चिंचो, आवळे, काजू आणि गरे,
कोकणी माणूस लय लय बरे....
शिवीगाळये घालतत खरे,
मनांत त्यांच्या काय नाय बरे.....
करवंदा खावची तर कोकणात
जावचा,
डोंगरातून फिरतांना, मजा लय
गावता....
नदी किनारी झाडा बघा
नारळाची,
पाणी पिता तेतूरला, स्वर्गच
गावता.....
हिरवी हिरवी गार आंब्याची
तोरा,
काजीचो रंग बघा लाली लाल
जरा....
जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका
ठाऊक हा,
पण डायाबिटीसवाल्यांका मात्र
लय लय भावता......
कापो आणि बरको, हे फणसाचे
प्रकार,
प्वॉटभर खाल्ल्यार वाढता
पोटाचो आकार.....
होडयेतून फिरतांना म्हणता,
वल्हव रे नाखवा,
मुंबईचो चाकरमानी इलो, त्येका
कोकण दाखवा........इति
-- मयुर तोंडवळकर.
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे ।
संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।। १
चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा ।
लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।। २
संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा ।
कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।। ३
संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते ।
सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
देशासाठी वीरमरण ते,
भाग्यवान" किती तुम्ही,
कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही "जन्मोजन्मी," --!!!
भारत मातेची सेवा" करता,
देह तुम्ही हो ठेवला, --
देशसेवा करता करता,
पाईकांनी कसा बळी दिला,--!!!
अगदी पुण्यकर्म हे ठरे,
असा मृत्यू तुमच्या नशिबी,
नेताना तुम्हाला तोही घाबरे,
पडलात ना देशाकारणी,--!!!
ज्या मातीत खेळलो,वाढलो,
तिचे केले रक्षण तुम्ही,--
आईला पूजताना शेवट,
कुडी झाली निव्वळ माती,--!!!
घरदार-- आईबाप,
पडतील उघड्यावरी,
विचाराने नाही छळले,--
इतकी तुमची होती तयारी,--!!!
शूरवीर देशाचे सैनिक,
खरेच तुम्ही धाडसी, --!!!
निधड्या छातीने सिंहागत,
शत्रूला झेलता अंगावरी,--!!!
हिमगौरी कर्वे
एका अज्ञात कवीची ही रचना आपल्याला नक्की विचार करायला लावेल..
कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी
स्वप्नातल्या पर्यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
अर्पितो भाव माझे श्रीहरी....।।धृ।।
तू आहेस ईश्वर,
करी सारे साकार
नशिब माझे थोर
मिळे तुझा आधार
सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी....१,
अर्पितो भाव माझे श्री हरी....
विविधतेने नटलेले
कृष्णाचे जीवन गेले
लय लागूनी जगले,
कसे जगावे शिकवले
जीवन सारे असूनी रूप ईश्वरी, दाखवी स्वानूभवे तो हरी….२
अर्पितो भाव माझे श्री हरी,
रंगीबेरंगी कोमल
कृष्णकमळ फूल
पाकळ्या बघता निल
प्रसन्न चित्त होईल
दरवळू दे कृष्ण कमळा परि, सेवा भावाचे समाधान उरी.....३,
अर्पितो भाव माझे श्री हरी
राही न्यूनता काही
ही अज्ञानाची ग्वाही
मज क्षमा ती व्हावी
परि आशिर्वाद तू देई
उकलन तव जीवनाची करी, यशासाठी जावे त्याच वाटेवरी....४
अर्पितो भाव माझे श्री हरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आहे ती लहान परि किर्ती महान,
छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।
आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,
लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।
शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे ।।३।।
बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।४।।
कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,
कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।५।।
शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,
ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।६।।
आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,
जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।७।।
जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,
कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.
साडी चोळी सुंदर नेसूनी आभूषणें ती अंगावरती
लज्जा सारी झांकुनी टाकतां तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।।
आत्म्यासम ती लज्जा भासे सौंदर्य जिवंत त्याच मुळें
लोप पावतां लज्जा माग ती जिवंतपणा तो कसा कळे ।।२।।
लपले असते सौंदर्य सारे एक बिंदुच्या केंद्रस्थानीं
शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।।
विकृत ती मनाची वृत्ति स्वच्छंदीपणात ती असते
क्षणिक पणाच्या मागें लागून खरा आनंद ती गमावते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti