(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आम्ही कोण?

    केशवसुतांनी कवितेतून कवित्वाची नवी जाणीव प्रकट केली हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘आम्ही कोण? ‘ या कवितेत कवितेबद्दलचा विचार मांडला आहे, पण त्याशिवाय त्यांच्या इतरही अनेक कवितांमधून त्यांनी कवितेचे महत्त्व ठासून सांगितले आहे. ‘अशी असावी कविता म्हणून’, ‘रांगोळी घालताना पाहून’, ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’, ‘जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद’ किंवा ‘दुर्मुखलेला’ या कवितांमधून त्यांनी कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी व एकूणच कवितेचे मोठेपण दाखवून दिले आहे.

  • पाऊसधारा

    क्षणक्षण सारे होता धुसर
    पापण्यातूनी दाटती पाझर
    व्याकुळ,कृष्णमेघ सावळे
    त्या ओढ़ वसुंधरेची निरंतर
    सृष्टिचे रूप अवीट मनोहर
    तोषवीणारा मृदगंध अनावर
    लपंडाव तो उन सावल्यांचा
    मोहवितो मनामनास निरंतर
    चिंबचिंब ओल्या पाऊसधारा
    सुखद सरिंची रिमझिम सुंदर
    आसक्त, ओढ़ प्रीतसखीची
    तनमन हृदया लागे चिरंतर
    जरी सुखदु:ख्खदी मेघडंबरी
    प्रीतभावनांचे अंतरी गहिवर
    ऋतुऋतुंचे सोहळेच लाघवी
    कृपाळू, कृपावंत तो दिगंबर
    -- वि.ग.सातपुते (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १५१.
    १२ - ६ - २०२२
  • हव्यास

    रुसवे फुगवे, तंटे बखेडे
    हवे कशास लढाई झगडे
    अतीतटीचे हे हेवेदावे
    आत्यंतिक द्वेषाचा सोस कशाला? ।।

    आभाळाच्या मुक्ततेला नाही बंध
    देवाच्या मायेला ना बंधाचा गंध
    भिंतीआडच्या कृत्रिम जगाचा
    तुम्हाआम्हाला मग ध्यास कशाला ॥

    जमिनीच्या हक्काच्या तुकड्याला
    कुंपणात जोखण्याचे ध्येय आम्हाला
    मुक्त हवा करुन कलुषित या
    छपराखाली कोंडला श्वास कशाला ॥

    आयुष्याची वरात ही रिकामहाती
    घर भरण्याची मग आस कशाला
    इवल्या मुठीत ना मावताना
    मिळे ते साठण्याची हाव कशाला ।।

    जे नाही ते दाखवण्याचा
    हा खोटा ध्यास कशाला
    जे नसतंच कधी आपलं
    ते कुणा देण्याचा भास कशाला ।।

    देवाच्या असीमतेला बंदिस्त गाभारा
    माणसाच्या नग्नतेला वस्त्रांचा डोलारा
    एकल्या प्रवासाला हा नात्यांचा पसारा
    असतं ते झाकण्याचा अट्टाहास कशाला ॥

    माणसाच्या मातीला हा वास एकला
    वेगळेपणाचा वेडा आटापिटा कसला
    जीवनाच्या क्षणभंगुर व्यर्थतेपुढे
    जगण्याचा आकांत, हव्यास कशाला ।।

    जन्मजन्मांतरीच्या किती त्या शपथा
    दुष्मनी पिढ्यापिढ्यांची मिथ्या
    परीक कुणा आसभास ना कसला
    ना ही शाश्वतता पुढील क्षणाला ॥

    एकमेकांच्या भावविश्वांना
    जखडून मापण्याचे दंड कशाला
    संपायचीच असतात जर सारी
    बांधावी नाती उदंड कशाला ॥

    तोटक्या आयुष्याच्या तुकड्यावर
    उभारुन अहंतेच्या उंच हवेल्या
    एकमेकांना तुच्छण्यासाठीचा
    हा थाटमाट बडेजाव कशाला ।।

    क्षणभंगुरतेला नजरेआड सारणाऱ्या
    खोट्या साऱ्या समजूती कशाला
    नश्वरतेला चिरंतन जपण्याचा
    सत्याचा एवढा अपलाप कशाला ॥

    जन्माचा आनंद, मृत्यूचा शोक कशाला
    पुनःपुन्हा चक्राच्या त्या फेऱ्या कशाला
    विरंगुळ्याच्या मृगजळाला सोडून
    सत्याचा का नाही ध्यास आम्हाला ॥

    - यतीन सामंत

  • विरोघांत मुक्ति

    भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती ।
    परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।।

    लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा ।
    जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।।

    झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा ।
    तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।।

    प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही ।
    होऊन गेले तेच प्रभूमय, सतत त्याचाच ध्यास घेई ।।

    रोम रोम तो शोधत होता, कोठे लपला आहे ईश्वर ।
    भक्ति असो वा विरोध असो, तन्मयताच करी साकार ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क – ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • स्वातंत्र्यदिन-गीत – (२) : सुंबरान मांडलं ऽ

    स्वातंत्र्याच्या वाढदिवशीं सुंबरान मांडलं ऽ
    आजपुरतं आनंदाला आवतान धाडलं ऽ ।।

    रोज-रोज रडन्याचा कट्टाळा आला रं
    येका दिवसापुरतं दु:ख खोलखोल गाडलं ऽ ।।

    आयतं मिळालं म्हनुन, किंमत न्हाई रं त्याची
    ठाऊक हाये कां रं, रगत किती सांडलं ऽ ?

    धर्माच्या कुर्‍हाडीनं आईचं तुकडं कां ?
    सांग की रं, कशासाठी भाऊ-भाऊ भांडलं ऽ ?

    जातपात अन् जमात, वाढतात अंतरं ऽ
    आरक्षन हें कारन, लहान-मोठं तंडलं ऽ ।।

    कोन जाइल खड्ड्यात, अन् वरती राहील कोन ?
    आपनऽच पडूं , जिथं आपनऽच खांदलं ऽ ।।

    देश किती जाइल पुढं, करा इचार, खरा इचार
    जर समदं याच्यापुढं एकोप्यानं नांदलं ऽ ।।

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • अर्जून दुर्योधन कृष्णाकडे

    दोघेही येती एकाच वेळीं
    श्रीकृष्णाच्या भेटीला
    अर्जून उभा चरणाजवळी
    दुर्योधन बसत उशाला...१

    प्रथम दर्शनी नेत्र उघडता
    नजर गेली अर्जूनावरी
    प्रभूकडे तो आला होता
    आशिर्वाद त्याचे घेण्यापरी....२

    दुर्योधन दिसे बघता पाठी
    अहंकाराने होता भरला
    मदत करण्या युद्धासाठी
    विनंती करि तो हरिला....३

    युद्धामध्ये भाग न घेई
    सांगेन गोष्टी उपदेशाच्या
    परि सारे त्याचे सैन्य जाई
    लढण्या दुसऱ्या बाजूच्या...४

    विश्वास होता सैन्यावरी
    दुर्योधन मागतो अनेक
    आशिर्वाद हवा होता
    अर्जून निवडतो एक...५

    निवड करूनी श्रीकृष्णाची
    विश्वास येई स्वत:वरी
    अस्तित्व शक्ती जेथे प्रभूची जयश्री जाईल कशी दुरी...६

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मुक्तीसाठीं

    रुजला पाहीजे विचार मनांत
    सारेच प्रभुचे असे ह्या जगांत

    जो वरी आहे मी माझे येथे असे
    त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे

    स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
    मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे

    बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
    प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे ।

    परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१

    आपण कर्म केलेले आपणचि भोगतो ।

    फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२

    आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना ।

    खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३

    इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं ।

    सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४

    शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची ।

    नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • निसर्गाचे मार्ग

    आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे

    त्या वाटेवरी चालत रहा, आवाहन त्याचे.....१

    चालत राहती जे जे कुणी, त्यावरी विसंबूनी

    यशस्वी होती तेच जीवनी, समाधान लाभूनी....२

    कर्ता समजूनी काही काही, अहंकारी होती

    सुख दु:खाच्या चक्रामध्ये, तेच सापडती....३

    भटकत जाती भिन्न मार्ग, काही कळापरि

    परिस्थितीचे चटके बसता, येती वाटेवरी....४

    हिशोबातील तफावत ही, दु:खाचे कारण

    नजीक जाता आखल्या मार्गी, सुखी होई जीवन....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दूरवर गगनी उडत निघाली…

    पक्ष्याचे एक लहानसे पिल्लू आपल्या आईशी बोलत आहे अशी कल्पना करून,----!!!!

    दूरवर गगनी उडत निघाली,
    सगळ्या पक्षांची माला,
    आई, झुंजूमुंजू झाल्यावरती,
    उडू दे ग लांब मला,---!!!

    त्यांच्यासवे फिरेन आकाशी,
    पाहेन रंगीबेरंगी दुनिया,
    होईन मग मी खूप आनंदी,
    विशाल उंच आभाळात या,--!!!

    निळ्या काळ्या ढगांवरती,
    कसे स्वार होऊनिया,
    पक्षी सारे माग काढती,
    उंच गगनात जाऊन या,--!!!

    आपले मोठे पंख पसरुनी,
    जवळ घेऊन आपुल्या पाया, अमर्याद नभा तोंड देती,
    तयार मीही धाडस करण्यां,--!!

    तीक्ष्ण नजरा, ताकद पंखी,
    सावध राहून हालचाल करता,
    जेथे कुठे माळ रानां उतरती, चाणाक्ष ते शत्रूस जोखता,--!!!

    नागसापांची आपल्याला भीती, पाण्याजवळ दक्ष राहता,--!!!
    माणूस निष्ठुर जाळे टाकी,
    करत कैद बघ भाईबंदा,--!!!

    जाण मला या सगळ्याची,
    दक्ष अन् सतर्क राहता,
    मी तर तुमच्या पुढील पिढी, चिमुकला तरी हुशार असतां,--!!

    © हिमगौरी कर्वे.