निसर्ग नियमें दया प्रभूची,
सदैव बरसत असते ।
दयेचा तो सागर असता,
कमतरता ही पडत नसते ।।
अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,
झेलून घेण्या तीच दया ।
लक्ष्य आमचे विचलित होते,
बघून भोवती फसवी माया ।।
उपडे धरता पात्र अंगणीं,
कसे जमवाल वर्षा जल ।
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,
निघून जाईल वेळ ।।
भरेल भांडे काठोकाठ ,
केवळ धरता योग्य दिशेने ।
टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची,
अशीच केवळ शुद्ध मनानें ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 3, 2015
बागेतील तारका
June 1, 2013
जेंव्हा ठरले गावी जाणे हूर हूर होती मनी
बराच काळ गेला होता आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये राहिलं कसे टिकूनी
चकित झालो बघुनी सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका, मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता पूर्णेच्या परिसरांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 30, 2020
असा एकटाच
जीव श्रमलेलेला
असह्य वेदनां
श्वास कोंडलेला
अंतरी कोलाहल
अश्रु ओघळलेला
उद्वेग भावनांचा
विचार बावरलेला
मन दिशाहीन
आव्हान विवेकाला
कसे सावरावे
अशांत मनाला
भौतिक सुखाचीच
आसक्ती जीवाला
निर्मळ सुखसौख्यदा
त्यजीता षडरिपुला
सांज रेंगाळलेली
माहोल गहिवरलेला
अंती लोचनी
सारा गोतावळा....
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १९९
१४/८/२०२२
September 16, 2022
दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।।
येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।।
आज अशी तु उडुनी पाखरा पंख तुझे पसरले काळ चालला त्यास पकडण्या झेपावित चालेपरंतु तुझिया नेत्रा येईल जळ जेव्हा डवरून टाक अश्रू हे झोळी माझ्या जा तर उडून फिरुन
-- जयंत वैद्य
October 4, 2025
सत्य, अहिंसा, साधी राहणी,
महात्मा गांधींची विचारसरणी
तत्वांची सगळ्या किती हेटाळणी,
कोण आणतो सांगा आचरणी, --!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
"अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती"चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,--!!!
हिमगौरी कर्वे.
May 13, 2019
September 17, 2013
अस्तित्व तुझे सभोवार
सर्वत्र तुझाच स्पर्शभास
वात्सल्य तुझे लडिवाळ
माते तुझाच अंतरी ध्यास.....
तुझ्याच कुशीत स्वर्गसुख
पान्हा, तुझा अमृती घास
तव आशीष कवचकुंडले
आठवे तुझे रूप निरागस.....
सत्य! तुच जननी सृष्टिची
निरपेक्ष तुझाच गे सहवास
आज अंतरी अस्तिव तुझे
मज सावरिते क्षणाक्षणास....
साक्षात, तुच गे देवदेवता
तुझ्या, उदरी ईश्वरीय वास
मातृत्व! एक ब्रह्म शुचिता
लाभते जन्मी भाग्यवंतास....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४१
१९/९/२०२२
September 25, 2022
जसे रंग फुलांफुलांचे
तसेच रंग मनामनांचे..
नित्य उमलुनी गंधाळावे
दरवळावे श्वास सुखाचे..
मनफुलांचे नाते आगळे
स्पर्श तयांचे मोरपीसांचे..
निर्माल्यातही सुख आगळे
जीवन हे, भाग्य भाळीचे..
जगण्याचे हे क्षण कृतार्थी
संचित सारे हे गतजन्मांचे..
-- वि.ग.सातपुते. (भावकवी )
9766544908
रचना क्र.२३७
१६ /९/२०२२
September 21, 2022
November 20, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti