धागा धागा विणून, केली तयार जाळी
गोल आणि बहुकोनी घरे, पडली निर निराळी....१,
स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे
सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे....२,
तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही
जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही....३,
जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ
संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझा थोबडा पाहून मी
तुझ्या प्रेमात पडलोच नाही
तुला पाहून माझ्या हृद्याचे
ठोके चुकले पहिल्यांदाच...
मला वाटते तुझे आणि माझे
काही नाते असावे गतजन्मीचे
पण ते नाते प्रेमाचे नाही
तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच
कारण क्षणात माणसांना
भुरळ घालणार्या मला
तुझ्या मागे उगाचच
धावत राहावे लागलेच नसते
वर्षानुवर्षे वेड्यागत...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा… सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते.
आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या
आज थोडे या जगाला विसरु या
हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे
आज ती हलक्या हातांनी रे पुसू या
घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे
आज अपुल्याही व्यथेला सावरु या
सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी
एकमेकांना तरी त्या दाखवू या
प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले
कोवळेपण जाईचे ते भोगू या
खूप जळलो पाहुनी तम भोवती
आज थोडे चांदणेही पांघरु या
वाट ही ना संपली अजुनी तरी
काढण्या काटे पढीचे थांबू या
आयुष्य जगला का कुणी प्रश्नांविना?
समजाऊनी हे एकमेकांना; हसू या !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी
विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।।
द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे
द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।।
वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन
हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।।
' द्वारकेच्या कृष्णा ' धावूनी ये मी दुःखत पडे
मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।।
धावूनी आला कृष्ण द्रौपदीचे मदतीसाठी
लाज राखली द्रपदीची उभे राहूनी पाठीं ।।५।।
कां उशीर केलास मदत देण्या मजला
लटका राग दाखवूनी प्रेमानें जबाब विचारला ।।६।।
बसलो होतो 'तुझ्याच ह्रदयी ' अति जवळ
संबोधितां तूं ' द्वारकेच्या कृष्णा ' येण्या झाला वेळ ।।७।।
म्हटले असते ' ह्रदयातील कृष्णा ' ये धावूनी लवकर
येथेंच होतो मी मदत केली असती सत्वर ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी ।
उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी ।।१।।
वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो ।
सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो ।।२।।
अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो ।
जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो ।।३।।
विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक ।
दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित असे एक ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
यातना आणि वेदना,
जीवन दुसरे असते काय,
भोग आणि उपभोग,
असे त्याचे दोन पाय ,,--!!!
स्वार्थ अन् भांडण,
हेच त्याचे अवयव,
कधीकधी फक्त कींव,
कधीकधी चांगुलपण, ,--!!!
दया करुणा उपकार,
सारेच जीवन विसरले,
म्हणूनच आज सगळ्यांना,
जीव न-कोसे करणारे,--!!!
समस्या अडचणी यांचा,
त्याभोवती घेराव ,
कसे कुणाला ठाऊक,
करेल कधी संपूर्ण पाडांव,--!!!
असेना का तरीही,
त्यातच मजा आहे ,
रडके तोंड करण्यापेक्षा,
हसरे गाणे प्रिय आहे,--!!!
माणुसकी आणि सर्व भावना,
आज निषिद्ध आहेत,
स्वतःच्या पोळीवर तूप ओढणे,
एवढेच शिल्लक आहे ,--!!!
पैसा, सत्ता ,लालसा,
यांचीच सारी ओढ,
त्यांच्यात लागते सारखी,
मात देण्याची ओढ,--!!!
पण असे असूनही
मन सुद्धा मरते,
जिवंत असून मन मेलेले,
माणूस हे सिद्ध करे,--!!!!
हिमगौरी कर्वे©
शब्दांचे अर्थ शब्दांकडे
हवे तसे वळलेच नाहीत
तिचे ते हलके इशारे
त्याला लवकर कळलेच नाहीत
निरागस तिचा चेहेरा
त्यानं जेव्हा पाहिला होता
जुन्या शब्दांचा नवा अर्थ
तेव्हा त्याला उमगला होता
तरीही न जाणे का नंतर
तो रेंगाळतच राहीला
समाजातील अंतर जणू
तो न्याहाळत राहीला
तिला मात्र समाजाच्या दरीत
डोकावयाचे नव्हते
परीमाण ते वास्तवाचे
तिला असे तोलायचे नव्हते
तिला कसं मुक्त
बेधुंद गायचं होतं
स्वप्नांच्या झुल्यावर
ऊंच ऊंच झुलायचं होतं
सुंदर स्वप्नं तिचे ते
मग स्वप्नचं राहीले
कोमल विश्व तिचे
ते हळूहळू मुरझले
निरपेक्ष प्रेमाचे झरे
आता आटले होते
पंख गोड स्वप्नांचे
अलगद तिनं छाटले होते
अल्लड भावनांना
तिनं मग आवरलं होतं
मनात उठलेले तुफान
एकटीनच सावरलं होतं
त्याच्या मनात काय होते
तिला अजून नाही कळले
पण डबडबलेल्या डोळ्यातुन
अश्रू कधीही नाही ढळले...
- डॉ.सुभाष कटकदौंड
आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा .
Copyright © 2025 | Marathisrushti