मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.
मराठा समाजातील आई आज बर्याaचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणार्यां आपल्या मुलाला उपरोधाने म्ह्णते, ’मराठयाचा बाणा आणि डोईवर व्हाणा...
मराठा समाज अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचेच हे घोतक म्ह्णावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजातील एखादी व्यक्ती आहे म्ह्णून तिला काही विशेष अधिकार, मान – सन्मान वगैरे मिळता आहेत अस कोणतही चित्र महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपर्यावत दिसत नाही. आज महाराष्ट्रात जी मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जाते आहे हे मराठा समाजाच्या अधोगतीचच लक्षण म्ह्णावे लागेल. कोणत्याही प्रगत देशाच लक्षण काय असावं ? की त्या देशातील आरक्षण क्रमाक्रमाणे कमी होत जावं पण आपल्या देशात तर आरक्षण मागणार्याम समाज गटांच प्रमाण दिवसेन – दिवस वाढत आहे. महाराष्ट्रात ब्राम्ह्ण समाजा खालोखाल मराठा समाज मानला जातो. त्यामुळे पुर्वी त्याखालच्या समाजाकडून मराठा समाजाला मान दिला जायचा पण आता तो दिला जातोच याची खात्री देता येत नाही. आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणातही मराठा समाजाचा वरचष्मा आहे असं गृहीत धरल तरी मराठा समाजातील चार डोकी पिढ॑यान - पिढ्या राजकारणात आहेत, चार डोकी श्रीमंत आहेत म्ह्णून संपूर्ण मराठा समाज सदन, श्रीमंत अथवा सुखी आहे असं गृहीत धरता येत नाही ना ! समजा असं गृहीत धरल की एकेकाळी मराठा समाज इतर समाजांपेक्षा सदन होता. पण त्या वेळ्च्या आणि आजच्या परिस्थितीत फारच फरक आहे. पुर्वी मराठा समाज राजा होता आता रामागडी झालेला आहे. राजकारण वगैरे क्षेत्र सोडा आणि उद्यागक्षेत्रात डोकावले तर आज मराठा समाजातील किती लोक मोठे उद्योगपती आहेत ज्यांची नावे जागतीक स्तरावर आदराने घेतली जातात. सद्यस्थितीतील मराठा समाज पुढे जात नाही त्याला मराठा समाजाची एक वृत्ती कारणीभूत आहे ती वृत्ती म्ह्णजे खेकडयाची वृत्ती ! एक वर जात असेल तर दुसरा खालून त्याची टांग खेचतो. त्यासाठी मराठा समाज देशातच नव्हे तर जगभरात विनाकारण बदनाम आहे. सरसकट सर्वच मराठा समाज खेकड्याच्या वृत्तीचा असता तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करूच शकले नसते. मुळात मराठा समाज म्ह्णजे लढवय्या समाज हिंमतीचे धाडसाचे कोणतेही काम त्याला करायला सांगा तो नक्की करणार पण व्यावसाय म्हटला की त्याचे पाय डगमगायला लागतात. कोणी तरी लिहलय,’ मराठी माणूस व्यावसायात उतरत नाही त्याला त्यांच्या बायका कारणीभूत आहेत. मराठा समाज ही दुदैवाने त्याला अपवाद नाही. मराठा समाजातीला बायकांची नवर्याा उद्योगधंद्यापासून दूर ठेवण्याची वृत्तीही काही अंशी मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. मराठा समाजातील मुलींना महिन्याच्या महिन्याला एक रकमी पगार मिळविणारा नवरा हवा असतो. लाखांची उलाधाल करणार्या व्यावसायिक असणार्याग मराठा समाजातील तरूणाला वधू मिळविण्यासाठी वणवण करावी लागते. पुर्वी श्रीमंत असणार्याम मराठा समजाने त्याकाळी बढेजाव पणा करण्यासाठी काही चाली, रूढी आणि परंपरा सुरू केल्या ज्या आजच्या मराठा समाजाला जाचक ठरत आहेत त्यांच नव्याने विचार करायला हवा. आजही मराठा समाजात लग्नकार्यावर अमाप पैसा खर्च केला जातो. प्रसंगी हा खर्च कर्ज काढूनही केला जातो. मराठा समाजाचे सामुहीक विवाह सोहळे क्वचितच पार पाडले जातात. त्यामुळे सद्यस्थितीतील मराठा समाज कर्जबाजारीपणामुळे ग्रस्त झालेला समाजही झालेला आहे. राजे महाराजांचा काळ संपल्यावर मराठा समाजाने ही नाईलाजाने शेती हा व्यावसाय म्ह्णून स्विकारला आणि तेथेच तो फसला. आज ही बराचसा मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्या वाढत गेली तशी प्रत्येकाच्या वाट्याची शेती कमी होत गेली. मग मराठा समाजावर दुसर्याण समाजातील लोकांची चाकरी करणे भाग पडले. तेथे ही कोकणस्थ मराठा समाजाने आपला माराठी बाणा सोडला नाही, होळी गणपतीला गावी जायला सुट्टी नाही दिली तर ते प्रसंगी नोकरीला ही लाथ मारून जातात. मराठा समाजात सारासार विचार करण्याची क्षमताच नष्ट झालेली आहे. मध्यंतरी कोठे तरी वाचनात आले मराठा समाजाचा मुंबईत एक ही हॉल नाही ! खर की खोटं देव जाणे पण जर हे खंर असेल तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. पुर्वी लोकांच्या हिंमतीला, मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला किंमत होती. पण आज तुमच्या जवळ असणार्याी शिक्षणाला, कलागुणांना आणि त्याहून ही अधिक तामच्या जवळ असणार्याा पैशाला अधिक किंमत आहे. मराठा समाजाला आपला वंश पुढे चालावा याचे भारी कौतुक त्यामुळे त्यांना मुलगा हवा असतो याचा अर्थ ते मुलींचा द्वेश करतात असा नाही पण त्यामुळे त्याचा कौटुबिक पसारा वाढतो आणि त्या वाढलेल्या पसार्यातखाली तो घुसमटून दम तोडतो. अखंड मराठा समाज एकत्र असा कधी आलेलाच नाही सद्यस्थितीतील मराठा समाज तुकड्या तुकड्यात विखुरलेला दिसतो. त्या प्रत्येक तुकड्यातील मराठा समाजाची मानसिकता, विचारसरणी भिन्न – भिन्न आहे. मराठा समाजात अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या पण मराठा समाजाचा स्वतंत्रपणे विचार करावा असा विचार त्यापैकी एकाच्याही मनाला कधी शिवला नाही. मराठा समाजानेच समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत म्ह्णून प्रथम पुढाकार घेतला पण आज सर्वांना आरक्षण बहाल करणार्याी माराठा समाजावरच आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील सर्वांनाच एका तराजूत तोलले जात आहे. पण कोणाच्या हे का लक्षात येत नाही मराठा समाज चार भागात विभागला गेलेला आहे. एक राजा- महाराजांच्या थाटात जगणारा मराठा समाज, एक श्रीमंत मराठा समाज, एक मध्यमवर्गीय पांढरपेशा मराठा समाज आणि एक दिन – दलीत गरीब मराठा समाज. एखादा रस्त्यावर राहणारा गरीब मराठा समाजातील आहे म्ह्णून त्याच गरीब असणं आपण अजून किती वर्षे नाकारणार आहोत ? आज मराठा आरक्षणाची मागणी होतेय याचा अर्थ आज मराठा समाजाची सहनशक्ती संपलेली आहे. आता यापुढे होईल तो उद्रेक ! सद्यस्थितीतील मराठा समाज सैरभैर झालेला आहे. त्याला कोणीही वाली उरलेला नाही. खरं म्हणजे मराठा समाजाने स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मरून घेतलेला आहे. मराठा समाज नेहमीच प्रसिध्दी माध्यमांपासून दूर राहिल्यामुळे आज त्यांच्या दुःखाची कोणी दखलच घेत नाही. मराठा आरक्षणाला उचलून धरण्यासाठी प्रसारमाध्यमांनी किती मदत केली हा संशोधनाचा विषय आहे. सद्यस्थितीतील मराठा समाजाचा विकास चारी दिशांनी खुंटला आहे. आजचा मराठा समाज स्वप्ने पाहायचीच विसरून गेलेला आहे. ज्यांच्यात स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे ते परदेशात स्थिरावता आहेत. पुर्वी मराठा समाजातील तरून छाती पुढे काढून सांगत असत मी मराठा आहे ! पण आज त्याला तस करण्याची लाज वाटते कारण आज मराठा समाजातील लोकांच दखल घेण्याजोग कर्तृत्वच दिसत नाही. आज मराठा समाज शिक्षण क्षेत्रातील आरक्षणामुळे बराच मागे पडलेला आहे. व्यक्तीशः मराठा समाजाच्या म्ह्णाव्यात अशा शिक्षणसंस्था महाराष्ट्रात नाहीत. मराठा समाजातील तरूण – तरूणी फक्त पदवीधर होण्यातच धन्यता मानत आहेत. गेल्या काही दशकात फार प्रसिध्दी लाभलेले मराठा समाजातील चेहरे उद्याल येताना दिसले नाहीत. सद्यस्थितीतील मराठा समाजाच्या हितासाठी संपूर्ण मराठा समाजाला एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवशकता आहे. फक्त आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाला चांगले दिवस येतील असे खात्रीने नाही सांगता येणार. सद्यस्थितीतील मराठा समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्येकाला माळेतील एक मनी व्हावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजाची अवस्था बिकट असली तरी मराठा समाजातील तरूणांनी व्यसनांच्या आहारी जाता कामा नये. मराठा समाज हा स्वभवतः सहनशील आहे त्यामुळे आपल्या दुःखाची तो उगडपणे वाच्यता करणार नाही. पण तो भडकला तर त्याला आवरणे शक्य होणार नाही. मराठा समाजातील प्रत्येक घटकाने आता समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला आपल्या परीने काही भरीव कार्य करता येईल का याचा विचार करायला हवा ! जुन्या चाली, रूढी आणि परंपरा ज्या संपूर्ण मराठा समाजात मानल्या जात नाहीत त्या नष्ट कराव्यात. मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.
लेखक – निलेश दत्ताराम बामणे ( कवी, लेखक आणि पत्रकार ( संपादक – मासिक साहित्य उपेक्षितांचे )


प्रकाशन दिनांक :- 09/11/2003
जगात भारताची ओळख भारतातील नानाविध वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे स्थापित झाली आहे. अर्थात ही सगळीच वैशिष्ट्ये आपल्यासाठी भूषणावह आहेतच असे नाही, उलट बहुतेक वैशिष्ट्यांनी भारत जगाच्या पाठीवर कुचेष्टेचाच विषय ठरला आहे. सर्वाधिक सुट्ट्या घेणारा देश ही आपली एक ओळख आपल्या आळशी आणि बेपर्वा वृत्तीचे जसे जाहीर प्रदर्शन ठरते, तद्वतच विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, मनुष्यबळ असतानादेखील देशात असलेली गरिबी आपल्या नियोजनशून्य कल्पकतेला उघडे पाडीत असते.
ऐतिहासिक रोम शहर जळत होते, तेव्हा सम्राट नीरो शांतपणे बासरी वाजवित होता म्हणे! घटना ऐतिहासिक आणि सत्य असली तरी ती एकदाच घडून गेली असे नाही. विध्वंसाकडे अलिप्त नजरेने पाहत आपल्याच मस्तीत जगणारा नीरो त्यानंतर पुन्हा-पुन्हा जन्माला आला आणि येत आहे.
कोणता पक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीवर नियंत्रण ठेवण्याची हिंमत बाळगून आहे? विशेष गरज नसताना विकासकामातील पैसा वळवून सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. या आयोगाच्या शिफारशी तुर्तास, राज्याची आर्थिक घडी नीट बसेपर्यंत लागू करणार नाही, असे म्हणण्याची हिंमत दाखवू शकतो?
राजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण?
Financial Resolution and Deposit Insurance Bill या बिलाचे अत्यंत घातक परिणाम सर्व साधारण नागरिकांवर होण्याची शक्यता खूप अधिक आहे.या बिलाचे वैशिष्ठ असे आहे कि जर एखादी बँक मग ती सरकारी असो अथवा खासगी असो बुडत असेल तर त्या बँकेला ग्राहकांचे deposits चे पैसे बुडणारी बँक तारण्यासाठी वापरण्याचा अधिकार असणार आहे.
एक अनामिक अदृष्यशक्ती ! .......... त्याला काही लोक नशीब....... असेही म्हणतात...... बघा काय म्हणणार या गोष्टींना....
गुहागर मुंबई एसटी बस एका ढाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर छत्री घेऊन त्यांना शोधायला उतरला होता. केवळ दोघांमुळे संपूर्ण बस निघू शकत नसल्याचे पाहून बाकीचे प्रवासी वैतागलेले होते. "ओ मास्तर चला जाऊद्या, राहूदे त्यांना पावसातच इथे !" एकजण ड्रायव्हरला म्हणाला. "तेच ना, जहागीरदार आहेत हे जसे काही ! एसटी म्हणजे यांच्या बापाचा माल आहे का ?" एक कोकणी हेल चिरकला. पण ड्रायव्हरसाहेब शांत. कारण त्यांच्यासाठी हे सर्व रोजचेच. त्यांनी फक्त सारखा हॉर्न वाजवायला सुरुवात केली. तेवढ्यात कंडक्टरसाहेब त्या दोघांना घेऊन आले. सर्व प्रवासी एखाद्या कैद्याकडे पहावे तसे त्यांच्याकडे पाहू लागले. पण बेल दोनदा वाजली आणि एसटीने कोसळणा-या पावसात मार्गक्रमण करायला सुरुवात केली. मागून एक जीप भरधाव वेगाने एसटीला ओव्हरटेक करून निघून गेली. पण थोड्याच वेळात ती रस्त्यावरून उलटी वळली आणि एसटीच्या दिशेने यायला लागली. नक्कीच काहीतरी वेगळे घडलंय हे ड्रायव्हरला जाणवले. त्यांनी वेग कमी केला अन जीपवल्याला विचारण्याचा प्रयत्न केला. पण ती जीप पुन्हा भरधाव वेगाने उलटी निघून गेली. काहीच मिनिटांनी त्यांच्या लक्षात आले की सावित्री नदीच्या पुलाच्या तोंडावर एक व्यक्ती हात करून थांबण्याचा इशारा करतोय. त्यांनी गाडी जवळ नेऊन थांबवली तर त्या माणसाने सांगितले की पूल मध्यावर तुटलाय आणि दोन एसटी आणि चारपाच गाड्या खाली कोसळून वाहून गेल्यात ! ते ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर सरारून काटा आला. खरे म्हणजे त्या तीनही बस रोज एकापाठोपाठ जातात. पहिल्या दोन निघून गेल्या पण या बसमधल्या दोन प्रवाशांनी गाडीत यायला पाचदहा मिनिटे उशीर लावल्यामुळे सर्वांचा जीव वाचला..... नाहीतर काय झाले असते ? उशीरा येऊन ज्यांनी इतरांच्या शिव्या खाल्ल्या त्यांनीच सर्वांचा जीव वाचवला ! नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?
मुंबईतील एक चाळीत निरुत्तर करणारी एक घटना घडली होती. ती चाळ एका बिल्डरला देण्यात आली. बिल्डरने सर्वाना सांगितले की नियमाप्रमाणे तुम्हाला सध्या जेवढी जागा आहे तेवढी देण्यासाठी मी बांधील आहे. पण चाळीतल्या सर्वच खोल्या शंभर दीडशे फुटाच्या आहेत. नव्या बिल्डिंगमढील सर्व फ्लॅट्स पाचशे फुटाच्या पलीकडे असणार आहेत. तेंव्हा तुम्ही वरच्या स्क्वेअर फुटाचे पैसे द्या म्हणजे तुम्हालाही अधिक जागा वापरायला मिळेल. अर्थातच सर्वांनी ते मान्य केले. पण एका कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. कारण त्यांचा मुलगा मतिमंद होता. त्यांनी पै पै जमा केली होती ती त्याच्या भविष्यासाठी ! बिल्डर म्हणाला की ठीक आहे. तुम्हाला तुमच्या जागेची बाजारभावाने येणारी किंमत देतो, तुम्ही जागेचा ताबा सोडा. पण ही जागा सोडून मुंबईत ते कुठे जाणार ? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्या दांपत्याची अवस्था झाली होती. आणि अचानक एक घटना घडली. एक दिवस बिल्डरचा मुलगा चाळीसमोरच्या रस्त्याने गाडीने जात असताना त्याच्या गाडीखाली सापडून एक मुलगा मृत्युमुखी पडला. तो नेमका या दाम्पत्याचा मतिमंद मुलगा होता ! सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बिल्डरने या दाम्पत्यासमोर हात जोडून प्रस्ताव ठेवला की कृपया केस मागे घ्या. मी तुम्हाला एक फ्लॅट फुकट देतो. त्या दुर्दैवी मातापित्याला प्रश्न पडला की मुलगा जिवंत होता तोपर्यंत फ्लॅट घेणे अशक्य होते. आता त्याच्या मृत्युमुळेच फ्लॅट मिळतोय ! मग या जागेचा आनंद व्यक्त करायचा की दुःख ? नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?
आणखी एक सत्य घटना सांगावीशी वाटते. दिल्लीत एक मराठी वकील रहात होते. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती म्हणून ते दुस-या स्थळाच्या शोधात होते. एक विधवा स्त्रीचे स्थळ सांगून आले आणि तिच्याशी त्यांचे लग्न झाले. पण त्यांच्या लक्षात आहे की दर पंधरा दिवसांनी त्यांची पत्नी ऑफिसच्या कामासाठी म्हणून विमानाने पुण्याला जाते. ते पेशाने वकील ! त्यामुळे त्यांना शंका आली म्हणून त्यांनी तिच्या नकळत शोध घेतला तेंव्हा समजले की त्यांच्या पत्नीला पहिल्या पतीपासून झालेली एक मुलगी आहे. आणि पदरी मुलगी असेल तर आपल्याशी कोणी लग्न करणार नाही असे वाटले म्हणून पत्नीने ही बाब त्यांच्यापासून दडवून ठेवली आहे. ती मुलगी तिच्या मावशीकडे वाढत होती ! हे कळल्यावर त्या महोदयांनी काय केले असेल ? काही दिवसातच त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यांनी सरळ पुण्याला येऊन त्या चिमुरडीला बरोबर घेतले आणि थेट दिल्लीला आणून पत्नीसमोर उभे केले.... तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून ! असा पती आणि असा बाप मिळणे नशिबातच असावे लागते, नाही का ? नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते ?
नशीब, प्राक्तन, चमत्कार या तीनही शब्दांना हल्ली फक्त टीकेचे धनी व्हावे लागते. आजचे जग विज्ञानवादी आहे त्यामुळे जे दिसत नाही, जे सिद्ध करता येत नाही ते अनेकजण खरे मानत नाहीत. पण अफाट अशा अंतराळातील पृथ्वी हा एक इवलासा ग्रह आहे. त्यात असणा-या लाखो प्रकारच्या जीवांपैकी मानव हा अतिशय क्षुद्र प्राणी आहे. ज्याच्या हातात स्वतःचा जन्मही नसतो आणि मृत्यूही. पण हा प्राणी स्वतःला अतिशय श्रेष्ठ समजतो. आपण फार म्हणजे फारच प्रगती केली आहे असे त्याला वाटते. नशीब, प्राक्तन, चमत्कार या गोष्टींना तो अंधश्रद्धा संबोधून मोकळा होतो. त्याला जणू "अहं" ची बाधा झालेली आहे. त्यामुळे माणसाच्या आधी अनेक गोष्टी होत्या आणि नंतरही अनेक गोष्टी आहेत हे त्याला कळतच नाही.
मला सांगा, दोन एसटी बसचा कपाळमोक्ष होऊनसुद्धा केवळ पाच मिनिटांच्या फरकामुळे तिसरी बस वाचते हा चमत्कारच नव्हे का ? मुलाच्या जिवंतपणात मरण अनुभवणा-या आईबापाला तो मेल्यानंतर चांगले दिवस दिसावेत याला प्राक्तनच म्हणतात ना ? आणि एका पुरुषाने आपल्या सावत्र मुलीला अशा प्रकारे स्वीकारावे ह्याला केवळ नशीबच म्हणायला हवे नाही का ?
एखाद्या बैलगाडीखालून कुत्रे जात असते, त्याला वाटते की आपणच संपूर्ण गाडी आपणच खांद्यावर पेलली आहे. माणसाचे काहीसे तसेच आहे. विज्ञानाच्या साहाय्याने आपण जग चालवतो आहोत असे त्याला वाटते. पण विज्ञान कितीही पुढे गेले तरी मुळच्या गोष्टी अनुत्तरीतच राहतात. आता पहा, H2O म्हणजे पाणी हे सगळ्यांना माहित आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे अणू वेगळे काढता येतात पण हायड्रोजन चे दोन आणि ऑक्सिजन चा एक अणू एकत्र करून पाणी नाही तयार करता येत. झाडे प्राणवायू तयार करतात हे माहित आहे पण तो कसा तयार करतात हे आजवर समजलेले नाही. बाळाच्या जन्माची पद्धत समजली पण प्रयोगशाळेत बाळ तयार करता आले नाही. इतकेच काय पण स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग होऊनच गर्भ तयार होत असेल तर जगातली पहिली स्त्री आणि पहिला पुरुष कसा तयार झाला असेल, कोणी तयार केला असेल याची कल्पनाही आजवर करता आलेली नाही. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाला माती तयार करता आली नाही, हवा निर्माण करता आली नाही. मग मी सर्वकाही करू शकतो अशी दर्पोक्ती का ? कोणीतरी अतींद्रिय शक्ती आहे, जिचा शोध अद्यापही आपल्याला लागला नाही, तीच सर्व जगाचे निर्माण करत असते आणि नियंत्रण करत असते. त्या शक्तीला कोणी परमेश्वर म्हणतो, कोणी विधाता म्हणतो, कोणी चमत्कार म्हणतो, कोणी प्राक्तन म्हणतो तर कोणी नशीब असे संबोधतो. तुम्ही कितीही नास्तिक असा, त्या अज्ञात शक्तीला नाकारुच शकणार नाही. पण ती नाकरण्यातच आपल्याला फुशारकी वाटते. एक गोष्ट आपण लक्षात घेतली आहे का की जगात जेवढे म्हणून धर्म आहेत त्या सर्व धर्मात देव आणि दानव तसेच स्वर्ग आणि नरक या एकसारख्याच संकल्पना मांडलेल्या आहेत. प्रत्यक धर्मात स्वर्ग आकाशातच असतो आणि नरक पताळातच असतो. शब्द वेगळे असतील पण संकल्पना एकच मांडणारे कोणीतरी अज्ञात आहे हे निश्चित पण ते नाकारण्याचा करंटेपणा आपण करत आहोत.
मानव सोडून इतर प्रत्येक सजीव निसर्गतःच ती शक्ती मानत असतो. वाळवंटात वादळ होणार हे उंटाला कळते तेंव्हा तो आपली मान वाळूत खुपसतो. कारण वादळात उभे राहण्याची शक्ती आपल्यात नाही हे त्याला माहित असते. काजवा कधीही दिवसा बाहेर पडत नाही कारण सूर्याच्या प्रकाशाच्या शक्तीपुढे आपण फारच यत्किंचित आहोत याची त्याला कल्पना असते. पाण्यात उगवणारी लव्हाळी महापुरात नतमस्तक होतात कारण महापुरातून वाचण्यासाठी तोच एक उपाय आहे हे त्यांना माहित असते. कोकीळा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते कारण घरटे बांधण्याची आणि अंडी उबवण्याची शक्ती आपल्यात नाही याची तिला कल्पना असते. फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते कारण फळे देणारा तो विधाता आहे, मी केवळ भारवाही आहे अशी त्याच्याकडे विनम्रता असते. आणि आपण ?...... पुढच्या क्षणी जिवंत असणार की नाही हे माहित नसतानासुद्धा चक्क महिन्याचा नेटपॅक मारतो आपण ! काय गम्मत आहे न ?
-- वसंत चरमळ
हे…निर्दयी माणसा.. गर्विष्ठ माणसा.. स्वार्थ आणि फक्त स्वार्थानचंं बरबटलेल्या माणसा.. अहंकारानं मती भ्रष्ट झालेल्या माणसा..
लोकशाही शासन व्यवस्था असलेला सर्वात मोठा देश म्हणून आपण जगाच्या पाठीवर मिरवतो, तसे मिरवणे गैर नाही. परंतु लोकशाही या संकल्पनेची व्यापकता किंवा मूल्य आम्हाला पुरेसे कळाले आहे की नाही हा प्रश्न आज अर्धशतकाच्या प्रवासानंतरही कायम आहे.
माणसाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होत असते. त्याचा खरा कस तेव्हाच लागत असतो. खरे तर माणसाची खरी परीक्षा म्हणण्यापेक्षा त्याची खरी ओळख म्हणणे अधिक संयुत्ति*क ठरेल.
Copyright © 2025 | Marathisrushti