किल्ल्यांचे माहेरघर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतगड किल्ला म्हणजे निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याचे एक सुंदर ठिकाण..
शहराच्या पश्चिमेस उक्ताड भागात उघडा गणपतीचे मंदिर आहे. हा पूर्वाभिमुख गणपती नवसाला पावतो, असा अनुभव आहे. काळया पाषाणाची ही मूर्ती सुमारे ३०० वर्षे उघडयावरच होती..
-- स्वाती ठोंबरे.
पौराणिक ग्रंथात भरपूर विज्ञान सामावलेले आहे. पण ते अध्यात्मात बुडालेले आहे. गीतेच्या मुखपृष्टावर असलेल्या चित्रासंबंधाने या लेखात विचार मांडले आहेत.
धार्मिक ग्रंथातील विज्ञान, शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.
गृहनिर्माण संस्थेला दरवर्षी विविध शुल्कातून होणाऱ्या उत्पन्नावर प्राप्तीकर भरावा लागतो. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संस्थेच्या मासिक शुल्क यामधील बिनभोगवटा शुल्क (NOC) ह्या उत्पन्नावर आता प्राप्तीकर देय नसल्याने गृहनिर्माण संस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दलची माहिती आपल्यासाठी सदर सत्रात देण्यात आली आहे.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.
महाकवी कालीदासाची कथा कविता रुपात
न्यूझिलंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना मोक्याच्या क्षणी हरभजनसिंगने चमकदार शतक झळकावून हा पराभव टाळला. आजवर आपल्या गोलंदाजीने देशाला विजय मिळवून देणार्या या सिंगने पहिले-वहिले कसोटी शतक झळकावून फलंदाजीतही आपण कमी नसल्याचे सिद्ध केले.
बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला
एकदम माझ्या मित्राचा
चेहरा पांढरा पडला
तो म्हणाला दिवाळी आली की
हल्ली धड धड होतं
जुनं सारं वैभव आठवून
रडकुंडीला येतं
चार दिवसाच्या सुट्टीत आता
कसं होईल माझं
एवढ्या मोठ्या वेळेचं
उचलेल का ओझं ?
मी म्हटलं अरे वेड्या
असं काय म्हणतोस
सलग सुट्टी मिळून सुद्धा
का बरं कण्हतोस ?
काय सांगू मित्रा आम्ही
चौघ बहीण भाऊ
कुणीच कुणाला बोलत नाही
मी कुठे जाऊ ?
आता कुणी कुणाकडे
जात येत नाही
आम्हालाही दोन दिवस
कुणीच बोलावीत नाही
चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो
लहानपणीचे फोटो पाहून
मी एकटाच रडतो
पूर्वीच्या काळी नातेवाईक
बरेच गरीब होते
तरीही ते एकमेकाकडे
जात येत होते
कुणाकडे गेल्या नंतर
आतून स्वागत व्हायचं
सारं काम साऱ्यानी
मिळून मिसळून करायचं
सुबत्ता फार नव्हती
पण वृत्ती चांगली होती
गरिबी असून सुद्धा
खूप मजा होती
मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा भेटायचा
त्याप्रसंगी आनंद मात्र
आभाळा एवढा असायचा
लाल,हिरव्या रंगाचे
वासाचे तेल असायचे
अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
बुडाला जाऊन बसायचे
उत्साह आणि आनंद मात्र
काठोकाठ असायचा
सख्खे असो चुलत असो
वाडा गच्च दिसायचा
चपला नव्हत्या बूट नव्हते
नव्हते कपडे धड
तरीही जगण्याची
मोठी धडपड
सारे झालेत श्रीमंत
पण वाडे गेले पडून
नाते गोते प्रेम माया
विमानात गेले उडून
घरा घरात दिसतो आता
सुबत्तेचा पूर
तरी आहे मना मनात
चुली सारखा धूर
पाहुण्यांचे येणे जाणे
आता संपून गेले
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण गेले
श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
मोठे सण असतात
फ्लॅट आणि बंगल्या मधे
दोन चार माणसं दिसतात
प्रवासाची सुटकेस आता
अडगळीला पडली
त्या दिवशी माझ्याजवळ
धाय मोकलून रडली
हँडल तुटलं होतं तरी
सुतळी बांधली होती
लहानपणी तुमची मला
खूप सोबत होती
सुटकेस म्हणली सर मला
पाहुण्याकडे नेत जा
कमीत कमी दिवाळीत तरी
माझा वापर करीत जा
सुटकेसचं बोलणं ऐकूण
माझं ही काळीज तुटलं
म्हणलं बाई माणसाचं
आता नशीब फुटलं
म्हणून म्हणतो बाबांनो
अहंकार सोडा
बहीण भाऊ काका काकू
पुन्हा नाती जोडा
' संदुक ' आणि ' वळकटीचे '
स्मरण आपण करू
दिवाळीला जाण्यासाठी
पुन्हा सुटकेस भरु
Copyright © 2025 | Marathisrushti