(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • प्रदूषण (६) – कर्मफळ

    त्या माणसाचा पुन्हा दिल्लीत नवा जन्म झाला. अस्थमा, कन्सर इत्यादी रोगांनी ग्रस्त होऊन, तडफडून तडफडून त्याच्या मृत्यू होणार.

  • ह्या शांत कृष्णा काठी

    ह्या शांत कृष्णा काठी
    मन एकचित्त घाटावरी,
    राऊळे निनादे घंटा
    मन प्रसन्न होईल तेव्हा..
    मन होईल अवखळ वेल्हाळ
    कृष्णेच्या काठी अल्लड,
    बालपण सरसर आठवून
    अंतरी सुखद क्षण हरवून.
    किती पाहू डोळा भरुनी
    सुखद दिसेल निसर्ग भवती,
    मन भरुन राहतील आठवणी
    सुंदर असेल ही स्वर्गीय अनुभूती..

    -- स्वाती ठोंबरे.

  • मर्ढेकरांची कविता – बन बांबूचे पिवळ्या गाते

    बन बांबूचे पिवळ्या गाते
    आकाशातील अघोरेखिते
    चराचरातील दळते संज्ञा
    जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
    लिंब कोरतो सांबरशिंगी
    जुनी भाकीते नपुसकलिंगी
    ज्या वाऱ्यातून त्यात उमटली …..

  • धिक्कार …..धिक्कार ……जन लोकपाल बिल विधेयक मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न………!!!!!!!!

    आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी ” ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .

  • सोसायटीमधील सदनिकेचा नॉमिनी मालक / ट्रस्टी कोण ?

    संस्थेने सदनिकेचे हस्तांतरणअन्वये व्यक्तीला सभासदत्व देण्याआधी काही अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घेणे नेहमी हिताचे ठरते. असेच नामनिर्देशन (Nomination), एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे, जी व्यक्ती असे नाव दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या नावे असलेली संपत्ती/सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असेल/विश्वस्त(Trustee).

  • बदल आणि बदलणे

    अनादीकालापासून आपण ऐकत आलोय, ते म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. कुणी सांगितलय हे. खरच सृष्टी बदललीय का हो? सूर्य आधी जसा उगवत होता, तसाच आजही उगवतो, मावळतो. चंद्राचे ही तसेच आहे. पृथ्वीचे फिरणे तसेच आहे, पाऊस येतो, उन्हाळा, हिवाळाही येतो. मग सृष्टी कशी बदलली. तिच्यात काही बदल झालेत हे जरी मान्य केले तरी त्यात मानवी हस्तक्षेपाची टक्केवारी किती होती हे देखील तपासले पाहिजे ना. माणसात मात्र आमूलाग्र बदल झालेत. त्याच्या आदीम अवस्थेपासून ते आधुनिकावस्थेपर्यंत. त्याच्या बदलण्याच्या प्रवाहामुळे सृष्टीतही बदल होत गेलेत, झालेत. बदलणे शेवटी काय आहे? आपल्या आहे त्या अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत जाणे, नवी परिस्थिती स्वीकारणे किंवा स्वीकारायला कुणीतरी भाग पाडणे हा झाला बदल. मग आपण काय स्वीकारले, काय बदलले आपल्या वर्तनात.

    आधुनिक होताना आपल्यात अनेक बदल झालेत. पण ते ध्यानात आले आहेत का? की आपल्या सवयीचा भाग झालेत. आपण पूर्वी सारखे संवेदनशील आहोत का? पूर्वी इतकाच निखळ आनंद आपण मिळवू शकतो काय? पूर्वी इतकाच आपला सहभाग सार्वजनिक उपक्रमात असतो का? जबाबदारी स्वीकारण्यात आपला पुढाकार असतो का? आपल्या अवती-भवती अनेक घटना घडामोडी घडत असतात, त्या पाहून ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती बळावतेय ना? या सारखे अनेक बदल आपल्यात झालेले आहेत, ते लक्षात आले नाहीत हा भाग वेगळा. काही वेळा असे होते सत्ता आली की माणुस बदलतो, गर्व झाला की माणुस बदलतो, अहंकार आला की माणुस बदलतो, पैसा आला की माणुस बदलतो एव्हढेच नव्हे तर लग्न झालं की मुलगा बदलतो असे आईलाही वाटते…! हे खरे आहे ना? मग हे चांगले की वाईट…! चांगल्या गोष्टींसाठी बदलणे चांगले. वाईट गोष्टींसाठी बदलणे वाईटच. चांगल्या आणि वाईटाचा फरक लक्षात घेणे देखील महत्वाचे ठरते.

