किती तो मोह
आता तरी आवर
गरजेचं खरं काय
याचा करूया विचार
आधीची पिढी
मानी समाधान खरं
पोटापुरत जगणं
आपलं आपण बरं
एक पिळा दोरीवर
दुसरा जोड अंगावर
ठेवणीतले एखाद पातळ
खणात नसे गच्च अडगळ
नसे कधी अतिरिक्त ताण
न ऋतू बदलता वरचेवर आजार
तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न
बाळसे असे कायम अंगावर
टेकता पाठ शांत निज येई
नसे सोस अधिक मनोरंजन सुमार
पिंगळा वेळी आपसूक जाग येई
प्रसन्नचित्ती दिवसाचा हरएक प्रहर
अगदी तसे आता जगणे अशक्य
मान्य! तरी घेऊ त्यातील सार
घरातील, मनातील नकोनकोसे
मोठ्या मनाने करूया हद्दपार
वस्तू, वास्तू, धन अन माणसं
सारेच येथे आहे नश्वर
आला क्षण खऱ्या आनंदात जगूया
तेव्हाचं होईल जीवन सुकर!!
--वर्षा कदम.
प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते.
धुंद सागराच्या काठी पडे तुझी गाठ
एक एक स्वप्नांची या कशी लागली ही वाटअश एक स्वप्नांची ही असे ही कहाणी
तुझ्यावीण झालो जगती जरी मी विराणी ।।१।।
एक पाऊली तू जाता कापिते ही लाट
तुझ्यापाठी पाऊल माझे सांग कुठे जात अथांग या सागरी असती माणिके अनेक
परंतु हाती माझ्या येती शिंपले नि शंख ।।२।।
तुझ्या येई मागे जरी मी कंपितो ही दीप
तुटोनिया जरी हे जाती युयुत्सुची पांखअथांग हा सागर खाली अनंत हेचि विश्व
जाणण्यास अधीरी जरी मी गूढ तुझे स्वत्व ।।३।।
दावी एकदा तू मजला तुझे गोड रूप
तुझ्यावीण नाही मजला अन्य काही सूखएकदाची सागरतीरी एकदाची दावी
विश्वरुप घेण्याआधी तूर्त तुझी काळी ।।४।।
-- जयंत वैद्य
हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे
लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१
लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी
धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२
काही हवेसे वाटू लागले एके दिवशी
विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३
आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती
गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४
तगमग करूनी तेच मिळविता आज
कल्पना विलास होता तो झाली ही समज....५
खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती
स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती....६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
इवलेसे लहानसे
होते विश्व ते छानसे
चार भिंतितले कसे
ते मोरपंखी जसे।।१।।
मनमानी वागायचे
हवे तेव्हा उठायचे
दिस कोड कौतुकाचे
पिलू आई-बाबांचे।।२।।
भोकाड पसरायचे
लोटांगण घालायचे
ढोंगी बगळा व्हायचे
खोटच रडायचे।।३।।
पोट दुखतं म्हणावे
घरी खुशाल लोळावे
आईच्या मागे फिरावे
अभ्यासाला टाळावे।।४।।
बालपणी रमतांना
गमती आठवतांना
खुप खुप हसतांना
गंमत वाटतेना।।५।।
सौ.माणिक शुरजोशी
गणित शिकलंच आहेस तू,
तर बेरीज वजाबाकी करू.
त्या क्षणांची फक्त बेरीज करू
अन या क्षणांची वजाबाकी करू.
चन्द्रासमोरच्या ढगांना जरासे
प्राजक्ती कळ्यांनी बाजूला करू
दिव्यावरच्या या काजळीला
गुलाबी पाकळ्यांनी बाजूला करू.
आंदोलने विसरून जाऊ सारी
अन क्रांतीचा मार्ग प्रशस्त करू
शहारल्या कमलदलांना या
दवांनीच आता निर्धास्त करू.
चल सखे, पुन्हा एकदा जगू या
चंद्र-चांदण्यांशी गप्पा करू.
अन या लखलखत्या चंद्राला
त्या कोजागरीची आठवण करू.
मी काय म्हणतो आपण ना,
भागाकारच सरळ वजा करू.
बेरजेची साथ घेऊ मोठी
अन गुणाकार आपलासा करू.
कच्चं असलेलं माझं बीजगणित
आपण दोघं मिळून पक्कं करू
गणित शिकलंच आहेस तू,
तर एवढं आपण नक्की करू.
©️ चन्द्रहास शास्त्री
शेवट असावा असा. नुकताच दारात .
कवडसा आलेला जसा.
झरकन नाहिसा होतो तसा...
शेवट असावा असा पहाटे गवतावरचा दवबिंदू असतो जसा.
एका क्षणात नाहिसा होतो तसा..
शेवट असावा असा. आळवावरचा थेंब
असतो अगदी जसा.
मोती मोती म्हणेपर्यंत घरंगळून जातो तसा.
शेवट असावा असा. पावसाच्या रेशिम.
धाग्यासारखा. ओंजळीत न येताच
वाहून जातो तसा..
शेवट असावा असा. प्राजक्ता सारखा.
आपल्या नकळत टपकन.
पडून जातो तसा....
–सौ. कुमुद ढवळेकर.
या जगी कलियुगी संसारात
जगणे झाले केवळ व्यवहारी
जाणिवा , भावनांच्या शुष्क
ऋणानुबंधी नातीही व्यवहारी..।।१
आस्था , जिव्हाळा हरविला
जो , तो स्वस्वार्थातची रमला
मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे
प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..।।२
मने गोठलेली , रक्तही गोठलेले
सत्य ! धनदौलत ,भौतिकसुख
क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे
जगणे जाहले सारेच व्यवहारी..।।३
केवळ पैसाच , मूल्य जीवनाचे
विवेकी , सद्गुणी , सात्विकता
संस्कार निष्फळ , या कलियुगी
जगणे स्वार्थी , जाहले व्यवहारी..।।४
निस्वार्थी प्रेमास्था कुठे शोधावी
शब्द ,स्पर्श, हास्य सारेच बेगडी
शाश्वत मैत्रभावही आज दुर्मिळ
मुसमुसती अंतरी , स्पंदने बावरी..।।५
©️वि.ग.सातपुते.(भावकवी)
? ( 9766544908 )
*रचना क्र. ७५ / ११ - ६ - २०२१*
सोडूनी मज गेलीस तू आता मी कसे जगावे
वाटते तव आठवणीत जीवन हे संपवावे ।
एक एक क्षण प्रेमाचा का आठवणीत रहावा
ह्रदयातील त्या आठवणींना अश्रुंत संपवावे ।
ठेवले जपून ह्रदयात मी त्या मधूर क्षणांना
का त्या मधूर क्षणांना पुन्हा पुन्हा मी आठवावे ।
आसमंत चांदण्यांनी झगमगून गेलाय येथे
एका चांदणीसाठी मग मी का रुसून बसावे ।
कैफात नशेच्या विसरतात वेदना दुःख कोणी
माझ्याच वेदनेला मी कवटाळूनी का रहावे ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
दि. ५ आक्टोंबर २०१८
Copyright © 2025 | Marathisrushti