
समाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.
आजपर्यंत आपण वृद्धांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांना होणारे त्रास, त्यांचे केवीलवाणे जीवन, तरुणांकडून त्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्लक्ष यांसारख्या विषयांवर बरेच काही बोललो आहोत, ऐकले आहे, वाचले आहे आणि थोडेफार पाहीले पण आहे. या विषयावरचे डोळ्यांतुन अश्रुंचे पाट व्हायला लावणारे 'चिमणी पाखरे' पासून ते 'बागबान' पर्यंतचे अनेक चित्रपट पण पाहीले आहेत. पण अनेकांनी 'वृद्धजीवनशास्त्र' हा शब्द पण ऐकला नसेल. नीदान मी तरी ऐकला नव्हता. थोडक्यात वृद्धांनी आपले जीवन आनंदात कसे घालवावे याचे पणं एक शास्त्र आहे हे मला पहिल्यांदा कळले.
मी जेव्हा जेव्हा अमेरिकेत येतो तेव्हा तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात येते. येथील वृद्ध मंडळी त्यांचे जीवन आनंदात जगताना मला दिसतात. बहुतेकांचे चेहेरे आनंदी असतात. त्यांच्या चेहेर्यारवर हास्य असते. मिस्कीलपणा तर भरपूर असतो. हसत खेळत हे लोक जीवन जगत असतात. तुम्हाला वाटेल की अमेरिका हा श्रिमंत देश आहे. या लोकांकडे भरपूर पैसा असतो. सरकार पण या लोकांची काळजी घेत असते म्हणून हे लोक आनंदाने जगत असतात. पण हे आपल्याला वाटते तेवढे खरे नसते. या लोकांनी सुद्धा आयुष्यात अनेक दुःखे भोगलेली असतात. अनेक संकटांना तोंड दिलेले असते. अनेकवेळा मानहानी झालेली असते. काहीजणांना तर वर्णद्वेषाला पण तोंड द्यावे लागलेले असते. बरे यांची संकटे पण फार विचित्र असतात. डायव्होर्स होणे, नवर्यााने बायकोला किंवा बायकोने नवर्याअला अचानक सोडून जाणे, अचानक नोकरी जाणे, मुलांनी लहान वयातच घर सेडून जाणे आणि वर्षातुन एकदाच म्हणजे थॅन्क्सगिव्हिंगच्या दिवशी आणि ते सुद्धा जमलेच तर भेटायाला येणे, सावत्र आई किंवा सावत्र बाप असणे, अचानक बिघडणारी इकॉनॉमी या सारखी संकटे या लोकांवर कोसळलेली असतात. तरी सुद्धा हे लोक हॅपी असतात. नाहीतर आपल्याकडे नेमके उलटे चित्र असते. मला ठाऊक असलेली बहुतेक म्हातारी मंडळी आंबट किंवा नुकतेच एरंडेल घेतलेल्या चेहेर्या ने वावरताना दिसतात. त्यांचे चेहेरे खंगलेले, दुःखी, कष्टी, उदास आणि काळवंडलेले असतात. मरण येत नाही म्हणून कसेतरी जगायचे किंवा आला दिवस ढकलायचा हे यांचे सूत्र असते. त्यांचा बोलण्याचा विषय पण बहुतकरून एकच असतो. ते म्हणजे त्यांचे आयुष्य किती वाईट आहे हे सांगत बसणे. त्यांची चर्पटपंजीरी ऐकल्यावर कोणाचाही समज, 'म्हातारपण नको रे देवा' असे होण्याचा संभव असतो. अमेरिकेमध्ये वृद्धकाळाला 'गोल्डन ईयर्स' म्हणतात पण आपल्याकडे मात्र या गोल्डन इयर्सचे मातेरे केलेले असते. असे का होते याचा मी गेली अनेक वर्षे विचार करत होतो. मग माझ्या लक्षात आले की या लोकांना थोड्याफार प्रमाणात का होईना 'वृद्धजीवनशास्त्र' कळलेले आहे आणि ते सुद्धा तरुण वयात कळलेले आहे. आपल्याकडे मात्र या शास्त्राचा थांगपत्ताच लोकांना नाही. त्यामूळे हे शास्त्र आता वृद्धांबरोबरस तरुणांनी पण जाणून घेणे आवश्याक आहे.
सुप्रसिद्ध मराठी लेखीका मंगला गोडबोले यांचेकडून मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला. तुम्ही म्हणाल मंगलाताई तर विनोदी लेखीका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा 'वृद्धजीवनाशी' काय संबंध? (त्या पण ज्येष्ठ नागरीकच आहेत). पण त्याचे असे झाले.
सन 1963 साली पुण्याच्या डेक्कन जिमखाना भावेस्कूलमधून (आत्ताचे विमलाबाई गरवार हायस्कूल) 11 वी म्हणजे मॅट्रिक झालेल्या आमच्या बॅचला 54 वर्षे झाली आहेत. सन 2013 साली आमच्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल पुण्याला एका भव्य स्नेह मेळाव्याचे म्हणजेच गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ 70 च्या वर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मेळाव्याला उपस्थीत होते. त्यानंतर माझे मित्र सुरेश रानडे आणि जयंत दामले यांच्या पुढाकाराने महिन्यात एकदा भेटणे आणि वर्षातुन एकदा गेट टुगेदर करणे असे प्रोग्रॅम सुरू झाले. या वर्षीचा म्हणजे सन 2017 चा गेट टुगेदर जानेवारी महिन्यात पुण्यात पार पडला. याला पण 50 च्या वर मंडळी उपस्थीत होती. या मध्ये महिलांची संख्या जवळ जवळ पुरुषांइतकीच होती. या मेळाव्याला मंगलाताई गोडबोले यांना मुख्य आतिथी म्हणुन आमंत्रीत केले होते. आपल्या 45 मिनिटांच्या खुसखुशीत आणि विनेदाची झालर असलेल्या भाषणात मंगलाताईंनी 'वृद्धजीवन' या विषयावर पहिल्यांदा प्रकाशझोत टाकला. त्यांच्या बोलण्यातून 'वृद्धजीवन' हे एक शास्र आहे याचा अंदाज आला. यावर मी पण थोडाफार अभ्यास केला.
एका फ्रेंच महिलेने सन 1950 ते 1070 या 20 वर्षांच्या काळात अनेक वृद्ध व्यक्तींच्या जिवनाचा अभ्यास करून त्यावर एक ग्रंथ लिहीला आहे. हा 600 पानांचा ग्रंथ असून याचे इंग्रजी भाषांतर पण उपलब्ध आहे. या ग्रंथामध्ये वृद्धांच्या जीवनाचा अभ्यास करून आणि त्यांचे अनुभव विचारात घेऊन 'वृद्धांनी त्यांचे जिवन आनंदात कसे घालावावे' या विषयी काही मार्गदर्शक तत्वे सांगीतली आहेत. वृद्धांच्या जीवनावरचा हा जगातला पहिला 'ऑथेंटिक' ग्रंथ समजला जातो. हा अभ्यास जरी युरोपमधील वृद्ध मंडळींबद्दल मर्यादीत असला तरी इतर देशातील वृद्ध मंढळींना पण यातील बरीच तत्वे लागू होतात. तसेच तुम्हाला यातील काही तत्वे ठाऊक असतील, काही नवीन असतील. काही पसंत पडतील तर काही पसंत पडणार नाहीत. पण वाचायला तरी काहीच हरकत नाही. असो.
माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या घटनेला एक 'स्टार्टिंग पॉईंट' असतो. माणसाचा जन्म झाला की त्याच्या आयुष्याला सुरवात होते. त्याला 16 वे वर्ष लागले की त्याच्या तारुण्याला सुरवात होते. त्याचे लग्न झाले की त्याच्या वैवाहीक आयुष्याला सुरवात होते. हे सगळे 'स्टार्टिंग पॉईंट्स' आहेत आणि याला 'सेलिब्रेशन' असते. सेलिब्रेशन हे नेहमी आनंद व्यक्त करण्यासाठी होत असते. पण वार्धक्याला म्हणजे म्हातारपणाला नक्की असा स्टार्टिंग पॉईंट नसतो की याचे सेलिब्रेशन पण नसते. मी वृद्ध झालो म्हणून कोणी आनंद व्यक्त करत नसतो. देवाने माणसाला पहिल्यांदा केवळ 25 वर्षांचेच आयुष्य बहाल केले होते. पण माणसाने वारंवार देवाकडे जाऊन अधीक आयुष्याची मागणी करायला सुरवात केली. मग देवाने घोडा, बैल, गाढव, माकड या प्राण्यांची आयुष्ये कमी करून माणसाचे आयुष्य वाढवले. म्हणुन मग माणसाला पंचविशीनंतर घोड्यासारखे धावावे लागते, मग आधी बैलासारखी आणि मग गाढवासारखी ढोर मेहेनत करावी लागते शेवटी त्याचे माकड होते असे सांगणारी एक बोधकथा जगप्रसिद्ध आहे. शरीरशास्त्र दृष्ट्या माणसाच्या पंचविशीनंतरच त्याच्या वार्धक्याला सुरवात होते. म्हणजे माणसाचे म्हातारपण हे त्याच्या वयाच्या पंचविशीपासूनच सुरु होते. आपल्याकडे माणसाला 60 वे वर्ष लागले की त्याच्या म्हातारपणाला सुरवात झाली असे समजले जाते. पण ते काही खरे नाही. हल्ली चाळीशितील माणसे सत्तर वर्षांच्या वृद्धासारखी वागत असतात तर सत्तरीतील वृद्ध पंचवीस वर्षांच्या तरुणाच्या उत्साहाने वावरत असतात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. प्रत्येक माणसाला वृद्धत्व हे 'बाय डिफॉल्ट कंपल्सरी' मिळालेले आहे. यातून सुटका नाही. यातून सुटका करायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे लौकर किंवा तरूण वयात मरणे. पण हा मार्ग काही योग्य नाही. कारण मरण काही आपल्या हातात नसते आणि आत्महत्या हा गुन्हा आहे.
पूर्वीचे वृद्ध आणि हल्लीचे वृद्ध यात बराच फरक पडला आहे. पूर्वी वृद्ध माणूस म्हणजे सोडावॉटरच्या बाटलीच्या तळासारख्या काचेचा जाड भिंगांचा चष्मा लावणारा, तोंडाचे बोळके झालेला किंवा दातांची कवळी वापरणारा, कानात भले मोठे कर्णयंत्र घातलेला, हातात काठी घेऊन गबाळ्या कपड्यात थरथरत्या अंगाने फिरणारा गरीब बापडा म्हातारा असे रूप असायचे. पण हल्लीचे वृद्ध असे नसतात. त्याची शरीरे धडधाकट असतात, अंगात अजून ताकद असते, ते चांगले कपडे घालत असतात. पूर्वी चष्मा लागणे ही वृद्धत्वाची खूण समजली जायची. पण हल्ली तर तरुण वयात किंवा लहान वयातच चष्मा लागतो. त्या मूळे चष्मा लागणे ही वृद्धत्वाची खूण कालबाह्य झाली आहे. पूर्वी वृद्धांचे वय छोटे होते. साधारणपणे वयाची साठी ओलांडली की पाच ते दहा वर्षात माणसाची 'एक्झिट' व्हायची. पण आता तसे होत नाही. आता माणसाचे वय वाढत चालले आहे. आता 80 किंवा 90 वर्षांचे अनेक वृद्ध दिसू लागले आहेत. याला कारणीभूत आहे 'मोडिकल इंडस्ट्री'. आता 'मेडिकल' हे प्रोफिशन राहीले नसून त्याची मोठी इन्डस्ट्री झाली आहे. या इन्डस्ट्रीच्या इन्कमचा एक मुख्य सोर्स वृद्धांना येन केन प्रकाराने जिवंत ठेवणे, त्यांचे आयुष्य वाढवत बसणे हा आहे. माणसाची सुद्धा जास्तीत जास्त वर्षे जगण्याची इच्छा पण असते. त्यामूळे आपल्याला आता आपल्याला कोणी लवकर मरू देणार नाही याची खूणगाठ प्रत्येकाने बांधून ठेवावी. भारतीय कुटुंबांमध्ये अजुन एक गोष्ट आढळून येते. पुरुषाचा मृत्यु आधी होतो आणि त्याच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीला कमीत कमी दहा वर्षे तरी जगावे लागते. मला काही ज्येष्ठ महीला ठाऊक आहेत की ज्यांच्या पतीचे निधन 60 ते 70 या वयांमध्ये झाले (त्या वेळी या महिलांचे वय 50 ते 60 च्या मधे होते). आता या महिलांचे वय 80 ते 90 च्या मधे आहे. त्यामूळे आपल्या मृत्युनंतर आपली पत्नी कमीत कमी 5 ते 10 वर्षे तरी जिवंत रहाणार आहे तर त्यासाठी लागणार्यात पैशांची योग्य ती तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे. पती पत्निमध्ये जर पती आधी गेला तर पत्निची फारशी ससेहोलपट होत नाही. पण जर पत्नि आधी गेली तर मात्र पतीची फारच ससेहोलपट होते असे आढळून आले आहे. असा जर प्रसंग आला तर काय करायचे हे पण आधीच ठरवावे लागेल.
कमी कमी होत जाणारे अधीकार ही वृद्ध मंडळींची पहीली प्रमुख समस्या असते. याची सुरवात शरीरापासून होते. आपले शरीरच आपले हुकुम मानेनासे होते, साथ देईनासे होते. मग आपल्या घरातले किंवा संसारातले आपले महत्व कमी कमी होऊ लागते. घरामध्ये आपले हुकुम चालेनासे होतात. अनेक वृद्धांना हे पचवणे फार जड जाते. ज्या घरात आपला दरारा होता त्या घरात आता आपली किंमत शून्य झाली आहे हे अनेकांना सहन होत नसते. मग त्यांची, 'मला कोणी घरात विचारत नाही. मला घरात काही किंमत नाही. हल्ली माझा सल्ला घेतला जात नाही. मी म्हणजे घरातील एक अडगळीची वस्तु झालो आहे' अशी बडबड चालू होते. घरातील तरूण पिढी विचारत नाही हा त्यांचा मुख्य आरोप असतो. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण जेव्हा कुटुंब प्रमुख होतो तेव्हा आपल्या घरातील मंडळी, विशेषतः मुलेबाळे आपला हेकुम पाळत होती. आपल्या इच्छेप्रमाणे जगत आणि वागत होती. आपल्या प्रतिष्ठेला किंवा इभ्रतीला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेत होती. आता ती मंडळी कुटुंब प्रमुख झाली आहेत तर त्यांचा योग्य तो आदर करणे हे आपले कर्तव्य आहे हे वृद्ध मंडळींनी जाणून घ्यायला हवे. यात कोणताही प्रकारचा कमीपणा नसतो. यासाठी काही पथ्ये मात्र पाळणे जरूरीचे आहे. आपल्या घरातील दुय्यम स्थान आपण स्वखुशीने स्विकारायला हवे. घरातील तरूण पिढीला जेणेकरून आपला त्रास किंवा वैताग होणार नाही. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचणार नाही अशी वागणूक आपण ठेवायला हवी हे आता वृद्ध मंडळींनी जाणून घ्यायला हवे. यासाठी वारंवार घरातील तरुणांच्या मधे मधे करू नये. त्यांच्या कामाला नेहमी प्रायॉरिटी द्यावी. त्यांना सतत उपदेशांचे डोस पाजत बसू नये तसेच सुचनांचा मारा करत राहू नय. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची पूर्ण मुभा द्यावी. त्यांनी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नयेत. जेणेकरून त्यांच्या काळजीत भर पडेल असे काही करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याविषयी तक्रारी करत फिरत बसू नये किंवा त्यांना नावे ठेवत तसेच त्यांच्यातील दोष काढत बसू नये. वृद्धांनी एवढी पध्ये जरी पाळली तरी त्यांच्या 50 टक्के समस्या आपोआप कमी होतील.
अनेक वृद्ध मंडळींना आयुष्यात अनेक कष्ट आणि मेहेनत करावी लागलेली असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागलेले असते. काडी काडी जमवून संसार उभा करावा लागलेला असतो. कोंड्याचा मांडा करून संसार करावा लागलेला असतो. पै पै वाचवून मुलांचे शिक्षण करावे लागलेले असते. अनेक प्रकारचे त्याग करावे लागलेले असतात. याचा त्यांना सार्थ अभीमान असतो. काहीजण तर स्वतःला त्यागमूर्ती समजत असतात. पण हल्लीच्या तरूण पिठीला त्यांच्या या कष्टाचे किंवा त्यागाचे फारसे अप्रुप किंवा ऍप्रिसिएशन नसते. कारण हल्लीच्या तरूण पिढीलापण तेवढेच कष्ट, मेहेनत किंवा त्याग करावा लागत असतो. फक्त त्याचे रूप बदललेले असते. असे असूनही अनेक वृद्ध मंडळींना 'आमच्यावेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते' असे सांगत आपला भूतकाळ तरुण पिढीच्या तोंडावर फेकून मारण्याची सवय असते. ही सवय अत्यंत घातक आहे. अनेक वेळा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगीतल्या जातात. त्यामूळे माणसे बोअर होत असतात. तसेच कालच्या भूतकाळावर उद्याचा भविष्यकाळ घडत नसतो. तो आजच्या वर्मानकाळावर घडत असतो हे तत्व ते विसरतात. काही मंडळी तर भूतकाळात पार डुंबुंन गेलेली असतात. त्यांनी आता भूतकाळातून बाहेर पडून वर्तमान काळात येणे आवश्यक असते. त्यामूळे भूतकाळातील घटना शक्यतो 'झाले गेले गंगेला मिळाले' या कॅटेगरीत ठेवाव्यात आणि वर्तमान काळ आनंदात कसा घालवता येईल याची चिंता करत बसावे.
पूर्वीच्या वृद्धांच्या मानाने हल्लीच्या वृद्धांची सांपत्तीक स्थिती बरीच चांगली असे. बँकेत बर्याापैकी पैसे असतात. स्वतःचे एखादे घर, प्लॉट, फ्लॅट, बंगला किंवा जमिनीचा तुकडा असतो. ही संपत्ती गोळा करायला सुद्धा पुष्कळ मेहेनत करावी लागलेली असते. त्यामूळे या संपत्तीचा रास्त अभीमान असणे साहजीकच आहे. अनेकांना असे वाटत असते की ही संपत्ती मुलाबाळांसाठी किंवा नातवडांसाठी आपली आठवण म्हणून ठेऊन द्यावी. काहीजणांचा असा पण समज असतो की आपल्या संपत्तीकडे पाहून किंवा आपल्या संपत्तीच्या मोहापायी आपली मुले बाळे आपली योग्य अशी देखभाल करतील. पण हा फार मोठा भ्रम आहे. हल्लीच्या तरून पिढीला या संपत्तीचे पण फारसे अप्रुप राहिलेले नसते. कारण हल्लीची तरूण पिढी कितीतरी पटीने जास्त पैसे कमवत असते. त्यामूळे या संपत्तीचे त्यांना काहीच आकर्षण नसते. आता व्रद्धांनी या संपत्तीचा उपयोग स्वतःसाठी करायला शिकले पाहीजे. अनेक वृद्ध मंढळी भावनेच्या भरात किंवा दबाव आल्यामूळे आपली सर्व संपत्ती जिवंतपणीच मुलाबाळांमध्ये वाटून टाकतात किंवा रहाते घर मुलांच्या नावाने करून टाकतात. मग यातूनच 'नटसम्राट' सारखी नाटके आणि सिनेमे तयार होतात आणी उतारवायात 'कोणी घर देता का घर' असे म्हणत बसायची पाळी येते. त्यामूळे जिवंतपणी आपली सर्व धनदौलत आणि संपत्ती मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या नावे करण्याचा गाढवपणा करू नये. आपली संपत्ती आपल्या मृत्युनंतरच मुलाबाळांना मिळावी अशी कायदेशीर तरतुद करावी. त्यासाठी मृत्युपत्रासारखे अनेक मार्ग उपलब्ध आहे. अजून एक गोष्ट. वृद्धपणाचा काळ हा गुंतवणूकीसाठी योग्य नव्हे. अनेक जण सांगतात म्हणून अनेक वृद्ध मंडळी शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, कमोडिटी मार्केट यामध्ये गुंतवणूक करत असतात. पहीली गोष्ट म्हणजे या वयात संपत्तीमध्ये वृध्दी करायचे काही कारण नसते. दुसरी गोष्ट म्हणजे या रिस्की इन्व्हेस्टमेन्ट आहेत. त्यामूळे उगीच ब्लड प्रेशर वाढते आणि रात्रिची झोप खराब होते. हे पैसे आता इन्जॉय करण्यासाठी वापरावेत. फॉरीन टूरला जावे (हल्ली अनेक ज्येष्ठ नागरीक अशा टूर्स करू लागले आहेत), भारत फिरून बघावा, आपला छंद जोपासावा किंवा वाढवावा, नाटक सिनेमा बघावा किंवा एखादा आवडीचा कोर्स करावा, छान कपडे घालावेत. अनेक मार्ग आहेत.
वृद्धपणामध्ये प्रत्येक वृद्धाने आपल्या तब्येतिची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. वेळच्यावेळी वैद्यकीय तपासण्या करून घेणे, औषध पाणी वेळच्या वेळी घेणे, पथ्य पाणी संभाळणे या गोष्टी आवश्यक आहेत. व्यायाम झेपेल एवढाच करावा. अघोरी व्यायामाच्या मागे लागून आपली तब्येत आणखी बिघडवून घेऊ नये.
हल्ली अनेक वृद्धांकडे भरपूर वेळ असतो आणि तो कसा घालवायचा हा त्यांचा मुख्य प्रॉब्लेम असतो. डोळे अधू झाल्यामूळे फारसे वाचन करणे जमत नाही. हल्ली टी. व्ही. पण फारसा पहाण्याच्या लायकीचा राहीलेला नाही. मग करायचे काय हा प्रश्न उपस्थीत होतो. यावर उत्तम उपाय म्हणजे 'टेक्नोसॅव्ही' व्हावे. इंटरनेटचा जास्तीत जास्त उपयोग करायला शिकावे. हल्ली अनेक घरांमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. नसले तर घेता येते. अनेक घरांत पिसी, लॅपटॉप किंवा टॅबलेट्स पडलेल्या असतात. नसल्यास विकत आणता येतात. इंटरनेटने आख्या जगाचे दार उघडून दिले आहे. स्मार्टफोममुळे तर इंटनेट आपल्या खिशापर्यंत किंवा पर्सपर्यंत पोचले आहे. त्यामूळे कॉम्युटर कसा वापरायचा, इंटरनेट कसे वापरायचे, स्मार्ट फोन कसा वापरायचा हे शिकून घ्यावे. सोशल मिडीयाचा उपयोग करावा. यूट्युबवर आवडीचे व्हिडियो बघावेत. आपल्याला या विषयांवरचे गुरु आपल्या घरातच भेटतात. ते म्हणजे घरातील तरून पिढी. त्यांचेकडून हे सर्व शिकताना त्यांच्यातील अंतर कमी होते आणि त्यांच्याशी दोस्ती पण होते.
विनोदासारखा दुसरा विरुंगळा नसतो. एकदा खळखळून हसले की जिवनातील अनेक दुःखे हलकी होतात. विनेद हा नेहमी विसंगतीवर अवलंबून असतो आणि आपल्या आजुबाजुला अनेक विसंगत आणि विनोदी गोष्टी सतत घडत असतात. त्यामूळे विनोद बुद्धी सतत जागृत ठेवावी. अमेरिकेतील वृद्ध मंडळींमध्ये चांगली विनोदबुद्धी असते आणि ते नेहमी दुसर्यावला हसवण्याचा प्रयत्न करीत असतात असे मला आढळून आले आहे.
हल्ली आपल्याकडे वृद्धांना 'ज्येष्ठ नागरीक किंवा सिनियर सिटिझन्स' म्हटले जाते. पण वृद्ध आणि सिनियर सिटिझन यात फरक आहे. जे शरीराने आणि मनाने गलीतगात्र झालेले असतात ते वृद्ध असतात पण जे शरीराने आणि मनाने धडधाकट असतात ते सिनियर सिटीझन्स असतात. आपण वृद्ध व्हायचे का सिनियर सिटिझन रहायचे हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. हा चॉईस प्रत्येकाला असतो. 87 वर्षांचे वॉरन बफे, 84 वर्षांच्या आशाताई भेसले, 71 वर्षांचे डोनाल्ड ट्रंप ही मंडळी अजुनही वृद्ध नसून सिनियर सिटिझन कॅटेगरीतच आहेत आणि शेवटपर्यंत त्याच कॅटेगरीत रहातील असे वाटते. अनुभव हा वृद्ध व्यक्तींचा फार मोठा ठेवा असतो. अनेकांच्या कडे प्रचंड अनुभवांचा खजीना असतो. ही खरे म्हणजे या लकांची संपत्ती असते. सिनियर सिटिझन मंडळी या अनुभवाचा उत्तम उपयोग करत असतात. आपणही जास्तीत जास्त काळ 'सिनियर सिटिझन' कॅटेगरीत रहावे यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
या शिवाय अजून बरीच तत्वे आहेत. पण ही प्रमुख तत्वे आहेत. ही तत्वे जरी युरोपियन लोकांसाठी असली तरी ती आपल्याला पण लागू आहेत. मंगलाताईंनी त्यांच्या भाषणात पण याच तत्वांवर प्रकाश टाकला.
आता ही तत्वे पाळून आपले म्हातारपण सुखी आणि आनंदी बनवायचे की नाही जे ज्याचे त्याने ठरवायचे.
-- उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही.
आजही आपल्या देशात नरबळी सारखे प्रकार घडता आहेत हया विषयी वाचल्यावर, ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मन सून्न होत. डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ गेले की काय असही नराहून वाटू लागत पण ते तस नाही. दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात इतका प्रदीर्घ लढा दिल्यानंतरही जर आपल्या देशात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर आपला देश अंधश्रध्देच्या गर्तेत किती खोलवर रूतलेला आहे हे लक्षात येत.
नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.
काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्धिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुत्त* असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुत्त* असते, आज त्या गोष्टीची उपयुत्त*ता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात.
पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्धिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्ध समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही.
आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकाळात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैर प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्यत्त*ीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्यत्त*ीच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली.
मृत शरीर जाळताना शेणाच्या गोवऱ्या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे. अनेक प्रकारच्या घातक विषाणूंचा फैलाव रोखण्याचे सामर्थ्य गाईच्या शेणात व मुत्रात तसेच कडुलिंबाच्या पाल्यात आहे. त्याचमुळे स्मशानातून आल्यानंतर कडुलिंबाची पाने खाण्याचा किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्याची पद्धत होती. तसेच घरात गोमुत्र शिंपडले जायचे. मृतकाच्या नातेवाईकांनी मुंडन करण्यामागेही जंतूप्रसाराला अटकाव करणे हाच उद्देश असायचा. हे सगळे प्रकार किंवा या सगळ्या रूढी त्याकाळी योग्यच होत्या. परंतु आज तेवढ्याच कर्मठपणे या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज नाही. कारण दुर्धर आजारी माणसे आजकाल रुग्णालयातच जीव सोडतात व अनेकदा रुग्णालयातुनच त्यांना स्मशानात नेले जाते. त्यामुळे जंतु घरात शिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे हे नसेल व रोगाचा प्रादुर्भाव असेल तेथे हे पाळणे समजण्यासारखे आहे. दळणवळणाची, संवादाची अतिशय वेगवान साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे मृत्यु झाल्याबरोबर काही मिनिटात ती बातमी सर्वांना समजते. तसेच विमानाने सातासमुद्रापारचे नातेवाईक अगदी 24 तासात येऊ शकतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. शिवाय तेरा दिवस शोक करण्याइतका वेळही आज नाही. इतर समाजांनी हे सत्य स्वीकारून आपली मृत्युपरांत कर्मकांडे दोन-तीन दिवसात आटोपण्याचा मार्ग स्वीकारला. मराठी समाज तो केव्हा स्वीकारणार? बरेचदा केवळ लोक काय म्हणतील या विचारानेही 'शोक' लांबविला जातो. खरेतर आजच्या या आधुनिक युगात लोक काय म्हणतील याचा विचार करण्याइतकीही सवड लोकांकडे नाही किंवा घरातील वृद्ध व्यत्त*ीनेच त्या संदर्भात सविस्तर लिहून ठेवले तर प्रश्न आपोआपच सुटतो. कालबाह्य रूढींचा सगळ्यांनीच त्याग करायला हवा. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेत काही विचार निश्चित असतो. तो विचार समजून घेणे आणि आजच्या युगात तो कितपत समर्थनीय आहे हे पाहून त्या रूढी आणि परंपरा सुरू ठेवायच्या, त्यचे स्वरूप बदलायचे की त्या बंदच करायच्या हे आपण ठरवायला हवे. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते आणि त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल स्वीकारावेच लागतात. विचार हे नहमीच प्रवाही असतात, उगाच त्यांचे डबके बनविण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमिवर आपल्या कृतीतून नव्या विचारांना जन्म दणार किंवा जुन्या विचारांना नवे वळण देणारे लोक समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतात.
असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. समाजप्रबोधनाचे कार्य ते आपल्या परिने करीतच असतात. फत्त* काही लोक प्रकाशात येतात तर काही कायम पडद्याआड असतात; परंतु त्याने काही फरक पडत नाही. दिवा खोलीत कुठे आहे यावरून त्याची अंधार दूर करण्याची क्षमता मोजली जात नाही. आमच्या आजोबांचा सत्यशोधक समाजाचा वारसा चालविणाऱ्या आमच्या वडिलांनी तर स्पष्टच सांगून ठेवले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर तेरवी, गोडजेवण वगैरे प्रकार अजिबात करायचे नाही. त्यासाठी एरवी जो काही खर्च आला असता तो एखाद्या सामाजिक संस्थेला दान करा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही गरज नाही. मी तसे मृत्युपत्रच करून ठेवतो. बाबांसारखी अशी साधी माणसंही बरेचदा आपल्या कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातात. खरेतर अशाच लोकांची आज समाजाला नितांत गरज आहे. बरेचदा कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या पायातील बेड्या ठरत असतात. त्या बेड्या तोडण्याची हिंमत कुणीतरी आधी दाखवायला पाहिजे, मग त्याचे अनुकरण करायला इतर अनेक लोक पुढे येतील. गेल्या शे-दोनशे वर्षांत संपूर्ण जग झपाट्याने बदलले आहे. युरोपीय देशांनी हा बदल चटकन आत्मसात केला आणि ते विकासाच्या दौडीत खूप पुढे गेले. एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश अजूनही कालबाह्य रूढी, परंपरांच्या जाळ्यातून म्हणावा तेवढा मोकळा झाला नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विकासावर झाला. याचा अर्थ सगळ्याच रूढी किंवा परंपरा कालबाह्य झाल्या आहेत असा होत नसला तरी बदलत्या परिस्थितीत त्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे ठरले आहे.
-- प्रकाश पोहरे
प्रत्येक स्त्रिला सुरक्षा देणे हे आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा करणे ही आपली म्हणजे पुरुषांची जबाबदारी आहे. कारण हे बलात्कारी पुरुष आपल्यातच बेमालूमपणे वावरत असतात. त्यांना शोधण्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास आता आपली नजर सराईत व्हायला हवी ! नाही का ?
लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो.
लग्नामध्ये अक्षता टाकणो हा प्रकार असतो. आशिर्वाद द्यावेत हा त्यामागचा मुळ हेतू आहे. लग्नमंडपात विवाहानिमित्त आलेल्या मंडळीना या अक्षता वाटतात. ज्वारी वा तांदुळास हळद वा रंग टाकून रंगीत बनवलेली असते. काहीठिकाणी त्यामध्ये धने टाकले जातात. ह्या धान्य मिश्रणास मग प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. पुड्या बनवतात .त्यात 'आम्ही आपले सहर्ष स्वागत करित आहोत' असा मजकूर असलेली, परिवाराच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी लावलेली असते. साधारणत: एका लग्नामध्ये पंधरा ते वीस किलो धान्य अक्षता तयार करण्यासाठी वापरतात. परवाच्या एका लग्नामध्ये एक व्यक्ती 'फुलं आहेत का?' असा असा प्रश्न करत होती. मी सहजच प्रश्न केला तर मिळालेले उत्तर खूपच उद्बोधन करणारे होते. ती व्यक्ती म्हणाली 'मी कुणाच्याही लग्नात अक्षता न फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या हाताने अन्नधान्याची नासाडी आपण का करावी?' त्याचा प्रतिप्रश्न बरेच काही सांगत होता. आणि ते बरोबरही होते. 'फुलं नाही मिळाली तर मग काय करता?' आम्ही विचारलेल्या प्रश्नावर ती व्यक्ती पटकन उत्तरली. 'मग काहीच नाही. हाताने टाळी.बस्स. अहो कितीतरी होणारे नुकसान आपण टाळू शकतो.' मला ते पटले. मग निर्णय घेतला. अक्षताऐवजी फुलं फेकण्याचा. काही ठिकाणी जाणिवपूर्वक धान्याऐवजी फुलांचा वर्षाव करतात. काही परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तर चांगल्या परंपरा नवीन सुरू केल्या पाहिजेत. त्यांचे जतनही झाले पाहिजे.
लग्न लागल्यानंतर भूकेजलेले वर्हाड लगेच पंगतीला जेवायला बसते. एकतर वधुवर पक्षाचा तसा आग्रह असतो! भूक असो वा नसो पण लग्नसोहळय़ात जेवण्याचा आनंद घेणो वेगळेच असते.पंगती बसतात. वाढपी वाढतात. लहान मोठे वयाचा विचार न करता वाढतात. जेवण पोटभर होते. उरलेले अन्न तसेच पात्रामध्ये शिल्लक असते. असे कितीतरी अन्न फेकून दिले जाते. अन्नाची नासाडी होते.वाया जाते.ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मानवी प्रयत्न होणे आवश्य़क आहेत. काही व्यक्ती यासाठी झगडतात.त्यांना बळ मिळायला हवे.
वाढत्या लोकसंख्येत एकीकडे भूकबळी होताहेत आणि एकीकडे अन्न वाया घालवून नासाडी केली जाते ही विसंगती योग्य नाही. पंचतारांकित हॉटेल, ढाबे, खानावळी येथे भोजन मिळते . तिथे व्यवहार असतो. पण खूप अन्न वाया जाते. हॉटेलमध्ये अन्नग्रहण करत असताना सोबतच्या द्रव्यांमुळेही अन्न वाया जाते. मोठमोठय़ा सार्वजनिक ठिकाणी अन्नदान केले जाते तिथेही अन्नाची नासाडी होते. हे वाया जाणारे अन्न ही गरीब लोकांची गरज आहे.देवस्थाने अन्नदान करतात. लग्नकार्य आणि इतर धार्मिक उत्सवप्रसंगी वाया जाणारे अन्न आपण वाचवू शकतो. जेवढे लोक जमणार आहेत. तितक्यांचा स्वयंपाक करणो . ताटात जेवणानंतर अन्न शिल्लक पडणार नाही. याची काळजी संयोजकांसह पाहुण्यांनी घेतली पाहिजे. तरच अन्नाची नासाडी थांबेल.पाणीबचत, उर्जाबचत जशी काळाची गरज आहे तद्वतच अन्नाची नासाडी थांबविणे ही देखील काळाची गरज आहे.त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणो आवश्य़क आहे. अन्न आणि पुरवठा विभागासह समाजाचे ते काम आहे. ही समस्या केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक स्तरावरील आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या बाबीचा विचार व्हावा.
प्रत्येकाने प्रत्येक जेवणावेळी हे आठवावे की जगातील कोणीतरी व्यक्ती अन्न नाही म्हणून मृत्यूला जवळ करतोय.कुपोषणामुळे बालमृत्यू होताहेत. पुर्णांन्न न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण करोडोत आहे. एकट्या बंगळुरू शहरात दरवर्षी लग्नात ९४२ टन अन्न वाया जाते. मग जगाची आकडेवारी किती मोठी असेल? त्याप्रती संवेदना जागृत झाल्यास अन्नाची बचत होईल. त्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करता येईल. बहुतांश लग्नकार्यामध्ये भिकारी अथवा दुर्लक्षित समाज जेवणासाठी पंगतीला बसतो किंवा अन्न मागत असतो आणि दुसर्या बाजुला पोटावरून हात फिरवत मनसोक्त भोजन केले जाते ही विसंगती कधी मिटणार? 'अन्न हे पुर्णब्रह्म आहे.ते यज्ञकर्म आहे' असे म्हणतात. हे ब्रम्ह सर्वांसाठी सारखे नको का ?
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड. मो.9421442995
पुण्यनगरी/12 मे 2017
गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी हताश, उदास, गरीब, अत्यंत कष्टप्रद काम करणा-या व नेसत्या वस्त्रांच्या चिंध्या झालेल्या महिलांचे भलेमोठे फोटो प्रसिद्ध करून या वर्तमानपत्रवाल्यांना त्यांच्या वाचकांपर्यंत नक्की कोणता संदेश पोहोचवायचा असतो, हे आजपर्यंत मला कळलेले नाही. आज जर ‘जागतिक महिला दिन’ आहे तर ‘जागतिक पुरुष दिन’ केव्हा साजरा करत असतील?, असा एक विचार विनाकारण मनाला चाळवून गेला. महिलांचे फोटो, त्यांच्या यशोगाथा व मुलाखतींने पेपरची सर्व पाने ओसंडून वाहत होती. टीव्हीवर काही वेगळे बघता येईल म्हणून प्रयत्न केला, तर ए नावाच्या चॅनेलपासून तर झेड नावाच्या चॅनेलपर्यंत एकूण एक वाहिन्या महिलांनी व्यापून टाकल्या होत्या. ‘कसा तुमच्या लक्षात राहत नाही आजचा दिवस तेच बघतो’, असा आज सर्वांनी चंगच बांधला असावा ! या सर्वांपासून दूर जाऊन एखादे आवडीचे पुस्तक वाचावे म्हणून उठणार, एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी प्रचंड वैतागलो. आजची सुंदर सकाळ आपल्या मनाप्रमाणे घालवता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे कपाळावर आठ्यांचे जाळे विणत अत्यंत अनिच्छेने दरवाजा उघडला, तर समोर आनंदाने निथळत असलेल्या चेह-याने हातात कसलातरी बॉक्स घेऊन तो उभा होता. दोन वर्षांपूर्वी इमारतीत वास्तव्यासाठी आलेल्या या व्यक्तीने कोणाशीही संबंध न ठेवल्यामुळे आज प्रथमच व अचानक तो स्वत: भेटायला आल्यानंतर माझा चेहरा प्रश्नचिन्हांनी भरून गेला. त्याने एकही क्षण वाया न घालवता तो बॉक्स माझ्या हातात ठेवला व त्याच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले, ‘सर, पेढे !’ ‘अहो, पण कशाबद्दल?’ मीही वेळ वाया न घालवता प्रश्न विचारला. ‘मुलगा !’ त्याचे टेलिग्राफिक उत्तर ऐकून मी जवळपास ओरडलोच- ‘अहो, केव्हा झाला आणि इथे कोणालाच कसे माहीत नाही?’ गेली दोन वर्षे आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून त्याची बायको आम्हाला सतत दिसायची व त्या काळात ती गर्भवती असल्याचे एकदाही लक्षण दिसले नव्हते. त्यामुळे त्याच्या तोंडून ‘मुलगा’ हा शब्द ऐकल्याबरोबर मी उडालोच. माझी अवस्था त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणाला, ‘सर, मुलगा अजून झाला नाही, होणार आहे. डिलिव्हरीला अजून काही महिने वेळ आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर मी अवाक् होऊन आळीपाळीने एकदा त्याच्याकडे व एकदा त्या पेढ्यांच्या बॉक्सकडे बघू लागलो आणि त्यानंतर हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला. माझ्या कोणत्याही प्रश्नाची वाट न बघता त्याने बोलायला सुरवात केली.
‘सर, तुम्हाला तर माहीतच आहे की मला शाळेत जाणारी एक मुलगी आहे. आम्हाला मुलगा नाही म्हणून काही वर्षांपासून आम्ही दोघेही खूप दु:खी होतो. शेवटी मी निर्णय घेतला की, आता आपल्याला मुलगा झालाच पाहिजे. माझी बायको गर्भवती आहे असे कळले, की मी डॉक्टरांकडे जाऊन तिची टेस्ट करून घ्यायचो. मुलगी असल्याचे कळले की लगेच गर्भपात. गेल्या तीन वर्षांत तिचा चारदा गर्भपात केला. पाचव्या खेपेला मुलगा असल्याचे कळले आणि वेळ वाया न घालवता सर्वांना पेढे वाटण्यास सुरुवात केली !’
त्याच्या बोलण्यातली सहजता व न लपवता येणा-या आनंदामुळे मला एका प्रचंड अस्वस्थतेने घेरून टाकले. माझ्याशी बोलत असलेला व स्वत:ला सुशिक्षित समजणारा एक माणूस पराकोटीच्या अशिक्षित व असंस्कृतपणाचे अत्यंत निर्विकारपणे प्रदर्शन करत माझ्यासमोर उभा होता. गप्प बसून ते सर्व सहन करणे अशक्य झाल्यामुळे माझ्या तोंडून नकळत प्रश्न निघून गेला, ‘साहेब, गर्भाचं लिंग ओळखण्याच्या चाचण्यांवर कायद्याने बंदी आहे, हे तुम्हाला माहीत आहे नं?’ तो मोठ्याने हसला व हसताहसता म्हणाला, ‘सर, अहो कुठल्या काळात जगताय तुम्ही? अशी बंदी आणल्याने का कधी काही गोष्टी थांबत असतात आपल्या देशात? तुमच्या दृष्टीने जी बंदी आहे ती अनेकांसाठी सुवर्णसंधी आहे. दारूबंदी असो की गर्भजल परीक्षेवर आणलेली बंदी, त्यात होत असते अनेकांची चांदी ! बंदी येण्याआधी ही चाचणी किती स्वस्त होती? पण बंदी आली आणि तिने अनेकांच्या बंगल्यांवर सोन्याची कौलं चढवली.’ माझ्या चेह-यावरील अविश्वास बघून त्याने नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबईतील चाचण्यांची ‘रेट लिस्ट’च मला ऐकवली. मी सुन्न होऊन त्याच्या चेह-याकडे बघत असताना त्याने माझा केव्हा निरोप घेतला हे माझ्या लक्षातही आले नाही. पुत्रप्राप्तीसाठी चार मुलींचा गर्भावस्थेतच खून पाडणारा एक सुशिक्षित बाप जागतिक महिला दिनाच्या दिवशी बिनदिक्कत सर्वत्र पेढे वाटत फिरत होता !
आपल्या महान देशाच्या उत्तरेकडील राज्यात मुलगी जन्माला येताच तिला दुधात बुडवून ठार मारण्यात येते, हे अनेक वर्षांपूर्वी ऐकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत नाही तोच राजस्थानात नवजात मुलींना मारण्यासाठी त्यांच्या तोंडात जळजळीत कॉस्टिक सोडा टाकण्यात येतो, तर काही स्त्रीलिंगी गर्भांना जन्म होताच यमसदनी पाठवण्यासाठी त्यांना गरम वाळूच्या पोत्यात भरून व त्या पोत्याचे तोंड करकच्च बांधून त्याला कडक उन्हात ठेवण्यात येते, हे वाचल्यानंतर माझा मनुष्यप्राण्यावरील विश्वास उडण्यास सुरुवात झाली. मला कळेना की या जगात सर्वात क्रूर नक्की कोण? या पृथ्वीवरील ज्यूंना नामशेष करण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ करणारा हिटलर, की मुलीला आईच्या पोटातच संपवणारे किंवा तिचा जन्म होताच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करणारे तिचे सख्खे जन्मदाते, की त्या हत्या करण्यासाठी घसघशीत फी आकारून उत्साहाने मदत करणारे पांढ-या डगल्यातील सोफिस्टिकेटेड राक्षस?
पेढे वाटणा-या शेजा-याचा आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. जागतिक महिला दिनानिमित्त सकाळपासून वर्तमानपत्रात व टीव्हीवर सावित्रीबाई फुले, मादाम क्यूरी, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, कल्पना चावला व अनेक जगप्रसिद्ध महिलांचे गायले जात असलेले गोडवे माझ्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. सतत गर्भपात करणे अत्यंत धोकादायक असते व त्यात स्त्रीला स्वत:चा जीवही गमवावा लागू शकतो, ही माहिती चार गर्भपातांनंतर मुलाला जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या त्या गर्भवतीपर्यंत पोहोचवण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा तिचे उत्तर होते - ‘माझा जीव गेला असता तरी चाललं असतं, पण मलाही मुलगाच पाहिजे होता !’
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
चकाकणाऱ्या वस्तूला सोने समजण्याचा मोह सगळ्यांनाच कधी ना कधी होत असतो. त्यामुळे प्रत्येकाला कधी ना कधी या फसवणुकीला तोंड द्यावेच लागते. आपल्या वैयत्ति*क आयुष्याचे आणि समाजाचेही सर्वाधिक नुकसान अशा नकली काचेच्या तुकड्यांमुळेच होत असते.
Copyright © 2025 | Marathisrushti