दगडात देव, माणसात भेटला
नाशवंत देह, आत्मा कुणी पाहिला ---(!)
सत्कर्म जगतचं राहते
तस्विरी टांगल्या भिंतीवर
नर्क काय अन स्वर्ग काय?
ठायी माणूस भूलोकी
आस वैकुंठाची
गिनती कशाला पाप पुण्याची
आयुष्य पुरे कर्माचे भोग भोगायला
दोर तुटता आयुष्याची
तडपला आत्मा, देहा वाचुनी
दगडात देव, माणसात भेटला
आत्मा अमर, देह मातीत मिसळला ---(!!)
वारीत शोधती हरी
सावळ्या विठू -रुक्मिणी परी
आई बाप घरी
पंढरीचा पांडुरंग, चंद्रभागी तीरी
राहुटी राहूळी
कधी बांधावर पाहिला
भजनात ऐकला
कणाकणात वसला
भगवी पताका खांद्यावर
वारीचा वारकरी दिसला
दगडात देव, माणसात भेटला
देही मानवी, देवपण अवतरला ---(!!!)
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणार्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
आभाळीच्या देवराया
कां ? पेरितोस रे माया
अवचित येसी, घेवूनी जासी
कां ? रुजवितोस रे माया
कां ? निर्मिलास रे निसर्ग
उध्वस्त क्षणात सारे व्हाया
निष्ठुर करिसी तू पंचभूते
कुठेच न उरे आसरा जगाया.
कां ? जाळलिस रे लंका
कां? बुडविलिस द्वारका
तूच रे निर्माता अन त्राता
तूच आभाळीचा देवराया
चैतन्य तुझेच रे हे सारे
घाल रे तुझीच पाखरमाया
निर्बुद्ध जरी मी हा पामर
शरणागत येईन तुझिया पाया
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०६.
९ - ४ - २०२२
श्रीरामा, घन:श्यामा,sssss---घनघोर या काननी,
किती पुकारु तुमच्या नावा,ssss-
लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,--!!! .
अयोध्येस परतल्यावरी,
बसले मी राणीपदी,
आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,--
त्यातच आणखी गोड बातमी,
स्वर्गच दोन बोटे राहिला,--!!!
कुणाची नजर लागली,
ग्रहस्थिती विपरीत फिरली,
तुम्ही का सोडले मज रानी,
जावे कुठे एकाकी मी आता,--!!!
मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी राहिली,
असे काय घडले सांगा तरी,
काय चुकले माझे, पुरुषोत्तमा--!!!
या रानीवनी मी एकटी,
काट्यांत कोवळी कळी, हिंडताना-- भरकटलेली,
या भयानक अरण्यी,
नाही मज कुणीच त्राता,--!!!
कुळाचा आपुल्या वंश पोटी,--
जीव वाढे, माझिया ओटी,--
पतीने पण सोडल्यावरी,--
काय सांगू त्या लेकराला,-!!!
उद्ध्वस्त सीता, उध्वस्त जानकी उध्वस्तताच या तिन्ही लोकी,
कुठले राज्य कुठला पती,
अर्थच जीवनात न राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे©
बरसत, बरसत ये रे घना
चिंब चिंब भिजव रे मना
आसक्त,अधीर प्रीतभाव
बरसत, बरसत ये रे घना
सांग कसे, मीच रे सावरुं
हे निळ्या सावळ्या घना
तुझ्यात रे स्पर्षतो सावळा
बरसत, बरसत ये रे घना
हेच गगन, हीच वसुंधरा
उताविळ, मिलना रे घना
तूच रे, चैतन्य या सृष्टिचे
ये सजवित ब्रह्मांडा रे घना
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४८
७ - ६ - २०२२.
तेजोनिधीच्या आगमनाने,
निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,---- डोकावती विस्तीर्णजलाशयी,---
आपुला रंग लेऊनी पाणी,-----
कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व" अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,--
निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर "निळाई", वर्षा ऋतूत जेव्हा 'बरसला' तुम्ही,
तुमच्यातील पाणीच आले खाली,
निळे--शाssर रंगले माझे पाणी,
किनार्यावर लोक हिंडून बघती, जलभरले' "मेघ" कुठे असती,--
उत्सुकताही त्यांना केवढी,-?
माझ्यात तुमचे प्रतिबिंबदिसे,
भास्करच त्यांना उत्तर देई ,
थेंब -थेंब पारदर्शक होती,
ही जादू सगळी सूर्यप्रकाशाची,
सोनेरी रंगाचा मुलामा घेऊनी,
पाणी कसे वर बघत असे,
विलक्षण रंगसंगती साधती किनाऱ्यावरती बाजूची झाडे,
हिरवागार रंग कंच लेवुनी, भोवती उभी कशी हिरवाई, आपल्या अद्वैताचे साक्षीदार ते,
शिवाय किनाऱ्यावरची रेती,-----
हिमगौरी कर्वे.
|| हरी ॐ ||
आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची,
संतांची आणि देशभक्तांची !
विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची,
उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची !
अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला,
बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा !
नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची
समलैंगिक संबंधींची !
घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना,
तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत कायद्याला !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली,
माणूसच स्वत:चा बुद्धिभेद करू लागला !
काय त्या पुढारलेल्या चारपाच राष्ट्रांनी
समलिंगींसाठी कायद्यात केले बदल !
पण माहित नाही त्यांना
भविष्यात काय वाढून ठेवले आहेत बदल !
नुकसान आहे स्वत:चे,
राष्ट्राचे, मानवतेचे,
भविष्यात राष्ट्राला
कारण नाही कुटुंबनियोजनाचे !
असे कसे काही शहाणे सुरते,
वागतात बुद्धीभेदाने पछाडल्यासारखे?
हेच का देशप्रेम आणि भक्ती?
जगदीश पटवर्धन, दादर
या कातरल्या क्षणांना,
सय तुझी येते,--
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,---!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
स्थिर आहे जग म्हणूनी,
अस्थिर आम्ही जगू शकतो ।
अस्थिर आहे जग म्हणून,
स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।
पोटासाठी वणवण फिरे,
शोधीत कण कण अन्नाचे ।
थकला देह विसावा घेई,
कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।
धरणी फिरते रवि भोवतीं,
ऋतूचक्र हे बदलीत जाते ।
जगण्यामधला प्राण बनूनी,
चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।
पूरक बनती गुणधर्म,
स्थिर वा अस्थिर ते ।
विश्वचक्र फिरवित राहणे,
निसर्गाचे तत्वची असते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti