अंतर्मनात
शोधण्या तुजला
मन कधीचे आतुर
डोकवावे आत खोलवर
बाहेर पाहावे खूप दूरवर
ठसवावे तुजला आतवर
तुझ्यात मी, माझ्यात तू
सर्वव्यापक एक तू
तू तो ईश्वर
तरीही मी एक
..देह नश्वर..
-- अरुण वि. देशपांडे
पुणे.
अवघ्या जगाचा संसार पेलून,
विटेवरी उभा तू कमरेवर हात ठेवून,
समाधान दिसे डोळ्यात,
दिसे स्मित हास्य तूझ्या ओठी,
काळा सावळा विठू तू माझा,
कीर्ती अथांग तुझी मोठी….
– श्वेता संकपाळ.
मंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय.
कोण छोटा कोण मोठा
सहॄदयी तो आत्मा मोठा
जिथे सुखावे तन्मनअंतर
तो निष्काम निर्लेपी मोठा
ब्रह्मांडालाही कवेत घेतो
तो निर्गुण निरागस मोठा
प्रसन्न कृपाळू रूप ज्याचे
तो अगम्य परमात्मा मोठा
जो भेटता सुख मोक्षानंदी
तो अनामिक ईश्वर मोठा
कर्मकांडी सत्कर्मी जगावे
तोच एक संचिताचा साठा
हरिनामी नित्य रमुनी जावे
मोक्षमुक्तिचा तो मार्ग मोठा
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२७८
३०/१०/२०२२
शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी
विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी
शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी
झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी
काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला
रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला
रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती
नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती
खेळून भूक लागली, हा विचार आला मनी
जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना
शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत
भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत
मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं
जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी
परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते
बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते
निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना
जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हस्तिनापुराच्या सुवर्णभिंतींमध्ये
एक स्त्री सावलीसारखी जगत होती,
न आवाज, न आक्रोश,
फक्त श्वासांच्या दरम्यान दडलेलं वादळ.
अर्थात ती म्हणजे गांधारी...
तिने डोळे मिटले नव्हते,
तिने दृष्टीला बांधून ठेवलं होतं.
अंधार हा तिचा शत्रू नव्हता,
तो तिचा निवडलेला आश्रय होता.
पतीच्या वेदनेशी एकरूप होताना
तिने स्वतःचं आकाश गमावलं.
त्यागाच्या नावाखाली
स्वतःच्या प्रश्नांना गाडून टाकलं.
राजकारण दरबारात उघडं नाचत होतं,
महत्त्वाकांक्षेच्या ज्वाळा वाढत होत्या,
पण तिच्या शांततेचा पडदा
सगळ्यावर अलगद पसरत होता.
मुलांच्या पावलांमध्ये तिने भविष्य ऐकलं,
पण त्या पावलांतला अहंकार
तिच्या मायेने झाकला गेला.
आईचं हृदय न्यायापुढे हरलं,
आणि इतिहासाने आपला निर्णय घेतला.
द्रौपदीच्या वेदनेचा प्रतिध्वनी
सभागृहाच्या स्तंभांवर आदळत होता,
तिच्या मौनात मात्र
एक खोल भीती घर करून बसली होती,
“जर मी बोलले, तर सर्व काही तुटेल.”
आणि ती न बोलल्यामुळे
सर्व काही तुटलं.
कुरुक्षेत्रावर जेव्हा रणशिंग वाजलं,
तेव्हा तिच्या अंतरात्म्यात
पश्चात्तापाचा शंखनाद झाला.
शंभर स्वप्नांचे देह पडले,
आणि तिच्या मायेचा महासागर
एका क्षणात वाळून गेला.
राख हातात घेऊन ती उभी होती,
आई, राणी, स्त्री…
तिन्ही ओळखी धूसर झालेल्या.
तिने कृष्णाकडे पाहिलं,
अनंताच्या डोळ्यांत प्रश्न ठेवला.
तो शाप नव्हता,
तो वेदनेचा भार होता.
“मी अंधार निवडला,
पण अंधाराने मला का निवडलं?”
तिच्या पट्टीत करुणा होती,
पण करुणेला कणा नव्हता.
