भटकत जातो वाटसरू तो, जंगलामधील अज्ञात स्थळी
आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी...१,
मार्ग जाण्याचे ज्ञात नसूनी, निराशेने वेळ दवडितो
ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो...२,
अज्ञानाच्या अंधारात आम्हीं, शोधत असतो असेच त्याला
मार्ददर्शन ते सद्गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला...३,
वाट दाखवी सद्गुरु आम्हां, प्रभूचरणी त्या जाण्याचा
दुवा साधतो आमच्यामध्ये, त्यात एकरूप होण्याचा...४
-- डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पाहूनी आरशात रुप स्वताचे
उगीचच स्वतःशी हसलीस तू
चेहऱ्यावरील तुझ्या.हास्यामागे
वेदना लपविल्या होत्यास तू ।
पाहणारास दिसत होते सदैव
तेच हास्य तुझीया चेहऱ्यावरी
नाही कुणाला दिसली कधीच
त्या हास्यामागील वेदना तुझी ।
हासत असता अचानक तुझ्या
अश्रू दोन ओघळले गालावरी
नाही कुणाला त्या अश्रूत दिसल्या
वेदना किती जपल्या होत्या ऊरी ।
सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा
७ सप्टेंबर २०१८
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।। १
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।। २
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।३
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।। ४
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।। ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नाग हा
जमिनीखाली रहातो.
गुप्त खजिन्यावर पहारा देतो.
कुणी पुढे ठाकलं, तर
फत्कारतो;
कधी चावतोही.
लोक त्याला भितात,
त्याची पूजा करतात
नागपंचमीला.
हा नाग
जमिनीवर रहातो.
गुप्त खजिन्यावर पहारा देतो.
कुणी पुढे ठाकलं, तर
फूत्कारतो;
कधी चावतोही.
लोक त्याला भितात.
त्याची पूजा करतात
काल-आज-उद्या,
कायमच.
किमानपक्षीं,
निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी.
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
माणसाचे तेज डोके
कसे पिकू लागले?
निसर्गात मिळे फुकट
तेच विकू लागले!
हवा होती मुक्तवावर
बंदिस्त होऊ लागली
रस्त्यावर , दुकानात
पैसा कमवू लागली!
पाणी होते प्रवाही
बाटलीबंद झाले
जारबंद संस्कृतीला
पैसे मोजू लागले!
माती तर अमापच
बघा जिथे तिथे मिळे
विटा पाडून भट्टीवर
बंगले बांधू लागले!
हवा, पाणी, मातीची
अशी चालू लूट आहे
कुरतडे उंदीर तशी
विनाशाची वाट आहे!
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
सुरवातीला तिच्या माझ्यात
काहीच अंतर नव्हते...
पण ते कधी निर्माण
व्हायला सुरवात झाली
हे लक्षातच आले नाही...
लक्षात आले तेव्हा
बऱ्यापैकी होते
मग मात्र..
ताण जाणवयाला लागला
रबर कोण हेच काही
कळेना...
दोघेही दोन टोके
सोडत नव्हते..
शेवटी कुणीतरी ते सोडलेच
परत शांत झाले
वादळे पेल्यातच राहिली...
अंतर कमी झाले नाही
पण जास्तही झाले नाही..
आत्ता सगळे आलबेल आहे....
-- सतीश चाफेकर.
https://youtu.be/0rAv7mcDBwU
मित्रांनो, "हार-जीत बनुनी बघ " ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
"माझी डायरी " या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा.
"माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
subscribe me : https://www.youtube.com/channel/UCWg4s4JepryoGlUdgiAFttQ
कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,
दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।
धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,
कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।
नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,
परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।।
जीवन कशासाठीं कळले नाही कुणां
जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।
तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले
मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली ।
दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,
जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते ।
क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,
निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल ।
पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,
स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत
मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य सहज होत...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti