(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • द्रौपदी वस्त्रहरण

    ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी,
    विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।।

    द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे,
    द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।।

    वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन,
    हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।।

    ' द्वारकेच्या कृष्णा ' धावूनी ये मी दुःखत पडे,
    मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।।

    धावूनी आला कृष्ण द्रौपदीचे मदतीसाठी,
    लाज राखली तीची उभे राहूनी पाठीं ।।५।।

    ‘कां उशीर केलास’ मदत देण्या मजला’ ,
    लटका राग दाखवूनी प्रेमानें जबाब विचारला ।।६।।

    ‘बसलो होतो 'तुझ्याच ह्रदयी ' अति जवळ,
    संबोधितां मजला ' द्वारकेच्या कृष्णा ' येण्या झाला वेळ ’ ।।७।।

    म्हटले असते ' ह्रदयातील कृष्णा ' ये धावूनी लवकर,
    येथेंच होतो मी, मदत केली असती सत्वर ।।८।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आज-उद्या

    उद्या' साठी जगतो आम्हीं राहून मृत्युच्या दाढी ।

    भविष्यांतील सुख कल्पूनी आज सारे कष्ट काढी ।।

    'आज' राहतो नजिक सदैव 'उद्या' चालतो पुढे पुढे ।

    आज नि उद्या यांची संगत कधीही एकत्र न पडे ।।

    कष्ट 'आज' चे शिरीं वाहूनी ध्येय 'उद्या' चे बघती ।

    हातीं न कांही पडते तेव्हां निराश सारे होती ।।

    समाधान चित्तीं आणण्या प्रयत्न सारे 'आज' व्हावे ।

    'आज क्षणाला' अस्तित्व असतां भविष्याला सोडून द्यावे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ओंजळीतली फुले

    कधीतरी दे तुझ्या ओंजळीतली फुले,
    सुगंधाने भरू दे माझ्या अंगणातले झुले
    कधीतरी ये वावटळीच्या वाऱ्याला घेऊन,
    उधळून दे मनातले सगळे पाश सारे तोडून
    कधीतरी ये चिंब ओली बनून माती,
    जीव तळमळेल फक्त त्या वेड्या सुंगंधासाठी
    कधीतरी दे तुझ्या मनातले थोडे जग,
    व्यापून उरेन इतका, कधी देऊन तर बघ...

    -- वर्षा कदम.

  • तिची आत्महत्त्या…

    ती आत्महत्त्या करताच समाज तिच्याच

    चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो...

    पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी

    किती रात्री जागून काढल्या असतील,

    किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील,

    कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल

    याचा विचार कोणी कधीच करीत नाही...

    प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो...

    ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं ...

    बाकीच्यांना तो मनस्तापच वाटत असतो...

    कोण म्हणतं तिचं प्रेमप्रकरण असेल,

    कोण म्हणतं तिचा प्रेमभंग झाला असेल,

    कोण म्हणतं ती गरोदर असेल,

    कोण म्हणतं तिचे लग्न ठरत नव्हतं,

    कोण म्हणतं तिच मन फारच हळवं होतं...

    पण खरंच हिच कारणे असतात का तिच्या आत्महत्तेमागे ..?

    तिच्या आत्महत्तेची खरी कारणे कधीच येत नाहीत का जगासमोर...

    पुरुषांना जन्माला घालणारी स्त्री

    त्याच पुरुषांच्या अहंकाराची बळी ठरत असते का ?

    ठरत असेल तर हे वेळीच थांबायला हवे !

    तिची आत्महत्त्या टाळायला हवी !

    नाहीतर... तिच्या अभावी...

    भविष्यात कित्येक पुरुषच

    आत्महत्त्या करताना दिसतील...

    ©कवी ‌– निलेश बामणे ( एन.डी.) 18-02-24

  • कोण जिंकलं…..!

    युद्ध संपलं…
    शत्रूवर विजय मिळाला…
    सगळीकडे फटाके… जल्लोष…
    चार दिवस सगळेच 'विजयोत्सव' साजरा करतील…
    नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील –
    "हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!"
    ...आणि त्या यशाचं भांडवल करून
    निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील!
    आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही......!

    पण...
    तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात...
    वृद्ध आई वडील–
    डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन....
    विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली
    दुचीत बसलेली आई......
    अन् सोललेल्या खावंदावर शहादत मलम लेपुन,
    शून्यात नजर लावून बसलेले वडील.......!

    एक अनाथ मुलगा –
    बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी रडतोय,
    तळमळतोय.....
    आईला वारंवार विचारतोय....
    "बाबा कधी घरी येणार ...!"
    "मला त्यांच्या कुशीत खेळायचं" म्हणतोय.....
    पण ती कुशी तर आता फक्त आठवणीतच उरली आहे...

    ...आणि ती,
    ती वीरपत्नी –
    जिचं कुंकू उजडलंय...
    भकास जिनगीचे चटके अंगावर सहन करत....
    ती जिवंत मरण जगते आहे,
    कधीही न भरावं असं दुःख घेऊन...

    आपण?
    आपणही चार दिवसात त्यांना विसरून जाऊ,
    फेसबुकवर "जय जवान" लिहून पुढची पोस्ट पाहू...!

    पण एक प्रश्न तसाच उरतोच...
    हो, त्यांनी मातृभूमी वाचवली…
    ते लढले आपल्यासाठी....
    त्यांनी शौर्यही गाजवलं…
    ...पण
    " कोण जिंकलं हो ?"

    ©गोडाती बबनराव काळे, लातूर
    9405807079

  • लक्ष्मीसूत

    आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र ।

    बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात ।।

    'केशव' माझे वडील असता, 'केवशसूत' हा ठरतो मी ।

    तसाच बनता 'केशवकुमार', मोठे होण्याची युक्ती नामी ।।

    जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे ।

    'लक्ष्मी' तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ

    आमचे नितीन नांदगावकर साहेब आजवर सदैव अन्यायाशी लढा देत आले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे . त्यांच्यावर केलेली एक कविता----
    तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ, अन्यायातला पाठीराखा,
    काय म्हणावे तुला तेजा,
    तुझ्यासम,-- या सम हा-!!!

    जनता जनार्दन भक्त होता,
    तुला पाठिंबा सकलांचा,
    दोस्त तू रंजल्या-गांजल्या,
    जुलमीना दाखवीत बडगा,--!!!

    दिप्त प्रदीप्त होशी,
    अन्याया समोर पाहुनी,
    सलाम मराठी अस्मितेला,
    विरोधात कार्यवाही करशी,--!!!

    निर्भिड निडर धच्चोट काम, जसे उधळत यावे तूफान,
    समोर कोणीही उभे न राहती
    ते पुरुषार्थाचेच काम,--!!!

    स्त्रीला संरक्षण तुझे,
    गरीब, गरजू बनती समाधानी, दुःखितांचे अश्रू पुसत,
    प्रेषित तू अंतर्यामी,--!!!

    फणसांगत वाटशी तू ,
    वरून किती काटेरी दिसतो, काळीज तुझे, गोड गरा, अनुभवणारा चक्रावतो,--!!!

    मदतीचा हात तुझा,
    चटकन पुढे येतो,
    व्यथितांना देत दिलासा,
    अत्याचारा नाहीसा करतो,-!!!

    अगतिक हतबल ते,
    तुला शोधीत येती,---
    रुपात तुझ्या मग सारे,
    प्रत्यक्ष भगवंत बघती,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • मिठापरी जीवन

    खारेपणा हा अंगी असतां, कोण खाईल केवळ मीठ

    परि पदार्थाला चव येई, मिसळत असता तेच नीट....१,

    जीवन सारे खडतर ते, भासते मिठासम मजला

    केवळ जीवन बघता तुम्हीं, पेलणें अवघड सर्वाला..२,

    तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते

    हर घडीच्या प्रसंगामध्ये, समाधानाचे अंकूर फूटते....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • टॉकटाईमचा बॅलन्स

    जो तो आपल्या कामात…..

  • जातियवाद आणि युवा पिढीचा सहभाग

    आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे.