उडून गेली दूर दूर तू
झेप घेउनी आकाशी
बघू लागलो चकीत होऊनी
पंखामधली भरारी कशी
नाजूक नाजूक पंखाना
आधार होता मायेचा
चिमुकल्या त्या हालचालींना
पायबंध तो भीतीचा
क्षणात आले बळ कोठून
विसरुनी गेलीस घरटे आपुले
बंधन तोडीत प्रेमाचे
आकाशासी कवटाळले
कधीतरी उडणे, आज उडाली
बघण्या साऱ्या जगताला
किलबिल करून वळून पहा
दाणे भरविल्या चोंचीला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
झापर कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई
चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
झापर कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई
चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
पतीराज पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
हसत जगावे हसत मरावे.
क्षणक्षण, धुंद मुक्त जगावे
स्वसुखातची रमता रमता
अंतरात विवेका जागवावे....
मी जे वागतो, तेच बरोबर
असे भ्रामक निष्कर्ष नसावे
जीवात्म्याला त्या मन असते
कां? उगा कुणाला दुखवावे....
अंती हिशेबात तोलणाऱ्या
चित्रगुप्ताला सदैव स्मरावे
संचित सत्कर्माचे, चिरंजीव
मनांधाराला, उजळीत रहावे....
माणसा, माणसात देव पहावा
कल्याणकारी अदृष्या जाणावे
अस्तित्व, श्वासांचेही बेभरोसी
मनामनाला नित्य जपत रहावे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २६१
१५/१०/२०२२
उगवले होते जंगलात ते उंच माळावरी
रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी //
जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी
खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी //
वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे
ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें //
वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा
स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा//
कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला
बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला //
खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते
आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते//
डेरेदार डौलदार भरगच्च भासला तो आता
परि स्वातंत्र्याच्या जीवनाला कात्री लागून जाता //
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@Gmail.com
कोण लागतात माझे,
नाते ते ठाऊक नाहीं,
देऊनी जातात मात्र,
बरेच मजला काहीं ।।१।।
विठ्ठल- रामाचा नाद,
गुंजन करितो येथें,
पवित्र वातावरण,
येण्यानी होवून जाते ।।२।।
देवाण घेवाण आत्म्याची,
आपसामध्यें चालती,
शब्द फुलांची गुंफण,
त्वरीत होऊन जाती ।।३।।
फुले देऊनी मजला,
हार गुफूंन घेतात,
दोघे मिळूनी तो हार,
प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।
अदृश्य असले नाते,
असावे दोघांमध्ये,
भाषा आत्म्याची जाणतां,
मन नाचते आनंदे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
वेळ येता उकलन होते, साऱ्या प्रश्नांची
जाणून घ्या हो थोडे तुम्ही, रीत निसर्गाची...१,
जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,
वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,
प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे
कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,
काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे,
उकलन होवून गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,
कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला
हीच वेळेची किमयासारी, कशी कळे कुणाला....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जन्मच जर सोसण्यासाठी, तर दुःख कशाचे करावे,--?
आयुष्याला तारण्यासाठी,
का सुखाचे आधार घ्यावे,--?
इथे कुणी ना आपल्यासाठी, कळवळून मग काय मिळवावे,
फक्त मग जगण्यासाठी,
शरीरही का झिजवावे,--?
थोडा उजेड दिसण्यासाठी,
कितीदा डोळे मिटून घ्यावे,
पार अंधारा करण्यासाठी,
सतत सारखे ठेचकळावे,
जखमी मन लपवण्यासाठी, जिद्दीला किती उभारावे,
घायाळ जिणे झाकण्यासाठी, डोळेझाक करत राहावे,
येतो तो वार करण्यासाठी,
कसे त्याला सारखे आवरावे,
हात उठतो थोपवण्यासाठी, अनामिक ओझे किती पेलावे,
जो तो फक्त आपल्यासाठी, मतलबाला कसे *आंकळावे,
अशा नि:स्वार्थी मनासाठी,
केवढे आणि किती झुरावे,-?
© हिमगौरी कर्वे.
‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
मी बसलोही
क्षीण तुझा कर करीं घेउनी
सुखावलोही .
नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
काय व्हायचें होतें
‘उद्या’च येथुन कायमचें तुज
दूर ज़ायचें होतें.
- - -
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता
हिच्या आठवणीत )
-- सुभाष स. नाईक
दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी मा.सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली.
Copyright © 2025 | Marathisrushti