ठाण्यातल्या आव्हाडसाहेबांच्या लेखी उच्च न्यायालय,सेन्सॉर बोर्डाने मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला संमती देण्याच्या निर्णयाला किंमत नाही असं वाटतं… का आता इथुन पुढे असे विषय घेऊन नाटक करण्यास इच्छुक असणार्यां लेखक दिग्दर्शकांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या कार्यालयाचे उबंरठे झिजवुन त्यांची परवानगी घेऊन मगचं नाटक उभ करायचं? ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालणे’ हा गांधीवादी विचार आहे हे आम्हा भारतीयांना माहिती नव्हतं आव्हाडसाहेब…
सकाळी उठलं की, सर्वात आधी घरी चहा बनतो. चहासोबत काहीजण नाश्ता पण घेतात. चहा घेत नाही अशी व्यक्ती एखादीच असते! चहाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, सकाळी चहा भेटला नाही की, अख्खा दिवस खराब जातो.
आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल.
मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे ५ मैल अंतर कापत असे.
मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरु केली गेली. कुलाबा - क्रॉफर्ड मार्केट - पायधुणी आणि बोरीबंदर - काळबादेवी - पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. यामध्ये ग्रॅंट रोड, पायधूनी, गिरगाव, भायखळा आणि ससून डॉक या भागांचा समावश होता.
१९०७ मध्ये ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रामचे शेवटचे स्थानक होते दादरचे खोदादाद सर्कल. शेवटच्या स्टेशनला टर्मिनस म्हणून संबोधतात. त्यामुळेच खोदादाद सर्कललाही दादर ट्राम टर्मिनस म्हणजेच दादर टीटी याच नावाने ओळखले जाऊ लागले. ट्रामची वाहतूक बंद झाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही प्रचलित आहे. कधीतरी टॅक्सीवाल्याला सांगून बघा की खोदादाद सर्कलला जायचेय.. कदाचित त्याला कळणारही नाही.
१९०७ मध्ये BEST ने ट्रामवाहतूक आपल्याकडे घेतली. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरु झाली आणि १९२० मध्ये डबल डेकर म्हणजेच दुमजली ट्राम सुरु झाली.
३१ मार्च १९६४ पासून मुंबईतली ट्राम कायमची बंद करण्यात आली त्यानंतर मुंबईत जलद वाहतुकीसाठी BEST च्या बसगाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण मुंबईतल्या काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरु असताना अचानकपणे जुन्या काळातल्या ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडले आणि मुंबईतली ट्राम पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
-- निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग ३
(क्रमश:)
कवी “बी” यांच्या चाफा बोलेना…चाफा चालेना… या कवितेचा मानसी पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेला रसास्वाद
संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर जगात अनेक देशात संघ परिवाराची जी घोडदौड सुरु आहे आणि संघाच्या व्यापक परिवाराची निर्मिती ज्यांनी केली ते माधव सदाशिव गोळवलकर ज्यांना सारेजण गोळवलकर गुरूजी म्हणून ओळखतात त्यांचा आज जन्मदिवस. या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याचरणी कोटी कोटी प्रणाम.
पूर्वी राजांच्या काळात प्रसिद्ध असलेला मल्लखांब हा क्रीडा प्रकार तसा दुर्लक्षितच. शरीराच्या सर्वांगीण व्यायामाच्यादृष्टीने आवश्यक असा हा खेळ. शरीर निरोगी राखण्याचे काम हा खेळ करतो. कोकणात असे काही कलाकार आहेत, की ज्यांच्यातील सुप्त गुणांना कधी वावच मिळाला नाही. कोकण ही कलाकारांची खाण म्हटले तर वावगे ठरू नये. क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कोकणातील अनेक हिरे चमकले. ‘मल्लखांब’ हा क्रीडा प्रकार तसा कठीण. पण कोकणच्या काही क्रीडापटूंनी तो लीलया पेलला. त्यातलाच एक क्रीडापटू विजयकुमार.
तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात....
आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही... आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून... या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात.... पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात.....
त्यातलाच एक तुम्हाला सांगतो....
काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत ठरला.... ऐनवेळी काजूच्या बागेतुन यायला ऊशिर झाला... मग घाईत बागेतुन आलो तसाच हाप पँट आणी टिशर्टवर गाडीत ड्रायव्हींगला बसलो....
वाटेत सौंच्या मैत्रीणीचे दुकान... शकूंतलाचे...10 वर्षापूर्वी तिच लग्न झालय अशी सौनी माहीती दिली.
मैत्रीणीचे दुकान म्हणजे खरेदी अपरिहार्य... पण सुदैवाने ती मला ऒळखत नव्हती... खाउची खरेदी झाल्यावर... तिला गाडीत कुणी ऒळखीचे वाटले... बघितले तर मैत्रीण.... मग मुलाला आणखी एखादा पुडा दिला बहुधा.. आणी आणखी गिऱ्हाईक नसल्यामुळे गाडीजवळ आली.... व ईकडच्या तिकड़च्या गप्पा सुरू झाल्या... मध्येच ती सौं ना बोल्ली,
"बघ गो कोन पोरग्या आसा तर भावाक... "
ही खास ताकाला येऊन भांड लपवण्याची मालवणी स्टाईल....
मी मध्येत तोंड घातले....
"वो ताई माका पोरग्या बघा खय आसा तर"
तीचे डोळे अचानक चमकले बहुदा कुणीतरी मुलगी असावी पाहुण्यात....
तिने पटकन विचारले मैत्रीणीला....
"गो वय काय हेंचा? काय करतात? तुमच्याकडेच ड्रायव्हर आसत मा?
आणि आमच्यातलेच......... /जातितले/........ मा?
आसा एक पोरग्या पण अपेक्षा काय?
एव्हाना "गाडी" गरम होउ लागली होती.... मला अंदाज आला पण ईलाज नव्हता .. ऊत्तर दिल्याशिवाय गाडी पुढे नेता येत नव्हती...
शेवटी सौनि ऊत्तर दिले...
" अपेक्षा काय नाय..... फक्त एक समोर आसा ती बायको.... आणि दोन पोरा संभाळुक व्हयी"
मी काहीही न बोलता गाडी चालू केली.... आणि शकुंतला वेड्यासारखी माझ्याकडे व सौकडे आलटुन पालटुन बघत होती
बापूर्झा.
डॉ. बापू भोगटे
काश्मिरातील वास्तवाबाबत काही
अहो आश्चर्यम !!!!! स्वतहाला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणाऱ्या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने आणांनी नामोहरण केले …… आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.
भारतीयांचा 47 टक्के वेळ व्हॅट्स - ऍप स्काइपवर या मथल्या खालील बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या आणि माझे विचारचक्र सुरू झाले. पहिल्यांदा त्याबाबतीत स्वतःचाच विचार केला तर माझ्या लक्षात आले माझ्या दिवसातील निम्मा वेळ नाहीपण साधारणतः दोन तास सोशल साइट्सवर खर्च होतात, माझ्याकडे स्मार्टफोन नसतानाही. माझा रविवार तर मला वाटत हल्ली जवळ - जवळ संपूर्ण सोशल नेटवर्क साइट्सवरच जातो. त्यासाठी मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे ही टाळ्तो. रात्री दोन - तीन वाजतानाही लोक सोशल नेटवर्क साइटवरून चाटींग करताना दिसतात. कदाचित ते आपल्यादेशातील नाही तर परदेशातील मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी चॅटींग करत असावेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून आता संपूर्ण जग अचानक जवळ आलंय अगदी एका क्लिकच्या अंतरावर. आता जग स्मार्टफोन नावाच्या हातात मावण्याइतक्या छोट्याश्या पेटीत बंधिस्त झालेलं आहे. आता सार्या जगाचं भविष्य या पुढील काळात कदाचित ही बंधिस्त पेटीच ठरवेल. या पेटीच्या बाहेर आता जगातील काही मोजकीच लोक आहेत. त्यातील काही परिस्थितीमुळे, काही नाईलाजाने आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके स्वच्छेने. स्मार्टफोन आपल्या जवळ असावा म्ह्णून भारतातील सध्याची तरूण पिढी समाजात अनैतिक मानली जाणारी अथवा चुकीची कामे अगदी सहज करून जाताना दिसतात. आपल्या देशात गुन्हगारीचे प्रमाण वाढण्यालाही काही अंशी हे स्मार्टफोन कारणीभूत आहेत. आपल्या देशातील आजकालचे तरूण आपल्या पहिल्या पगारातून काय विकत घेत असतील तर ते स्मार्टफोन! या वरून आपल्या देशातील तरूण पिढी या स्मार्टफोनच्या किती आहारी गेलेली आहे हे अगदी सहज लक्षात येते.
मी आजही माझा जूनाच फोन वापरतो त्यामुळे मला व्हॉट्स- ऍप आणि वाय-फाय चा वापर करता येत नाही आणि इतर कोणत्या ही ऍपचा वापर करता येत नाही. त्यामुळे माझं काही ही आडत नसल्यामुळे आणि मला व्यक्तीशः त्याची तितकीशी गरज नसल्यामुळे मी स्मार्टफोन अजूनही विकत घेतलेला नाही. माझे मित्र आणि माझ्याशी जुजबी ओळख असणारे ही मला स्मार्टफोन घेण्याचा सल्ला देतात. पण माझा मोबाईल व्यवस्थित चालत असताना आणि मला आवश्यकता नसताना मी स्मार्टफोन विकत घ्यावाच का ?मला स्वतःला नाही पण माझ्या सभोवतालच्या लोकांना तो माझा कमीपणा वाटतो याचा अर्थ आपल्या देशात स्मार्टफोन हा स्टेट्स सिम्बोल होऊ पाहतोय. आजची तरूण पिढी खासकरून मध्यमवर्गीय कुटूंबातील हजारो रूपयांचे स्मार्टफोन प्रत्येक दोन - तीन वर्षानंतर विकत घेत राहिली तर त्यांच भविष्य नक्कीच धोक्यात आहे असंच म्ह्णावं लागेल. स्मार्टफोन आजच्या काळची गरज आहे हे जरी मान्य केलं तरी आपण त्या गरजेचे गुलामहोता कामा नये ना ? आजच्या गृहीणी ही स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या आहेत.त्यामुळे त्यांचे आपल्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. या स्मार्टफोन आणित्यात उपलब्ध असणार्या ऍपच्या माध्यमातून माणसे जवळ आली पण त्यांच्यातीलप्रत्यक्ष संवाद जवळ- जवळ संपला. आजकाल तर नवरा - बायको ही एकमेकांशी सोशलनेट्वर्क साईटवरून संवाद साधतात, एकमेकांच्या हालचालींवर आणि ताज्या घडामोडींवरलक्ष ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात बोलण्याची गरजचभासत नाही. सोशलनेटवर्क साइट्स वरचा कोणासोबतचा ही नियमितचा संवाद नंतर कंटाळ्वाणावाटू लागतो मग तो संवाद कोणासोबतचा का असेना अगदी नवरा - बायकोसोबतचा ही. त्यामुळेहा संवाद क्रमशः कमी कमी होत जावून नंतर थांबतो. आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाणवाढत आहे त्याला हा न होणारा संवाद नंतर एक मोठ कारण म्ह्णून समोर येताना दिसतो.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातीलशेतकरी जर स्मार्टफोनच्या आहारी गेला आणि तो आपला अर्धा वेळ जर त्यावर वाया घालवूलागला तर आपल्या देशाला ते परवडणारे नाही. स्मार्टफोनमुळे आपल्या देशातील तरूणांचीकल्पकता धोक्यात आलेली आहे कारण कित्येकांच्या कल्पकतेला पर्यायी ऍप स्मार्टफोनवरउपलब्ध झालेले आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून समाजात चुकीची माहिती, चुकीच्यागोष्टी, चुकीची छायाचित्रे आणि चलचित्रे ही काही सेकंदात जगभरात पसरविली जातात.आता स्मार्टफोनमुळे कोणाची ही बदनामी ही एक गावा पुरती, शहरापुरती अथवा देशापुरतीमर्यादीत नसते आता ती बदनामी जागतिक होते. पूवी आपल्या आपल्या भावना व्यक्तकरण्यासाठी हक्काची माणसे लागायची पण आता ती हवीच अशी गरज उरलेली नाही कारण सोशलनेटवर्क साईट्च्या माध्यमातून आपल्याला अशी हजारो माणसे रोज भेटतात. आपल्यामुलांच्या आयुष्यात सध्या काय भानगडी सुरू आहेत हे पालकांना ही सोशलनेटवर्कसाईट्सच्या माध्यमातून कळ्ते आणि तेंव्हा ते आपल्या पाल्याशी त्याविषयीचर्चा करतात. त्याहून भयंकर म्ह्णजे वाचनसंस्कृती दिवसेन – दिवस कमी होत चाललेलीआहे. पूर्वी बसमधे, रेल्वेमधे अथवा इतरत्र वर्तमानपत्र अथवा इतर वाचनीय साहित्यवाचणारे तरूण दिसत नाहीत तर त्याउलट सर्वत्र स्मार्टफोनमधे घुसलेले तरूण पाहायलामिळतात. पुस्तकातील शंभर पाने वाचून आपल्या हवी ती माहिती मिळविण्यापेक्षा तीमाहिती आपल्या स्मार्टफोनवरील एका क्लिकवर मिळविण्याची सवय लागलेय आजच्या तरूणपिढीला . आजच्या तरूण पिढीची ही सारे झटपट कामे करण्याची आणि झटपट गोष्टी मिळविण्याचीसवय भविष्यात आपल्या देशाला महागात पडणार आहे यात शंकाच नाही. कालांतराने लोकांनास्मार्टफोन पासून दूर ठेवण्यासाठी सक्ती करण्याची गरज भासणार या बद्दल मला पूर्णखात्री आहे. तशी सुरूवात झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. आज मी स्वतःला यास्मार्टफोन पासून दूर ठेवू पाहतोय पण माझ्या सभोवताळ्चे मला किती दिवस त्यापासूनदूर राहू देतील याबद्दल शंकाच आहे. पण मला वाटतं आपण स्वतः स्मार्टफोनचं गुलामहोऊन आपला मोल्यवान वेळ वाया घालविण्यापेक्षा स्मार्टफोनला आपला गुलाम करून आपलावेळ वाचावा म्ह्णून त्याचा योग्य वापर करायला हवा. तसं झाल तर आणि तरच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित राहील.
लेखक - निलेश बामणे
गोरेगांव(पूर्व) मुंबई - 400 065.
मो.8652065375 / 9029338268
Copyright © 2025 | Marathisrushti