सुधांशू येता गगनी,
चांदण्या चमचम करती,
धरेवरती रात्र काळी,
रानकेवडे घमघम करती,
आकाशी पखवाज वाजती,
एकत्र येऊन ढग खेळती,
रात किड्यांची "धांदल" होई,
वाट काढण्या पृथ्वीवरती,
"ओलेतेपण" या झाडांवरी,
काळ्याशार सावल्या पडती,
असंख्य काजवे वाट दाखवती, निसर्गाची धरेवर दीपावली,
किर्र किर्र""_ आवाज करती,
रात किडे लगबग"" करती,
वरती चांदण्या येती जाती,
कुणास ठाऊक कुठे भ्रमंती,
वाट पाहत दिवसाची,
आभाळ उगा डोलत राही,
रात किड्यांची चमचम संपली, समय कसा पुढे जात राही,
झाडे झुकती वाऱ्यावरती,
वृक्षलता त्यांच्यात मिसळती,
कळ्या फुले पानोपानी दडती,
अंधाराची त्या वाटून भीती, पहाटे दवबिंदूओघळती,
गार हवेत विहरत येती, प्रकाश--गाणीगुणगुणती,
पडून तृणावर मजा करती,
जल थेंबांची जादू सगळी,
पाहण्या चांदण्या डोकावती,
यावया उत्कंठेने पृथ्वीवरती,
हळूच एक एक पळ" काढती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली
अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।।१
वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे
आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।।२
घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा
मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।।३
भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला
कचरा आणि घरटे काढून खिडकीतुनी फेकला ।।४
काम संपवूनी सांज समयी घरी परत मी आलो
त्याच चिमण्या तसेच घरटे पाहून चकित झालो ।।५
पहाट होता चिमण्या उडाल्या काढून टाकले घरटे
असेंच चालले कित्येक दिवस परी जिद न सोडी ते ।।६
चार दिवसाची सुटी घालउन गांवाहून परतलो
घरटे बघता संताप येऊन मुठी वळवूनी धावलो ।।७
घरट्या मधूनी चिमणी उडाली बसली पंख्यावरती
चिव चिव करुनी विनवू लागली दया दाखवा ती ।।८
परी मी तर होतो रागामध्ये चढलो माळ्यावरी
मन चरकले बघून अंडी छोट्या घरट्यामध्ये ।।९
असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज करुणायुक्त नयनी
यश मीळाले तिनेच शेवटी भूत दया जागवूनी ।।१०
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अंतर्मनात
शोधण्या तुजला
मन कधीचे आतुर
डोकवावे आत खोलवर
बाहेर पाहावे खूप दूरवर
ठसवावे तुजला आतवर
तुझ्यात मी, माझ्यात तू
सर्वव्यापक एक तू
तू तो ईश्वर
तरीही मी एक
..देह नश्वर..
-- अरुण वि. देशपांडे
पुणे.
मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१,
तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२,
वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३,
बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हृदयात वणवा होता
नजरेत ती होती
मंद गारवा हवेत
मनात उब होती
डोक्यात विचार होता
ओठावर कविता होती
मंद गारवा हवेत
शब्दात उब होती
भोवती प्रेम होते
सुंदर ती होती
मंद गारवा हवेत
तिच्यात उब होती
जगणे सुरू होते
जीवनात मजा होती
मंद गारवा हवेत
जगण्यात उब होती
जवळ ती नाही
फक्त कल्पनेत होती
मंद गारवा हवेत
स्वप्नात उब होती
© निलेश बामणे
ठाऊक नव्हते कालपावतो
नांव तुझे आणि गांवही
क्षणांत जुळले अचानक परि
नाते आपुले जीवनप्रवाही
उकल करितो जेंव्हां ह्याची
ओळख पटते माझ्या मनां
तेच रुप अन तीच मूर्ती
पूर्व जन्मीच्या खाणाखुणा
असेल हे जर ऋणानुबंद
आणेल एका छायेखालीं
साथ देऊन अनुभऊ
सुख दुःखे ही जीवनातली
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
असे कसे गं असे कसे.
कां तुझे गं मज वेड असे
वेळी, अवेळी केव्हांही
नेत्री सामोरी गं तूच असे।।
नित्य प्रभाती त्या नभाळी
तांबूसलेल्या सांजसकाळी
आठविताच सहजी तुजला
खुदकन मनी मीच कां हसे।।
हिरव्या वेली, कोमल कळी
अलवार, जणू तूंच उमलते
पाकळी पाकळी अधर तुझे
मकरंदा गंध तुझा कां असे।।
निर्मल, शामल तुझी गं तनू
माळूनी घेता श्वेत चंद्रचंद्रिका
उजळुनी टाकिते नभांगणाला
सर्वत्र स्पर्श तुझाच कां भासे।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८.
८ - १ - २०२२.
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि
जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी
भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं
भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी
भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा
परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा
शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक
कवि मनाशीं 'स्व' भावांचे करी जुळवणूक
कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे
खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti