(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बघता तुला प्रिया रे ,

    बघता तुला प्रिया रे ,--
    जिवा बेचैनी येते,
    कासाविशी होता हृदयी,
    आत मोरपीस हलते,--!!!

    विलक्षण ओढ तुझी,
    काळजाला किती छळते,
    मूर्त माझ्या अंतरीची,
    अढळ अढळ होतं जाते,--!!!

    स्पर्श होता तुझा सख्या,
    माझी न मी असते,
    बाहूंत तुझ्या विसावण्या,
    किती काळ मी तरसते,--!!!

    तुझ्यातच सारे विश्व माझे,
    जगही तोकडे भासे,
    तुझ्याचसाठी राजसा,
    मन्मनीचा चकोर तरसे,--!!!

    उषा आणि संध्या,
    आपले रंग उधळती,
    प्रेम रंगाचाच वर्षाव,
    भास्करावरती करिती,--!!!

    रात्र येते चंदेरी ती ,
    जेव्हा जवळ तू असशी,
    जिवापाड जाऊन तूही,
    प्रीत" माझ्यावर करशी,--!!!

    धुंद रात्रीची मदमस्त किमया,
    प्रेमात नखशिखांत नहाते,
    आभाळीची चटोर चांदणी,
    प्रेम--लीलेसाठी धडपडते'--!!!

    हिमगौरी कर्वे©

  • हिरव्या पानात लगडलो

    हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो,स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या,
    गोऱ्या रंगावरी आमुच्या,
    जनहो नका हो भाळू,
    टपोरेआकार पाहुनी,
    मोहून नका हो हाताळू,
    कौमार्य फुलते आमचे,
    दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद,
    मगच उमलेल फूल हे सुंदर ,
    येईल मोगऱ्याला बहर,
    स्पर्श न करता नेत्रसुख घेता,
    घ्या हो आमुचा आस्वाद,
    किती थोडे आमचे जीवन,--
    बघता बघता येते मरण,--!!
    फुलून कोमेजणे केवळ,
    एवढेच काम या धरतीवर,
    अशा अल्प जीवनात,
    भरून राहतो सुगंधात,
    आमचा असून वाटतो,
    येईल त्याला या जगात,
    स्त्रीच्या लाडके आम्ही ,
    नका पुरुष हो इतके जळू*,
    आमच्या सुगंधेभारुन, त्याही प्रेम लागतील करू,--
    फुले मोगऱ्याची देऊनी,
    आपल्या प्रेमा पटवती,-!
    असे मिलन घडवतो,
    अहो,भाग्यवानकिती,?

    हिमगौरी कर्वे.©

  • खरा एकांत

    निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।

    बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।१।।

    त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।

    चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।२।।

    खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।

    समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।३।।

    एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।

    अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पुरेसं

    कालपर्यंत
    पावसाच्या एका सरीसाठी
    डोळे आभाळाकडे लागले होते.
    आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
    मनात भीतीचं वादळ उठलं आहे.

    आयुष्य इतकंच शिकवतं
    अभाव दुःख देतो,
    पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.

    जिथे "पुरेसं" थांबतं,
    तिथेच समाधान फुलतं.
    जिथे हव्यास वाढतो,
    तिथे आनंद हरवत जातो.

    भाकरी पुरेशी असेल,
    तर ती अमृताहून गोड लागते.
    छप्पर पुरेसं असेल,
    तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.

    श्रीमंती म्हणजे
    अफाट संपत्ती नव्हे.
    "आहे ते पुरेसं आहे,"
    असं मनापासून म्हणता येणं
    हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.

    कारण...

    अति पाऊस पूर आणतो,
    अति ऊन दुष्काळ घडवतो.
    निसर्ग असो वा आयुष्य
    "पुरेसं" हाच सुखाचा खरा समतोल असतो.

    ज्याला पुरेसं कळलं,
    त्याला समाधान लाभलं.
    आणि ज्याला समाधान लाभलं,
    त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • स्वप्न आणि जागेपण

    एक ती झोप स्वप्न बघत राही
    शिणवून शरीर ताप जीवास सुख देई

    स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
    जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा

    एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
    भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां

    स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
    नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पुन्हा नवी झेप घे

    पुन्हा नवी झेप घे

    मित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.

  • मला हसावे की रडावे हेच कळत नाही ?

    ही वात्रटीका आहे , लिहावी वाटली ,पटली म्हणुन लिहीली.

  • समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र

    समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र –

    निश्‍चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू

    अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी ॥

  • आठवण

    अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली
    योग्य वेळ ती येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली

    शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी,
    विजयी झाले ऋणाणू बंधन, बांधले होते हृदयानी,

    उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा
    स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा

    मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक सुखांच्या आठवणी
    जगण्यासाठी उभारी देतील, शरीर मनाच्या दु:खी क्षणी


    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सोड मागणी

    मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही

    भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई

    एका मागून एक मिळे मागणी होता त्याची

    निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची

    जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी

    कशांत दडले सुख उमज येईना मनीं

    देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी

    समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी

    ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे

    न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com