(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तीन चारोळ्या…

    १ - राजहंस

    बाकावर एकटा तो
    मागे गरीब बसतो
    तरी राजहंस आहे
    श्रेष्ठ बुद्धीत असतो

    २ - शहामृग

    आहे पंख भव्य दिव्य
    नाही उडताच येत
    देती दिलासा हे पाय
    धावण्यास बळ देत

    ३ - गिधाड

    तोंड वेंगाडती सारे
    नाव ऐकताच माझे
    स्वच्छ ठेवी परिसर
    अरे मित्र आम्ही तुझे

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • अमर काव्य

    विसरून गेलो सारे कांहीं,

    आठवत नाही मला,

    रचली होती एक कविता,

    त्याच प्रसंगाला ।।१।।

    जल्लोषांत होतो आम्हीं,

    दिवस घातला आनंदी,

    खिन्नतेचा विचार त्या दिनीं,

    शिवला नाही कधीं ।।२।।

    नाच गावूनी खाणेंपिणें,

    सारे केले त्या दिवशीं,

    बेहोशीच्या काळामध्यें,

    कविंता मजला सुचली कशी ।।३।।

    छोटे होवून गेले काव्य,

    अमर राहिले आतां ते,

    प्रसंग जरी तो मरून गेला,

    कविता जिवंत राहते ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • एक्झिट

    कधीतरी एक्झिट घायचीच ना, घेऊयात कि आरामात
    आलंय कोण इथे थांबायला, जाऊयात कि आरामात
    एक्सिट घ्यावी अशी कि कोणालाच कळणार नाही
    थांबवायचे म्हटले तरी शोधूनही सापडणार नाही
    उगाच त्रास नको कोणा,
    नकोत वाया टिपे गाळाया
    इथे प्रत्येकालाच कोण व्याप, सगळेच म्हणतात
    उचला चला उरकूयात
    कोणताही असो प्रसंग काट्यावरच सरकूयात
    आज मी गेलो... उद्या तू येणारेस
    रडतोस कशाला वेड्या सगळे इथूनच जाणारेत
    संपला जरी डाव आपला तरी मोडत नाही खेळ
    चल मी जातो आता ... माझा जात नाही इथे वेळ!!
    -- वर्षा कदम.
  • कृष्ण बाललीला

    कृष्ण कमळ-

  • बुझगावणं

    माणसाला वाटत राहतं
    पाखरं त्यांना घाबरतात
    म्हणून पिकात
    बुझगावणं उभारतात

    अाळशी माणसाच्या
    सवयी त्यांना माहीत होतात
    बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर
    पाखरं मस्त खेळत राहतात.
    छानपैकी दोस्ती करतात....

    -- श्रीकांत पेटकर

  • मदमत्त मुजोर टगे

    मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली
    फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।।

    दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं
    खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।।

    काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी
    घर पेटवून द्याया चहुंवर खड्या मशाली ।।

    माझ्यामुळेच ज्यांचा जगिं मान वाढताहे
    दाबून ओठ, करतो त्यांचीच मी हमाली ।।

    मधुनीच हात स्फुरती, पण हाय रे नशीबा !
    नाही कणा, बसे मी घालून मान खाली ।।

    तक्रार कुठे नेऊ ? मी दाद कुणां मागू ?
    चढवून सभ्य बुरखे, सारे उभे मवाली ।।

    -- सुभाष स. नाईक
    मुंबई.
    M- 9869002126.

  • जगण्यात मौज आहे

    जगण्यात मौज आहे,
    सुखदुःखाची फौज आहे,
    रिवाजांचे शासन आहे,
    रीतींचे आसन आहे,
    आश्वासनांचे नभ आहे,
    निराशांचा पाऊस आहे,
    क्वचित आशेचा किरण आहे,
    कल्पनांचे साम्राज्य आहे,
    वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे,
    संताहून हळवे कुठे मन आहे,
    देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे,
    अत्याचाराचा विळखा आहे,
    कधी प्रेमाचा झरा आहे, जिव्हाळ्याचा शब्द बोलका,
    मुके प्रेम कधी थोर आहे,--!!
    आभाळाहून मोठे मन आहे, विहिरीत कोंडलेले कधी सान आहे,
    सुदैव कधी जादूगार आहे,
    कधी दुःख मोठे प्रहार आहे,--
    जीव कधी कसानुसा आहे,
    कधी कधी त्याला भरवसा आहे, दुनियेत कधी ईश्वराचा वास आहे मध्येच कधी, राक्षसी भास आहे,--!
    *जगण्यात मौज आहे,
    सुखदु:खांची फौज आहे*---!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • समाधानी वृत्ती

    कशांत दडले समाधान ते
    शोधत असतो सदैव आम्ही
    धडपड सारी व्यर्थ होऊनी
    प्रयत्न ठरती कुचकामी

    बाह्य जगातील वस्तू पासूनी
    देह मिळवितो सदैव सुख
    क्षणीकतेच्या गुणधर्माने
    निराशपणाचे राहते दुःख

    'समाधान' ही वृत्ती असूनी
    सुख दुःखातही दिसून येती
    चित्त तुमचे जागृत असतां
    समाधान ते सदैव मिळते

    सावधतेने प्रसंग टिपता
    समाधान ते येईल हाती
    सुख दुःखाला दुर सारता
    अंतरभागी समाधान दिसती

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • कोण ती स्फूर्ती देवता ?

    मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।
    कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।

    अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।
    शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।

    सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।
    असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।

    तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।
    अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • वठलेल्या वडाला मोह

    वठलेल्या वडाला मोह
    आम्रतरुचा झाला आहे
    काष्ठवत फांद्यांवर पर्ण
    पिसारा फुलून आहे..
    मनातील सारे न कळून आहे
    प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे
    दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे
    वठलेला वड आज फकीर आहे..
    न कळत्या दुःखाना वेदनेची
    अस्पष्ट करुण किनार आहे
    मरणाची वाट जवळ येईल कधीही
    अंतरात दुःख विरजून अनामिक आहे..
    आम्रतरुचा झोका मदमस्त
    एकाकी वड उन्मळून आहे
    मोहाच्या मिठीत अलगद
    पालापाचोळा मन व्यथित आहे..
    सांज गूढ सावल्यांना
    क्षितिजाची आस आहे
    न कळत्या मनातला मोहर
    का पुन्हा एकाकी दुःखी आहे..
    दूर कुठे गातो फकीर गाणे
    बोल त्याचे अंतरी ठाव आहे
    सगळेच अर्थ न उलगडतात
    शब्दांचे खेळ काव्यांत बहरुन आहे..
    मोहरल्या आम्रतरुच्या प्रेमात
    वठलेला वड एकांती आहे
    स्वार्थ न कसला गंधाचा तो
    आम्रतरुचा मोह मन फुलून आहे..
    उन्मळून पडेल वड एकाकी
    सावलीत पांथस्थ न कोण आहे
    वडाचे दुःख मिटून हलकेच
    मोहरणाऱ्या आम्रतरुत आहे
    न सोसवतो वारा बेफाम
    न वादळ सोसते आहे
    पर्णाचे दुःख अंतरी आल्हाद
    वेगळे दुःख पाचोळ्याचे आहे..
    प्रत्येक शब्दांचे अर्थ भावार्थ
    वेगवेगळे वेढून काव्यांत आहे
    विस्तीर्ण वडाचे दुःख एकाकी
    मोहरल्या आम्रतरुत अव्यक्त आहे..
    -- स्वाती ठोंबरे.