(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खडा पारसीचे सौंदर्यीकरण पूर्ण

    तत्कालीन पारसी समाजाचे प्रमुख शेट करसेटजी माणेकजी यांचे स्मारक भायखळा पश्‍चिम येथील वाय ब्रिजजवळ अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर १८७५ मध्ये उभारण्यात आले. प्रथम श्रेणी दर्जाचे हे …..

  • घालीन लोटांगण

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

    घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?
    या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.
    रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!

    - रवी उवाच
    विकास,
    'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.

    (१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.

    (२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.

    (३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

    (४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.

    (५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

    तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.

    -- रवी अभ्यंकर

  • महिलांच्या छेडछाडीला कायद्याचा लगाम !

    महिलांची छेडछाड व वाढत्या गुन्हेगारीला आळा…कमकुवत कायदा ….त्यातील पळवाटा…न्याय मिळण्यास होणारी दिरंगाई …कायदा सुव्यवस्थेसाठी कडक कायदा करण्याची गरज… त्यासाठी उपायात्मक सूचना.

  • राजसाहेब कुठे आहेत?

    अनिल नाचणे, मुंबई

    राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय...

    राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा... हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!!

    त्या राष्ट्रवादीवाल्यांनी बारामतीचा टोल रद्द करुन घेतला... फडणवीसांनी नागपूरचा टोल रद्द करुन घेतला... आमचा मुंबईकरांचा वाली कोण ?

    राजसाहेब... लवकर काहीतरी करा......

    Anil Nachane - anc@gmail.com

  • संस्कारित जीवन

    भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत.

  • अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम…

    लिंबू हे आपल्या नेहमीच्या आहारातील एक महत्त्वाचे अंग आहे. या लिंबाच्या अनेक औषधी उपयोगासंबंधी एक लेख गेले बरेच महिने सोशल मिडियावर फिरतो आहे. “मराठीसृष्टी”च्या वाचकांसाठी हा लेख प्रकाशित करत आहोत.


    स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..

    ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

    भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, कडधान्य, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, सुशी, मासे, मट्ण, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

    सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..

    सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

    सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

    लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

    लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

    लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो..
    केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

    मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

    कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

    तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

    विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

    लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्शन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणुवरही प्रभावी आहे..

    लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..

    या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

    लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ॲड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे..
    लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

    आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

    म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..

    तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

    सोशल मिडियावर लोकप्रिय झालेला हा एक लेख

  • आपण आपल्याशी

    साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे.

  • खलनायक नही नायक हूं मै : प्राण

    आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातुन मुक्त व्हायला आणखी २७ वर्षांचा कालावधी होता. दिल्लीतल्या बल्लीमारन या वस्तीत नेहमी प्रमाणेच धावपळ असायची. माणसांची गर्दी, कामाच्या ओढीने बाहेर पडणारे जथ्थे, हातगाडी वाले, मध्येच वाजणाऱ्या सायकलरिक्षांच्या घंटा वगैरे..काहीशा अंधारलेल्या या गल्लीच्या शेवटी काही जुन्या उदासिन हवेल्या पण होत्या. आताही आहेत. अशा प्रकारची एकतरी गल्ली भारतातील सर्वच शहरात आजही आढळते. “सौदागरन” अशी पाटी असलेला एक मार्ग आजही जुन्या दिल्लीतल्या या भागात आहे. तर याच मार्गाच्या गल्लीत लाला केवल किशन सिंकद यांनी एक घर भाड्याने घेतले होते. लाला व्यवसायाने इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर त्यामूळे बऱ्यापैकी श्रीमंत. याच घरात १३ जुलै रोजी आजच्या आपल्या या कथेचा नायक जन्मला. चार भाऊ आणि तिन बहिणीपैकी एक. १९२० मध्ये लाला केवल किशन आणि आई रामेश्वरी यांच्या स्वप्नातही आले नसेल की आपण ज्या मुलांचे नाव प्राण किशन ठेवणार आहोत त्याची अशी ख्याती होणार आहे की किमान तीन ते चार दशके माता पिता आपल्या मुलाचे “प्राण” हे नाव कधीच ठेवणार नाहीत.

    आपल्या जबरदस्त अभिनयाने नायकांचाही थरकाप उडवणाऱ्या खलनायकाचा जन्म झाला होता आणि भारतीय चित्रपटसृष्टीला त्याचा पत्ताच नव्हता. वडीलांचा व्यवसाय ठेकेदारीचा असल्यामुळे त्यांना वारंवार शहरं बदलावी लागत. लाला उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आले. मग तेथील एका शाळेत लहानग्या प्राणकिशनचे प्रायमरी शिक्षण झाले. पुन्हा वडीलांना रामपूरला घर बदलावे लागले. तेथील हमिद इंटर कॉलेजमध्ये हायस्कूल मधून हायस्कूल पर्यंत शिक्षण प्राणकिशनने पूर्ण केले. नंतर मात्र प्राणकिशन शिक्षणाच्या नादी लागलाच नाही. पतंगबाजी आणि फोटोग्राफी हा त्याचा आवडता छंद.

    पतंगबाजीमुळे कदाचित आकाशाचे वेध घेण्याचा गूण त्यात जन्मत:च आला असावा. आणि फोटोग्राफी तर चित्रपटाची आद्य माता. रामपूर वरून जेव्हा लालाचे कुटूंब दिल्लीत आले तेव्हा प्राण किशनने एका स्टुडिओत नोकरी पत्करली आणि ती ही फक्त ४०० रूपये महिन्याची. ए. दास अण्ड कंपनी या स्टुडिओत फोटोग्राफीचे पहिले धडे घेतानाच आणखी ही कला आत्मसात केली पाहिजे हा किडा त्याच्या डोक्यात शिरला आणि यासाठी तो थेट शिमल्याला पोहचला. गमंत म्हणजे येथे मदन पूरी या एके काळच्या खलनायकाने याला आपल्या राम लिला मध्ये चक्क सितेची भूमिका करायला लावली. मदन पूरी रामाच्या भूमिकेत होते. फोटोग्राफीचे वेड मग त्याला लाहोरला घेऊन गेले.त्याकाळी लाहोर भारतातील चित्रपट निर्मितीचे मोठे केंद्र होते. श्रीमंत लोकांचे आणि कलावंताची कदर करणारे शहर असा लौकिक त्यावेळी लाहोरचा होता. याच ठिकाणी प्राण किशनला चित्रपटातील पहिली संधी मिळणार होती.

    १९४० चे ते साल होते. प्राणकिशनला पान खायचं भारी वेड. लाहोरच्या स्टुडिओत काम करत असताना मधल्या सुट्टीच्या वेळात जवळच्या पानपट्टीवर तो हमखास जाई. एके दिवशी असाच पानाची ऑर्डर देऊन तो तिथे वाट पहात उभा राहिला असतानां एक गृहस्थ् तेथे आले. नुकतीच विशी पार केलेला डोक्यावर हॅट असलेल्या या रूबाबदार व देखण्या तरूणाकडे त्या इसमाचे लक्ष गेले. चुन्याचे बोट खास स्टाईलने जिभेवर फिरविणाऱ्या प्राणकिशनला ते म्हणाले- “बर्खुरदार…यूँ ही पान खानेका शौक है या कुछ करना भी चाहते हो…” उत्तर द्यावे म्हणून प्राणकिशनने तोंड उघडण्याच्या आत ते म्हणाले- “फिल्मो मे काम करोगे?” क्षणाचाही विलंब न करता प्राणकिशनने हो म्हणत मान हलवली. ते गृहस्थ लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक दलसूख पंचोली होते. चित्रपटाचे नाव होते “जट यमला”. पंजाबी भाषेतल्या या चित्रपटातील ही भूमिका निगेटीव्ह अर्थात व्हीलनची होती. आणि वयाच्या विसाव्या वर्षी प्राणकिशनचा “प्राण” झाला. आणि मग अगदी शेवटा पर्यंत तो चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही प्राणच राहिला. अभिनयाचे कुठेही प्रशिक्षण नाही, चित्रपटाचे कोणतेच तंत्र अवगत नाही, पूढे आपल्या आयुष्यात नेमके काय वाढून ठेवलयं याचा पत्ता नाही तरीही या माणसाने चित्रपटसृष्टीत ६० वर्षे राज्य केले. अभिनयाचे मानदंड तयार केले. हे कसे शक्य झाले असेल? २००४ मध्ये एका वाहिनीवर मुलाखतीत जेव्हा प्राणला प्रश्न विचारला की- ‘’तुम्हाला खलनायकच का व्हावेसे वाटले? नायक व्हावेसे का नाही वाटले?’’ यावर प्राणनी उत्तर दिले- “मला झाडा भोवती नायिके मागे गाणे म्हणत गोल गोल फिरायची अजिबात इच्छा नव्हती, मला ते कधीच जमले नसते.” पूढचा प्रश्न होता- “तुमच्या आत खलनायक आहे किंवा होता का? म्हणून हे काम स्विकारले?”त्यावर प्राणने उत्तर दिले- “नाही…आतुन मी अत्यंत प्रामाणिक आणि चांगलाच माणूस आहे. पण चित्रपटात जर खलनायकच नसेल तर नायकाला काहीच अर्थ नाही. रावण होता म्हणूनच रामाचे मोठेपण अधोरेखीत होऊ शकले.” आणि प्रत्यक्षात चित्रपटसृष्टीतही असेच घडले. प्राण हा एकमेव असा खलनायक आहे ज्याचे चित्र नामावलीत सर्वात शेवटी…..and PRAN असे नाव झळकत असे.

    लाहोरच्या वास्तव्यातील ५ वर्षात प्राणने ४० चित्रपट केले. १९४५ मध्ये शुक्ला अहलुवालिया या तरूणीशी लग्न केले. अरविंद,सुनील आणि मुलगी पिंकी ही तिन अपत्ये. आपल्या मुलांनी काय करावे याची कोणतीच बळजबरी मुलांवर प्राणने केली नाही. पैकी सुनील सिंकदने १९८४ मध्ये “फरिश्ता” नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर धरमवीर, अमर अकबर अंथनी, परवरीश, सुहाग, लक्ष्मणरेखा या चित्रपटात सह दिग्दर्शन केले. १९४७ मध्ये मात्र लाहोरचे वातावरण तापू लागले. कुटुंब सुरक्षित रहावे म्हणून त्याना इंदोरला हलविण्यात आले. फळणीच्या दोनच दिवस आगोदर प्राणने लाहोर सोडले आणि मुंबईत पोहचले. श्रीमंती थाटात राहिलेल्या प्राणचे मुंबईतील पहिले निवासस्थान होते हॉटेल ताजमहल. हातात काम नाही त्यात हळूहळू जसजसे पैसे संपू लागले हॉटेलचा स्तर पण खाली खाली येत राहिला. शेवटी शेवटी तर गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम हलवावा लागला. या काळात प्रसिद्ध लेखक सदाअत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांनी मात्र प्राणला खूप मदत केली. आठ महिन्याच्या धडपडी नंतर बॉलीबुडचा पहिला चित्रपट प्राणला मिळाला. बॉम्बे टॉकीज या मात्तब्बर संस्थेच्या या चित्रपटात देवआनंदला प्रथमच नायकाची मूख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटाचे नाव होते जिद्दी. लाहोर मध्ये हजारो रूपये मानधन घेणाऱ्या प्राणला या चित्रपटाचा मेहनताना मिळाला होता फक्त ५०० रूपये. जिद्दी चांगला चालला. या नंतर लगेच तिन चित्रपटाची ऑफर पण मिळाली. यातील “गृहस्थी” या चित्रपटाने तर डायमंड ज्युबली साजरी केली. मग हळूहळू १९५० पर्यंत प्राण स्थिरावत गेला. नंतर १९६८ पर्यंत प्राणने पडद्यावर आणि बाहेरही अशी जरब निर्माण केली की भलेभल्यांची घाबरगुंडी वळत असे. नंतरच्या ८० पर्यंत तर मुलाचं प्राण हे नाव ठेवण्यास पालक मागेपूढे बघत.

    तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या प्राणला ५०० रूपये मेहनताना मिळाला होता त्याच प्राणला नंतरच्या काळात नायका पेक्षाही अधिक मानधन मिळत असे. डॉन या चित्रपटासाठी अमिताभला अडीच लाखात साईन केले होते त्यावेळी प्राणचे मानधन पाच लाख होते. ही किमत प्राणने केलेल्या अफाट कष्टांची होती. चित्रपटातल्या पात्रांचा ते सखोल अभ्यास करत असत. त्याचा मेकअप, त्याची भाषा, त्याची देहबोली, त्याचे उच्चार याचा ते स्वत: अभ्यास करून ते पात्र कसे असेल हे ठरवत असत. या कामी त्यांना फोटोग्राफीची खूप मदत होत असे. आपल्या चेहऱ्याचे अनेक छायाचित्रे काढून त्यावर ते हाताने वेगवेगळे स्केच करून आपण कसे दिसू याचा अभ्यास करत. त्यांचा प्रत्येक खलनायक काहीतरी ढब घेऊन अवतरत असे. “राम और श्याम” मधले त्यांचे ते हिरवे डोळे अक्षरश्: आग ओकत. “मधूमती” मधल्या उग्र नारायणाच्या आवाजातील जबरदस्त जरब, “जिस देश मे गंगा बहती” मधला कधी ना कधी आपली मान फासात अडकणार आहे म्हणून सारखा सारखा गळ्याच्या कॉलर वरून हात फिरवणारा राका डाकू, “खानदान” मधला हिटलर छाप मिशा आणि अजब गजब कपडे घालणारा नवरंगी लाल, “कश्मीर की कली” मधला ‘शता ले शता ले’ म्हणणारा मोहनप्यारे, “दो बदन” मधला नायकेशी लग्न करूनही तिला हात न लावणारा अश्विनी नाथ, “गुमनाम” मधला कायम व्हीस्कीचे घोट घशाखाली रिचवत ‘अब किसकी बारी’ म्हणणारा बॅरिस्टर राकेश……………ही यादी प्रचंड आहे. प्रत्येक चित्रपटातील प्राणवर स्वतंत्र लेख होईल इतका मोठा आवाका या अभिनेत्याचा आहे. त्यांना स्वत:ला १९५६ मध्ये प्रदर्शीत झालेला “हलाकू” नावाच्या चित्रपटातील भूमिका खूप आवडत असे. त्यात ते नायक होते. नायिका होती मीनाकुमारी. तिने आगोदर प्राण नायक आहे म्हणून नकार दिला होता. पण प्राण जेव्हा हलाकूच्या मेकअप मध्ये आले तेव्हा मीनाकुमारीने लगेच होकार दिला. तुम्ही जर या चित्रपटातील त्यांचा गेटअप बघितला तर ओळखू येणार नाहीत इतपत हटके गेटअप होता. सुलतान हलाकू खान हा मंगोलियन सम्राट चंगेजखान यांचा नातू. यातील हलाकूची मूख्य भूमिका प्राणनी साकारली होती. यातील रफी-लता यांचे आजा के इंतजार मे…..हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

    आपल्या खलनायीकेने चित्रपटसृष्टी ढवळून काढत असताना मग अचानक हा खलनायक एकदम वेगळ्याच रूपात अवतरला. १९६७ मध्ये मनोज कुमारचा “उपकार” प्रदर्शीत झाला आणि यातल्या मलंग चाचाने सर्वांनाच चकित केले. बैसाखीचा आधार घेत ‘कस्मे वादे प्यार वफा’…म्हणणारा हा मलंग प्राणच्या आगोदरच्या खलनायकी भूमिकेहून सर्वस्वी वेगळा होता. काही केल्या विश्वास बसत नव्हता की प्राणणे ही भूमिका साकार केलीय. अर्थात नंतरही प्राण खलनायक साकार करत होताच. पण हळूहळू मग तो चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत शिरला. १९७२ मधल्या “व्हिक्टोरिया न.२०३” मध्ये अशोक कुमार सोबत आपण कॉमेडी ही तितक्याच ताकदीने साकारू शकतो हे ही त्याने दाखवून दिले. पडद्यावरचा प्राण जितका दहशत गाजवणारा होता त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तो व्यक्तीगत आयुष्यात चांगला माणूस होता. जंजीर च्या भूमिकेसाठी अमिताभची शिफारस करणारा प्राण अमिताभच्या वाईट काळात त्याच्या सोबतीला धावून गेला. तब्यत चांगली नसतानां अमिताभच्या ७० व्या वाढदिवसाला आवर्जुन हजर झाला. अमिताभ सोबत प्राण यांनी १४ चित्रपट केले आणि प्रत्येक चित्रपटातील त्यांची भूमिका वेगळी ठरली. “बॉबी” मध्ये राजकपूरला प्राण हवा होता पण त्याचा मेहनताना देण्या सारखी आर्थिक् स्थिती नाही हे जेव्हा प्राणला समजले तेव्हा या दिलदार माणसाने शगून म्हणून फक्त १ रूपया घेतला आणि काम केले. मला तर प्राण हा मुळी खलनायक नाही तर नायकच वाटतो. कारण चित्रपटातील त्याच्या वाईट भूमिकेमुळेच नायक अजरामर झाले. त्यांच्या पडद्यावरील कृष्णकृत्यामुळे समाजातील चांगूलपणा विजयी होतो हे ठसठशीतपणे दिग्दर्शक दाखवू शकले. वाहिनीवरील मुलाखतीत बोलताना प्राणसाब म्हणाले की- “रामायणात रावण नसता तर रामाचे सर्व सद्गुण इतक्या उंचीवर दिसलेच नसते. रावण जरी रामायणातील खल पुरूष असला तरी तो विद्ववान होता. सीतेचे हरण केल्यावर तीला महालात नाही ठेवले. कारण रावणाला माहिती होते ती रामा सोबत वनवासात आली आहे. तिच्या इच्छे विरूद्ध त्याने बळजबरी केली नाही.” खलनायकाचे चित्रपटातील महत्व खऱ्या अर्थाने प्राणने पटवून दिले. आपल्या संबंध आयुष्यात मी तरी कुठेही कुणा बरोबर प्राण बद्दचे गॉसिप वाचल्याचे आठवत नाही.

    प्राण यानां कुत्र्यांचा खूप शौक होता.बुलेट, व्हिस्की,सोडा अशी त्यांची नावे. एक माकडही त्यांनी घरी आणले होते मात्र शेजारच्यांनी तक्रार केल्यामुळे परत नेऊन् सोडावे लागले. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या अनेक छड्यांचा संग्रह होता. त्यातील अनेक छड्यांचा वापर त्यांनी चित्रपटात केला आहे. गंमत म्हणजे पत्ते खेळण्यात ते महावस्ताद होते. सहसा हारत नसत. फिल्म फेअर ते पद्मभूषण अशा पुरस्कारांच्या किती तरी माळा त्यांच्या गळ्यात पडल्या पण या महान अभिनेत्याचे जमिनीवरील घट्ट पाय कधीच सैल झाले नाहीत. १९९० नंतर ते हळूहळू चित्रपटसृष्टी पासून लांब जात राहिले. सर्व वेळ आपल्या कुटूंबीयात घालवू लागले. २०१३ मध्ये त्यानां दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला पण ते त्याला उपस्थित राहू शकले नाही. प्राण इतर कलावंतानाही भरभरून दाद देत असत.खूच उमद्या मनाचे होता हा माणूस. १९७३ मध्ये मनोजकुमार नायक असलेल्या चित्रपटात त्यांनी पोलिस हवालदार रामसिंगची अतिशय सुंदर भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरचा पुरस्कार जाहिर झाला. पण त्यानी तो नाकारला कारण होते- त्या वर्षी बेइमान चित्रपटासाठी शंकर जयकिशन ऐवजी पाकिजाच्या गुलाम मोहमंद याना उत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळायला हवा होता तो त्यांना मिळाला नाही म्हणून…..मला सगळ्यात जास्त हा माणूस भावला तो एका पुरस्कार सोहळ्यात. १९९७ मध्ये त्यांना फिल्म फेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला. हा पूरसकार स्विकारण्यासाठी ७७ वर्षांचे प्राण दोघां मदतनिसांच्या साहय्याने स्टेजवर आले. सर्व रसिकांवर एक कटाक्ष टाकून एखाद्या देवाला करावा तसा त्यांनी प्रेक्षकानां साष्टांग दंडवंत केला. सर्व सभागृह अवाक् होऊन बघत राहिले. तेव्हा कित्येक मिनीटे टाळ्या शिवाय कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. प्रेक्षकानां आपला देव आणि कलेला आपला धर्म मानणारा हा माणूस फक्त नायकच असू शकतो खलनायक नव्हे !!!! अभिनयाचे शेकडो मापदंड सर्वांसाठी मागे ठेवून १२ जुलै २०१३ रोजी प्राणच्या शरीरातील प्राण खूप दूरवरच्या प्रवासाला निघून गेले.

    दासू भगत( १२ जुलै २०१७)

  • मनस्वी यमन

    आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला "थाट" असे म्हणतात, जसे, "मारवा थाट","कल्याण थाट" इत्यादी. त्यानुसार, हा राग "कल्याण" थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत, यात बरीच देवाणघेवाण चालू असते. दक्षिणात्य संगीतात, याच रागाशी मिळता जुळता असा "कल्याणी" नावाचा राग ऐकायला मिळतो. अर्थात, स्वर लावणे, आणि सादर करणे, यात बराच फरक पडतो.
    राग संगीताची एक गंमत आहे, प्रत्येक रागाचे स्वर ठरलेले असतात पण, तेच स्वर, कसे घ्यायचे, याचा "अंदाज" प्रत्येक कलाकाराचा वेगळा असतो तसेच एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर कसे जायचे, याबाबत वेगवेगळे ठोकताळे असतात. म्हणूनच, प्रत्येक कलाकाराचे सादरीकरण, तोच राग असला तरी वेगळे होते. आपल्याकडे, जेवणात देखील हाच अनुभव असतो आणि त्यानुसार प्रत्येक गृहिणीची भाजी वेगळ्या चवीची होते!! मसाले तेच असतात पण प्रमाण वेगळे. म्हणूनच, रागाचे स्वर म्हणजे ओळख असते आणि ती कशी करून द्यायची, हे कलाकारावर अवलंबून.
    आता स्वरावली बघायला गेल्यास, आरोही सप्तकात "पंचम" वर्जित तसेच "मध्यम" तीव्र, तर अवरोहात सगळे स्वर उपलब्ध असतात. "नि रे ग रे सा", "नि रे ग म ग " या स्वरावली, यमन रागाची "ठेवण" दर्शवतात.
    हाच वेगवेगळा "अंदाज", सगळ्या संगीतकारांना, यमन रागात गाणी बनविण्यासाठी प्रवृत्त करीत असणार. या रागात, सहज सापडणारे भाव म्हणजे, शृंगार, भक्ती, विरह, प्रणय इत्यादी अगदी मुबलक आढळतात आणि सुगम संगीताच्या दृष्टीने, ही पर्वणी ठरते. त्यातून सुगम संगीतात गाणे बनवायचे म्हणजे, तंतोतंत राग सादर करण्याची अजिबात गरज नसते, एखादी हरकत, एखाद्या स्वरावर स्थिरावण्याची पद्धत, यातून अनेक छटा निर्माण होतात.
    कवियत्री इंदिरा संतांच्या "प्रवास" या कवितेतील या ओळींतून, यमन रागाच्या नवीन ओळखीची जाणीव होते.
    "मोकळे मोकळे चालतांनाच, पुढचे वळण व्याकूळ करते
    पहाडांतून सरकत सरकत, सांवळा मेघ आडवा येतो
    क्षणभर वेढून भान येऊन, आला तसाच सरकून जातो.
    मनांत अमृत टाकून जातो, पावलांत झुळझुळ गारवा भरतो."
    यमन राग असाच आहे. या रागातून कधीही पराकोटीची वेदना ऐकायला मिळत नाही. किंबहुना आपल्या रागदारी संगीतात, नेहमीच समर्पणाची भावना दृग्गोचर होते आणि त्या भावनेला यमन राग अप्रतिम कोंदण देतो.
    किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक, पंडित भीमसेन जोशींची "शाम बजाये आज मुरलिया" ही चीज म्हणजे यमन रागाची व्यवच्छेदक ओळख म्हणता येईल. या बंदिशीच्या सुरवातीला, पंडितजींनी "म ध नि" ही स्वरावली घेतली आहे आणि ती केवळ अपूर्व आहे. गायनाच्या संदर्भात लिहायचे झाल्यास, आवाजाचे लगाव, नावास साजेसा असा गरिमा ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. गरिमा म्हणजे ध्वनीचे लहान-मोठेपण. त्याचबरोबर आणखी एक बाब नोंदवायला हवी. केवळ असामान्य गरिमा हेच वैशिष्ट्य म्हणता येणार नसून, तांत्रिक भाषेत लिहायचे झाल्यास, ते आपल्या आवाजात दोन्ही रजिस्टर्सचा वापर फार परिणामकारक करतात. त्यामुळे खालच्या स्वरांवर भरीव आणि संपन्न तर वरच्या स्वरांवर चमकदार तसेच उच्च तारतेवर सहज पोहोचणारा आवाज.
    त्यांच्या दृतगती तानांत गरिमा कमी असतो पण तरीही त्या परिणामकारक वाटतात. त्याचे प्रमुख कारण हे निमुळते चमकदारपण असते. रागाची बढत नेहमी पायरी पायरीने करत जायची, असे करायचे म्हटल्यावर गायनातील "स्वर" या अंगावर अधिक भर देणे क्रमप्राप्तच होते. अर्थात या ओघात शब्दोच्चार महत्व गौण ठरते. परिणाम असा होतो, शब्द उच्चारण्याला लागणारा श्वास, ते स्वरांच्या भोवती रुंजी घालण्यासाठी वापरतात. त्यामुळे घुमारायुक्त अखंडता राखता येते.
    मराठी भावगीतांत अढळ स्थान प्राप्त करणारे - "शुक्रतारा मंदवारा" हे गाणे यमन रागावर आधारित आहे. मंगेश पाडगावकरांची गेयताबद्ध कविता आणि त्याला चाल अर्पिणारे, संगीतकार श्रीनिवास खळे!! गाण्याच्या सुरवातीला सतारीचे जे सूर आणि त्याच्या पार्श्वभागी व्हायोलीन वाद्याचे स्वर, यातून आपल्या समोर यमन राग उभा राहतो. खळे साहेबांच्या सगळ्याच चाली जरा बारकाईने ऐकल्या तर काही वैशिष्ट्ये आपल्याला समजून घेता येतील. बहुतेक गाणी अतिशय संथ लयीत चालत असतात, तसेच शब्दानुगामी चाली असतात. गाण्यात लयीचे वेगवेगळे बंध अनुभवायला मिळतात. गाणी ऐकायला सोपी वाटतात परंतु लयीच्या अंगाने हरकती असल्याने, लायीफ्चे पक्के भान ठेवावे लागते अन्यथा गाताना भरकटले जाण्याची शक्यता अधिक. कविवर्य मंगेश पाडगावकर, खऱ्या अर्थी "भावकवी"आहेत आणि अशा कवितेतच त्यांची त्यांची खरी प्रतिभा आपल्याला दिसून येते.
    "शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
    चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
    आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा,
    तू अशी जवळी रहा."
    रचना म्हणून प्रस्तुत गीत हे अतिशय अवघड आहे.
    "लाजऱ्या माझ्या फुला रे
    गंध हा बिलगे जीवा,
    अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा".
    इथे कवितेत "सलज्ज"प्रणयाचा अनोखा संस्कार आहे आणि ती भावना गाताना, ज्या संयत पद्धतीने मांडली आहे, ते खास ऐकण्यासारखे आहे. लय मुखड्यावरून बदलली आहे पण गाताना ती लय नेमकी सांभाळून, शब्दांतील आशय अधिक अंतर्मुख केला आहे. हे फार अवघड आहे पण खळे साहेबांच्या रचनांचे खास वैशिष्ट्य म्हणावयास हवे.
    मराठी चित्रपट "कामापुरता मामा" मध्ये "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे यमन राग आनंदाने निथळत असतो, याची ग्वाही देणारे आहे. नुकताच प्रणयाचा स्वीकार झालेला आहे आणि नव्या जीवनाची स्वप्ने नायिकेच्या मनात असतत. याचा पार्श्वभूमीवर हे गाणे आहे. संगीतकार यशवंत देवांची चाल आहे आणि गीत रचना देखील त्यांचीच आहे. रूढार्थाने यशवंत देव हे कवी नाहीत परंतु त्यांनी प्रसंगोत्पात रचना लिहिल्या आहेत. लिहिताना, आपण "कवी" नसून केवळ काही गाण्यांच्या बाबतीत रचना करीत आहोत,याचे भान नेहमी आढळते. परिणामी शब्दरचना सहज, सोपी आणि गेयता प्रमुख असते.
    "जीवनात ही घडी अशीच राहू दे,
    प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे."
    त्यांनीच एकेठिकाणी म्हटले आहे, "चाल ही शब्दातच दडलेली असते. संगीतकार फक्त ती चाल शोधून काढतो". अर्थात देवांनी काही प्रसंगी चालीवर देखील शब्दरचना केल्या आहेत पण तरीही तो केवळ अपवाद मानावा. गाणे अतिशय द्रुत लयीत आहे, पण तरीही शब्दोच्चार (अर्थात लताबाईंचे) आणि त्याची सुरांबरोबर घातलेली सांगड विलक्षण सुंदर आहे. एक गंमत आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, त्यातील व्हायोलीनचे सूर किंचित "पुरिया धनाश्री" रागाची छटा दाखवतात!! चाल यमन रागावर आणि त्यात पुरिया धनाश्री रागाची छटा!! काय बिघडले? गाण्याच्या चालीत तर कुठेही विक्षेप आलेला नाही. संगीतकार म्हणून यशवंत देवांची ही खुबी खरोखरच अप्रतिम आहे.
    मराठी माणसाच्या भावजीवनात माडगुळकरांच्या गीत रामायणाचे स्थान अढळ आहे. आज इतकी वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची मोहिनी काही उतरलेली नाही. गेयबद्ध रचना कशी करावी याचा आदीनमुना माडगूळकरांनी पेश केला आहे. अर्थात, अशा कवितांना तितकीच तोलामोलाची सुरांची साथ सधीर फडक्यांनी दिली असल्याने, यातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ""दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा" हे गाणे तर चिरंजीवित्व लाभलेले गाणे. यमन रागाचे सूर या गाण्यात ओतप्रोत भरलेले आहेत. मुळात, गाण्याची शब्दरचना(च) इतकी अप्रतिम आहे की अशा कवितेला चाल देखील तितकीच सुमधुर लागणार. आयुष्याचा "अर्क" म्हणून गणले जावे, अशा ताकदीची शब्दरचना आहे.
    "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा,
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."
    गाणे लांबीला बरेच मोठे आहेत आणि हे ध्यानात घेऊन, सुधीर फडक्यांनी चाल बांधताना आणि गायन करताना, त्यात निरनिराळे "खटके" घेतले आहेत, प्रसंगी चाल तार स्वरांत नेउन ठेवली आहे. अर्थात तिथे देखील संगीतकाराने, शब्दांचे औचित्य सांभाळून गायन केले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास,
    "दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गाठ"
    अगदी सोप्या पद्धतीने आशय व्यक्त केला आहे पण, गायन जर का नीट ऐकले तर चालीतील फरक कळून घेता येतो. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, फडके गाताना, शब्दांबाबत फार विचक्षण दृष्टी ठेवतात. "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा", या ओळीतील "दोष" हा शब्द किती अचूक पद्धतीने उच्चारला आहे, हे अभ्यासण्यासारखे आहे. सूर आणि लयीचा सगळा बिकट बोजा सांभाळून, शब्दांबाबत सजग भान ठेवणे, हे सहज जमण्यासारखे नव्हे.
    सुप्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांची "दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती." ही कविता आजही, त्यांच्या लोकप्रियतेची निदर्शक अशी कविता आहे. आजही कवी बोरकर, बहुतांशी याच कवितेच्या संदर्भात ओळखले जातात. या कवितेचे गाण्यात रुपांतर केले आहे, संगीतकार वसंत प्रभू यांनी, "पोस्टातली मुलगी" या चित्रपटाच्या निमित्ताने. कविता अतिशय भावगर्भशील आहे जीवनाला यज्ञाची उपमा देण्याची कल्पकता आहे तसेच कवितेच्या शेवटी, "मध्यरात्री नभघुमटा खाली, शांतीशिरी तम चवऱ्या ढाळी; त्यक्त बहिष्कृत मी त्या काळी, एकांती डोळे भरती" सारख्या अजरामर ओळींनी करून, ही कविता सामान्य माणसाच्या भावजीवनाचा भाग बनून गेली.
    तशी कविता सरळ, सोपी आहे आणि त्याच प्रकाराने, वसंत प्रभूंनी गाणे तयार करताना, चालीची निर्मिती केली आहे. कवितेतील काही ठराविक कडवी घेतली आहेत परंतु चित्रपटातील प्रसंग उठावदार करण्याच्या दृष्टीने सुयोग्य आहेत. सरळसोट यमन राग या गाण्यात दिसतो. चालीत कुठेही औचित्यभग होणार नाही आणि आशयाची अभिवृद्धी सतत होत राहील, याची काळजी घेतली आहे. अर्थात, आशा भोसले यांचे परिणामकारक गायन देखील तितकेच महत्वाचे आहे.
    पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी "भोळी भाबडी" चित्रपटात यमन रागावर आधारित सुंदर अभंग गायलेला आहे - "टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग". अभंग, माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला आहे आणि त्याला तितकीच समर्पक चाल, संगीतकार राम कदम यांची आहे. संगीतकाराने, या दोन दिग्गज गायकांची गायकी समोर ठेऊन, चालीची निर्मिती केली आहे. स्वरांवर ताबा ठेवण्याची वसंतरावांची शैली तर घुमारेदार, गोलाईयुक्त गायनाची भीमसेन जोशीची शैली, दोन्ही प्रकारच्या गायकीचे पुरेपूर प्रत्यंतर आपल्याला ऐकायला मिळते. यमन सारखा सर्वसमावेशक राग हाताशी असल्याने, चालीत "गायकी" अंग अंतर्भूत होणे क्रमप्राप्त(च) आहे.
    "टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग;
    देवाजीच्या दारी आज रंगला अभंग."
    भीमसेन जोशींचे अभंग गायनाशी कायमचे नाव निगडीत होण्यापूर्वीची ही रचना आहे परंतु गाणे ऐकताना पंडितजींच्या आवाक्याची आणि पुढील वाटचालीची कल्पना करता येते. तसे बघितले तर या गाण्यात वसंतरावांपेक्षा भीमसेनी गायनाचा प्रभाव अधिक आहे आणि त्यांना गायला बराच अवसर मिळालेला आहे. नवल असे वाटते, इतकी समृद्ध रचना काळाच्या ओघात मागे कशी पडली?
    कविवर्य भा.रा.तांब्यांनी आयुष्यात असंख्य गीतसदृश रचना केल्या. किंबहुना, त्यांच्या कविता वाचताना, आपल्या मनात आपोआप लयबद्ध चालीचा आराखडा तयार होतो. कवितेच्या प्रत्येक ओळीत गेयता सामावली गेली आहे. मुळात त्याकाळच्या इंदोरच्या सरंजामी राजवटीचा गाढा परिणाम त्यांच्या कवितेवर पडलेला दिसतो.
    "तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वाचन तुला;
    आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला."
    या कवितेत देखील याच वृत्तीचा प्रभाव दिसतो. काही ठिकाणी संस्कृत प्रचुर शब्द वाचायला मिळतात परंतु त्यामुळे कविता अधिक "श्रीमंत" होते, ही बाब नाकारणे अवघड आहे. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी, या कवितेतील "राजस" भाव ओळखून, नेमका यमन राग(च) निवडला. आपण मागील लेखात बघितले त्याप्रमाणे, यमन रागच समय, प्राचीन ग्रंथात "सांजसमय" दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर, या गाण्याच्या सुरवातीला संतूर वाद्यातून यमन रागाची धून छेडलेली आहे आणि पुढील रचनेची सूचना मिळते. चाल गायकी अंगाची आहे.
    किंबहुना हृदयनाथ मंगेशकरांच्या बहुतेक रचना या गायकी थाटाच्याच असतात आणि त्यामुळे गायला अवघड होतात. लताबाईंनी चालीतील अश्रूत गोडवा ओळखून गायनाची शैली ठेवली आहे आणि त्यामुळे गाणे कमालीचे रमणीय होते. चालीचा तोंडावळा खरेतर रागदारी चीजेकडे वळतो पण तसे असून देखील रागातील "लालित्य" शोधून, संगीतकाराने चालीचे खरोखर सोने केले आहे.
    -- अनिल गोविलकर

  • रक्तापलिकडची नाती…

    आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी.