स्वप्नातही बघताना ज्याची भीती वाटते
ते वास्तव असते
वास्तव आणि स्वप्न
एकाच नाण्याच्या दोन बाजू
एक चमकते दुसरे भासते
वास्तव आणि स्वप्न
दोन विरुद्ध गोष्टी
एक खरी दुसरं खोटी
वास्तवात जगायला हिम्मत लागते
स्वप्नातही वास्तव नकोसे वाटते
स्वप्नात मन स्वैर होते
वास्तवात मन बंदिवान होते
स्वप्नात कल्पनांचे डोंगर रचले जातात
वास्तवात ते सर्व कोसळतात
वास्तव हे वास्तव आहे पटल्यावर
स्वप्न हे स्वप्न आहे मानल्यावर
स्वप्नही कधीकधी वास्तवाशी लढायला बळ देते
वास्तवही कधीकधी स्वप्न वाटायला लागते
वास्तवातील स्वप्न आणि स्वप्नातील वास्तव
संसारातील बेरजा, वजाबाक्या, भागाकार आणि
गुणाकार करताना दोघांचे भान ठेवते !
-- जगदीश पटवर्धन
वा झुरळा,
खबरदार जर पंख फुलवोनी जाशील पुढे,
मुडदा पाडीन तुझा गधड्या
हा मी मर्द मराठ्याचा वंशज असे
म्यान न करातले का तुला हे दिसे
दचकलो पाहून तुला मी न कीटका
मारुनच तुला मी टाकीन उसासे ॥
क्षुद्रा जरी चावला होतास मला,
तरी शूर वीर मी न तुला चावलो
धर्मयुद्ध खेळीन शर्थीचे मी
हा पहा तलवार आणण्या चाललो ॥
असेल रंग तुझ्यासारखा तिचा
पण गंजली म्हणून म्हणू नको
भ्यायलो तुला मी, समजून
विकट असा हासू नको ॥
-यतीन सामंत
एका अज्ञात कवीची ही रचना आपल्याला नक्की विचार करायला लावेल..
एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे
बाया बी गोळा करा समद्या
मारा समद्यांनला जोरात हाका,
आन् ती समदी मेंढरं हाका.
चला आपन बहिनी-भाऊ
मतदानासाठी जाऊ.
देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा.
तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका.
- सुभाष स. नाईक
दिसे किनारा, निवता वारा
तेवती संध्यादीप काही
आता, आस उरली नाही ॥
पूर्वायुष्य या पुसत्या रेषा
नव्या धुक्यात अशा विराव्या
ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही
आता आस उरली नाही ॥ १ ॥
न जगताच जे जगले
जीवन, त्यातच मन उबले
थरथर मनीची शरीरी उतरुन राही
आता आस उरली नाही ॥ ३ ॥
भयाणतेच्या सीमेवरी
वास्तवता वास्तव्य करी
जीवन झाले चोथा, रस उरला नाही
आता आस उरली नाही.
-- यतीन सामंत
जेंव्हा ठरले गावी जाणे
हूर हूर होती मनी
बराच काळ गेला होता
आयुष्यातील निघुनी
काय तेथे असेल आता
सारे गेले बदलूनी
काळाच्या प्रवाहामध्ये
राहिलं कसे टिकूनी
चकित झालो बघुनी
सारे जेथल्या तेथे
उणीवता न जाणली
क्षणभर देखील मानते
बालपणातील सवंगडी
जमली अवती भवती
गतकाळातील आनंदी क्षण
पुनरपि उजळती
आंबे चिंचा पाडीत होतो
झाडावरती चढुनी
आज मिळाला तोच आनंद
झाडा खालती बसूनी
मळ्यामधली मजा लुटली
नाचूनी गाऊनी
विहिरीमधल्या पाण्यात
मनसोक्त ते डुबूनी
ऐकल्या होत्या कथा परींच्या
तन्मयतेने बसूनी
आज सांगे त्याच कथा मी
काका मुलांचे बनुनी
वाडा सांगे इतिहास सारा
पूर्वज जगले कसे
भव्य खिंडारी उमटले होते
कर्तृत्वाचे ठसे
बापू, आबा, मामा, काका,
मामी वाहिनी जमती
कमी न पडली तसूभरही
प्रेमामधली नाती
मीही बदललो, गांवहीं बदलले
काळाच्या ओघांत
आनंद मात्र तो तसाच होता
पूर्णेच्या परिसरांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे?
मीही नाही रे पाहिलं
आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे
त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे
कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे
अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण
क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते
हरवतो तो न जाणो किती दिवस.
अगदी अगदी दडून बसतो
अवचित मग कधी कुठेतरी पुन्हा गवसतो कुठे बरं
गाभाऱ्यात मंद मंद समईसोबत दरवळत असतो
जीवाची शिवाशी भेट ठरवत असतो
कधीतरी कणकण होऊन ओंजळीतही उतरतो
पण निर्माता मात्र अजून देखिलाच नाही
चंदन एक अलौकिक परिमळ
नित्य नव्या जाणीवांसह पुन्हा पुन्हा भेटत राहतो
स्पर्शाविना तुझा सुगंध आसमंत भरून उरतो
चंदना एकदा तरी चांदण्यात तू मला कडकडून भेट
रंध्रातून श्वासात उतरून मीच होऊदे चंदनाचे बेट!!
-- वर्षा कदम.
गदीमा आणी बाबुजींनंतर
रामायणातील गीत संपले
भावमधुर त्या भावगीतातील
भावनांचे अस्तित्व संपले ।
बाबुजीं नंतर पुन्हा एकदा
भावगीत ते स्तब्ध जाहले
देण्या संगीत स्वर्गलोकी
संगीतसुर्य यशवंत निघाले ।
संवादिनी ती तानपुऱ्यासह
आज अश्रु ढाळीत आहे
ताल हरवलाय आज तबल्याचा
विणा सरस्वतीची अबोल आहे ।
भाव मराठी भावगीतातील
आज गेले आहेत हरवूनी
गायकांच्या मधूर गळ्यातील
सूरही आज बसले रुसूनी ।
वाटते त्या संगीत सुर्यांनी
जन्म घ्यावा येथे फिरुनी
पुन्हा एकदा सजवावी मैफील
गंधर्व लोकीच्या त्या सप्तस्वरांनी ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
३० आक्टोंबर २०१८
दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने ।
तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने ।।
कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी ।
प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।।
शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी ।
आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।।
खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो ।
सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सर्वांतरी, तो एक अनामिक
चराचर सारे रूप भगवंताचे
प्रेमवात्सल्ये जगतो जीवात्मा
आत्म्यात रूप त्या भगवंताचे
कळणार कधी, तुला मानवा
हा जन्मची रे दान दयाघनाचे
तोची वसतो जीवाजीवातुनी
जाण रे, सत्यरूप भगवंताचे
कोण म्हणूनी? कां रे संभ्रम
ब्रह्मांडाचे, रूपही दयाघनाचे
त्याच्या ठायी नतमस्तक व्हावे
रांजण, भरित रहावे सुकृताचे
वि.ग.सातपुते.( भावकवी)
(9766544908)
रचना क्र.२७१
२५/१०/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti