मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ' कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे
-- चिंतामणी कारखानीस
ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच....
पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे....
आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो...
मिऴालाच तर फोटोही देईन.....
पहिला महत्वाचा फरक बांधणीचा
.. याच खोड...बहुधा फणसाचे.... पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती.... आणी त्यातुन निघणार्या
रामरामरामरामरामरामरामराम...
आवाजानेच सुतार समाजाला..रामकातयो..... म्हणजेच रामखातयो..... हे नाव मिळालं असावं......
त्यातही श्रिमंतांचा ढोल तांब्याचा.
.. हे वेगळ वैभव.... वेगळा नाद....
दुसरी गोष्ट कुडा..... म्हणजे त्याला लावावं लागणारे चामडे.... यात एका बाजुला बैलाच ... काठीने वाजवाण्याचं.... तर दुसर्याबाजूने बकर्याचं कातडं.... हातानं वाजवण्याचं......
आणी खास त्यांना बांधणिसाठी काकर..... बारीक चांबड्याची दोरी न गाठ बांधलेली अखंड काकर... हे ढोलाच्या मालकाचे वैभव....
आता शेवटची गोष्ट.... कुडाप....
म्हणजे ढोल वाजवायची काठी. खास माडाच्या शेल्यापासुन... म्हणजे ज्या भागाला नारळ लटकलेले असतात, त्यापासुन बनवलेले....... अत्यंत मजबुत, हलकी, सहज ऊपलब्ध आणि महत्वाचे म्हणजे अजिबात गाठ नसलेली....
तर असा ढोल जेव्हा देवळात वाजायचा तेव्हा 4 ते 5 किमी सहज ऐकू जायचा.....
आता गेले तेदिवस....
फोटोसुद्धा शोधुन मिळेना या ढोलांचा....
आता महत्वाचा फरक आवाजाचा.... आश्या ढोलातुन येणारा आवाज एका वेगळ्या लयीत रामरामरामरामरामरामराम.
असा आवाज देय़ील... फक्त मन लाऊन ऐका.....
तर आताचे सिंथेटिक ढोल... डमडमडमडम किंवा ढमढमढमढमढमढम असा आवाज देईल....
आणी असाच नाशिक ढोल ताफ्यातला ढोल देवळात वाजतांना सहज एखादा मालवणी म्हातारा बरळतोच....
अरे मायझयानु हयते कसले ढोल.? ... हयते डबे वाजयताय.......
सरले रे ढोलाचे दिवस..... आता रवले ते आठवणी.......
खरच माझ्या कोकणच आणखी एक वैभव काळाआड गेलय....
बापूर्झा.....
डॉ बापू भोगटे....
अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता.
श्री शिव भजन
……आणि एक ना एक दिवस एका भयंकर भयावह अशा विनाशकाल परिस्थितीला सामोरे जावे लागेल…अशी नुसती कल्पना केलेलीच बरे…नाही का?..तात्पर्य शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.
क्रेडिट किवा डेबीट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहक आणि दुकानदार दोघांचेही बरेच श्रम वाचतात. परंतु, ग्राहकाने अदा
केलेली रक्कम दुकानदाराबरोबरच बँकांमध्येही विभागली जाते. यात दुकानदाराच्या नफ्यातील जवळजवळ अर्धी रक्कम खर्च होते असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दुकानदार कार्ड पेमेंटपेक्षा रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
महाराजा सयाजीराव यांचे बडोदा राज्य आणि महात्मा गांधीजी यांचे जन्मगाव एकाच म्हणजे गुजरात राज्यात येते. महात्मा गांधीजी आणि महाराजा सयाजीराव यांचा स्नेह दृढ होता.
कुटणे, दळणे, भरडणे, कांडणे, सडणे,फोडणे, वाटणे ...केवढ्या या क्रिया ! आणि त्यासाठी पूर्वी घराघरातून जाती,( किमान २ /३ प्रकारची ), पाटा-वरवंटा, खलबत्ता , रगडा, उखळ-मुसळ अशा गोष्टी असायच्याच ..दगडी वस्तूंना टाकी लावून घेणे, लाकडी वस्तू नीट साफ करणे, लोखंडी वस्तू धुतल्यावर गंज लागू नये म्हणून नीट पुसून ठेवणे अशी केवढी उस्तवा
र असायची ! मसाल्याचे काही नाजूक पदार्थ आणि औषधे कुटण्यासाठी पितळी किंवा संगमरवरी खलबत्ते असायचे. रोजच्या छोट्या कुटण्यासाठी जमिनीतच वायन असायचे. मेंदी किंवा अफू वाटायला वेगळ्याच आकाराच्या वरवंट्याचे पाटे असत.हलकी किंवा जड अशी २ प्रकारची मुसळे असत. पण ..पण साला
एक मिक्सर आला ....आणि या सगळ्यांची वाट लागली ! मराठी भाषेतून कांही वर्षांनी ही सर्व क्रियापदेच बाद होतील. लग्नात घाणा भरतांना पाटा-वरवंटा, जाते , मुसळ यांचा सन्मान होई. देव देवतांनी असुरांशी लढताना मुसळ हे हत्यार म्हणून वापरले होते. बारशाला
तर तान्हुल्याच्या आधी वरवंट्याचा केवढा मोठा मान !
तसेच कायम अग्नी जपून ठेवणारे गावचे अग्निहोत्र म्हणजे -चूल वैल ! ज्या चुलीवर जेवण शिजवले जायचे त्यातच वैश्वदेवाच्या आहुतीही दिल्या जायच्या. हे सगळंच आता वेगाने नाहीसे होतंय.
यातील काही वस्तूंच्या ३-४ इंचाच्या सुंदर प्रतिकृती मला अलीकडे नाशिकला मिळाल्या. जाते,पाटा वरवंटा, रग
डा हे अस्सल दगडाचे,चूल-वैल मातीची ,लोखंडी खलबत्ता ( तुळशीबाग),लाकडी उखळ-मुसळ.. अशा सुंदर वस्तू !! एका मित्राच्या खूप महागड्या flat मधील नवीन "किचन" च्या सजावटीसाठी मी या वस्तू त्याला दिल्या. त्या त्याला आणि पाहणाऱ्यांना खूप आवडल्या . माझ्या संग्रही तर या गोष्टी आहेतच पण त्याचा असा प्रचार झाला तर निदान आठवणी तरी टिकून राहतील !!
--मकरंद करंदीकर
वास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय? यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेक जणांनी... ज्यांना स्वतःचे विचार, स्वतःचं मन आणि स्वतःची स्वप्न असतात अशा साऱ्यांनीच हा अनुभव घेतलेला असतो.
हे असं कशामुळे घडत असतं याबद्दल अनुभव घेणारा अनभिज्ञ असतो किंवा तो फारसा विचार या मुद्द्यावर करत नाही. जर त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्या ध्यानी येईल त्या वास्तूच्या अंतर्गत सजावटीमध्ये भिंतीचा रंग फ्रेश आहे. आत लटकवलेली-लावलेली-अडकवलेली पेंटिंग्ज वा निसर्गचित्र वा सिन वा देखावा...... एक असो एकाहून अधिक असो... वातावरण शांत ठेवणारे असतात, आल्हाददायक असतात. खिडक्या-दरवाज्यांचे पडदे असतील तर त्यांचे रंग देखील वातावरणाला पोषक असतात.
हा सारा प्रकार आणि हे सारं वातावरण केवळ आणि केवळ रंगयोजनांचा अत्यंत अचूकपणे-समर्पकपणे केलेला वापर होय. दवाखान्यांना हॉस्पिटल्सना पिस्ता कलर, फिक्कट हिरवा, पांढरा, ऑफव्हाईट अशाच प्रकारचे रंग दिलेले असतात. कधी आपण पाहिले आहे काय? की एकदम भडक लाल-भगवा, गडद हिरवा इत्यादी डोळ्यांना त्रास होईल अशा रंगांनी तो दवाखाना वा हॉस्पिटल सजविले आहे? असं दिसलंच तर तो डॉक्टर आणि तो दवाखाना वा हॉस्पिटल खरंच किती रुग्ण व्याधीमुक्त करेल याबाबत प्रश्नच राहील... असो.
आपण पुढील लेख हा कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग घरात लावावे यावर माहिती मिळवू.
-शुभम भवतु
गजानन सिताराम शेपाळ
Copyright © 2025 | Marathisrushti