तिच्या प्रेमात ऊब होती,
पण सत्याला सामोरं जाण्याचं तेज नव्हतं.
गांधारीची शोकांतिका
नियतीने लिहिलेली नव्हती,
ती विलंबलेल्या निर्णयांची सावली होती.
डोळे बांधणं सोपं होतं,
पण अंतर्मनाला बांधणं अशक्य.
सत्य दार ठोठावत राहिलं,
आणि तिने शांततेचं कुलूप लावून ठेवलं.
शेवटी जेव्हा कुलूप तुटलं,
तेव्हा उरली होती फक्त राख
आणि राखेत उमटलेली शिकवण.
प्रेम जर न्यायाला साथ देत नसेल,
तर ते मायेचं कवच नसून
विनाशाचं निमंत्रण ठरतं.
गांधारी अंध नव्हती...
ती प्रकाशाला घाबरली होती.
आणि जेव्हा तिने पट्टी उघडली,
तेव्हा पाहण्यास काहीच उरलं नव्हतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

आईची महती अनेक थोर कवींनी वर्णन केली आहे. ‘प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई’ – माधव जूलियन, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ -यशवंत, ‘निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी – भा. रा. तांबे किंवा ‘अंतरले पाय तुझे हाय हाय माते ।’ – केशवसुत. आई आपल्या मुलाची मायेने काळजी घेते. त्याला घास भरवते. लहानाचा मोठा करते. आजारपणात सेवा करते. आईमुळेच घराला घरपण येते. मुलाला घडवण्यात, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात आईचा वाटा फार मोठा असतो. चार-पाच दिवस जरी आई घरापासून दूर बाहेरगावी गेली तर घर सुने सुने होऊन जाते. आईच नसलेले घर तर अगदी पोरके होऊन जाते. इतके आईचे स्थान महत्त्वाचे आहे.
आयुष्य पुढे धावत असते,
वय सारखे वाढत असते,
पण......
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते ,,,,,
उच्छृंखल आणि समंजसपणा,
यामधली मर्यादा कळते,
अल्लडपणावर हलकीशी, प्रगल्भतेची झालर चढते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
जगण्याची परिभाषा,
थोडी थोडी बदलू लागते,
काय हवे अन् काय नको,
हे नेमकेपणे कळू लागते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
मन जोडीदाराचं,
न बोलताच कळू लागते,
गोडी संसारातली,
एक पायरी वर चढते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
जगणे समजुन घेण्याचे,
हेच खरे वय असते,
याच वयात आपण स्वत:साठी, जगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
आयुष्याच्या चित्रपटातील,
हेच मध्यंतर असते,
इथूनच पुढे,
शेवटच्या क्लायमेक्स कडे
जायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
म्हातारे होण्याआधीचे,
हे शेवटचे तरूणपण असते,
ते, आपण मनापासून उपभोगायचे असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,,
चाळीशीनंतरही पावसात
भिजावेसे वाटणे,
हे मन अजुन हिरवे असल्याचे
लक्षण असते,
खरी मजा जगण्याची,
चाळीशीनंतर सुरू होते,,,,,
चाळीशीपुढच्या मित्र मैत्रिणींनो, एकदा तरी अवश्य वाचाच....
खरंतर हेच वय आहेन आयुष्याला चॅलेंज करायचे.
त्याने शिकवलेले अनुभव वापरून, इच्छा असल्यास चाकोरी मोडून आपल्याला आनंद मिळेल ते सुरु करण्याचे.
आयुष्याच्या विमानाचा डिसेंड सुरु व्हायला अजुन अवकाश आहे. आत्ता तर कुठे "सिट बेल्ट ऑफ" ची साईन आली आहे.
ही वेळ आणि वय आहे "क्रूझ" करायचं, नवी क्षितिज गाठायचं, नवी आव्हान स्वीकारायचं, आयुष्याकडून शिकायचं, जे शिकलो ते इतरांना द्यायचं..!
कारण चाळीशी / पन्नाशी म्हणजे नृसिंह अवस्था.!
ना तरुण ना म्हातारा,
ना नवशिका,
ना पूर्ण अनुभव संपन्न,
ना खूप आसक्ति
ना पूर्ण विरक्ति,
ना पूर्ण सौष्ठव,
ना गलित गात्र,
आयुष्याच्या एका फेज मधून दुसऱ्या फेज मधे जायचा उंबरठा....
अरे जमवा मित्र दर महिन्याला,
घेऊन जा घरच्यांना फॉरेन ट्रिपला,
नसेल परवडत तर शक्य असेल तिथे करा एखादी "हनीमून स्पेशल" टूर वर्षातून एक दोनदा....
जमतील तसे आणि तेथे आपले अनुभव शेयर करा.
आपण आयुष्यात अनुभवलेले खड्डे चुकवायला इतरांना मदत करा,
पोरांचे मित्र व्हा,
त्यांच्या मित्र मैत्रिणींचे Buddy व्हा,
सामाजिक कार्यात सक्रीय भाग घ्या,
सभ्यतेच्या परिघात राहून बिनधास्त फ्लर्ट करा,
गॉसिप करा,
शाळेची गेट टुगेदर आयोजित करा,
ट्रेकला जा,
रिक्षा किंवा टॅक्सीवाल्यावर दादागिरी करून "आवाज कुणाचा" चे ऐन जवानीतले जोशाचे दिवस कधीतरी परत अनुभवा.
बर्फी वहिनी किंवा पेढा शेजारी दिसला तर हळूच कटाक्ष टाका.
औषधे किंवा गोळ्या ज्यांच्या नाशिबी लागल्या असतील त्यांनी त्या नेमाने घ्या, पण एखाद्या पार्टीत मित्रांबरोबर कॉलेजातल्या पहिल्या क्रशची आठवण जागवताना क्वचित एखादा पेग जास्त झाला तर त्याची झिंग पण एन्जॉय करा.
पावसात भिजा,
जॉगिंग करा,
सूर्यनमस्कार घाला,
लाँग ड्राइव्हला जा,
सिनेमे पहा,
काका / काकू म्हणतील त्यांचे काका / काकू व्हा,
दादा म्हणून जवळ येतील त्यांचे थोरले बंधू व्हा,
अनुभवाचं ओझं इतरांना वाटून थोड हलक करा.
मुख्य म्हणजे हसत रहा.
एकदा मनाशी पक्के बांधले की चाळीशीचा / पन्नाशीचा घाटमाथा म्हणजे, पालिकडल्या उताराची सुरुवात न वाटता अलिकडचा चढ चढून शिखर सर केल्याचा आनंद देऊ शकतो. पन्नाशी टेंशन न रहाता सेलिब्रेशन बनते.
आणि मग चाळीशी / पन्नाशी हा फक्त एक आकडा रहातो...
जस्ट अनदर ब्लडी नंबर...
म्हणूनच म्हणतो .....
ENJOY YOUR
चाळीशी पुढे ......
चकचक करती चांदनी । लकलक करतात डोळे । आयुष्य संपूण फक्त राहते । जोडीने फिरलेले नदिनाल्यांचे ओढे (वडा) !
जन्माला आलो तेव्हा । देवाने टाकले कोड़े । कधी नाही सुटले म्हणून । जाता जाता रचले वाळलेले झाड़े !
मी जेव्हा गेलो । तेव्हा मातीवर ठेवले कंदी पेड़े । जिवंत असताना कधी मुकात ठेवले नाही थोड़े !
जाता जाता ठेवून गेलो कायमची आठवण , फक्त मुला –मुलींची । जो पर्यंत सृष्टि आहे , रंग भी रंगी फुलांची !
।। कवी ।। सचिन जाधव
sachinrjadhav1992@gmail.com.
Viravade(dattanagar),tal-karad,dist-satara .
Mobile no-8459493123
हा निसर्ग देखणा
प्रतिबिंब बिलोरी
मन मनास भुलते
झुलते प्रीत अंतरी
हा लोभस नजारा
कोण? हा रंगारी
रंगकर्मी रविवर्मा
स्वर्गिचा, चितारी
रूप अनामिकाचे
विलसले चराचरी
हा डोह प्रसन्नतेचा
इथे डूंबावे निरंतरी
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२४७
२५/९/२०२३
Copyright © 2025 | Marathisrushti