ॐ गँ , ॐ गँ , गँ गणपती गँ गणपती
महामंत्र हेरंबाचा प्रत्यक्ष-पराशक्ती ।।
गकार करि साकार, मोरया , मोहक गजशुंडा
गकार, गोंडस दंत वाकडा तुझा वक्रतुंडा
गकार, समईमध्ये नाचे ज्योती तमहारी
गकार, गर्भसमाधि गहन निजमातेच्या उदरीं
गकार गणदल, कार गुणबल, गकार गहन गती ।।
अकार अविचल आद्यस्वर अवतार तुझा मूर्त
अकार, बृहद्-अवकाशपोकळी कोटिसूर्यव्याप्त
अकार कालातीत अनंतहि, अकार तूंच अनादि
चिरशाश्वत तूं, अस्तित्वातच ब्रह्मांडाआधी
अकार , अवगुंठन सगुणाचें अद्वैताभंवती ।।
शिर टेकुन अर्धेंदु बने तन , नमन भालचंद्रा
याचक-ओंजळ अर्धेंदू , अर्धेंदु वरदमुद्रा
एकवटत बिंदूमधिं ऊर्जास्रोत अमर्याद
पंचप्राणांमधें घुमे घन अनुस्वारनाद
उरीं अनाहत ओंकाराची ओजस अनुभूती ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे.
ये रे ये घना | तोषवी तना |
तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु ||
हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी |
पुरे पुरे आता, राख-रांगोळी |
सुकल्या माझिया देहावरी,
जल शिंपना | ये रे ये घना | ये रे ये घना .....|| १ ||
व्याकुळ मी ही, तरु-वेलीही |
आटले सारे, नद्या-नालेही |
वाट पाहुनी, तुज हाकारी |
तुझी मेघना | ये रे ये घना | ये रे ये घना . || २ ||
तापल्या तनुला, तुझीच आंस |
तुझिया स्पर्शाचा, ओला सुवास |
अधिर, आतुर, मिलन क्षणाची |
भूक भागवना | ये रे ये घना | ये रे ये घना ... || ३ ||
तुझ्यावाचुनी, कोंब ना उगे |
पक्षी पाखरे, कोण रे जगे ?
कैसे विनवू ? तूची सांग ना |
पुरवी कामना | ये रे ये घना | ये रे ये घना .. .|| ४ ||
केव्हांची तुला , साद घालते |
ये रे ये झणी, तुज झेलते |
रिमझिम त्या, तालावरी |
करी नर्तना | ये रे ये घना | ये रे ये घना.... || ५ ||
सखया अंबरी, कां रे थांबला ?
लपंडाव हा, फार लांबला |
विरह, वेदना, सोसू मी कशी ?
सोसे न यातना | ये रे ये घना | ये रे ये घना ..|| ६ ||
क्षमावंत तू, क्षमाशील तू |
हाकेला देवा, धावशील तू |
चुकला मानव, तो ही आळवी |
हे दयाघना | ये रे ये घना | ये रे ये घना....... || ७ ||
-- कवी : उपेंद्र चिंचोरे
क्षणक्षण, आनंदे जगुनी घ्यावे
अजाण,अनभिज्ञ क्षण जीवनी
अशाश्वत,असे भाकीत क्षणांचे
सदैव! सतर्क रहावे या जीवनी।।
भाळीच्या, विधीलिखीत घटना
जे घडणारे, ते सारे घडुनी जाते
विवेकी मानवतेचा तर्क असावा
वास्तवतेला, समजुनी घेता येते।।
भिरभिरे, कालचक्र जन्ममृत्युचे
झाले, गेले, सारे विसरुनी जाते
अलगदी काळ, सावरे दुःखाला
संयमे, सहज जीवन जगता येते।।
निर्मळी! सहवासाच्या सदिछ्या
जीवास, सावरती क्षणाक्षणाला
गतजन्मांचेच,सारे आपुले सुकृत
स्मरावे! सातत्याने अनामिकाला।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३०.
१ - २ - २०२२.
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
वळून बघता पूर्व आयुष्यी,
प्रखरतेने हेची जाणले
घडले नाही कधीही ते ते,
हवे असूनी मनी योजीले....१
सभोवतालची देखूनी स्थिती,
आखती योजना कल्पकतेने
खेळामधली चाल नियतीची,
ध्यानी न येते दुर्दैवाने.....२
मार्ग तिचे ठरले असूनी,
बांधलेले इतर जीवांशी
अपूर्व योजना निसर्गाची,
कळेल कुणाला सहज कशी....३
जाळीतल्या धाग्याची टोके,
गुंतली असती ग्रह गोलाशी
फिरता फिरता खेच पडे,
वा ढीली होवून जाती कशी.....४
सुख दु:खाचे परिणाम हे,
असेच दिसून येती मग
अनपेक्षीत हे जेव्हा घडते,
म्हणती त्यासी दैवी अंग....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने…
स्नान करूनी निर्मळ मनीं,
दर्पणापुढे येऊन बसला ।
जटा साऱ्या एकत्र बांधूनी,
भस्म लाविले सर्वांगाला ।।
ओंकाराचा शब्द कोरला,
चंदन लावूनी भाळावरती ।
रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,
गळा हात नि शिरावरती ।।
वेळेचे भान विसरूनी,
तन्मय झाला रूप रंगविण्या ।
प्रभू नाम घेत मुखानें,
नयन आतूर छबी टिपण्यां ।।
पवित्र आणि मंगलमय,
वाटत होते स्वरूप बघूनी ।
सजविला होता देह त्यानें,
प्रभूचेच एक रूप समजूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तिळ स्नेहाचा गुळ गोडीचा ।।
पौषातला सण संक्रांतीचा ।।
स्नेह वाढता वाढे गोडीने ।।
करिदिनी घाट धिरड्याचा।।
हर्ष पतंग महोत्सवाचा।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे,
दुःख जिवापाड सोसावे,--!!
ठरवलेले नेहमी चुकते,
विपरीत काही घडते,
अगणित अपेक्षांचे ओझे,
इवल्या हृदयाने पेलावे,-?
जे विधायक, ते दूर राहते,
नकारात्मक ते सारे घडते,
आपल्याच जिवाचा बळी
रोज नव्याने पहावे लागते,-!!
मदतीचा हात करता पुढे,
आरोपांना पेंव फुटते ,
आंधळ्या निर्जन आयुष्याला ,
रानावनीची वाट दिसते,--!!
कुणाला आपले म्हणावे,
मन एक ठरवून ठेवते,
बघता बघताअगदी सारे,
कुठेतरी बिनसलेले असते,--!!!
गैरसमजांची तुफान वादळे,
अवती भोवती घोंघावती ,
अलगद घास टिपण्या,
सभोवार तांडव करिती,-!!
शांतता करुणा प्रेम
सहकाराच्या सर्व भावना,
का हरत राहती सारख्या,--
मग जीवन कसे असावे क्षेम,-?
हिमगौरी कर्वे.©
विज्ञानाने शोधली, अणुतील प्रचंड शक्ति
प्रथमच जगाला कळली, अणूंतील उर्जा शक्ती
सुक्ष्म असूनी अणु आकार, सुप्त शक्ति अंगीं
प्रचंड उर्जा करी साकार, फोडतां अणु मध्यभागीं
विचार मनीं येई , कोठून शक्ति ही आली
निर्जीवातील अणूरेणूला, कशी उर्जा लाभली
समजोनी घ्या एक, निसर्गाची श्रेष्ठता
लहान असून देखील, प्रचंड त्याची योग्यता
जीव देहाचे पिंड, जीवंततेतील सुक्ष्मता
बाळगी ते ब्रह्मांड, हीच त्याची महानता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti