(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पत्रकार

    पत्रकार

  • जेष्ठांचा आशीर्वाद….

    एका पोस्ट मध्ये वाचले होते की जेष्ठ महिना. जेष्ठ वडवृक्ष आणि जेष्ठांचा आशीर्वाद. किती गहरा अर्थ आहे ना?

    रखरखता रणरणत्या उन्हाळ्यात जीव कासावीस झाला होता. मन पण उद्विग्न. कधी एकदा पावसाची सर कधी येणार आणि सगळे कसे वातावरण बदलून जाईल याची ओढ असते.

  • विक्लांत अहिर भैरव

    “मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे.

  • उपाय

    रामास प्रार्थना

  • फक्त हिमतीने लढ

    घरटे उडते वादळात
    बिळा, वारूळात पाणी शिरते
    कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
    म्हणून आत्महत्या करते ?

    प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
    शिकार मिळाली नाही म्हणून
    कधीच अनूदान मागत नाही

    घरकुला साठी मुंगी
    करत नाही अर्ज
    स्वतःच उभारते वारूळ
    कोण देतो गृहकर्ज ?

    हात नाहीत सुगरणी ला
    फक्त चोच घेउन जगते
    स्वतःच विणते घरटे छान
    कोणतं पॅकेज मागते ?

    कुणीही नाही पाठी
    तरी तक्रार नाही ओठी
    निवेदन घेउन चिमणी
    फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

    घरधन्याच्या संरक्षणाला
    धाऊन येतो कुत्रा
    लाईफ इन्शुरन्स काढला का ?
    अस विचारत नाही मित्रा

    राब राब राबून बैल
    कमाउन धन देतात
    सांगा बरं कुणाकडून
    ते निवृत्ती वेतन घेतात ?

    कष्टकर्याची जात आपली
    आपणही हे शिकलं पाहिजे
    पिंपळाच्या रोपा सारखं
    पाषाणावर टिकलं पाहिजे

    कोण करतो सांगा त्यांना
    पुरस्काराने सन्मानित
    तरीही मोर फुलवतो पिसारा
    अन कोकिळ गाते मंजुळ गीत

    मधमाशीची दृष्टी ठेव
    फुलांची काही कमी नाही
    मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
    कोणतीच रोजगार हमी नाही

    घाबरू नको कर्जाला
    भय, चिंता फासावर टांग
    जिव एवढा स्वस्त नाही
    सावकाराला ठणकाऊण सांग

    काळ्या आईचा लेक कधी
    संकटापुढे झुकला का ?
    कितीही तापला सुर्य तरी
    समुद्र कधी सुकला का ?

    निर्धाराच्या वाटेवर
    टाक निर्भीडपणे पाय
    तु फक्त विश्वास ठेव
    पुन्हा सुगी देईल धरणी माय

    निर्धाराने जिंकु आपण
    पुन्हा यशाचा गड
    आयुष्याची लढाई
    फक्त हिमतीने लढ

    फक्त हिमतीने लढ

    !! आवडली तर इतरांनाही पाठवा !!

    ऍड. अनंत खेळकर,
    अकोला

  • थोरांच्या ऐतिहासिक वास्तूंतून प्रेरणा

    पुणे शहरात खासगी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजचा परिसर म्हणजे तर ज्ञानवंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला परिसर होय. गोपाळ कृष्ण गोखले, रॅंग्लर परांजपे, रॅंग्लर महाजनी यांसारख्या अनेक ज्ञानी व व्यासंगी शिक्षणतज्ञांचे वास्तव्य व वावर या परिसरात झालेला आहे. येथील प्रत्येक इमारतीला वैभवशाली इतिहास व परंपरेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आईवडिलांच्या अशिर्वादाने मला या फर्ग्युसन कॉलेजचा आवारात तब्बल ८ वर्षे बंगला नं.१ म्हणजे, प्राचार्य आगरकरांच्या बंगल्यात राहण्याचा योग आला. त्या वास्तूतील रम्य आठवणी एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.

  • बॅक टू सी

    सुमारे अडीच वर्षानंतर ऑफिसमध्ये जॉइनिंग करण्याकरिता जुलै 2017 मध्ये रिपोर्ट केल्यानंतर प्रत्यक्ष जहाजावर पुन्हा जॉईन करण्यासाठी मध्ये जवळपास दीड महिना गेला. बॉस ने अडीच वर्षानंतर जॉईन करायला जाऊनसुद्धा प्रमोशन देऊन अनपेक्षित धक्का दिला होता प्रमोशन मिळून तीन पट्ट्या मिळण्यापेक्षाही पाच ते सहा महिन्यांऐवजी तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळणार याचाच जास्त आनंद झाला.

