(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • गरज आहे हमखास यशस्वी होण्याची

    आजच्या जगात यशस्वी होण्याची व्याख्या आणि अर्थ ह्यामध्ये व्यक्तिनुसार फरक असू शकतो. शरीराने आपण रोजच्या अत्यंत तणावग्रस्त अशा रहाटगाडग्यात अडकलेले असतो. पण व्यक्तीच्या मनात स्वत:ची अशी अनेक स्वप्नं तरळत असतात.

  • खरे श्रेष्ठत्व

    कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।

    कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।

    निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।

    मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।

    विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।

    प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरविले ।।

    दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।

    विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।

    मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।

    स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।

    आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।

    युक्ती चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।

    घारीच्या द्दष्टीतील तीक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।

    कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी स्वासांनी जे हरवले ।।

    नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।

    उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।

    आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।

    दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।

    सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।

    हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।

    जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।

    मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • नवी खोपी

    आज नव्या घरात येऊन 10 दिवस झाले.
    अजूनही घर ओळखीचं असं झालं नाही...
    सामान जुनंच आहे...
    तरीही नवीन ठिकाणी हात सरसावत नाही.
    जुने शेजारी, जुन्या वाण्याचा अजूनही कुठे कुठे भास होतो... भाजीवाल्यापासून गिरणीपर्यंत
    सगळेच चेहरे अनोळखी आहेत..
    ते मला नि मी त्यांना कोण ही नवी बया? हा एकच सवाल आहे...
    भिंतीसुद्धा बोलक्या असतात...
    त्या आधीच्या घरी बोलायच्या...
    छोट्याशा माझ्या अंगणात ऊन सावल्यांचा खेळ खेळायच्या...
    इथलं अंगण प्रशस्त आहे,
    आमराई अन तुळशी वृंदावन आणखीन झोपाळा नेमका आहे...
    तरीही ते अजून ओळखिच नाही
    माझ्या मनाला घेऊन झुलवत नाही...
    सावल्या दाटून आल्या म्हणजे
    गप्पा तिथे रमत नाहीत...
    चहासोबत किशोरीचा सहेला रे इथे गुंजत नाही...
    होईल हळूहळू सारे काही सुरळीत...
    रमेन ही काही काळानी मी माझी या खोपीत...
    तरी अजून सारे काही नवे नवे नव्हाळी
    सरत नाही दिस माझा लागतो उगी जिव्हाळी!!
    -- वर्षा कदम.
  • शबरीचे निर्मळ प्रेम

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी ।।धृ।।

    व्याकूळ होती राम भेटी
    रात्रंदिनी नाम ओठी
    नाचूनी गाऊनी भजन करी ।।१।।

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी

    बोरे जमवित चाखूनी वेचली
    अंबट तुरट दूर फेकली
    भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी ।।२।।

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी

    उष्टी बोरे प्रभू चाखती
    शोषूनी त्यातील रसभक्ती
    शबरी त्यांत जी जमा करी ।।३।।

    ठेवूनी भक्तिभाव उरी अर्पिती बोरे शबरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • रूप बिलोरी

    असते कां खरे? दर्पणातले रूप बिलोरी
    झांकता अंतरी मलाच माझे कळत नाही

    मी खराखुरा कां? खरे प्रतिबिंब बिलोरी
    हा संभ्रम मनीचा अजुनही दूर होत नाही

    हसवे, फसवे, नाटकी सत्यरुप मनीचे
    तो आरसा बिलोरी कधीच दाखवित नाही

    अदृश्य वास्तवी अंतरीचेच प्रतिबिंब खरे
    आरश्यातले प्रसन्न रूप बेगडी सत्य नाही

    निर्मळ स्पर्श मानवतेचा हीच खरी सुंदरता
    जगी याविण दूजे सुंदर रूप बिलोरी नाही
    **********

    -–वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३१७

    २/१२/२०२२

  • साले म्हणू नका

    ताल नाही तंत्र नाही
    जिभेवर नाही ताबा
    उठले सुटले भाषण देती
    शेतकऱ्यांनाच दाबा

    कापूस गेला तुर गेली
    कोणीच देईना भाव
    "साले"म्हणून शिव्या देती
    असे का करता राव?

    आम्ही पिकवतो तुम्ही खा
    तक्रार आमची नाही
    चूल पेटेल एवढेच द्या
    जास्त तर मागत नाही

    मोठी झाली लग्नाची
    लहान बारावी पास
    तुरीला मिळेल भाव तर
    काम जमेल हो खास

    कर्जाचा हा डोंगर मोठा
    मी कोसळून जाणार नाही
    संकटाला घाबरून भाऊ
    गळफास घेणार नाही

    एक वात हिमतीची मी
    कष्टाने पेटविलं पुन्हा
    काळ्या आईच्या कुशीत
    बीज उगवून दाखवील तुम्हा

    सत्काराचे चार शब्द
    कधीतरी आम्हा बोला
    भूमिपुत्र म्हणायचा तो
    कधिच काळ गेला

    कष्टाचे चारच रुपये
    वर टीप देऊ नका
    जमलं तर दोन हाना
    पण "साले"म्हणू नका

    रचना-रमाकांत द.मांढरे।
    9657356696

  • बालकविता – ससेराव, ससेराव,

    बालकविता
    ससेराव, ससेराव,
    निघालात कुठे ,
    चांदोबावर स्वार
    अगदी भल्या पहाटे,--!!!

    भोवती किती ढग,
    वाजत नाही का थंडी,
    अंगात तुमच्या लुसलुशीत ,
    पांढरी पांढरी बंडी,--!!!

    ससोबा ससोबा,
    कान करून उभे,
    वटारून आपले डोळे,
    बघता काय मागे,--!!!

    तुमच्यासंगे हरिण,
    आज नाही का आले,
    का छोट्या बाळागत,
    आईच्या कुशीत झोपले,--?

    ससेराव ससेराव,
    भीती वाटते मला,
    हलता हलता चंदामामा,
    पाडेल ना तुम्हाला,--!!!

    मग काय तुमची,
    चार पायांची गाडी,
    तुरूतुरू धावत,
    गायब होईल स्वारी,--!!!

    © हिमगौरी कर्वे

  • आत्म्याचे बोल

    काय आणि कसे बोलतो,
    त्यांना माहीत नव्हते,
    सहजपणे सुचणारे,
    संभाषण ते असते ।।१।।

    शिक्षण नव्हते कांहीं,
    अभ्यासाचा तो अभाव,
    परि मौलिक शब्दांनी,
    दुजावरी पडे प्रभाव ।।२।।

    जे कांहीं वदती थोडे,
    अनुभवी सारे वाटे,
    या आत्म्याच्या बोलामध्ये,
    ईश्वरी सत्य उमटे ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • क्षण भाळीचे

    अस्तित्वाचा क्षणभंगुर भरोसा

  • माझं मैत्र

    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या
    दुधावरची साय असतं
    तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर
    भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    बऱ्याच वर्षांनी अचानक
    शाळेतील क्रश समोर दिसताच
    हृदयाच्या आतून उमटलेले
    हाssssय असतं
    तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता
    हसून केलेलं हाय असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    मित्रांसोबत अड्डा जमल्यावर
    आपसूकच कनेक्ट झालेलं वाय फाय असतं
    स्वतःची आतली परिस्थिती कशीही असली
    तरी बाहेर दाखवताना एकदम हाय फाय असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    आपला मित्र त्याचं दुःख सांगत नसला
    तरी नुसती नजरा नजर होताच
    या हृदयीचं त्या हृदयाला कळतं
    त्याच्या मनात नेमकं काय डाचत असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    रोजच्या जीवनात कभी खुशी-कभी गम
    सहन करत आयुष्य पार पडायचं असतं
    पण मित्राची थाप पाठीवर पडतांच
    आनंदाच्या लाटांवर स्वार होऊन
    पुन्हा नव्यानं fresh होवून
    जग रहाटीत मिसळून जायचं असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    आपण कामाच्या कितीही धावपळीत असतो
    पण मित्राचा फोन आला तर
    त्याच्या नुसत्या हॅलो शब्दाला ऐकून
    त्याला काय म्हणायचंय हे जाणायचं असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?

    या GT ला टाटा करताना
    पुढच्या GT ला भेटेपर्यंत
    आठवणींचं गाठोडं बांधून
    मनात लॉक केलेलं फिक्स डिपॉझिट असतं
    अरे हे मैत्र मैत्र काय असतं?
    हे तर आपलं सर्वस्व असतं
    हे तर आपलं सर्वस्व असतं.

    @ मी सदाफुली?
    ✍️ संध्या प्रकाश बापट