गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम...दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले...
आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस...रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी...त्यांचा फारसा विरोध झाला नाही..
जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती यांचा तसा प्रेम विवाह तरीही इमरतीचा याला नकार ...इमरती जाम हट्टी..कट्टर...धष्टपुष्ट पंजाबी..तिचा मात्र विरोध होता....त्याचे कारणही असे की तिची मुलगी जिलेबी एवढी नाजुक-साजुक,कवळी काकड़ी सारखी, गोरीपान आणि त्याउलट गुलाबजाम गलेलठ्ठ, काळा सावळा आणि
त्यात गुलाबजामचा मोठा भाऊ कालाजाम एक नंबरचा गुंड दिसायचा...
खुप समजून सांगितले पण इमरती काही ऐकेना... मग बूंदीच्या लाड़वाने आपल्या परदेशी मित्राला म्हणजे रसगुल्ला आणि त्याची पत्नी रसमलाई यांना मध्यस्थ घातले आणि कसेबसे इमरतीचा होकार मिळवला...
लग्नाची बोलणी सुरु झाली...बैठका झाल्या...याद्या झाल्या...देवाण घेवाणीचा प्रश्नच नव्हता...फक्त चार वयस्कांचे मानपान एकमेकांनी करायचे व वर्हाड़ी मंडळींना पंचतिखटीय, चटपटित, चमचमित, जेवण द्यायचे हे तय झाले...
आणि बघता बघता जिलेबी आणि गुलाबजामच्या विवाहाची तारीख निच्छित झाली..
सगळे कामाला लागले...निमंत्रणे धाडली जावु लागली...
बूंदीच्या लाडुचा गोतावळा मोठा, अगदी रव्यापासून, मग बेसन,शेंगदाना ते मोतीचूर पर्यन्त सगळ्यांना निमंत्रणे गेली...
इमरतीने आपल्या बहिणीला रबड़ीला मदतीला बोलावून घेतले,तिच्या बरोबर लस्सीही आली...
इकडे श्रीखंडाने आपल्या मोठ्या भावाला आम्रखंडाला बोलावणे धाडले..बासुंदीची बहिण खीर आणि त्यांची सगळी मूल, रवा, गवले, तांदूळ इत्यादि यांना बोलावले गेले...
बोलता बोलता...लग्नाची तारीख येवून ठेपली..
मांड्याच्या पुरणपोळीचा मांडव घालण्यात आला...
मुंबई हलव्याचे स्टेज तयार करण्यात आले..त्यावर छान सूंदर सोनपापडीचे जाजम अंथरण्यात आले...
स्टेजच्या मागे...वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेटची फुले आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोळयांच्या माळांनी आरास करण्यात आली..
पिठीसाखरेची रांगोळी घालण्यात आली...
स्टेजवर चढण्यासाठी काजुकतलीच्या पायऱ्या करण्यात आल्या...
हळूहळू पाहुण्यांनी मंडप भरू लागला...विविध प्रकारच्या बिस्किटाच्या, नानकटाइच्या खुर्च्या मांडण्यात आल्या..
एक एक पाहुणे येवू लागले.... बालुशाही आपल्या राजेशाही थाटात मंडपात विराजमान झाली.... ...वेगवेगळ्या बर्फीची लगबग सुरु झाली...
कलाकंद, घेवर, मालपुवा, गुळ पापड़ी इत्यादि मंडळी येवून विराजमान झाली...
बूंदी, शंकरपाळी, चिक्की ई. लहान लहान मुले उगाच इकडे तिकडे पळत दंगा करत होती....नुक्ती आपला जूना रुबाब कायम ठेवत दुरून सर्व बघत होती....
दूर कोपऱ्यात गावाकडून आलेले गोडीशेव आणि रेवड़ी आपले अंग चोरून एवढा तामझाम बघुन उगाच बिचकुन बसले होते..
सगळ्यांची नजर चुकवत शंकरपाळा, रसभरीत कुल्फिवर लाइन मारत मंडपात तिच्या मागे मागे फिरत होता...
म्हैसूरपाक,गाजर हलवा आणि मुगडाल हलवा आल्या गेल्याचे स्वागत करत होते..
आमरस बाहेर गावी गेला असल्याकारणाने त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.
तेवढ्यात कोणीतरी सांगितले की वरमाय रुसून बसली...शेवटी म्हाळसा सारखीच ती, तिची समजूत काढत तिला स्टेजवर आणण्यासाठी सुतारफेणीच्या पायघड्या घालण्यात आल्या...
मग याद्यात् ठरल्याप्रमाणे थोऱ्या मोठयांचा म्हणजे करंजी, साठोरी, अनारसे,नारळीभात, इत्यादि यांचा मानपान करण्यात आला.
शिरा आणि त्याची बायको लापशी यांना 'मेहुन' म्हणून बोलावण्यात आले..
तेवढ्यात गुरूजी म्हणजे 'उकडीचे मोदक' यांनी विवाह समय जवळ आल्याची व वराला वधुला मंडपात आणण्याची आज्ञा दिली...
गुलाबजामचे मामा पेढ़े आणि जिलेबीचे मामा पेठा वधुवरांना घेवून मंडपात आले.
साखर फुटाण्यांच्या अक्षता वाटण्यात आल्या...
ग़ुलाबजामच्या पायावर पाकाचा अभिषेक करून पाद्य पूजन करण्यात आला...जिलेबी वधु आपल्या नारंगी शालुत खुपच खुलुन दिसत होती...तिला केशराचा टिळा लावण्यात आला...
माहिम हलव्याचा अंतरपाठ धरण्यात आला..मंगलाष्टके झाली....
छोट्या छोट्या गोळ्याच्या माळांचा हार वधु वरांनी एकमेकांना घातला...
लग्न लागताच पंच तिखट आणि चमचमित जेवणाच्या पंक्ती उठु लागल्या..
जेवणात...समोसे, कचोरी, भेळ, पाणीपुरी, SPDP ढोकळा, ठेपले, बटाटेवडा, मिरची वडा अश्या आणि अनेक पक्वान्नाचा फडशा पडत होता..
जेवणावळी नंतर, जिलेबीची पाठवणीची वेळ आली.
चॉकलेटची गाडी सजवली गेली...जिलेबी जाताना आईच्या गळ्यात पडून रड़ू लागली...ते पाहताच तिच्या वडिलांच्या म्हणजे बूंदीच्या लाडुच्या डोळ्यात सुधारस दाटुन आला तो अलगद पुसत त्याने जिलेबीला आशीर्वाद दिला...
चॉकलेटची गाडी जिलेबी आणि गुलाबजामला घेवून रवाना झाली...
-- WhatsApp वरुन फॉरवर्ड झालेली पोस्ट
जहाजावर मरीन इंजिनियर व्हायचे म्हणजे एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स करून कमीत कमी सहा महिने पूर्ण करावे लागतात. सहा महिने काम केल्याशिवाय मरीन इंजिनियर किंवा जवाबदार अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येत नाही. आपल्या भारतात ही परीक्षा भारत सरकारच्या समुद्र वाणिज्य विभाग म्हणजेच मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट कडून घेतली जाते. भारतात आणि विशेषकरून मुंबईतील केंद्रावर घेतली जाणारी परीक्षा जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अवघड आणि कठीण समजली जाते. लेखी परीक्षा आणि त्याचसोबत तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाते. ज्यामध्ये अधिकारी होण्याकरिता लागणारी निर्णयक्षमता आणि कोणत्याही परिस्थितीला किंवा आव्हानाला सामोरे जायची सक्षमता तपासली जाते. म्हणूनच परीक्षा पास झाल्यावर मिळणारे सीओसी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पेटेन्सी ज्याला सक्षमता प्रमाणपत्र असेच म्हटले जाते.
२०२५ साली जाहिराती कशा असतील याची एक झलक
बऱ्याचदा मुलीला इंग्लिश माध्यमात टाकलेले असेल आणि त्याचवेळी मुलाला ज्यावेळी इंग्लिश माध्यमात टाकायची वेळ येते तेव्हा हीच मंडळी मुलीचे नाव तिथून काढून त्याजागी मुलाला टाकतात आणि परंपरेने अन्याय होत असलेली स्त्री
दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते.
एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती हे लक्षात घेऊन प्रथम साध्या शब्दाने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शक्य असेल तर त्यांना काही भेटवस्तू देऊन सन्मानित करणे ही आणखी चांगली भावना !
ही सकारात्मक अशी उच्च दर्जाची शिकवण भारतीय संस्कृती देते, आपल्या स्वत:च्याच कल्याणासाठी.
अशी सकारात्मकता नेहमीसाठी असली तर तुमचे कोणतेच काम कधी अडत नाही. कारण तुम्ही कृतज्ञ असता ब्रह्मांडाशी ! म्हणजे जो देतो त्याच्याशी !
(उडीद डाळ- पारंपारिक मसाले वापरून, कमी तेलात व कमी वेळात कशी करायची).
ढ़ळती अश्रु गालावरुनी,
अमर्त्य सेन साहेब, आम्ही तुम्हाला मोठे अर्थतज्ज्ञ आहात असे समजत होतो. कदाचित असालही आपण फार मोठे अर्थतज्ज्ञ. पण आपण उगाचच भलत्या विषयात – ज्यामध्ये आपला काही अधिकार आहे असे दिसत नाही – हात घातलाय. आता हा हात निखार्यात घातलाय की शेणात हे आपल्यालाच माहित. कदाचित भाजून निघेल किंवा माखून निघेल.
“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो.
शब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.)
Copyright © 2025 | Marathisrushti