गझल
वृत्त :- व्योमगंगा
लाच घेणे पाप आहे सांगणारे पाहिले मी
वाट सत्याची धरूनी चालणारे पाहिले मी
झोपडी माझी सुखाची खाण व्हावी वाटते मज ;
गर्व मोठ्या बंगल्याचा मानणारे पाहिले मी
फाटका माझा खिसा पण दान देणे जाणतो मी
पावत्या छापून खोट्या मागणारे पाहिले मी
लोकशाही श्रेष्ठ आहे हेच लोका सांगती ते
लोकनेते साफ खोटे बोलणारे पाहिले मी
वाचवावी लेक, मित्रा फार झाले बोलणे हे
वारसासाठी सुनेला जाळणारे पाहिले मी
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
October 5, 2018
एक परिघ ते आंखले आहे
विधात्याने विश्वाभोवतीं
जीवन सारे फिरत असते
एक दिशेनें त्या वरती १
वाहण्याची क्रिया चालली
युगानुयुगें या जगतीं
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा
एकांच परिघात सारे फिरती २
जेंव्हां कुणीतरी थकून जाई
दुजा उठोनी मदत करी
जीवन मरणाची शर्यत
जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी ३
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी
नियंत्रित कुणी करी जगाला
परिघ सोडूनी जाण्यासाठीं
दिसत नसे मार्ग कुणाला ४
प्रयत्न तुमचा सदा असावा
मध्यबिंदूकडे तो सरकण्याचा
शक्तिरुप तेथेंच असूनी
त्याच्यांत सामावून जाण्याचा ५
भिती तुमच्या मनीं वसते
कसे जाऊं त्या आंसाकडे
तुकडे होतील या देहाचे
जेव्हां त्या आसांत पडे ६
सोडूनी देण्या तो सारा खेळ
केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे
विसरुन जाता या देहाला
प्रभू समर्पण करण्यांत असे ७
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
August 25, 2015
निशब्द झाली होतीस तू मीही निशब्द झालो होतो
नदी किनारी आपण दोघे एकमेकांत गुंतलो होतो
प्रेम म्हणजे काय असते दोघांनाही माहित नव्हते
प्रथम दर्शनी मन दोघांचे घायाळ मात्र झाले होते |
जे मनात तेच ओठात पटकन रिते केलेस तू मन
मी मात्र तुजसवे बोलण्यास शब्दात अडकत होतो
जितक्या वेगाने आलीस तितक्याच वेगाने दूर गेलीस
मी मात्र आठवणी जागवत कविता रोज करीत होतो |
अजूनही रोज त्या नदी किनारी मी जाऊन बसत असतो
वाटतं परत कधीतरी येशील या आशेवर जगत असतो
नदी तर ती कधीच आटली आहे ना तिथं पाणी आहे
नुसतंच वैराण वाळवंट पण डोळ्यात प्रेमाचा झरा आहे |
-- सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा
१ जून २०१९
June 8, 2019
(अरुणा साधू, मुंबई) – माझे यजमान “अरुण साधू” ह्यांना जाऊन दोन वर्ष होत आहेत. २५ सप्टेंबर ला ह्यांचा दुसरा स्मृतीदिन. दिवस,वर्ष सरतात, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते आणि माझे मन व्याकुळ होऊन जाते. ह्या व्याकुळतेतून सुचलेली ही कविता…..
September 24, 2019
July 25, 2013
शेवट असावा असा. नुकताच दारात .
कवडसा आलेला जसा.
झरकन नाहिसा होतो तसा...
शेवट असावा असा पहाटे गवतावरचा दवबिंदू असतो जसा.
एका क्षणात नाहिसा होतो तसा..
शेवट असावा असा. आळवावरचा थेंब
असतो अगदी जसा.
मोती मोती म्हणेपर्यंत घरंगळून जातो तसा.
शेवट असावा असा. पावसाच्या रेशिम.
धाग्यासारखा. ओंजळीत न येताच
वाहून जातो तसा..
शेवट असावा असा. प्राजक्ता सारखा.
आपल्या नकळत टपकन.
पडून जातो तसा....
–सौ. कुमुद ढवळेकर.
August 24, 2022
ज्याचे चिंतन आम्हीं करितो
तोच 'शिव ' ध्यानस्थ भासतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतन शक्ति दाखवितो १
जीवनाचे सारे सार्थक
अन्तरभूत असे चिंतनांत
चिंतन करुनी ईश्वराचे
त्याच्याशी एकरुप होण्यात २
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्हीं असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयात सामावितो ३
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभुसंपर्क साधण्याचा
लय लागूनी ध्यान लागतां
आनंदीमय होण्याचा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
March 5, 2019
सुर्यास्त जवळ आला
पायाखाली रेगाळणारी सावली
पाठमोरी झाली
पाखरांचा गलका परता परता घरट्यात
असा सुचक संदेश देऊ लागला..
शिवारात एकच गडबड
पश्चिमेला सुर्य
झाला डोगंराआड.
पाय गुमाण घराच्या ओलीन अंधार चिरत
चुल पेटवली होती तिनं
पातेल्यात शिजत होते चार दाने खदखदत
आयुष्याचे....
खाऊणघ्या...पिऊन गटा गट पाणी...मोजा चांदणे...
काळोखात लुकलुकणारे
स्वप्न!
आणि झाला उल्कापात
बघून सुधा मागणे मागता नाही आले
या जिनगानीसाठी.
@शरद शहारे वेलतूर
December 12, 2019
डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी.
July 30, 2021
विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती ।
सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।१।।
पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती ।
अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळांत राहती ।।२।।
फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची ।
पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 18, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti