(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • अनामिक हुरहुर

    सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली
    जरी निश्चिंती, मी सदैव जगलो...

    तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक
    स्मरणगंध सारे उसवित राहिलो...

    उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले
    धागे सारे शब्दात गुंफित राहिलो...

    प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले
    गीतात, नित्य आळवित राहिलो...

    तरीही अजुनही हुरहुर अनामिक
    आत्मारामा अंतरी शोधित राहिलो...

    हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर
    मनास माझ्या समजावित राहिलो...

    साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी
    तीलाच स्मरत मी गंधाळत राहिलो...

    --वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र. १८५

    २/८/२०२२

  • अज्ञानात सुख असते…

    जगाला कधीच
    न पडणारी कोडी
    मला पडलीच नसती ...
    ती कोडी सोडविण्यात
    माझ्या आयुष्याची वर्षे
    खर्ची पडलीच नसती...
    भूत भविष्य वर्तमानाची भुते
    माझ्या मानगुटीवर
    कधी बसलीच नसती...
    देवाच्या अस्तित्वाचा शोध
    घेण्याची गरज मला
    वेड्यागत भासलीच नसती...
    माझी नजर फक्त सुखावर असती
    तर दुःखाची धग मला
    कधी लागलीच नसती ...
    प्रेमातील वासना आणि
    वासनेतील मुक्ती शोधली नसती
    तर मला खरे प्रेम शोधण्याची
    गरज कधी जाणवलीच नसती....
    भल्या भल्यानां न सुटणारी कोडी
    मला सहज सुटलीच नसती
    निरर्थक जीवनातील निरर्थकता
    मला कधी पटलीचं नसती...
    भविष्याच्या उदरात शिरण्याची
    माझी हिंमत झालीच नसती
    भविष्यातील कोडी मला
    स्पष्ट दिसलीच नसती...
    माझ्या सभोवताली स्वैराचार
    बोकाळला असताना
    माझी समाधी लागलीच नसती ...
    मी अज्ञानी असतो तर जगाला
    उत्तरे देण्याची वेळ
    माझ्यावर आलीच नसती...
    माझ्या मेंदूत सारी
    ज्ञानाची भंडारे नसती
    तर अज्ञानात माझ्या भोवती
    सुखे नांदली असती...

    ©कवी - निलेश बामणे

  • मराठी माणूस

    मराठी माणसाची
    रित लय भारी
    त्याच्या वागण्याची
    रितच कांही न्यारी

    ........कुणी म्हणतसे
    .......त्याला खेकडा
    .........तर कुणी म्हणे
    ........हा अपुला बापडा

    करीतसे गोष्टी
    फार मोठ्या मोठ्या
    धाव असे कुंपनापर्यंत
    फार छोट्या छोट्या

    ..........व्यवहार करताना
    ..........भावनेला तो मध्येमध्ये आणि
    ..........फायद्याच्या गोष्टींवर
    ..........सोडून देई पाणी

    भावना जेव्हा आड येई
    तेव्हा पैसा त्याचा जाई
    पैशाला पैसा खेचतो
    याची जाण त्याला नाही

    ...........गरीबीतच राहण्यास
    ...........मानितसे धन्यता
    ..........मोठ मोठ्या गप्पा मारून
    ...........स्वत:ची फसवणुक करीतसे अन्यथा

    म्हणूनच मराठी माणूस
    दिसत नसे व्यवसायात
    इमाने इतबारे सेवा करून
    मान मिळविण्याचा प्रयत्न करीतो
    धनिकांच्या दप्तरात

    ............राहणार नाही काय मागासलेला
    ............मग तो आर्थिक व्यवहारात?
    ............कसा बरे तो दिसू लागेल
    ............व्यापार उदिमात?

  • उपयोगीता हेच मूल्य

    चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण
    दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,

    फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी
    पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,

    चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम
    खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,

    वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती
    तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गेला आस्तालं सुरयं……

    ना.धो.महानोर सर भावपूर्ण श्रद्धांजली

    गेला अस्तालं सुरयं,काळवंडलं आभाळं
    जिवं झाला कासावीसं,झाला काळुख आंधारं
    उजेडाची हि लेखनं,कशी रूकली रूसली
    आज सरोसती माय,हुंदका फोडून रडली
    झाली पोरकी कविता, रानी आंधार आंधारं
    कुठं शोधु तुलं आत्ता,कुठं गेलासी सोडूनं
    युगां पडलं भगदाडं,झाला युगांत युगांत
    वलावल्या पापण्यां त्या,वघळत वघळती
    अवकाश मोठा झाला,त्यालं तुहीच गरजं
    ये रे आता परतुनी,उजवं सरू मायची कुसं

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079

  • गाण्याच्या कहाण्या – एक मोहब्बतवालं गाणं

    आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे !

  • जन्माला आलो तर

    जन्माला आलो तर
    मरणं ही ठरलेलं आहे,
    कुणाचं लवकर जाणं
    हे विधिलिखित आहे
    कोण कसं लवकर गेलं
    ही हळहळ व्यक्त होते,
    आयुष्य असेल थोडं
    तर नशीब ही रुसते
    लहान मोठं वय ह्याचा
    संबंध मग राहतं नाही,
    मरणदारी नौका जाणं
    सत्य मग टळत नाही
    किती करा टेस्ट आणि
    किती खा गोळ्या,
    हृदय बंद पडेल कधी
    न कळेल वेळ तेव्हा
    कोण न ह्याला अपवाद
    न कोण ह्यातून सुटला,
    क्षण भंगुर आयुष्य हे
    न रहावा कधी राग रुसवा
    मी ही जाईल अशी अचानक
    हृदय हलकेच बंद पडता,
    काव्य हृदयावर करता करता
    धडधड वाढेल मग तेव्हा
    नसेल भरोसा कसला तो
    कोण जाईल सोडून केव्हा,
    आठवणी उरतात मागे साऱ्या
    ह्यालाच उत्तरायण म्हणतात
    -- स्वाती ठोंबरे.
  • विश्व सारे निर्मिलेस

    विश्व सारे निर्मिलेस,काय असावे तुझ्या मनात,
    हेतू असावा का निरलस,
    खेद वाटे आज अंतरात,---!!!

    ग्रह गोल ब्रम्हांड तारे,
    निसर्ग चराचर वारे,
    आज दिसती सारे भोगत, सातत्याने जणू दिनरात,--!!!

    प्रदूषणे पृथ्वीला घेरत, मनुष्यप्राण्यात फक्त स्वार्थ, अहंकार कधी न जात,
    सांग ठेवले काय दुनियेत,--?

    लतावेली, झाडेझुडपे,
    सगळे दुःखी प्राणिजात,
    समस्या सगळ्या या वेढत,
    अशात तू काय मिळवलेस,--?

    पसारा सभोवार असत,
    जिकडे तिकडे फक्त उध्वस्त, सृष्टीची फक्त वाट लागत,
    कोणते समाधान मिळवतोस,!-

    सौंदर्य देखणे निर्मिलेस,
    त्यास क्षणभंगुरतेचा शाप,
    कोणी न देई कोणास हात,
    मर्म जीवनात काय ठेवलेस,--!!

    © हिमगौरी कर्वे.

  • शरण तुला भगवंता

    वारा होता झंझावात पावसाचा माराही जोरात
    जग गेले होते तेव्हा बुडून गडद अंधारात
    कारागृहात एक तेजस्वी दिव्य बाळ जन्मले
    बघूनी आईबापांचे काळीज गलबलून गेले
    तो काळ येण्या आधीच सांभाळली ती वेळ
    पण बाळाला लागता कामा नये त्याची झळ
    पाऊस वारा विजांचा एकच होता मारा
    तरीही टोपलीतील बाळासह धावत सैरावैरा
    यमुनेलाही आला होता महा भयंकर महापूर
    त्यातून तो निर्भय चालत राहिला दूर दूर वर
    बाळाच्या पायाचा तिला झाला जेव्हा स्पर्श
    पात्रातील पापं वाहून गेली याचा झाला हर्ष
    आत्ताही ये ना रे तू याच दिव्य रुपात
    कुठल्याही घरात वा पडक्या झोपडीत
    त्याच्या दर्शनाने सगळे त्याला शरण जातील
    आमची पापं नि चुका धुवून होईल सर्व शांत
    लहर लहरपे आज है तुफान
    वो नैयावाले हो सावधान
    हे गोविंदा हे मुकुंदा संकट मे है हमारे प्राण
    रक्षा करो रक्षा करो हे दयानिधान
    धन्यवाद
    -- सौ. कुमुद ढवळेकर.
  • जागतिक दहशतवादविरोधी दिन

    सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो.