चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय.
August 8, 2021
दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली.
बायको: कुठं निघालात?
आम्ही: हिमालयात
बायको: ट्रेकिंगला?
आम्ही: सन्यास घेतोय.
(बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी)
बायको: आता हे काय मध्येच?
आम्ही: सन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 ला या अखंड महाराष्ट्राचा मामु…………
बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट राहील का सन्याशांच?
आम्ही: जो पर्यंत सुर्य-चंद्र …………
बायको: (किंचाळत) आणि हे काय? या तांब्याच्या तांब्याचे हे हाल कोणी केले?
(काल आम्ही गुपचुप तांब्याला दोन भोकं मारुन नायलॉनची दोरी बांधली होती.)
आम्ही: ते कमंडलु आहे.
बायको: (रागाने) आपल्या लग्नात मिळालेला तांब्या होता, माझ्या बाबांनी ………
आम्ही: हे बघ आता मोह, माया यापासुन दुर राहिले पाहिजे. आम्ही दोन वर्षाने परत येऊ, पण आपण 14 वर्ष तपश्चर्या केली असं लोकांना सांगायचं.
बायको: (ओरडत) कायपण काय? अजुन लग्नाला दहा वर्ष झाली नाहीत.
आम्ही: गणित चुकतय काय?
बायको: साफ चुकतय.
आम्ही: ठिक, मग सात वर्ष दिवस रात्र घोर तपश्चर्या केली असे सांगु.
बायको: (त्राग्याने) काय करायचे ते करा, माझी मला कामे पडलीत.
(आम्ही आमचे उरकुन निघायच्या तयारीत,बायकोची परत एंट्री)
बायको: (किंचाळत) अहो काय घातलयं हे?
आम्ही: (निर्विकारपणे) भगवी वस्त्र
बायको: कसली डोंबलाची वस्त्र, माझा गाऊन आहे तो.
आम्ही: पण भगवाच आहे ना?
बायको: गप काढा.
(मधेच पोराची एंट्री, कापडी पिशवी घेऊन)
मुलगा: बाबा पैसे द्या.
आम्ही: कशाला?
मुलगा: रविवार आहे, मटण आणायचेय.
बायको: (आमचे पाकिट काढुन घेत) हे पाकिट आणि एटीएम इथच ठेवा, याची गरज नसतेय सन्याशाला, (मुलाला उद्देशुन) हे घे पैसे.
मुलगा: बाबा तुमचं फायनल झालयं का?
आम्ही: काय बेटा?
मुलगा: हिमालयात जायचे.
आम्ही: कारे?
मुलगा: नाही म्हणजे जाणार असाल तर मटण आमच्या दोघांच्या पुरतेच आणायला.
(मनात चलबिचल)
बायको: जा, दोघांसाठीच आण, यांच डोकं फिरलयं.
(मुलगा चप्पल घालुन बाहेर पडणार, एवढ्यात)
आम्ही: थांब, हे बघ मांडीचं जास्त दे म्हणावं, आणि थोडे चॉप्स, चरबी जास्त टाकु नको म्हणाव, मागच्या वेळी…………
मुलगा: माहिति आहे सगळं (आम्हाला दुर्लक्षित करुन बाहेर)
बायको: अहो इकडं या, जरा कांदा कापायला घ्या.
(सदर क्षणिक मोहापायी अखंड महाराष्ट्र एका हुशार आणि प्रामाणिक मुख्यमंत्र्याला मुकला)
नुकताच कांदा कापुन झाल्यावर अश्रुनयनांच्या साक्षिने पोस्ट टाईप केली आहे.
July 10, 2017
झोपडपट्टी पुनर्वसन(एस.आर.ए.) योजनेंतर्गत झोपडीधारकाला फुकट मिळणारे घर किमान १० वर्षे विकता येणार नाही अशी नियमावलीत अट आहे. नव्याने झोपडपट्ट्या वाढू नयेत एवढाच त्यामागचा उद्देश होता. …..
January 29, 2013
या विनोदी बातमीवर आधारित एक विडंबन …! उषःकाल होता होता वर आधारित असलेल्या या कवितेचा कवी माहित नाही, पण त्याला सलाम…
April 7, 2015
September 27, 2011
खरं आहे. या टोलचा आता कंटाला आलाय. नुस्ते पेसे जातात म्हणून नाही तर वेळ किती फुकट जातो? एकदाच काय ते वर्षभराचे पेसे घ्या आणि आम्हाला या रोजच्या कटकटीतून वाचवा...
March 22, 2015
परवाच लाईटची दुरुस्ती व काही दिवसांपुर्वी पाण्याच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याकरिता सरकारी कर्मचारी (ठरलेल्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा, वैतागलेले, दमलेले, अनऊत्साही, सावकाशपणे काम करणारे, ना सुरक्षेची ऊपकरणे ना नियोजित वस्तु.... असो...) आले होते.
काम सर्वंच पातळीवर व्यवस्थित झाले... असे गृहीत धरुन कर्मचारीही खुश होते...
मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसुन प्रश्नचिन्ह होते..,,,,
त्यातील अनुभवी कर्मचाऱ्याने हसुन यथोचित पुढाकार घेऊन आमच्याकडे "चहापानी" मागितले...
हो.... नाही...... करत..., तडजोड करत..... शेवटी "मांडवली" झाली.....
बघा... म्हणजे सरकारी नौकरीमध्ये असुन.... बरेच आयोगाच्या प्रमाणे मासिक पगार घेऊन असे साधे कर्मचारीही जर "चहापानी" घेत असतील तर यांच्याप्रमाणे सरकारी शिपाई पासुन ते क्लासवन अधिकाऱ्यांपर्यंत असे कितीतरी अधिकारी "चहापानी" घेत असतील....
तेही स्वताःच "कर्तव्ये" करुन...
ना वेळेच बंधन.... ना दिवसांची मर्यादा ....
मग आपण निवडणुकीच्यावेळी जनकल्याणाच्या कामासाठी निवडुन दिलेल्या....
नगरसेवकांचे ......
खासदारांचे......
आमदारांचे.....
राज्यमंत्र्यांचे.....
केंद्रिय मंत्र्यांचे .....
"चहापानी"
नक्कीच यथोचित व मानाप्रमाणे भरगच्चच असणार..
हा अनुभव तर तमाम भोळ्या जनतेला असणारच..
विवेक जोशी
November 29, 2016
“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो.
January 20, 2019
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायाचे ठरविले. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने, ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचे इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नौकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होते, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घरा बाहेर पडल्या आणि दोन वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. दोनवर्षांनंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नौकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्रता चळवळीचे काम सुरू केले.
June 28, 2022
उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते.
November 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti