त्या माणसाचा पुन्हा दिल्लीत नवा जन्म झाला. अस्थमा, कन्सर इत्यादी रोगांनी ग्रस्त होऊन, तडफडून तडफडून त्याच्या मृत्यू होणार.
-- स्वाती ठोंबरे.
बन बांबूचे पिवळ्या गाते
आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली …..
आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी ” ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .
संस्थेने सदनिकेचे हस्तांतरणअन्वये व्यक्तीला सभासदत्व देण्याआधी काही अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घेणे नेहमी हिताचे ठरते. असेच नामनिर्देशन (Nomination), एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे, जी व्यक्ती असे नाव दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या नावे असलेली संपत्ती/सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असेल/विश्वस्त(Trustee).
अनादीकालापासून आपण ऐकत आलोय, ते म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. कुणी सांगितलय हे. खरच सृष्टी बदललीय का हो? सूर्य आधी जसा उगवत होता, तसाच आजही उगवतो, मावळतो. चंद्राचे ही तसेच आहे. पृथ्वीचे फिरणे तसेच आहे, पाऊस येतो, उन्हाळा, हिवाळाही येतो. मग सृष्टी कशी बदलली. तिच्यात काही बदल झालेत हे जरी मान्य केले तरी त्यात मानवी हस्तक्षेपाची टक्केवारी किती होती हे देखील तपासले पाहिजे ना. माणसात मात्र आमूलाग्र बदल झालेत. त्याच्या आदीम अवस्थेपासून ते आधुनिकावस्थेपर्यंत. त्याच्या बदलण्याच्या प्रवाहामुळे सृष्टीतही बदल होत गेलेत, झालेत. बदलणे शेवटी काय आहे? आपल्या आहे त्या अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत जाणे, नवी परिस्थिती स्वीकारणे किंवा स्वीकारायला कुणीतरी भाग पाडणे हा झाला बदल. मग आपण काय स्वीकारले, काय बदलले आपल्या वर्तनात.
आधुनिक होताना आपल्यात अनेक बदल झालेत. पण ते ध्यानात आले आहेत का? की आपल्या सवयीचा भाग झालेत. आपण पूर्वी सारखे संवेदनशील आहोत का? पूर्वी इतकाच निखळ आनंद आपण मिळवू शकतो काय? पूर्वी इतकाच आपला सहभाग सार्वजनिक उपक्रमात असतो का? जबाबदारी स्वीकारण्यात आपला पुढाकार असतो का? आपल्या अवती-भवती अनेक घटना घडामोडी घडत असतात, त्या पाहून ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती बळावतेय ना? या सारखे अनेक बदल आपल्यात झालेले आहेत, ते लक्षात आले नाहीत हा भाग वेगळा. काही वेळा असे होते सत्ता आली की माणुस बदलतो, गर्व झाला की माणुस बदलतो, अहंकार आला की माणुस बदलतो, पैसा आला की माणुस बदलतो एव्हढेच नव्हे तर लग्न झालं की मुलगा बदलतो असे आईलाही वाटते…! हे खरे आहे ना? मग हे चांगले की वाईट…! चांगल्या गोष्टींसाठी बदलणे चांगले. वाईट गोष्टींसाठी बदलणे वाईटच. चांगल्या आणि वाईटाचा फरक लक्षात घेणे देखील महत्वाचे ठरते.
बदल दोन प्रकारचे असतात. एक बाह्य, दुसरा आतला. बाह्य बदल चटकन होतो. कारण तो कुणी लादलेला असतो, दिलेला असतो. आतला बदल व्हायला कालावधी जावा लागतो किंवा एखादा स्पर्शणारा प्रसंग घडला तर हा बदल होता. बाह्य बदलात आपला फारसा सहभाग असतोच असे नाही. काहीवेळा इतरांच्या सांगण्यावरून आपण हा बदल स्वीकारत असतो. जसे घरात आई-वडील आपल्याला संस्कार देत असतात, ते आपण स्वीकारतो. मित्र-मंडळी चांगल्या-वाईट गोष्टी सांगत असतात त्या आपण स्वीकारतो. शाळेत गुरूजी काही सवयी सांगतात. मोठ्यांचा आदर करावा, अदबीने बोलावे, देवाला नमस्कार करावा, चांगले वर्तन ठेवावे वैगरे वैगरे. आपल्याला ते पटते म्हणून आपण ते स्वीकारतो. अंगीकारतो. तसे वागू लागतो.
आतला बदल मात्र थोडा कठीण असतो तो व्हायला काहीतरी घडावे लागते. किंवा आतली जागृती तरी यावी लागते. जसे नारदाने वाल्या कोळीला उपदेश केला आणि त्याचा वाल्मिकी झाला, महात्मा गांधीना रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकले आणि त्यांच्यांत आंतरिक बदल झाला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या कृष्ठरोग्याला पाहून बाबा आमटेंच्या अंतरात बदल झाला. अशी कितीतरी माणसे आपल्या अवती भोवती आहेत ज्यांच्यात आंतरिक बदल झाला आणि त्यांनी इतिहास घडवला. बदल आणि बदलणे यातला हा सुक्ष्म फरक लक्षात घेतला पाहिजे. जे चांगले, ते स्वीकारले पाहिजे, चांगले बदल व्हावेत यासाठी बदलले पाहिजे, नाही का….!
दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)
पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले
आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- …..
ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.
इंग्रजी :-
जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते? इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
गोरेपणा :-
गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
रिअॅलिटी शो :
यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात !? त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
लग्नसमारंभ :
बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग.. काही मुलींच्या बापांना तर 25 वर्षे जीव लावलेल्या मुलीच्या विरहा पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
इंजीनियरिंगची पदवी :
७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते.
बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
क्रिकेट :
भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
सोने :
जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा! काय छान दुर्दैव आहे !
लोक काय म्हणतील ? :
हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पण हाच विचार करतात लोक काय म्हणतील ?? मी तर यांना अर्धवटच म्हणतो
बोर्डाची परिक्षा :
जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत.
परदेशी ब्रँड :
ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजून खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात...
कसले हे दुर्दैव !
भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
कमाल आहे राव ?
Copyright © 2025 | Marathisrushti