मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला “पुळ्याचा गणपती” असेही म्हणतात.
भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर जनजातींच्या आधारावर असलेलं आरक्षण…मग फक्त ओबीसी, विमुक्त जाती, भटकी जमाती व एस.बी.सी. यांच्या आरक्षणासाठी नॉन-क्रिमीलेअर म्हणजेच आर्थिक निकष का लावला जातो… मग सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का मिळत नाही? …. यावर प्रकाश टाकणारा लेख.
डी.व्ही. राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी धुरा सांभाळली असून, हा चित्रपट “बेघर” या कादंबरीवर आधारीत आहे. २९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उंबरठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले होते..
बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
आई……………………
पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’
अविरत चघळत होतो चिंगम
हाणामारी दावी पडदा
जोरानें मी करी ओरडा
चिंगम चिकटे गळ्यात
धावत गेलो इस्पितळात.
-
चिंगम : Chewing Gum
-
सुभाष स. नाईक
( ९८६९००२१२६)
आसाममधील ४२ विधानसभा क्षेत्रांतील बांग्लादेशी मुस्लीम घुसखोरांचे बाहुल्य, ब्रम्हपुत्रेच्या पुत्रांना अभिशाप ठरत आहे. बोडो बांधवांची हत्या, लुट, बोडो तरुणींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतरण तसेच बोडो मूळ निवासी जनजातीय लोकांच्या जमिनीवरील अतिक्रमण हे प्रकार दररोजचेच झालेले आहेत. क्रुरतेने अत्याचार करणे आणि पुन्हा बोडो बांधवांवर खोटे आरोप करून त्यांनाच वेठीस धरणे ही बाब सर्वश्रुतच आहे. भारतीय संस्कृतीवर अगाढ निष्ठा असलेल्या या बांधवांना आम्ही सुरक्षिततेचे वातावरण कधी देणार ?
ग्लासभर व्हिस्की, थेंबभर पाणी
रोज ग्लास मी सात-आठ हाणी
होणारच, झाले आजार
डॉक्टरनें केलें बेजार
‘हें खा, तें घ्या, तें नको’
कंटाळुन गेली बायको
तरिही अजुन मी भरतो पेला
ग्लासभर पाणी, थेंबभर हाला.
-
हाणणें : भरपूर रिचवणें
हाला : मद्य
-
सुभाष स. नाईक
( ९८६९००२१२६)
२७ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील एका लेखात श्री अशोक शहाणे यांनी लिहिले आहे की “सी-डॅक वाल्यांनी मराठीची वाट लावली… सगळ्याच भारतीय भाषांची वाट लावली”. यात तथ्थ्य किती हे त्यांचे त्यांनाच माहित पण वस्तुस्थिती अशी आहे की आज संगणकाशिवाय पर्याय नाही.
मला तर सध्यस्थितीत अस वाटत की, प्रत्येक भारतीय मनुष्य "भारतीय दंड संविधानाला" घाबरेल अस वाटतच नाही.... कारण हल्ली कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या .... नेमलेल्या..... व्यक्तीच अशा अनेक कायदेशीर पळवाटा शोधुन काढतात की, त्याला सर्वौच्च न्यायालय देखील काहीच करु शकत नाही.
पण... मात्र..
भारतातील प्रत्येक जातीधर्मांतील श्रध्दाळु भक्तच मला जास्त आवडतात..... कारण ह्यांची ज्या-त्या देवांपाशी असलेली अपार भक्तीच अस काही यांना करुच देत नाही की ते धर्ममान्य नसेलही व कायदेशीरतर नसेलच.
कारण काहीजण "भारतीय दंड संविधाना" तुन सहीसलामत व ब्बाईज्जत सुटतीलही..,,, पण वरच्या न्यायालयात जन्मापासुन ते मृत्युपर्यंतच्या सर्वंच गोष्टींची दखल काळजीपुर्वज घेतलीच जातीही...,
ते ही कोणत्याही पळवाटेविना..... व अंमलबजावणी तेवढयाच कठोरात कठोरपणे होते ही..,,
-- विवेक जोशी
Copyright © 2025 | Marathisrushti