(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • खराब रस्ते

    आपल्याकडे दरवर्षी नेमके पावसात किंवा पावसाच्या आधी रस्ते खराब होत असतात. खड्डे पडतात. प्रवासाला निघतांना आपण म्हणतो “ पावसाचे दिवस आहेत, रस्ते खराब झाले असणार – लवकर निघूया.“ अशी मानसिकता आपल्यात का आली? आपण मान्य करून घेतले कि पावसात रस्ते खराब असायलाच हवेत. परदेशी पण बर्यापैकी पाऊस पडतो तेथे का नाही रस्ते खराब होत?

    खराब होणारे रस्ते पाहून मला पडलेले काही प्रश्न

    – रस्ते प्रत्येक वर्षी खड्ड्यात का जातात?

    – एवढे खड्डे रस्त्याला का पडतात?

    – रस्त्यात खड्डे असतात कि खड्ड्यात रस्ते?

    – बोटीत बसत नाहीत एवढे धक्के आणि हेलकावे ह्या रस्त्यावरून जातांना का बसतात?

    – खड्ड्यामुळे इंधन आणि वेळ जास्त लागतो आणि गाडी खराब होते ह्याला जबाबदार कोण?

    – खड्ड्यांमुळे अपघात होतात, लोक जखमी होतात आणि कधी कधी काही लोक जीव गमावतात, त्याला जबाबदार कोण?

    – मंत्री आणि संत्री ह्या रस्त्याने प्रवास करतात का? की त्यांना सचिव सांगतात “साहेब रस्ता खराब आहे, हेलिकॉप्टर ने जा“

    – रस्ते असे दरवर्षी खराब होऊ नये म्हणून सरकारतर्फे काय उपाययोजना केली जाते? ती व्हावी म्हणून स्थानिक संस्थाकडून आणि जनतेकडून सरकारची काय अपेक्षा आहे?

    – रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांकडून पेनल्टी घेण्याची काय तरतूद आहे? अशी तरतूद आहे का?

    – जनतेकडून रोड टॅक्स, टोल घेतला जातो, नोकरदार आयकर भरतात त्याबदल्यात चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ?

    – जर पावसात रस्ते खराब होतात तर पावसाच्या आधी मार्च एप्रिल मध्ये हे सगळे रस्ते टकाटक का केले जात नाहीत? भर पावसात, रहदारी चालू असतांना खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार का केला जातो?

    – खराब रस्त्यामुळे साधन संपत्तीचा किती अपव्यय होतो ह्याचा हिशोब कधी कोणी ठेवलाय का ?

    अशा रस्त्यावरून परदेशी प्रवाशी प्रवास करताय तेव्हा ते राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. ज्या देशात दळणवळण करणारे महामार्ग असे आहेत तो देश महासत्ता कसा आणि कधी होणार?

    प्रकाश दिगंबर सावंत, पुणे
    ९०४९००८५०३

  • पान…

    ‘पान खायो सैंया हमार’ किंवा ‘खाईके पान बनारसवाला’ अशा गाण्यांची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करायचा असेल तर जुन्या काळात थोडेसे डोकावले पाहीजे. सतरंजी तक्क्याने सजलेली बैठक, मध्यभागी पितळेचा पानपुडा, अडकित्ता, चुना, कात, सुपारी, लवंग, विलायची, हे घराघरात हमखास दिसणारे चित्र.

  • कविता – अविस्मरणीय पाऊस…

    एकदा, बस स्थानकावर भर पावसात ओले चिंब भिजलेल्या तरुणीला पाहिल्यावर सुचलेली हि कविता!!!!

  • या वयात

    आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस‌ जमके‌ practice ‌केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही.

  • तंत्रयुगातही जुने तेच सोने !

    तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असताना आज प्रगत वाटणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उद्याच जुनी होतात. नवी आणखी प्रगत उत्पादने त्यांची जागा घेण्यास टपलेली असतात. या जीवघेण्या स्पर्धेतही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेक वर्षे लोकप्रियता राखून आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांचा मागोवा.

  • शुभारंभ

    नमस्कार

    मी आयडीबीआय बॅंकेच्या सेवेतून जुन २०१७ मधे निवृत्त झालो आहे. मी मुख्यतः काव्यलेखन करतो. काही वैचारिक लेखन केले आहे.ते मी आपणाबरोबर शेअर करीन. या साईटवर लेखनाची सुरुवात आमची कुलदेवता श्री. मोहीनीराज याचे मी रचलेल्या आरतीने कैलेली आहे.

    कृपया वाचकांनी अभिप्राय व पाठींबा देऊन माझे सारख्या नवोदित साहित्यिकांना ऊर्जा द्यावी ही विनंती.

    सुरेश काळे

    सातारा

  • आहुती

    काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटले, त्या व्यक्तीविषयी, तिच्या आयुष्याविषयी ऐकल्यावर खूप वाईट वाटले....त्यावर सुचलेल्या काही ओळी

    आहुती! (१४-०८-२०१८)

    अशीच अगतिक झाले होते,
    स्वप्न झुल्यावर झुलत होते,
    मी प्याला त्याच्या प्रेमाचा,
    अमृत समजुनी पित होते...

    ओवला मणी त्याचा नावाचा,
    भाळी कुंकुम टिळक लावले,
    होम पेटला संसाराचा,
    आहुती म्हणूनी स्वतःस चढवले...

    रोज रोजचे तंटे वाजले,
    अंगी लाल रांगोळी अन् काहूर माजले,
    चणचणत्या जखमांचे तोरण,
    खपली धरुनी गळून पडले....

    थंडी बोचरी काय असते?
    दुदैवाने तेव्हा कळली,
    झोंबणाऱ्या या संसारातला,
    निर्दोशी असूनही, मी एक बळी...!!

    - कु. श्वेता संकपाळ.

  • बस्स झाले – आता आमूलाग्र बदल हवा

    श्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्री पदाची शपथ घेतल्यावर जाहीर केले होते की ते आर टी ओ च्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवतील. मुंबई -पुणे एक्सप्रेस वे केल्यापासून उभा देश त्यांना ओळखू लागला आहे. आठवा ते पूर्वीचे दिवस ज्यामधे पुण्याला जाताना घाटात ५-५ तास आडकून पडावे लागत असे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने नितीन गडकरी यांनी साकार केले. ते करीत असताना त्यांनी प्रॉजेक्टचा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी करून दाखवला. नितीन गडकरी यांच्याकडे त्याच त्यांच्या अनुभवामुळे रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून केंद्रीय कारभार दिला गेला. पण त्यांनी संसदेत मांडलेले या संदर्भातील बिल अडकले आहे. अशा प्रकारे चांगली बिले रोखून धरायची आणि कुठे आहेत चांगले दिवस म्हणून तोंड वर करून विचारायचे हेच पाहण्याचे तुमच्या आमच्या नशिबी आले आहे.

    "रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस किंवा RTO मधला भ्रष्टाचार इतका प्रचंड आहे की त्यापुढे चंबळचे दरोडेखोर काहीच नाहीत". खुद्द रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे हे शब्द आहेत. रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल गेले आठ महिने मंजुरीच्या प्रतीक्षेत संसदेत अडकून पडले असून RTO च्या अधिका-यांनीच या विधेयकाविरोधात राज्य सरकारांचे कान भरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .

    RTO अधिका-यांनी आपली दुकानं बंद करावीत असं जाहीर आवाहन यापूर्वीही गडकरींनी केलं होतं. हे विधेयक संमत झालं तर हे संपूर्ण क्षेत्र सुधारेल आणि भ्रष्टाचार निपटला जाईल असा गडकरींचा दावा आहे. ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तेच या विधेयकाला विरोध करत असल्याचे गडकरींचे म्हणणे आहे. राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे सांगण्यात येत असून ते निखालस असत्य असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

    भारतात जितक्या सहजपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, इतक्या सहजपणे जगात कुठंही मिळत नाही असं सांगताना यातली ३० टक्के बोगस असतात असंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स देता येऊ शकतात, ऑनलाइन परमिट आणि अन्य सुधारणाही या बिलात प्रस्तावित आहेत.

    संपूर्ण वाहतूक व्यवस्था बदलण्याची क्षमता या विधेयकात असून संसदेच्या अधिवेशनात ते मंजूर व्हावं अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली आहे. सदर विधेयकला हाणून पाडणा-या लोकांना उघडे पाडले पाहिजे. देशात आता शिकलेल्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. जी मंडळी या विधेयकला विरोध करीत आहेत त्यांना संसद आणि विधी मंडळाचे दरवाजे कायमचे बंद केले पाहिजेत .देशाच्या बाबतीत फालतू राजकारण नको. आता खूप झाले.

    -- चिंतामणी कारखानीस

  • स्वर्गीय अटलजी

    मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि

  • सातार्‍याचा ढोल्या गणपती

    सातार्‍यातील या गणेशाची मूर्ती आकाराने १० ते १२ फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात.