(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • झेंडावंदन

    मी आज सकाळी झेंडावंदन झाल्या नंतर बऱ्याच मित्राना व ओळखीच्या लोकांना फोन केले

    विचारले झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला का
    बऱ्याच लोकानंचा व मित्रांचा रिप्लाय आला नाही यार आज आम्ही झेंडावंदनाच्या कार्यक्रमास गेलो नाही आज सुट्टी उपभोगतोय कोन मित्राबरोबर, कोन गावी ,कोन फँमीलीबरोबर

    प्रश्न मलाच पडला

    ह्या देशाला स्वतंत्र्य मिळवुन देण्यासाठी किती लोकांनी बलीदान दिले
    आज त्यांच्या मुळे हे स्वतंत्र्य आपण उपभोगतोय..
    निदान त्यान श्रध्दांजली साठी तरी हजर राहिल पाहिजे
    कमी आधिक सर्वच सरकारी व खासगी आँफिस आँफिस मधील कर्मचाऱ्यांची झेंडावंदनास हजेरी खुप कमी आसते
    सरकारी कर्मचाऱ्यास कुठ तरी झेंडावंदनास हजर होता म्हनून पुरावा द्यावा लागतो तोही तो नेहमीच्या सरकारी पद्धतीनी मिळवून सादर करतो
    व खासगी आँफिस मध्ये आसा पुरावा लागत नसले मुळे इथ तर कार्यक्रमास उपस्थिती खुपच विरळ आसते

    काय म्हनाव याला

    ज्या स्वतंत्र्या मुळे हे लोक आज हे आसे मोकाट वागतात..

    निदान..।

    त्याची कृतज्ञता म्हनून तरी झेंडावंदन कार्यक्रमास हजर राहिल पाहिजे

    विचार करा

  • किमान लग्न तरी वेळेवर लावा!

    लग्न किती उशिरा लागले हे कळावे एवढ्याचसाठी लग्नाचा मुहूर्त काढल्या जात असावा. खरेतर एखादा विशिष्ट मुहूर्त जेव्हा काढला जातो तेव्हा त्याचा अर्थ त्यावेळी त्या शुभकार्यासाठी ठाह-योगाचे पाठबळ वधू-वराच्या पाठीशी असते. लग्नाचा मुहूर्त काढणारे ही श्रद्धा बाळगूनच असा मुहूर्त निश्चित करीत असावेत आणि तशी त्यांची श्रद्धा असेल तर त्यांनी त्या विशिष्ट मुहूर्तावर लग्न लावलेच पाहिजे.

  • अनपेक्षित

    दोन व्यक्तींमधील संभाषण वा व्यवहार दोघांच्या मर्यादां दरम्यान होत असतील तर ते ठीक असते. पण अशी मर्यादा ओलांडली गेली की एकाचे दुसर्‍याविषयीचे मत बदलते. कारण त्या एकाला धक्का बसलेला असतो. योग्य कारण जाणण्यात जर तो कमी पडला तर गैरसमज वाढतो. धक्का बसल्यानंतर त्यामागचे खरे कारण समजून घेणे म्हणूनच आवश्यक असते. यासाठी मन खुले असावे लागते.

  • लुटारूंनी लुटारुंसाठी…!

    दारिद्र्य रेषा’ हा सरकारी भाषेतील एक नेहमी ऐकू येणारा शब्द. या रेषेचे काही निकष आहेत. हे निकष साधारणत: उत्पन्नाच्या संदर्भात असतात.

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या, तसेच धर्मनिरपेक्षता : एक टिपण

    (०१.०४.२०१६)

    मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या ; व २) धर्मनिरपेक्षता ; या, एकमेकांशी संल्लग्न असलेल्या दोन गोष्टीबद्दल मी इथे कांही माहिती पुढे ठेवीत आहे.

    • रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितलें म्हणजे, देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची कल्पना येते, तिचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता रहात नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नांवानें इंग्रजीत लिहिला , व त्याचे मराठी भाषांतर नंतर झालेले आहे, हे ध्यानीं घ्यावे. इंग्रजीत कां , तर इंग्रजी ही संपर्क-भाषा (लिंक-लँग्वेज) असल्यामुळे, कुठलीही मातृभाषा असलेल्या शिक्षित माणसाला तें लेखन सहज वाचता व समजता यावे ; तसेंच, पाश्चिमात्यांपर्यंतही (त्यात नवमतवादी ब्रिटिश आले, व अमेरिकनही आले), ते विचार पोचावेत.
    • ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण, तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला (कॉइन केला) . याचे कारण असे की, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, अजूनही जोडला जातो. पण , सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसें ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे ; तसेंच, त्यांना अभिप्रेत असलेलें ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदुपण’ .
    • सावरकारांची हिंदुत्वची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाहीं. याउलट ती, भाषा, जाती, ‘मतें’ (जसें, बुद्धिझम, जैनिझम इ. ) वगैरे सर्वांच्या पलिकडे आहे. ती व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे. याचे पहिले कारण म्हणजे, वेगवेगळ्या मातृभाषा असलेले भारतीय लोक तिचा अर्थ समजू शकतील. अर्थातच, ही व्याख्या भारतीय जनांसाठी असल्यामुळे, (आणि, संस्कृत ही शतकानुशतकें भरतखंडातील संपर्क-भाषा असल्यामुळे), सावरकारांना ही व्याख्या इंग्रजीपेक्षा संस्कृतमध्ये करणें अधिक योग्य वाटले. दुसरें, आणि अधिक महत्वाचें, कारण म्हणजे, संस्कृतमध्ये अगदी थोड्या शब्दांत अतिशय चपखल, सुस्पष्ट, अॅप्ट् अशी वाक्यरचना करता येते. (कुणीही हीच सावरकर-रचित परिभाषा, इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा अन्य भाषेत, पूर्ण अर्थ सुस्पष्ट होईल अशाप्रकारें करून पहावी, म्हणजे याचा प्रत्यय येईल).
    • काय आहे ही परिभाषा :
      आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
      पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुर् इतिस्मृत: ।।

    थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिन्धुसागरापासून ते सिन्धु नदीपर्यंत पसरलेल्या भूभागाला जे लोक भारतभूमी समजतात, आणि या भूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतात, ते सर्व लोक हिंदू आहेत.

    • सावरकरांनी या व्याख्येत ‘मातृभू’ असा शब्द कां वापरला नाहीँ ? ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यात त्यांनी भारताचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा केलेलाच आहे. पण , इथें आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, संस्कृतमध्ये ‘पितरौ’ असा उल्लेख केल्यावर माता-पिता (parents) असा अर्थ होतो ; ‘पितर:’ अशा उल्लेख केल्यावर पूर्वज (ancestors) असा अर्थ होतो. म्हणजेच, ‘पितृभू’ असा उल्लेख केल्यावर, दोन्हीकडील सर्व पूर्वजांचा संबंध आपोआपच जोडला जातो. ( आतां मी जें उदाहरण देत आहे, त्याचा धार्मिक संदर्भ हा, संस्कृतृ-भाषिक अर्थामधून निर्माण झालेला आहे, हें ध्यानीं घ्यावें. भाद्रपदाचा वद्यपक्ष हा ‘पितृपक्ष’ मानला जातो ; येथें संदर्भ सर्व पूर्वजांचा आहे, ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल). त्यामुळे, पितृभू असा शब्द योजल्यावर, ‘ज्यांचे पूर्वज पिढ्यान् पिढ्या या भूभागातले रहिवासी आहेत ’ , असा अर्थ साहजिकच ध्वनित होतो.
    • ‘पुण्यभू’ हा शब्द सावरकरांनी निर्माण केलेला आहे. तो पाश्चिमात्यांच्या ‘होली लँड’ (Holy Land) या कल्पनेवरून घेतलेला आहे, हे उघड आहे. म्हणजे, ‘जे लोक या भूभागाला पुण्यभूमी मानतात, महान मानतात ’, असा अर्थ येथे स्पष्ट आहे. मात्र, सावरकांच्या व्याख्येतील ‘पुण्यभू’ वाटणें , हें धार्मिक संदर्भातील नाहीं, तर तिचा महत्तेशी, थोरवीशी संबंध आहे.
      (उदाहरण द्यायचें झालें तर, ‘आई’ हें नातेंच पवित्र आहे, असा शब्दप्रयोग अनेकदा केला जातो; तेव्हां त्या ‘पवित्रते’चा अर्थ धार्मिक नसून, थोरवीशी जोडलेला आहे. त्याचप्रमाणें, ‘पुण्य’ असें म्हटल्यावर त्याचा अर्थ धार्मिकच असतो असे अजिबात नाहीं. ‘दुष्काळात दामाजीपंतांनी गरिबांना धान्य वाटून टाकले, हें पुण्यकृत्य केलें’ ; इथें धार्मिक कृत्य केलें असा अर्थ मुळीच होत नसून, सत्कृत्य केलें, महत्-कृत्य केलें, असाच अर्थ होतो. ‘पुण्यश्लोक’ असा शब्दप्रयोग केल्यावर त्याचा अर्थ ‘धार्मिक’ असा होत नाही, तर सद्वर्तनी, सद्प्रवृत्त असा होतो. संभाजीपुत्र शाहू यांस ‘पुण्यश्लोक’ म्हणतात, तें या अर्थानें ).
      म्हणजेच, सावरकरांच्या या व्याख्येत, ‘जे लोक या देशाला थोर समजतात, ज्यांची महत्तापूर्ण स्थळे या भारत-भूभागात आहेत ’ , असा अर्थ अभिप्रेत आहे. (काशी-प्रयाग वगैरे स्थानें आपल्याला महत्तापूर्ण वाटतात, तितकीच , शिवाजी महाराजांची राजधानी रायगड , परकीयांपासून या भूमीला वाचविण्यासाठी प्राण देणार्‍या मराठ्यांची युद्धभूमी पानिपत , जिथे शिवपुत्र संभाजी औरंगझेबाच्या कैदेत ताठ मानेने मृत्यूला सामोरा गेला तें वढू गाव , अशी स्थळेंसुद्धा आपल्याला महत्तापूर्ण वाटतातच ना ! ).
    • याहून अधिक खोलात जाऊन चर्चा करण्याचें ही जागा नव्हे. पण, यावरून हा मुद्दा स्पष्ट आहे, की, ही सावरकरीय व्याख्या, जातपात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, वेदप्रामाण्य मानणारे-न मानणारे, अस्तिक (ईश्वराचे अस्तित्व मानणारे, या अर्थाने), एकेश्वरवादी-अद्वैतवादी-द्वैतवादी, इहवादी (जसे की चार्वाकपंथीय) , निरीश्वरवादी, जैन-बौद्ध-शीख-लिंगायत इत्यादी भिन्नभिन्न ‘मतें’ असलेले पंथ, चातुर्वर्णवादी, दलित, आदिवासी, वगैरे वगैरे सर्वांच्या पल्याड गेलेली आहे, सर्वसमावेशक आहे. इतकी विस्तृत व सुस्पष्ट व्याख्या दुसरी कुठली असेल असे वाटत नाहीं.
    • एका अर्थी, भारतीय संविधानानें, (तसें स्पष्ट न म्हणताही), ही व्याख्या स्वीकारलेली आहे, असें म्हणतां येईल. संविधानातील ‘ हिंदू लॉ ’ कुणाकुणाला लागू होतो, ते पहावे, म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल.

    धोडेसे धर्मनिरपेक्षतेबाबत.

    पाश्चिमात्यांनी १९ व्या शतकात, ‘धर्म’ म्हणजे ‘रिलिजन’ (Religion) असा अर्थ गृहीत धरला. भारतीयांच्या ‘धर्म’ या संकल्पनेचच्या विस्तृततेची त्यांना कल्पनाच नव्हती. परंतु, धर्म या शब्दाचा अर्थ खरें तर ‘रिलिजन’हून फार व्यापक आहे. शरीरधर्म, शेजारधर्म, पुत्रधर्म, कुलधर्म, युगधर्म, मानवधर्म, कर्मधर्मसंयोग, अशा अनेक शब्दांतून ही गोष्ट स्पष्ट होते. ‘धर्म’ या संकल्पनेचे महत्वपूर्ण विश्लेषण कुणाला समजून घ्यायचें असेल तर त्यांनी, ख्यातकीर्त विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा, ‘शिवराज्याभिषेक त्रिशतकमहोत्सवा’च्या समयींच्या ग्रंथात लिहिलेला लेख वाचावा. ‘धर्मा’चे विविध अर्थ कोणते हें कुरुंदकरांनी विशद केलें आहे, आणि, शिवाजी महाराज कुठल्या अर्थाने धार्मिक होते व कुठल्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते, याचा ऊहापोह कुरुंदकरांनी तेथे केलेला आहे.

    • महात्मा गांधीजीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून, नंतर हें सांगावेसें वाटतें की, ते व्यक्तिगत जीवनात ‘धार्मिक’ होते, व त्यांनी स्वत: तसा निर्वाळाही दिलेला आहे. पण, सामाजिक व राजकीय पटलावर ते ‘सेक्युलर’ मानले गेले आहेत (त्या बाबीच्या योग्यायोग्यतेची चर्चा तूर्तास करायची नाहींये, फक्त, तसे वास्तव आहे, एवढीच नोंद इथें करायची आहे ). सावरकर हे व्यक्तिगत जीवनात निरीश्वरवादी, जातिभेद न मानणारे, विज्ञानाची कास धरणारे असे होते. पण, त्यांची हिंदुत्वाची मूलभूत व्याख्या नीट न समजून घेतांच, किंवा पूर्वगृहदूषित (biased) वृत्तीने, त्यांना नॉन्-सेक्युलर ठरवलें गेले ! (सावरकरांचा राजकीय स्टॅन्स् --- stance --- काय होता व कां होता, हा वेगळा मुद्दा आहे. ती चर्चा तूर्तास अभिप्रेत नाहीं ).
    • कांहीं दशकांपूर्वी श्री. विठ्ठलराव गाडगीळ यांनी ‘सेक्युलरिझम’ या विषयावरील एक पुस्तिका प्रकाशित करून ती पार्लमेंटच्या सभासदांना वाटली होती (सर्क्युलेट केली होती). तिच्यात, त्यांनी, ‘सेक्युलर’ या शब्दाच्या संदर्भात, ‘निधर्मी/धर्मनिरपेक्ष आणि ‘सर्वधर्मसमभाव’ या बाबींची चर्चा केली होती. भारत हा देश सेक्युलर आहे, म्हणजे काय, तर इथें त्याचा, ‘निधर्मी’, ‘धर्मनिरपेक्ष’ असा अर्थ नसून, ‘सर्वधर्मसमभाव मानणारा’, असा अर्थ आहे, अशी त्यांनी मीमांसा केली होती.
      या सर्व विवेचनातून हाच अर्थ निघतो की, सावरकरांची ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या पूर्णपणें नॉनरिलिजियस (non-religious) आहे. लखनऊच्या शियांनी सावरकरांना अॅप्रोच् केलें असतां, तुमच्याशी आम्ही सहकार्य करू, अशीच भूमिका सावरकरांनी घेतली होती, याचा अर्थ उघड आहे. सिंधमध्ये तर कांहीं काळ हिंदुमहासभा पार्टी व मुस्लिमांचे संयुक्त सरकार होते, याच्या मागील खरा अर्थ आपण खोलात जाऊन समजून घ्यायला हवा.
    • समारोप : कुठल्याही कारणांनी का होईना पण, स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल अनेक अपसमज आहेत ; आणि ते अपसमज, अपुर्‍या महितीमुळे, किंवा पूर्वग्रहांमुळे, बायस् मुळे (bias) झालेले आहेत. पण सावरकारांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वच उचललें होतें. (‘की घेतलें व्रत न हें अम्ही अंधतेनें …… बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें’ असें त्यांनी म्हटलेलेंच आहे). पण त्या गैरसमजांमुळे होणारे नुकसान आपल्या सर्वांचे आहे. सावरकरांची मतें आपल्याला मान्य असोत वा नसोत, पण आपण निष्पक्षपणें त्यांचा संदर्भ आणि पूर्ण सुस्पष्ट अर्थ नीट समजून घ्यायला हवा, यात शंका नाहीं.
      सेक्युलरिझमचेंही तसेंच आहे. त्यासाठी व्यर्थचें ‘शंख फुंकणें’ व शड्डू ठोकणें नको ; त्यासाठी योग्य तो ‘वैचारिक चश्मा’ लावणें गरजेचें आहे. विचारी जन आज ना उद्या तसें करतील, अशी आशा आपण बाळगूं या.

    - सुभाष स. नाईक.
    सांताक्रुझ (प.), मुंबई.
    M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in.
    website : www.subhashsnaik.com

  • समस्या २००अपंगांच्या सुटल्या प्रेरणेतून

    सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी.

  • LGBTQI : सुप्रीम कोर्ट झिंदाबाद !

    अखेर तो सुप्रीम कोर्टाचा मच्-अवेटेड् निकाल जाहीर झाला , की, ‘समलेंगिकता हा गुन्हा नव्हे’ .
    ( संदर्भ: बातम्या , लोकसत्ता दि. ७ सप्टे. २०१८ . टाइम्स ऑफ् इंडिया ७ सप्टें. २०१८, आणि इतर). आपण अनेकदा बोलतांना-लिहितांना, ‘दि कोर्ट इन इट्स् विज़डम्’ असा शब्दप्रयोग करतो, तो किती यथार्थ आहे, याची पुनश्च एकवार जाणीव झाली.

  • समाजाचं मन बदलायला हवं !

    समाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल.

  • तुमचे कौटुंबिक, सामाजिक संबंध कसे सुधाराल

    आज समाज, संस्कृती यात अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी समाजातील लोकांच्या मानसिक, भावनिक गरजा या जशाच्या तशाच आहेत. त्या समजून घेतल्या तरी आपले नाते संबंध सुधरायला मदत होते. प्रत्येक पदोनपदी आपला लोकांशी संबंध येतोच. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायच झालं तरी कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या, समाजातील लोकांच्या मदतीची गरज लागतेच

  • अशी आई नको गं बाई !

    एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्‍या पानाच्या टपरीसमोर बर्‍यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण सिगारेट ओढून झाल्यावर आपल्या उंच टाचेच्या सॅन्डल खाली सिगारेट विजविण्याची कला पाहिल्यावर तर मी स्वतः ही आवाक होतो. एक तरूणी सिगारेट ओढतेय आणि एखादा तरूण लायटरने तिचे सिगारेट पेटवतोय हे चित्रपटात शोभणार दृष्यही हल्ली उगडया डोळ्यांनी पाहताना डोळे अक्षरशः तृप्त होतात खेदाने. आपल्या देशात कॅन्सर रुग्णांच प्रमाण वाढत असतानाही सिगारेट ओढणार्‍या अधुनिक तरुणी पाहिल्या की मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. चारचौघात आपल्या वडिलधार्‍यांसमोर सिगारेट ओढताना काही पुरुषांनाही संकोच वाटतो तिथे आजच्या तरुणी चार सिगारेट न ओढणार्‍या परुषांच्या मधे उभ राहून ऐटीत सिगारेट ओढताना हल्ली सर्रास दिसतात. भर रस्त्यात आरामात सिगारेट ओढणार्‍या हया तरूणी काही कोणी अशिक्षित तरूणी नसतात त्या असंस्कृत असतील असे ही खात्रीने सांगता येणार नाही. पण बहुदा हया तरुणी नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबापासून दूर राहणार्‍या असतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी त्या सिगारेट ओढत असाव्यात हे पटण्याजोगे नाही. फक्त एकच प्रश्न पडतो आपल्या देशाचं भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे त्या पिढीला घडविणारी जन्माला घालणारी स्त्रियांची पिढी या पिढीच्या हातात खरंच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे का ?

    सिगारेट ओढण्याचे दुषपरिणाम माहित झाल्यावर आपली आई सिगारेट ओढणारी असावी असे कोणत्याही बाळाला वाटणार नाही. तो तर गर्भात असतानाच म्ह्णेल कदाचित अशी आई नको गं बाई ! आमच्या लहानपणी आमच्यावर झोपडपट्टीत राहात असतानाही सिगारेट ओढणे ही वाईट गोष्ट आहे हे आमच्या अशिक्षित आईने आंम्हाला समजावले होते. तिच्या हातात जोपर्यंत होते तिने आमच्यावर कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्याचेच संस्कार केले होते. पण आजची आईच जर व्यसनाधीन असेल तर ती आपल्या मुलांवर काय खाक संस्कार करणार ? पूर्वीच्या स्त्रियांची पुरूषांच्या बरोबरीने कोणतीच व्यसन करण्याची हिंमतच नव्हती. आज स्त्री - पुरुष समानतेमुळे स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने व्यसनही करू लागल्या आहेत. पुरूषांच्या व्यसनाधीनतेचा परिणाम फक्त कुटुंबावर होतो पण स्त्रियांच्या व्यसनाधिनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होतो. अधुनिकता फक्त स्त्रियांच्या अधिकारा पुरती मर्यादित होती तोपर्यंत सारे ठिक होते पण आता स्त्रियांना इतर व्यसनांबरोबर सर्वच बाबतीत पुरुषांची बरोबरी करण्याच एक नवीन व्यसन जडू लागलं आहे जे फारच भयंकर आहे याचे फार भयंकर परिणाम आपल्या देशाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. आजच्या तरूणी उच्चशिक्षित आहेत, पुरुषांच्या तोडीच्या आहेत, सारं जग त्यांनी पादाक्रांतही केलेले आहे, पण आता त्या एक चांगली आई होण्याची क्षमता कदाचित गमावून बसल्यात की काय अशी शंका मनात निर्माण होऊ लागली आहे... स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करण्यात काहीच वावगे नाही पण व्यसनांच्या बाबतीत स्त्रायांनी पुरूषांची बरोबरी करण्याचा मोह टाळायला हवा. फक्त सिगारेट ओढल्यामुळे स्त्रिया असंस्कृत असभ्य अथवा व्यभिचारी ठरत नाही पण जी गोष्ट चुकीच आहे ती गोष्ट स्त्रियां करता आहेत म्ह्णून त्याचे समर्थन नाही ना करता येणार. आजच्या अधुनिक स्त्रियांनीही शक्यतो सिगारेटच्याच नव्हे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून शक्यतो दूरच राहायला हवे. पुरुष कितीही अधुनिक असला तरी त्याला व्यसनी मैत्रिण अथवा प्रेयसी आवडतही असेल पण व्यसनी पत्नी मात्र शक्यतो त्याला नकोच असते हे सत्य बदलणार नाही. व्यसनाने मानसिक ताण कमी होण्याऐवजी हल्ली तो अधिक वाढून काही लोक आत्महत्या करण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत पोहचताना दिसत आहेत. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करता आपल्या देशाला व्यसनी आईची नाही तर निर्व्यसनी आईची जास्त गरज आहे ती गरज आजच्या प्रत्येक तरुणीने ओळखून व्यसनाधिन तरूणींनी आत्मपरिक्षण करायला हवे नाही का ?

    लेखक – निलेश बामणे

    202, ओमकार, जलधारा एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित, गणेश मंदिरा समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई - 400 065. मो. 8652065375