    बदल दोन प्रकारचे असतात. एक बाह्य, दुसरा आतला. बाह्य बदल चटकन होतो. कारण तो कुणी लादलेला असतो, दिलेला असतो. आतला बदल व्हायला कालावधी जावा लागतो किंवा एखादा स्पर्शणारा प्रसंग घडला तर हा बदल होता. बाह्य बदलात आपला फारसा सहभाग असतोच असे नाही. काहीवेळा इतरांच्या सांगण्यावरून आपण हा बदल स्वीकारत असतो. जसे घरात आई-वडील आपल्याला संस्कार देत असतात, ते आपण स्वीकारतो. मित्र-मंडळी चांगल्या-वाईट गोष्टी सांगत असतात त्या आपण स्वीकारतो. शाळेत गुरूजी काही सवयी सांगतात. मोठ्यांचा आदर करावा, अदबीने बोलावे, देवाला नमस्कार करावा, चांगले वर्तन ठेवावे वैगरे वैगरे. आपल्याला ते पटते म्हणून आपण ते स्वीकारतो. अंगीकारतो. तसे वागू लागतो.

    आतला बदल मात्र थोडा कठीण असतो तो व्हायला काहीतरी घडावे लागते. किंवा आतली जागृती तरी यावी लागते. जसे नारदाने वाल्या कोळीला उपदेश केला आणि त्याचा वाल्मिकी झाला, महात्मा गांधीना रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकले आणि त्यांच्यांत आंतरिक बदल झाला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या कृष्ठरोग्याला पाहून बाबा आमटेंच्या अंतरात बदल झाला. अशी कितीतरी माणसे आपल्या अवती भोवती आहेत ज्यांच्यात आंतरिक बदल झाला आणि त्यांनी इतिहास घडवला. बदल आणि बदलणे यातला हा सुक्ष्म फरक लक्षात घेतला पाहिजे. जे चांगले, ते स्वीकारले पाहिजे, चांगले बदल व्हावेत यासाठी बदलले पाहिजे, नाही का….!

    दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

  • पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले

    पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले

  • भूमिका – आजोबांची !

    आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- …..

  • खरंच इतके महत्व द्यावे का?

    ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.
    इंग्रजी :-
    जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
    गोरेपणा :-
    गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
    रिअॅलिटी शो :
    यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात !? त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
    लग्नसमारंभ :
    बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग.. काही मुलींच्या बापांना तर 25 वर्षे जीव लावलेल्या मुलीच्या विरहा पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
    इंजीनियरिंगची पदवी :
    ७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते.
    बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
    क्रिकेट :
    भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
    सोने :
    जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा! काय छान दुर्दैव आहे !
    लोक काय म्हणतील ? :
    हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पण हाच विचार करतात लोक काय म्हणतील ?? मी तर यांना अर्धवटच म्हणतो
    बोर्डाची परिक्षा :
    जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत.
    परदेशी ब्रँड :
    ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजून खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात...
    कसले हे दुर्दैव !
    भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
    कमाल आहे राव ?

  • एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

    आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज जर भारतात नसते आले तर आपले किती तरी मंदिरं आता पण दिमाखात उभे असते ,असो ....
    तर भारतात खुप सुर्यमंदिरंआहेत पण त्यातल्या त्यात मुख्य दोन सुर्यमंदिर आहेत ,एक उडीसा मधलं कोणार्क चं सुर्यमंदिर आणि दुसरं गुजरात मधील मोढेरा चं सुर्यमंदिर ....
    अहमदाबाद पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा मधे हे सुर्यमंदिर १०२२-१०६३ च्या दरम्यान सोळंकी राजा भीमदेव पहिला ह्यांनी बांधलं ,सोळंकी घराणे हे सूर्य उपासक होते आणि म्हणुनच भीमदेव पहिला ह्याने हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित केलं ,(मंदिर कुणी बांधलं ह्या मध्ये मतांतरे आहेत ,गूगल किंवा इतर माहिती स्त्रोत मध्ये आणि मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात तफावत आहे ,वरील माहिती ही मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखावरून घेतली आहे....)
    मंदिर परिसरात शिरताच आपल्याला दिसतं ते सुंदर हिरवेगार गार्डन ,मंदिर परिसर विविध झाडांनी वेढलेला आहे ,गार्डन संपवून आपल्या नजरेत भरतं ते अतिसुंदर असं मंदिर आणी त्याच्यासमोर असलेल भव्य रामकुंड , मंदिर मुख्यतः तीन भागात व्यापलेल आहे, प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.
    असं म्हणतात की हे मंदिर अश्या प्रकारे बनवलं गेलं होतं की २१ जून ला सूर्याचे पहिले किरण नृत्यमंडपातून आत येऊन त्या काळी गर्भगृहात असलेल्या सुर्यदेवाच्या सोन्याच्या मूर्तीच्या मुकुटावर असलेल्या हिऱ्यावर पडत असे आणी ते किरण त्या हिऱ्यावरून परावर्तीत होऊन पूर्ण गर्भगृह उजळुन निघत असे,किती नयनरम्य दृश्य असेल ते ,आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो....
    सूर्य जिथे दुपारी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून(वर्षातील सर्वात मोठा दिवस ) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो....आणी ह्याच वृत्तावर हे मंदिर उभारलेलं आहे ,तेही त्या काळी कुठलेही आधुनीक तंत्रज्ञान नसतांना....
    हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य शैली मध्ये बनवलं गेलं आहे ,मंदिराच्या समोरच्या भागात सुर्यकुंड किंवा राम कुंड आहे ,स्थापत्य कलेचा एक अदभुत अविष्कार म्हणजे हे सुर्यकुंड ,ह्या कुंडात १०८ छोटे छोटे मंदिरं आहेत आणी कुंडात जायला पायऱ्या आहेत ,हे कुंड आणी त्या त्या पायऱ्या एवढया कोणबद्ध आहेत की सुमारे बाराशे वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल की सर्व पायऱ्या एकदम एकसारख्याच ,राम कुंड किंवा सूर्य कुंड बनवतांना पण खुप विचार केला गेला ,कुंडात १०८ मंदिरं आहेत ते सर्व १२ राशी आणी ९ नक्षत्र (१२*०९) ला ध्यानात घेतलं आहे ....
    भीमदेवांनी कुंड बनवतांना एक विचार केला की सर्व लोकांना तिर्थ यात्रा करणे शक्य नाही म्हणून कुंडातच सर्व मंदिरं बनवले ,आणी कुंड बनवतांना ह्या कुंडात ७ समुद्राचं पाणी ,विविध पवित्र नद्यांचे पाणी टाकण्यात आले ,आणी असं म्हणतात की तेंव्हा पासून त्या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही.....
    सूर्य कुंडानंतर येतो नृत्य मंडप ह्या नृत्य मंडपात ५२ खांब आहेत जे वर्षातील ५२आठवड्यांना दर्शवतात ,ह्या खांबांवर अतीशय बारीक कोरीवकाम ,नक्षीकाम केलेलं आढळतं, ह्या खांबांची रचना अश्या प्रकारे केलेली आहे की वरतुन खाली बघितलं तर हे खांब गोलाकार दिसतात आणि खालुन वर बघीतल्यास हेच खांब अष्टकोणी दिसतात ....
    खांबांवर रामायण ,महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहे ,आणी नृत्यमंडपाच्या छतावर देखील असेच महत्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहेत छताची रचना देखील खूप वेगळी आणी कलात्मक पध्दतीने केलेली आहे,मंदिरातील दगड ,खांब हे लॉक पद्धतीने एकमेकांत घट्ट बसवलेले आहेत ,आणी ते एवढे वर्ष होऊन सुध्दा उत्तम आहे ...
    नंतर येतो गर्भगृह ,त्या काळी गर्भगृहात सुर्यदेवांची सोन्याची मूर्ती होती जी आक्रमनकर्त्यांनी लुटून नेली ,मंदिराची नासाधुस केली आणी त्याच्यामुळे आता खंडित झालेल्या ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे,गर्भगृहात आधी जेथे मूर्ती होती तिथे आता दरवाजा बसवुन ते बंद केल्या गेलं आहे ....
    मंदिराच्या गर्भगृहात सूर्य,इंद्र ,विष्णु आणि इतर देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत ,त्या काळात कुठल्याही आधुनिक साहित्या शिवाय एवढी सुंदर आणी बारीक कलाकुसर तेही दगडावर ,विश्वास करायला पण खूप कठीण जातं, बाहेरच्या बाजूलापण पूर्ण बाजुंनी सुर्यदेवांच्या बारा प्रतिमा कोरलेल्या आहेत ज्या वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे आणी सोबतच दहा दिशांच्या बाजुला दहा दिशांचे दिगपाल देखील कोरलेले आहेत ,प्रत्येक दिगपालांसोबत त्यांचे वाहन देखील भिंतींवर कोरलेले आहे ,भिंतीवर सुर्यदेवांची रथारूढ प्रतिमा देखील कोरलेली आहे त्या रथाला ७ अश्व जोडलेले आहेत जे सात वारांचे प्रतीक आहे ,पूर्ण गर्भगृहाभोवती ३६४ हत्ती आणी एक सिंह कोरलेला आहे हे हत्ती आणी सिंह वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक आहे ,मंदिराच्या भिंतीवर इतरही काही देव देवतांच्या महत्वपूर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत ,ह्या सर्व मूर्त्यांच्या सर्वात वरच्या बाजूला विणाधारी सरस्वती मातेची मूर्ती कोरलेली आहे ,ज्याचा अर्थ होतो की आम्ही शिक्षणाला सर्वांत वरचं स्थान देतो ....
    मंदिरावर मुख्यतः धर्म ,अर्थ ,काम ,आणी मोक्ष ह्या विषयानुसार प्रतीमा कोरलेल्या आहेत.
    मंदिरावर त्या काळचे सामाजिक जीवन देखील कोरलेलं आहे ,एका ठिकाणी नृत्य करणाऱ्या स्त्रिया कोरलेल्या आहेत ,त्या एवढया सारख्या कोरलेल्या आहेत की असं वाटतं की त्या एका लयीत नृत्य करत आहे ,आणी त्याच बाजुला पुरुष नृत्य करतांना दाखवले आहे ,ज्यात एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसोबत मॅच होत नाही,म्हणजे पुरुष ऑर्गनाईज्ड नसतात हे सुचवलेलं आहे.....
    हे एवढं सुंदर मंदिर सर्वांत पहिले मोहम्मद गझनी ने लुटलं , नंतर मंदिर परत बनवण्यात आले ,त्या नंतर मंदिर परत धर्मांध मुर्ख खिलजी ने लुटले ,आणी ह्या वेळी त्याने फक्त लुटच नाही केली तर मंदिराची भरपूर लुट केली आणी आपल्या वैभवाला गालबोट लावलं ,त्यानंतर ब्रिटिश आणि इतरही लोकांनी हे मंदिर लुटलं ,एवढी लुटा लूट होऊन देखील मंदिर अजून दिमाखात उभं आहे ....
    #मंदिर परिसरात एक छोटंसं संग्रहालय देखील आहे ,त्यात विविध काळात सापडलेल्या मुर्त्या आहेत ...
    #जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल ,तर मोढेरा नक्कीच तुम्हाला आवडेल .
    कसे जाल :मंदिर अहमदाबाद पासून खूप जवळ आहे (अंदाजे १००किमी) मेहासाना पासून मोढेरा साठी सिटी बसेस सुरू असतात, तुम्ही मेहसाना मधुन खाजगी रिक्षा करून देखील जाऊ शकता, पण बस चा पर्याय योग्य आहे ....
    मंदिर पूर्ण हफ्ता उघडे असते आणी संध्याकाळी ६:०० पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो.…..
    संध्याकाळी मंदिरावर लेसर शो दाखवतात ज्यात मंदिराचा इतिहास आणी इतर माहिती दाखवल्या जाते ,तो लेझर शो एवढा जबरदस्त असतो की तुम्ही आपोआपच म्हणाल की ये लेझर शो नहि देखा तो कुछ नही देखा....
    उत्तरायण काळात इथे गुजरात सरकार तर्फे सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन असते ....
    प्रो टिप:शक्यतो मंदिर बघायला सकाळी सूर्योदय जेंव्हा होतो तेंव्हा जा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जा,सुर्यमंदिराची खरी महती सूर्योदयाच्या वेळीच कळते .....
    #अमिताभ बच्चन उगाच नाही म्हणत खुशबू गुजरात की आणी कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ...
    -–नितीन काकड