गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे
संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे
ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी
गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी
चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी
बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी
धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो
जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो
यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा
साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 15, 2019
(अरुणा साधू, मुंबई) – माझे यजमान “अरुण साधू” ह्यांना जाऊन दोन वर्ष होत आहेत. २५ सप्टेंबर ला ह्यांचा दुसरा स्मृतीदिन. दिवस,वर्ष सरतात, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते आणि माझे मन व्याकुळ होऊन जाते. ह्या व्याकुळतेतून सुचलेली ही कविता…..
September 24, 2019
उडून गेली दूर दूर तू
झेप घेउनी आकाशी
बघू लागलो चकीत होऊनी
पंखामधली भरारी कशी
नाजूक नाजूक पंखाना
आधार होता मायेचा
चिमुकल्या त्या हालचालींना
पायबंध तो भीतीचा
क्षणात आले बळ कोठून
विसरुनी गेलीस घरटे आपुले
बंधन तोडीत प्रेमाचे
आकाशासी कवटाळले
कधीतरी उडणे, आज उडाली
बघण्या साऱ्या जगताला
किलबिल करून वळून पहा
दाणे भरविल्या चोचीला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 11, 2017
तू
जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून
एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……
April 12, 2011
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 17, 2017
भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
मातेहूनही ती मोठी,
भाषा देतसे अधिक वेलांटी,!
ती आहे सृजनांत ,
सर्वांची काळी आई,
तिच्या कुशीतून जन्म घेतो,
आपण सारे, पक्षी, प्राणी, --!
ती करते जसे संगोपन,
जिवांचे नित्य जतन,
म्हणूनच तिला रोज करावा,
नेमाने आपण प्रणाम,---!
काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
जीवनातील संजीवनी,
तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!
जोडीदार आभाळाची,
विशाल त्यांचा संसार
लेकुरे उदंड जाहली,
गोकुळ सगळा परिवार,--!
माती पोटी जन्मते बीज,
आणि विशाल वृक्ष होती,
कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
हीच बिजे मातीत रुजती,--!
फळे-फुले रसरशीत,
कधी पिकून पडती,
त्यातूनच पुन्हा जन्मती
मातीतून परत वरती,--!
मानवी शरीर पार्थिव,
मातीतच शेवट अंत,
तिच्यातून असे जन्म,
तिच्यात एकरूप परत,---!!
© हिमगौरी कर्वे.
March 1, 2020
घन काजळ रात्री तू आलीस
-- श्री.उदय विनायक भिडे
July 19, 2013
कृष्णा तुझ्या विना
अस्पष्ट अधुरे सारे
मनातील भावनांचे
ह्रदयी बंदिस्त किनारे..
तुझ्या ओढीने माझा
जीव झाला अधीर..
तिमिरात जळणारा
राधे मी मिहीर..
अचल पवित्र स्थान
नयन दीप तेवती..
ह्रदयातील भाव
बासरीत उमटती..
भवसागर दाटला
द्वारकेच्या भूवरी
निश्चल उभा कृष्ण
राधेच्या ह्रदयांतरी
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
August 2, 2026
वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
June 24, 2019
कळेना चालला आहे तुझा त्रागा कशाला
कधीचा राहिला आहेस तू जागा? कशाला ?
जिथे चिटपाखरूही फारसे फिरकत नसावे
मला बोलावते आहे अशी जागा कशाला ?
तुलाही वाटले होतेच की हे शेवटाला -
कुणाला वावगे वाटेलसे वागा कशाला !
किती फुललेत रस्ते दाट गर्दीने सभोती
हव्या आहेत लोकांना तरी बागा कशाला ?
असे झाकायचे आहे खरोखर काय नक्की ?
हवासा वाटतो इतका तलम धागा कशाला ?
ठिगळ लावायचे इतकेच आहे काम केवळ
हवा आहे तरी इतका तलम धागा कशाला ?
-- ॐकार जोशी
July 30, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti