एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar”gmail.com
पोस्टाची खिडकी
टपालासाठी
रेल्वे ची खिडकी
तिकिटासाठी
सिनेमाची खिडकी
हाऊसफुल्ल साठी
नाटकाची खिडकी
श्री. सौ. साठी
खिडक्याच खिडक्या
त्यांना काय तोटा
कुठे जाल तिथे पडेल
त्यांच्याशी गाठ
सापडेल का कुठे?
कल्पवृक्षाची खिडकी?
सापडलीच तर
एकच वाटते खंत
पाळी येईल तेव्हा
ती होऊ नये बंद!
-- विनायक अत्रे.
जीवनाच्या रगाड्यातून-
(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)
एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी
नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी...१,
मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते
गादीवरती पडून सारे, स्वप्ने आपली रंगवीत होते,
तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी
हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी,
कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने
शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने,
भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते
कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप ते काय असते
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
स्त्री आहे अंबा,दुर्गा आणि काली,
अष्टभुजा धारण करणारी रणरागिणी.
सांभाळ करून सर्व नात्यांचा प्रेमाने,
गाजवते अधिराज्य जगात शक्तीने आणि युक्तीने.
बाबांच्या ह्या इवल्याश्या परीने,
फुलविला तिचा संसार स्वकर्तृत्वाने.
मिळाली देणगी मातृत्वाची हिच्या उदरी,
संयमाने करते ती पालनपोषण दिवस-रात्री.
शिकवतेस जगाला प्रेम, आपुलकी आणि माया,
नाही पडू देत संसारावर कधी दुःखाची छाया .
सांभाळताना तुझ्या संसाराचा गाडा,
राखून ठेव वेळ वेगळा तुझ्यासाठी थोडा.
घे आकाशात उंच भरारी
मात्र लक्षात ठेव पाय असू दे जमिनीवर पोरी
-सौ. मुक्ता शैलेश मोहोड
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी
कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।।
जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।।
मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।
कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक
त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती प्रभूची ।।४।।
सत्य परिस्थीती ऐसी कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी प्रभू अस्तित्वा विषयीं ।।५।।
फक्त एकमुखी वाच्यता असे ती सर्वता
महान शक्ति असता त्या ब्रह्मांडामध्यें ।।६।।
सर्वानी जाणले एक 'अपूर्व शक्ती' ह्याचा चालक
त्याच उर्जेचे हे प्रतीक सारे विश्वमंडल ।।७।।
कुणी नाहीं दुजा भाव समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञान विज्ञान देती नाव निरनिराळे त्या शक्तीसी ।।८।।
कुणी म्हणती राम कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम येशू असे कुणाचा ।।९।।
परी तत्व नसे वेगळे नांवे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे हीच खरी शोकांतिका ।।१०।।
सारे जीवन निघून जाई परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही त्याच्या अस्तित्वाविषयी ।।११।।
जाणावी ती शक्ती रुप आकार त्यासी नसती
शक्ती समजोनी करावी भक्ती आदरभाव ठेवून ।।१२।।
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उमजण्याला सर्वप्राण्यामध्ये ।।१३।।
बहूत झाले विद्वान कर्तव्याने मिळवी मान
मानव जातीची ती शान ह्या संसारी ।।१४।।
मार्ग निरनिराळे दाखवी सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई ध्येय मिळतां जीवनी ।।१५।।
विचार करा मनाशी वैर आपले आपणाशी
नसते केंव्हां प्रभूशी हेच मूळ दुःखाचे ।।१६।।
वाद नसतो ध्येयापरी चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी सर्व सुख दुःखाची ।।१७।।
तथा कथीत पंडित विद्वान सामान्यात
बहूजनांपेक्षां ज्ञान त्यांचे थोडेसे ज्यास्त ।।१८।।
वापरुन ज्ञान शक्ती सामान्यजनास वाकविती
आपले अस्तित्व स्थापती विसरुन प्रभू शक्तीसी ।।१९।।
तर्क शक्ती थोर “आहे चा नाही” करणार
“नाहीं ला आहे” पटविणार , करुनी ज्ञानाचा खेळ ।।२०।।
मार्गाचा करुनी भेद वाद करीत राही
जीवन करी बरबाद विसरुनी ध्येयासी ।।२१।।
ध्येय हे साध्य, मार्ग हे साधन
वाया जाई आयुष्य माध्यम साधन समजून ।।२२।।
साध्य नका समजू साधनासी ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने साधका प्राप्त साध्य होई ।।२३।।
अनेक मार्गाचे प्रयोजन ज्ञान शक्ती वापरुन
स्व अस्तित्व ठेवण्या टिकवून ।।२४।।
आस्तित्वाची भावना मोठी प्रत्येक झगडतो त्यासाठीं
सकळजन आयुष्य खर्ची त्या पोटी ।।२५।।
न कळे त्यास देवपण भांडण्यांत जाई विसरुन
टाकी आयुष्य मातीमोल करुन ।।२६।।
विसरुन जा सर्व भेद मिटवा वादविवाद
नष्ट करा त्वरीत लहान मोठ्यांचा संवाद ।।२७।।
न कुणी मोठे न लहान सारेच आहे समान
असती सारे मानवनिर्मित घ्या सारे समजून ।।२८।।
ज्ञात धर्म होत अनेक हे मानवनिर्मीत प्रतिक
न कळे अज्ञाना सर्व मार्गाचे ध्येय एक ।।२९।।
मानव शक्ती तीच ईश्वर दुसरा नसे कोणी वर
सगुण रुप देऊनी आपणची देतो त्यासी आकार ।।३०।।
मानवता हाच धर्म खरा आपसातील भेद विसरा
जीवन सुखी करण्या प्रभू देई तयांना आसरा ।।३१।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय...१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ....३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार....४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदीप....५,
प्राण आपल्या अंतरी,
तेच असे रूप ईश्वरी....६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती...७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती....८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी...९
- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भाग्य असे अती थोर अमुचे
असे गुरुजन आम्हा लाभले
जन्म जन्मीचे सार्थक की हो
या एकाच जन्मी जाहले ।
दिले विविध ग्रंथातील ज्ञान
भाषा इतिहास भुगोल शिकविला
विविध कला शास्त्रे शिकविता
गणीत जिवनाचे समजाविले ।
पारंपारीक शिक्षण देऊनी
शिक्षीत आम्हाला बनविले
आदर्श स्वतःच्या आचरणाने
सुसंस्कृत आम्हांला घडविले ।
करीतो नमन त्या थोर गुरुजना
ज्यांनी स्वातंत्र्यवीर बहू घडविले
ज्यांनी आपुल्या बलीदानामधुनी
हे स्वतंत्र राष्ट्र अपुले घडविले ।
सुरेश काळे
सातारा
मो. 9860307752
५ सप्टेंबर २०१८
शिक्षकदिन
तिचे अस्तित्व आज तीच शोधत होती
कधी काळाच्या ओघात रडत होती
युगे युगे लोटली तिच्या या लढाईला
स्त्रीचं ती प्रश्न समाजास विचारत होती
कधी गर्भात खुळल्याजात होती
ती गर्भात समाजाला नकोशी होती
तिच्या रडण्याचा आवाज नाही ऐकला कोणी
निरागस कळी ती जगणे शोधत होती
कोण करेल ग माझे स्वागत असे घर शोधत होती
अन् मिळालाच तोही आनंद एक आई तिची वाट पाहत होती
नको नको म्हणता म्हणता आलेच मी आयुष्यात
या हळव्या प्रश्नाने ती आज फारच खुश होती
चिमुकल्या पावलांनी ती अंगणात खेळत होती
मंद मंद वाऱ्यासवे फुलासमान डोलत होती
निरागस तिच्या हसण्याने हसत होते अंगणही
पण लगेच तिच्या खेळण्यावर निर्बंध लादले जात होती
पोरींची जात तू या शब्दाने ती हिनल्याजात होती
अन् परक्याच धन तिला आपलेच करीत होती
शाळेचे दिवस कसे भरकन उडून जातात
पण निरागस चेहऱ्यावरून आसवे वाहत होती
जगणे बदलते पण रित मात्र तीच होती
लवकरच ती सासरी जाणार होती
वाजले सनई चौघडे पडल्या डोई अक्षदा
नव्या आयुष्याचे ती स्वप्न पाहत होती
दिवस गेले सुखाचे पण आता ती हुंड्यासाठी जळत होती
जळता जळता त्या आसवाला हलकेच पुसत होती
आता पुरे झाले होते आयुष्य संघर्षच जगता जगता
पण माझा स्त्री असणे हा काय गुन्हा हा प्रश्न ती विचारत होती
-- अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जी अकोला
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti