(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • निवडून देण्यासाठीच मतदान करा!

    लोकशाही शासनपद्धती आपण स्वीकारली आहे. त्यामुळे निवडणुका हा अपरिहार्य आणि तेवढाच महत्त्वाचा घटक झाला आहे. अलीकडील काळात या निवडणुकींना आलेले स्वरूप बघून अनेक सुबुद्ध नागरिक निवडणूक पद्धतीवर पर्यायाने लोकशाहीवरच टीका करीत मतदानापासून दूर राहतात.

  • दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

    ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते.

  • सरकार मार्केटिंग एजंटांच्या ताब्यात

    06 रविवार,जानेवारी 2008

    इंठाजी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सर्वदूर नुकताच धूमधडाक्यात पार पडला. सगळ्याच वयोगटातील लोकांनी आपापल्या परिने नवीन वर्षाचे स्वागत केले. तरूणांच्या उत्साहाला तर नुसते उधाण आले होते.

  • भावनाशून्य माणूस

    बसमधून प्रवास करताना रहदारीमुळे बस काही काळ रस्त्यावर थांबली असता मी सहज खिडकीतून बाहेर रस्त्याच्या कडेला पाहीलं तर एक दारू प्यायलेला बिगारी काम करणारा कामाठी आपल्या बायकोला बेदम मारहान करत होता. आणि ती निमुटपणे त्याचा प्रतिकार न करता त्याचा मार खात होती.

  • सार्वजनिक आणि गोपनीयतेमधे फरक हवाच!

    प्रकाशन दिनांक :- 12/12/2004
    असे म्हणतात की, संस्कृत ही देवाची भाषा आहे. त्यामुळेच पूजापाठ, होम- हवनात वा इतर धार्मिक कार्यांत संस्कृतचा वापर करत असावेत. वेद, गीता, रामायण आदी पौराणिक ठांथ वा शास्त्रग्रंथ हे संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत.

  • शहाणे व्हा!

    पावसाळ्याची चाहूल लागताच निसर्गात बदल दिसू लागतात. गेल्या काही वर्षात मृगासहित पावसाच्या साऱ्याच नक्षत्रांची महाराष्ट्रावर आणि त्यातही विशेषत: विदर्भ-मराठवाड्यावर अवकृपा झाली असली तरी यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, या वेड्या आशेवर बळीराजा पेरणीपूर्व कामाला दरवर्षी उत्साहाने सुरुवात करतो. जुन्या कर्जासोबतच गेल्या हंगामातले कर्जाचे ओझेही पाठीवर असतेच.

  • समरसता की समरांगण?

    प्रकाशन दिनांक :- 29/02/2004

    ब्रह्यदेवाने ही सृष्टी निर्माण केली असे आम्ही मानतो. वृक्ष-वेली, पशु-पक्षी, वैविध्यपूर्ण जीवसृष्टी त्यानेच निर्माण केली. असे म्हणतात की, ही संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केल्यावरही सर्वोत्तम निर्मितीचे समाधान ब्रह्यदेवाला झाले नाही.

  • आपण आणि आपले जगणे

    या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले.

  • जेवणात मीठ ? नव्हे, केवळ मीठचं!

    धन, संपत्ती, पैसा प्रवाहित असेल तरच त्याची वृद्धी होत असते आणि धनाची जितकी अधिक वृद्धी होईल तेवढ्या अधिक प्रमाणात लोकांचे आयुष्य सुखी होईल, हा एक सर्वसाधारण नियम आहे.

  • उपाय आहे तयारी आहे काय?

    सरासरी दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. हे सगळे नियोजन चुकते कशामुळे? उत्तर स्पष्ट आहे.