  • जग जाहिरातीचे

    पुस्तक लिहिण्यामागे जसा विद्यार्थ्यांचा विचार आहे तसाच छोट्या जाहिरातदारांचाही विचार आहे. अनेकांना या शास्त्राविषयी माहिती नसल्याने जाहिरातीवर खर्च केलेल्या पैशाचा पुरेसा लाभ घेता येत नाही. कमीत कमी पैशातही उत्तम जाहिरात होऊ शकते. मात्र त्यासाठी या विषयाचे पुरेसे ज्ञान पाहिजे. त्यांनाही उपयुक्त होईल, या विषयाकडे पाहण्याची त्यांची विचारधारा बदलेल ही. तसेच ज्याला कुणाला या क्षेत्रात काम करायचे आहे, जे या क्षेत्रात काम करीत आहेत, पण औपचारीक शिक्षण घेतलेले नाही, ज्यांना आपल्या व्यवसायासाठी जाहिरातीचा वापर करायचा आहे अशा सर्वांसाठी उपयुक्त व्हावे.या हेतूने हे पुस्तक आहे.

  • झाड म्हणालं…

    पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो…

    अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? तर अंगणातलं हे झाड बोलू लागलं, म्हणालं, मलापण जरा बोलू द्या, खुप दिवस झाले कुऱ्हाडीचे घाव मुकपणाने सोसुन. आता बोललं पाहिजे….

    जमिनीत रुजलेलं माझं बालपण अंकुरलं…. बहरलं… आणि वाढलं… उन, वारा, पाऊस अंगावर झेलतं वाढत होतं, फांद्यांचं फुटणं आणि पानांच बहरणं अनुभवलं होतं मी. जमिनीपासुन जरी उंच होत असलो तरी मुठीत माती घट्ट धरलेली होती. कधी सोडली नाही मातीची साथ. फांद्या फोफावू लागल्या, पानं बहरू लागली… मस्ती होती वाढण्याची.. जगण्याची. अशातच एक दिवस एक चिमणी उडत अलगद येऊन बसली माझ्या खांद्यावर… तिचा चिवचिवाट लोभस वाटू लागला, ऐकत रहावासा वाटू लागला. थोड्यावेळाने तिचा जोडीदारही आला. तसे क्षणभरात दोघेही उडाले.. थोड्या वेळाने दोघे परत आले. दोघांच्या चोचीत काड्या होत्या, घरटे बांधण्यासाठी. माझ्याच एका फांदीवर त्यांनी घरटं बांधलं. त्यांच चिवचिवणं मला रोज ऐकायला मिळेल हे पाहुन मनोमन समाधान वाटलं. चिमणा-चिमणीचा संसार बहरला… फुलला..

    माझ्या फांद्यां पसरत होत्या, तशी माझी सावलीही वाढत होती. या सावलीत अनेक प्रकारची माणसे येऊन बसत होती. त्यांच्या गप्पांचे विषयही वेगवेगळे असायचे. काही खलबतेही करत रात्री बसुन माझ्या आडोशाला. काही रचत डाव, माणसांचे पाय ओढण्याचे. मी मात्र सारे जाणुनही गप्प असायचो. सगळं साठवून ठेवलंय आतल्या आत…

    पुढे दिवस पालटत गेले, वातावरणात बदल होत गेले. तसे माझ्यातही बदल होऊ लागले. पानगळीचा मोसम सुरू झाला. माझ्याच अंगाचा भाग असलेली पानं मला सोडून जाऊ लागली. ज्यांच्या असण्यानं माझ्या सौदर्यांत भर पडत होती ते मला सोडून जाऊ लागले होते, त्यांचं हिरवेपण जाऊन शुष्कता आली होती. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर ती माझ्यापासुन दूर जाऊन पडत होती. त्यांच्या दुरावण्याचं दु:ख होतं. पण जुनं गेल्यावरच नव्याला जागा मिळते हे मी जाणत होतो… त्यामुळे हे दु:ख क्षणभराचं होतं. ऋतू बदलला तशी नवी, हवीहवीशी कोवळी पानं पुन्हा माझ्या फांद्यांमधुन उमलू लागली. सृजनाच्या या सोहळ्याचं वर्णन तरी कसे करणार…

    हे सारं चांगलं चाललेलं असताना, कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन आलेल्या दोघांनी कशाचीही तमा न बाळगता थेट घाव घातला माझ्या हृदयावर… असंख्य वेदनांची त्सुनामी शरीरभर पसरली… वेदनेचा हुंकार पसरला… पण तो कुणाला ऐकू जाणार होता…!

    कोण ऐकणार होत…!

    दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

  • मुंबईतील ट्रामगाड्या

    आज महामार्ग, फ्लायओव्हर आणि रेल्वेच्या जाळ्याने एकसंघ बनलेल्या मुंबई शहराच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये तेव्हा पालखी, होड्या आणि घोडागाड्या यांचा समावेश असे. कालांतराने रस्तांचे जाळे विणले गेले. भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरु झाली. वाहतुकीची साधने वाढली तशीच नव्या साधनांची गरजही वाढू लागली. १८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली.