‘गुरु शिवाय मोक्ष नाही’ जेंव्हा जेंव्हा काही अध्यात्मिक चर्चा ऐकल्या, वाचल्या सर्वातून हा एकच निष्कर्ष निघाला. तशी मी फार कर्म-कांड करणारी नाही.
समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
मी
त्याग केला
माझ्या सुखांचा आनंदाचा
आणि प्रेमाचाही
फक्त जगासाठी...
त्या त्यागाची
जगात किंमत
शून्य...
तू
आशेचा किरण होतीस
या स्वार्थी जगात
माझ्यासाठी...
देवालाही
साकडे घातले मी
फक्त तुझ्यासाठी
वाटते आहे आता
देवावरही लागेल
प्रश्नचिन्ह...
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
व्यथा साऱ्याच अंतरीच्या
हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें
एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।।
कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ?
कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ?
सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।।
काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी
काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ?
जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें ऐसें नव्हे !
तूं ज़री नाहींस पुढती, राहसी नयनीं तरी
तूं ज़री नाहींस ज़वळी, आठवण ज़वळी परी
राहते, राहील कायम स्मृति तुझी माझ्यासवें ।।
एकादा भेटून माझी तृप्ति नाहीं व्हायची
विकलता, त्या भेटिनें ज़ाईल वाढत हृदयिंची
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ मजला ज़वळ घे ।।
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ तूं स्वप्नांत ये ।।
- - -
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो
इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो
शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला
आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला
बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता
हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता
केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती
पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती
एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली
उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली
त्याच्या देहा भोवती जमले, सारे गांवकरी
आज शब्द जे बाहेर पडती, स्तुती त्याची करी
निच वृत्तीची पकड होती, त्याच्या देहाला
देहाबरोबर दुष्टपणा तो, नाश पावला
सुटका झाली आत्म्याची, त्याच्या हीन देहातूनी
स्तुति सुमनें उधळली गेली, हेच जाणोनी
जेव्हां कुणाचा मृत्यु होई, गुण गातो त्याचे
रुप ईश्वरी उरते जातां, वेष्टन देहाचे
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
माणसाचे तेज डोके
कसे पिकू लागले?
निसर्गात मिळे फुकट
तेच विकू लागले!
हवा होती मुक्तवावर
बंदिस्त होऊ लागली
रस्त्यावर , दुकानात
पैसा कमवू लागली!
पाणी होते प्रवाही
बाटलीबंद झाले
जारबंद संस्कृतीला
पैसे मोजू लागले!
माती तर अमापच
बघा जिथे तिथे मिळे
विटा पाडून भट्टीवर
बंगले बांधू लागले!
हवा, पाणी, मातीची
अशी चालू लूट आहे
कुरतडे उंदीर तशी
विनाशाची वाट आहे!
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.
किती रे खोड्या करशी कृष्णा
यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।
झोपू दे रे तिजला आता, ती तर गेली खूप दमूनी
दही दुधानी भांडी भरली,
काही प्याली, काही वाटली,
काही तर ती उपडी झाली,
पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
गणरायाचे पूजन करितां
मग्न झाली यशोदा माता
लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडता
फस्त करशी काही मोदक, ताटामधले तूच खाऊनी....२,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
गोपीच्या तू फोडल्या घागरी,
पळवी त्यांची वस्त्रे सारी,
दुधा तुपाची केली चोरी,
मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
खोंड्या नच लीला बघूनी,
प्रेमभावना उचंबळूनी
जाई यशोदा ती बावरूनी
डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
गिरीश लाड यांनी “जात”या विषयावर केलेले भाष्य…मनाला खुप भावले. पहा तुम्हाला ही उमगते/आवडते का ते..
Copyright © 2025 | Marathisrushti