एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. …..
December 13, 2012
जानकीदेवी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून काम करू लागल्या. सुरवात आपल्या सोन्याच्या आभूषणांच्या दानाने केली. मग स्वदेशीचा प्रचार सुरू झाला आणि विदेशी वस्तूंचा त्याग. विदेशी वस्तूंच्या होळीसाठी जानकी देवींनी आपले व घरातले सगळे विदेशी कपडे टाकून दिले, आणि स्वतः सूत कातून खादी चा वापर, प्रचार आणि प्रसार सुरू केला.
July 27, 2022
जॉर्ज वॉशिग्टंन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होऊन गेले. हा माणूस अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा होता. मीना गवाणकर यांनी या शास्त्रज्ञाचे “एक होता कार्व्हर” नावाचे एक छोटेखानी सुंदर असे आत्मचरित्र लिहीले आहे. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की हा शास्त्रज्ञ एकदा चर्च बाहेर बसला असतानां त्याच्या तोंडून अत्यंत गोड आवाजात उस्फूर्त असे गीत बाहेर पडले ज्याचा समावेश जगातील उत्कृष्ट गाण्यात होतो. हे कसे घडले असावे? मला असं वाटतं की त्यांच्या आतली अतीउत्कट अशी मानवीय संवेदना गाण्याच्या रूपाने अशी बाहेर आली असावी. अनेक मान्यवर गायक वा गायिका असे मानतात की गाणे दोन प्रकारचे असते एक जे गळ्यातुन येते आणि दुसरे जे हृदयातुन येते. यात जर आवाजाची नैसर्गिक देणगी असेल तर हृदयातुन गळ्याद्वारे बाहेर पडणारे गाणे नि:संशयपणे अप्रतिम होते. गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता दत्तचे असेच काहीसे होते.
वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता रॉयला गायनाची पहिली संधी मिळाली ती कोरस मधील दोन ओळीच्या रूपात. खूप मोठ्या जमिनदाराच्या १० अपत्यापैकी गीता एक होती. त्यात मुलगी असून गाणे शिकते व गाणे गाते हा तसा विरोधाभासच होता. तिचे वडील आपली ईदीलपूरची जिल्हा फरीदपूर (आताचा बांगला देश) मधील सर्व जमिन व इस्टेट मागे ठेवून कलकत्ता व आसामला आले. पूढे मग त्यांनी मुंबईला येऊन दादरला एक फ्लॅट खरेदी केला व तेथेच राहू लागले. त्यावेळी गीता रॉय १२ वर्षांची होती. लहानपणा पासूनच संगीताची ओढ गीताला होती. हनुमान प्रसाद नावाच्या एका संगीतकाराने गीताचा आवाज ऐकला आणि तिला गाणे शिकवण्याची जबाबदारी घेतली. पूढे त्यानीच मग “भक्त प्रल्हाद” नावाच्या चित्रपटात कोरस मधील दोन ओळी गाण्याची संधी दिली. पूढेही काही गाणी मिळाली पण फारसा प्रभाव नाही पडला. मात्र १९४७ मधील ‘दो भाई’या चित्रपटातील “मेरा सुंदर सपना बित गया’’ या गाण्यातुन तिच्या प्रतिभेची चुणूक मिळाली आणि पार्श्वगायीका म्हणून तिच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. या नंतर दोनच वर्षांनी ‘महल’ मधल्या “आयेगा आयेगा …आयेगा आनेवाला” म्हणत लता दिदीचे नाव दुमदुमू लागले. याच काळात सचिन देव बर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांच्यातल्या चाणाक्ष संगीतकाराने गीता रॉयच्या नैसर्गिक आवाजातली जादू ओळखली. काय योगायोग बघा याच काळात बंगलोर मधील वसंतकुमार पडूकोण नावाचा एक तरूण कोलकत्ता, पूणे प्रवास करत मुंबईत आला होता. लवकरच या तरूणाशी गीता रॉयची भेट होणार होती आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार होते.
१९५१ मध्ये देवानंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट “बाजी”चे काम सुरू झाले. चित्रपटाचे सगीतकार एस. डी. बर्मन यांनी गीता रॉय कडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होता वसंतकुमार पडूकोण उर्फ गुरू दत्त. गाणी रेकॉर्ड होत असतानां गुरूदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि यातील ‘तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले’ या गीता रॉयच्या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली. तिच्या पार्श्वगायनाचे सर्वच दरवाजे उघडे झाले आणि खरेखरच तिची तकदीर बन गयी. दरम्यान गीता रॉय देखिल गुरूदत्तच्या प्रेमात पडली आणि २६ मे १९५३ रोजी दोघांनी विवाह केला. गीता रॉय गीता दत्त झाली. त्यानां तरूण व अरूण ही दोन मुलं आणि निना ही मुलगी झाली. नंतरची चार वर्षे तिचा गळा बहरत गेला. अनेकजण असे मानतात की तिच्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता. पण मला ते फारसे पटत नाही. तिने पाश्चात्य सुरावटीची व तशी बाज असलेली गाणी सुंदरच गायली यात दुमत नाही. पण मग खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते (बावरे नैन), सुनो गजर क्या गाए (बाज़ी)]न ये चाँद होगा, न ये तारे रहेंगे (शर्त),कैसे कोई जिए, जहर है जिन्दगी (बादबान), जाने कहाँ मेरा जिगर गया जी (मिस्टर एंड मिसेस 55), ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है (भाई-भाई), आज सजन मोहे अंग लगा ले (प्यासा), वक्त ने किया क्या हँसीं सितम (कागज के फूल), आन मिलो आन मिलो (देवदास), हम आपकी आंखो मे..रफी सोबत (प्यासा), बाबूजी धीरे चलना (आरपार), ना जाओ संया छुडा के बयाँ (साहब बिबी और गुलाम),मुझे जा न कहो मेरी जान (अनुभव), घुंगट के पट खोल (जोगन) अशी एकापेक्ष एक सरस गाणी गीता दत्तने गायली. यात अस्सल भारतीय मातीची लोक संगीतावर आधारीत अशीही गाणी होती. नंतर गुरूदत्तच्या बहुतेक सर्व चित्रपटाची गाणी ती गात राहिली. मात्र नंतर अचानक या सर्वाला ग्रहण लागले. जीए कुलकुर्णी यांच्या कथेत प्रकर्षाने आढळणारी नियती किंवा प्राक्तन या दोघांच्या आयुष्यात आडवे आले.
१९५७ च्या सुमारास गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्यात अस्पष्टशी भेग पडली आणि हळूहळू यातील अतंर वाढत गेले. गुरूदत्त यानां वाटायचे की गीताने आपल्याच चित्रपटासाठी गाणी गावीत. पण गीता प्रतिष्ठीत झालेली पार्श्व गायिका होती. बाहेरच्या चित्रपटाच्या ऑफर्स येणे साहजिक होते. गीता दत्तला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख होती, एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. मग स्वत: एक संवेदनशील मन असणाऱ्या गुरूदत्तने हा हट्ट का धरला असेल? संगती लागत नाही. १९७३ मधील हृषिकेश मुखर्जीच्या ‘अभिमान’ मध्ये असेच काहीसे कथानक होते. ज्यात अमिताभ आणि जया भादूरी यांचा उत्कृष्ट अभिनय होता. तर सुरूवातीला या गोष्टीला नकार देणाऱ्या गीताने मग त्याच्या प्रेमापोटी हळूहळू माघार घेतली. पण यामुळे संगीतकारही हळूहळू बाजूला होत गेले. यात भर म्हणून की काय वहिदा रेहमानचा गुरूदत्तच्या आयुष्यात झालेला प्रवेश. या सर्वाचा परिपाक म्हणजे गीता वेगळी राहू लागली. हृदया पासून गाणारी गीता आतल्या आत कोसळू लागली. खरं तर सचिनदा यानां तिच्या आवाजावर खूप विश्वास होता. पूर्वी गाण्याच्या भरपूर रिहर्सल होत असत त्यात गीता दत्त म्हणावी तशी मेहनत घेतानां दिसेना. जर खरोखरच तशी मेहनत घेतली असती तर तिच्या गायकीचे अनेक रंग दिसू शकले असते. याच काळात मग आशाताई आपल्या प्रचंड मेहनतीने वर येत गेल्या. गुरूदत्तवर गीता दत्तने मनापासून प्रेम केले. कदाचित त्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यात अंतरिक तळमळ होती, उर्मी होती……. पूढे जेव्हा वहिदा रेहमान गुरूदत्तच्या आयुष्यातुन निघून गेली तेव्हा गुरूदत्त पूरता दारूच्या आहारी गेला. परीणाम १९६४ ला अतीमद्य आणि झोपेच्या गोळ्या सेवनाने गुरूदत्तचे निधन झाले. या दुसऱ्या धक्कयाने मात्र गीता दत्त पार कोलमडून गेली. ती नर्व्हस ब्रेकडाऊनची शिकार झाली. आर्थिक कटकटीचा गुंता अधिक वाढत गेला. त्यासाठी मग काही स्टेज शो पण करावे लागले. १९६७ मध्ये “बधू बारन” नावाच्या एका बंगाली चित्रपटात मूख्य भूमिका केली. पण मन आणि शरीर यांचा मेळ काही केल्या बसत नव्हता. १९७१ मध्ये कनू रॉय या संगीतकारासाठी गीता दत्तने शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट होता बासू भट्टाचार्य यांचा ‘अनुभव’. पूढे गीता दत्तचा आजार वाढतच गेला. गीता दत्त याचं “वक्त ने किया क्या हंसी सितम…” हे गाणे जेव्हा आज कानावर पडते तेव्हा नकळत मनात विचार येतो की खरंच काळाने गुरूदत्त आणि गीता दत्त दोघांवरही अत्याचरच केला. गुरूदत्त गेला तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर गीता दत्तने अखेरचा श्वास वयाच्या ४१ व्या वर्षी घेतला…..
-दासू भगत (२० जुलै २०१७)
January 6, 2018
मला भावलेले अर्कचित्रकार
May 31, 2011
काही जागा अशा असतात की ज्यांच्याविषयी मनोमन कुतुहल असूनसुध्दा त्या जागांच ऐतिहासिक महत्व किंवा मोल काय आहे, भूतकाळात व वर्तमानात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाची व्याप्ती काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. त्या जागेमध्ये नक्की काय चालतं व कुठल्या वैशिषट्यांमुळे त्या जागेची किर्ती ही सर्वदुर पसरलेली आहे, यांविषयी आपल्या मनात पुर्णपणे काळोख नसला तरी पुर्ण प्रकाशसुध्दा नसतो. समस्त अलिबागकरांच्या व पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली व अलिबागसारख्या बिंदुभर गावाला केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशामध्ये प्रतिष्ठेचं व सन्मानाचं वलय प्राप्त करून देणारी अशीच एक ऐतिहासिक व प्राचीन जागा म्हणजे अलिबागची चुंबकीय वेधशाळा.
July 19, 2011
या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत.
कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं... निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?
March 22, 2015
उन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात.
March 7, 2011
गोव्याचे उपमुख्यमंत्री श्री फ्रान्सिस डिसूझा यांचे “भारतात राहणारे सर्व भारतीय हिंदूच आहेत” – या मोठ्या मनाने केलेया विधानाबद्दल अभिनंदन करावयास हवे. हे विधान केल्याने त्यांच्या काथोलिक असण्यावर कुठलीच बाधा येत नाही.
July 30, 2014
हल्ली भेटवस्तू द्यायच्या असतील तर पुन्हा एकदा गहन प्रश्न पडायला लागलाय काय द्यायचे ? पूर्वी लग्नामध्ये ५-५,६-६ मिल्क कुकर्स,कफ लिंक्स,४/५ लेमन सेट प्रेझेंट आलेले असायचे. नंतर फ्लॉवर पॉटस, स्टीलची भांडी,घड्याळे,पेन्स,रुमाल. आता अगणित निरुपयोगी चीनी वस्तू,गणपतीच्या विविध मूर्ती,नको असलेले शो पिसेस. काय द्यायचे प्रेझेंट ?… लोकं पुन्हा रोख रक्कमच देण्याकडे आता पुन्हा वळायला लागली आहेत. मी स्वत: बनविलेल्या पाकिटातून असा आहेर किंवा भेट देतो. सोबतची शाळेतील पाटी ही काळा कागद व पट्ट्यांचा वापर करून बनवली असून त्यामागे रोख राक्कामेसाठी पाकीट आहे. १०वी उत्तीर्ण झालेल्या
एका मुलीला मी असेच पाकीट दिले होते ती मुलगी आज वकील झाली तरी तिने ते जपून ठेवले आहे. साध्या की चेनला असलेल्या छान बाहुल्या चिकटवून बारशाचा आहेर देता येतो. बडीशेपेच्या गोळ्या भरलेल्या बदकाचे २ उभे तुकडे चिकटवून मुला-मुलींचे नाव लिहायला पताका करता येते.छोटी गणेशमूर्ती,प्लास्टिकचे छोटे गुलाब फुल व गवत (दुर्वा) चिकटवून आकर्षक पाकीट तयार होते. २ छोटी कागदी भिरभिरे किंवा छोट्या (लहानपणी पाण्यात सोडायला करायचो तश्या ) होड्या पाकिटांवर चिकटवून उत्तम पाकिटे
तयार होतात' सोबत काही पाकिटांची छायाचित्रे देत आहे. त्यावरून अनेकांना अधिक चांगल्या कल्पना सुचू शकतील. नवीन वर्षाचा हा एक नवा उपक्रम !
-- मकरंद करंदीकर.
May 25, 2017
मनाची लाही लाही…..अंगात ज्वर उसळला……(वात्रटिका)
June 7, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti