नार्वेकर सर यांचं संपूर्ण नाव किशोर यशवंत नार्वेकर. २५ सप्टेंबर १९६० रोजी एका मध्यम वर्गीय कुटूंबात त्यांचा जन्म झाला. मध्यम बांधा, कृष्णवर्ण, टवटवीत डोळे आणि बुद्धिमत्तेचं प्रतिक असलेलं रुंद लांब कपाळ अशी त्यांची रेखीव आकृती. त्यांनी कॉलेजपासूनंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली व पारितोषिकेही पटकवली. १९८१ पासून “प्रयोग मालाड” या नाट्यसंस्थेतून लहान सहान भुमिका करत व बॅकस्टेज सांभाळत त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. प्रयोग मालाडच्या “गच्ची नाट्य उपक्रमात” सहभाग घेतला.
जीवनाच्या रगाड्यातून –
मानसिक तणाव (क्रमशः पुढे ५ वर चालू)
00
जीवनाचे एक महान सत्य …..
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी २०११-१२ या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पावर पश्चिम बंगाल निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे ममता या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्येही काही नवीन घोषणा केल्या. मा्त्र त्यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या घोषणा किती प्रत्यक्षात उतरल्या किती नाही हे तुम्हीच पाहा. ममता बॅनर्जी यांनी २०१०-११ दरम्यान सादर केलेल्या बजेटमधील काही ठळक मुद्दे….
काय करावे परिधान
कसे असावे साधन
कशास करावे विधान
कर्म साधण्यासाठी!!
अर्थ-
कर्म- धर्म-मर्म यांना सुयोग्य दिशेस जर न्यायचे असेल तर काही गोष्टींना प्रधान्य दिले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की ज्याला आपले कर्म आणि आपले शब्द यांनी जर हातात हात घातले नाहीत तर कर्म असले थोर जरी वाचा फुटत नाही, जेव्हा फुटते वाचा तेथे कर्म टिकत नाही,
यातून सांगायचे ते एवढेच की ज्याचे कामाचे साधन योग्य आहे ज्यात लबाडी नाही, दुसऱ्यास फसवून काही मिळवण्याची शक्यता नाही, ज्याच्या कामामुळे इतर लोकांचा प्रपंच चालण्यासाठी हातभार लागतो अशा दैवी कार्यकर्त्याला जर कुठे काय बोलावे, कसे बोलावे कळत नसेल तर ते कर्म देवासमोरच्या निर्माल्यात अर्पण करून पाण्यात सोडून द्यावे. कारण शब्द हे प्रमाण आहे माणसाच्या चांगले पणाचे.
प्रपंच चालवण्यासाठी माणसाने काय साधन वापरले पाहिजे यावरही समर्थ म्हणतात की ज्याचा मार्ग असेल सरळ, ज्याचा कोणास नहोईल भार, ज्याला कष्ट असतील फार, तोचि मार्ग निवडावा!
आम्हाला १०वित शाळेत स्मशानातील सोने नावाचा पाठ शिकायला होता. त्यातला व्यक्ती प्रपंच सुरू ठेवण्यासाठी जे कर्म करतो त्यातून त्याला द्रव्य मिळत जरी असले तरी समाधान मिळत असेल का? त्याच्या घरच्यांना त्याने कमावलेल्या पैशाने बनलेल्या अन्नाचा घास गोड लागत असेल का? असे अनेक प्रश्न मनात उभे रहातात. तसेच आपल्या रोजच्या व्यवसायात, नोकरीचे असे काही क्षण येतात का की जे कर्म साधण्यासाठी चुकीचे आहेत. जर तसे होत असेल तर मार्ग बदलावा असे समर्थ सांगतात. जेथे कष्ट आहेत तेथे समाधान नक्की असणार पण त्याला शब्दांचा पाठिंबा हवा. नाहीतर नुसते चांगले कपडे घालून, चांगल्या ऑफिसमध्ये बसून वाणी स्वच्छ होत नाही.
-- सुमंत परचुरे.
कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट… नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?
किल्ल्यांचे माहेरघर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतगड किल्ला म्हणजे निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याचे एक सुंदर ठिकाण..
मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो.
रामास प्रार्थना
रॉक्सी सिनेमा हे कॅनडामधील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक सिनेमागृह आहे. तसं पहायला गेलो तर कॅनडात Ice Hockey, Niagara Falls सारख्या अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत पण इथली नाट्यगृह, चित्रपटगृह एका वेगळ्याच धाटणीने बांधलेली असतात. अशा चित्रपटगृहात चित्रपट पहायला मजा का नाही येणार?
लेखांक ५
मृगशीर्ष वा मृगशिरा वा मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर चंद्राचा आणि चंद्र कलांचा कमी-कमी होत जाण्याचा अन वाढत वाढत जाण्याचा परिणाम हा होतोच होतो. राशिचक्रातील वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म मृग नक्षत्रावर झालेला असतो. जलाशय, नदीकाठ, समुद्रकाठी या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. शितल रंगाच्या चंद्रप्रकाशात या व्यक्तींनी रहावयास म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. चंदेरी रंग, रंग चक्रातील शीतरंग, पांढरा रंग हे सर्व रंग या व्यक्तींचे लाभ देणारे रंग होय.
खैराचं म्हणजे काताचं झाड हे या नक्षत्राचं जवळचं असल्यामुळे या झाडाची पंचांगे म्हणजे मूळ-खोड-पान-फुलं आणि फळ तसेच या नक्षत्राचा स्वामी चंद्र किंवा सोम यांसह या नक्षत्राच्या मुहूर्तावर जन्मलेल्या व्यक्तींचा राशी, वृषभ आणि मिथुन यांपैकी जी ज्याची असेल तिचा आकारआणि ओम सोमाय नमः किंवा ओम चंद्रमसे नमः ही जपाक्षरे या सर्वांचं त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहून, विशिष्ट चरणात म्हणजे चरण काळात बनविलेल्या त्या रंग आकारांच्या अचूक आणि सुचक रचनात्मक मांडणी द्वारा पेंटिंगला पूर्वाभिमुख दिशेला म्हणजेच पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर सदर पेंटिंग लावले की, त्या व्यक्तीस आणि त्या वास्तूस अनेक सुखद अनुभव येऊ लागतात. यात काळजी काय घ्यायचीय? तर विशिष्ट वेळेला पेंटिंगमध्ये केलेल्या अर्थात उल्लेखिलेल्या स्वामींचा जप, जप सुरू असतानाच विशिष्ट दिशेला तोंड करूनच ते पेंटिंग चितारायला लागते.
हे सर्व झाल्यानंतर राहुकाळ तपासून तो टाळून पेंटिंग दिलेल्या म्हणजे सुचविलेल्या भिंतीवरच्या जागी लावावे.
या लेखात एक प्रतिकात्मक पेंटिंग दिलेले आहे. त्याचा आकार, त्या पेंटिंग मधील आकार यांना महत्त्व आहे. जप देखील कॅलिग्राफीच्या पद्धतीने चित्र घटक विषय म्हणून रंगविला आहे.
बऱ्याचदा खैर वृक्षउपलब्ध झाला नाही तर अडुळसा शेवरी या वनस्पती वृक्षांचा पंचांगांसह पेंटिंगमध्ये उपयोग केला जातो. रंग, आकार, जपाक्षरे, आणि व्यक्तीनुरूप पेंटिंग मधील घटकांची रचना या चतुसूत्रींवर पेंटिंग त्या वास्तूशीअन वास्तुमधील व्यक्तींशी ते बोलू लागते.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
Copyright © 2025 | Marathisrushti