(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • सोना बंटी

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • द्रौपदी वस्त्रहरण

    ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी
    विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।।

    द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे
    द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।।

    वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन
    हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।।

    ' द्वारकेच्या कृष्णा ' धावूनी ये मी दुःखत पडे
    मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।।

    धावूनी आला कृष्ण द्रौपदीचे मदतीसाठी
    लाज राखली द्रपदीची उभे राहूनी पाठीं ।।५।।

    कां उशीर केलास मदत देण्या मजला
    लटका राग दाखवूनी प्रेमानें जबाब विचारला ।।६।।

    बसलो होतो 'तुझ्याच ह्रदयी ' अति जवळ
    संबोधितां तूं ' द्वारकेच्या कृष्णा ' येण्या झाला वेळ ।।७।।

    म्हटले असते ' ह्रदयातील कृष्णा ' ये धावूनी लवकर
    येथेंच होतो मी मदत केली असती सत्वर ।।८।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • नियतीचा फटका

    भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...

    एक भयानक रात्र अशी,
    सहस्त्रावधींचा घेई बळी ।
    नियतीच्या खेळामधली,
    कुणा न समजे ही खेळी ।।१।।

    मध्यरात्र होऊन गेली,
    वातावरण शांत होते ।
    गादीवरती पडून सारे,
    स्वप्ने रंगवीत होते ।।२।।

    तोच अचानक विषारी वायू,
    पसरला त्या वातावरणी ।
    हालचालींना वाव न देता,
    श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।

    कित्येक जनांचे बळी घेतले,
    काळ्या काळाने ।
    शांत निद्रेची महा निद्रा,
    करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।

    भरडून गेले सारे परि,
    पापी वा पुण्यवान ते ।
    कळला नाही हिशोब त्याचा,
    मोजमाप काय असते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गांडूळ

    (मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ शेती प्रकल्प राबवला. हे गांडूळ खादाड आणि जाडजाड असतात आणि कचऱ्याचा फडशा पाडतात. कौतुकाने प्रकल्प बघायला गेलेल्यांना मात्र तिथे कचऱ्याचे ढिगारे आणि भिकारी सापडले, गांडुळे मात्र बेपत्ता! कुठे होते ते?)

    महानगरपालिकेने राबवला
    गांडूळ शेतीचा प्रकल्प
    हे गांडूळ असतात खादाड
    आणि दिसायला जाड जाड
    लोक गेले तिथं
    पहायला गंमत
    दिसले त्यांना तिथे
    कचऱ्याचे ढिगारे
    आणि भिकाऱ्यांची पंगत!
    लोक तरी कसे खुळे
    पाहायला गेले भलतीकडे?
    महापालिकेच्या सभागृहातच
    वळवळतात ते अलीकडे!
    गांडुळाच्या शेतीत
    गांडुळाचा अभाव
    सभागृहातल्या गांडूळांचा
    मात्र वधारतो भाव!
    कचरा खायला काय
    ते आहेत गांडूळराव?
    अकलेचे कांदे आहेत खरे
    कचऱ्यापेक्षा म्हणतात शेण बरे!

    -- विनायक अत्रे.

  • अमर काव्य

    विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला,
    रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।
    जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी,
    खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।
    नाच गाऊनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं,
    बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।
    छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां,
    प्रसंग जरी तो गेला निघुनी, राहते जिवंत कविता ।।४।।
    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • उपयोगीता हेच मूल्य

    चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण

    दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,

    फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी

    पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,

    चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम

    खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,

    वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती

    तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दुजातील ईश्वर

    दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।

    ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।

    देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।

    त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।

    आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।

    ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।

    लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।

    विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।

    माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।

    कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।

    जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।

    म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • येथ जाति कुळ अप्रमाण

    संत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

  • त्यांचे नाते

    कोण लागतात माझे,
    नाते ते ठाऊक नाहीं,
    देऊनी जातात मात्र,
    बरेच मजला काहीं ।।१।।

    विठ्ठल- रामाचा नाद,
    गुंजन करितो येथें,
    पवित्र वातावरण,
    येण्यानी होवून जाते ।।२।।

    देवाण घेवाण आत्म्याची,
    आपसामध्यें चालती,
    शब्द फुलांची गुंफण,
    त्वरीत होऊन जाती ।।३।।

    फुले देऊनी मजला,
    हार गुफूंन घेतात,
    दोघे मिळूनी तो हार,
    प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।

    अदृश्य असले नाते,
    असावे दोघांमध्ये,
    भाषा आत्म्याची जाणतां,
    मन नाचते आनंदे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • संशयाचे भूत

    हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।

    करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।

    एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।

    डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।

    गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।

    कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।

    येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।

    शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०