोषण करती वाम मार्गाने जावूनी ५
आम्ही केवळ भाविक, वेडे श्रद्धाळू असती,
जो आपल्या अकलेने, उपयोग त्याचा घेती ६
गंडे, दोरे, जादू - टोणा हे सारे थोतांड,
चूक मार्गाने जावून शोधत राहतो ब्रह्मांड ७
विश्वास साधूंवरी देवापेक्षाही जास्त
म्हणून चटकन लाभे किंमत त्याची स्वस्त ८
भाषा त्यांची ठरलेली, राहू, केतू, शनी
जर फारच भोळे असाल तर म्हणती झाली करणी ९
संकटाचा काळ सांगती तीन वर्षाचा
दु:ख जावुनी सुखी व्हाल, शब्द देती आशेचा १०
ह्यात काही नवे नसते, हे तर चक्र निसर्गाचे,
सुख दु:खाच्या घटना घडते घडणे चालते नित्याचे ११
विश्लेषण करीता कळेल, आम्हीच करितो घटना,
परि हिंमत नसते आमची फळ त्याचे घेण्या १२
आम्हास हवा इतर कुणी झेलण्यास त्या दु:खाते
शब्द दाखवूनी प्रेमळ लुटीत असतो धनाते १३
फरक पडत नसतो, आमच्या कर्म फळात,
त्यांच्या मंत्र – तंत्राने, सहन करतो समाधानात १४
भयग्रस्त असूनी मन, चिंतेत आम्ही असतो,
आधाराचा शब्द बोलूनी, आशा आम्हास दाखवीतो १५
पारखोनी घ्या खरा गुरु दूर रहा भोंदूपासून,
फरफटत जाल जीवनी मृगजळास नीर समजोनी १६
गुरु दाखवी मार्ग, तुमच्या आत्मशुद्धीचा,
त्यातच त्याला समाधान, संदेश देतो ईश्वराचा १७
जवळ असूनी दूर असतो, हेच सार ईश्वराचे,
भक्तीभाव ठेवा , यश मिळेल जीवनाचे १८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वाहत असते जीवन सारे,
वाहणे जीवनाचा गुणधर्म,
स्तब्ध राहता जीवन आपले,
कसे घडेल हातून कर्म ।।१।।
वाहत होते, वाहत आहे,
भविष्याते वहात जाईल,
सतत चाले ही प्रक्रिया,
जीवन करण्यास सफल ।।२।।
आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो,
निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही,
अणूची ती बनली असूनी,
प्रचंड हालचाल आत होई ।।३।।
अणूत असूनी तीन भाग,
अतिशय वेगाने फिरती,
केवळ त्यातील वेगामुळे,
स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
निरपेक्ष, निस्वार्थी जीवन
मुलमंत्र परमानंदी सुखाचा
जे घडते, ती प्रभुची ईच्छा
करू नये, संताप जीवाचा
स्वेच्छेने, जगु द्यावे सकला
जगणे अधिकार प्रत्येकाचा
अटकाव, बंधनांचा नसावा
हाच विवेकी मार्ग शांततेचा
मन:शांती! केवळ तडजोड
नसावा संघर्ष वादविवादाचा
सूत्र, मौनं सर्वार्थ साधनम
मुलमंत्र! हाची धागा सुखाचा
सर्वांशी सदा सुखानंदी रहावे
मनी रुजावा मुलमंत्र सुखाचा
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ४७.
१४ - २ - २०२२.
थोडा रिकामा दिसलो रे दिसलो
की एखादा शब्द येतो कुठूनतरी
त्याला थोडं गुणगुणलं
कि अजून दुसरा
मग तिसरा
असे येत राहतात
फेर धरतात
मी सुद्धा
जास्त विचार करत नाही
शब्दांना येऊ देतो मग लिहून घेतो
मला बरं वाटते ...छान वाटते
ते काही म्हणत नाही
अन मीही काही म्हणत नाही
हे सारं कविता आहे
की अजून दुसरं काही म्हणून
पण
एवढं मात्र खरं
कि
हे शब्द येत राहतात मराठीतून
.........दुसऱ्या भाषेतून येतच नाही
इतकं सहज आलंच नाही अजून
-- श्रीकांत पेटकर
Copyright © 2025 | Marathisrushti