टीव्हीने जनसामान्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात शिरकावच काय तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ढवळाढवळ सुरु केली. याचे नकारात्मक व समाजघातकी परिणाम एकूण समाज भोगतो आहे…!
मागच्या म्हणजे २०२३च्या ऑक्टोबर महिन्यात हेमामालिनी ७५ वर्षांची झाली… फिल्म इंडस्ट्रीत अतिशय यशस्वी कारकीर्द – नुसतीच यशस्वी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास लिहिताना ह्या ” ड्रीमगर्ल ” चा उल्लेख सिनेमा जगताला पडलेलं एक सुंदर स्वप्न असा करावाच लागेल… दोनेक पिढ्यांना आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी अफाट लोकप्रियता मिळवलेली ही अभिनेत्री… गेली दोन दशकं देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत ही खासदार म्हणून उपस्थिती…
एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.
तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.
ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.
तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.
स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.
यथासमय देवाच्या देव्हार्यात डोकवावे, मन मोकळे करावे.
एका ग्रुपने what's app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.
रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.
तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what's app ला पुजावे.
जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!
जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................,
स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही.
उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा......
त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं...........
तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं............,
सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते.
जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती.
एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स घेउन आला...
साहेब उठले ......
जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले “खा."
कोणाला काहीच कळत नव्हतं पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली.
"अभिनंदन" जोशी गरजले.
"मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत.........
आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती"
"मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above' लिहीता........ ,
अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या".
गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या
अगदी सुइसाइड नोट वगैरे लिहून मी आत्महत्येचा ड्रामा सुरु केला . ब्लेडने हाताची शीर कापून घेतो म्हणून उजव्या हाताच्या मनगटावर ब्लेड ने हळूच कापण्यास सुरवात केली , आता आईचा धीर सुटला व ती रडू लागली , ते पाहून , बहिण आणि तिची मुले देखील घाबरून रडू लागली तेव्हा भावाने त्यांना सांगितले ‘ तुम्ही सरळ शेजारी निघून जा मी पाहतो काय होईल ते
दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!
दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
हल्लीच्या पिढीला हा मायना कळणारच नाही, आणि त्यात त्यांची काही चुकी आहे असे मला तरी वाटत नाही. आजच्या इंटरनेटच्या जगात, व्हाट्सअँप, ट्विटर, इंस्टाग्राम, सिग्नल, स्नॅप-चॅट, वगैरे अँप्स वरून क्षणार्धात हव्या असलेल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्क करणे त्यांना सोपेच वाटणार.
माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो.
अनेक प्रकारच्या अध्यात्मिक पुस्तकातून अश्या प्रकारचा अनुभव अध्यात्मिकतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना अश्या प्रकारचा मात्र थोडा वेगळा अनुभव आलेला आहे असे नमूद केलेले आढळले, मी त्या काळात व्यसने करीत होतो त्या मुळे मी अध्यात्मिक वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता, एक खरे की व्यसने बंद करण्याचा माझा निर्णय त्या काळापुरता तरी खूप प्रामाणिक होता व व्यसन न केल्यामुळे आलेली अस्वस्थता व बैचेनी घालवण्यासाठी मी जे पुस्तक वाचावयास घेतले होते ते अध्यात्मिक होते.
कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन त्यांच्याच आवाजात ऐकूया.
https://www.youtube.com/watch?v=VmhjVAiICzU
मंगेश पाडगावकरांचा जीवनपट वाचण्यासाठी क्लिक करा...
Copyright © 2025 | Marathisrushti