आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्हणजे अशी शंका मांडण्यापूर्वी त्यांनीं कांहीं गोष्टी ध्यानांत घ्यायला हव्या. एक म्हणजे भारतातील हवामान. भारतातल्या मान्सूनच्या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्य ऐतिहासिक सत्यही येथें लक्षात घ्यायला हवें.
माझ्या दृष्टीकोनातून…. होय मी सुरक्षित आहे…. कारण…..
शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकऱ्यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा पुन्हा एकदा अक्षरश: बाजार मांडला आहे. त्यांचे कोणतेही आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी कधीच नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही आंदोलनातून शेतकऱ्यांचे हित साधल्या गेले नाही. ऐन निर्णायक क्षणी पेटलेले आंदोलन मागे घेऊन त्यांनी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला.
“पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात..” फुलं साठवणं सोपं असतं, पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही…
कोन बनेगा करोडपती मध्ये प्रत्येकाला मान देणारा, न्याय देणारा, समजून घेणारा,खोटं खोटं न हसणारा, गंभीर होणारा अभिताभ. एकेक नायक एक एक पिढीवर राज्य करत असतो, अनेकांच्या मनावर राज्य करत असतो.
आज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे.

मुंगेरीलाल स्विमिंग शिकायला स्विमिंग पुलवर आला. खोल पाणी पाहून घाबरला.
पण कोचने धीर दिला, म्हणाला, ” मी तुला पोहायला शिकवेन. घाबरू नकोस. पाण्यात उडी मार!”
जीव मुठीत धरून मुंगेरीलालने पाण्यात उडी मारली आणि व्हायचे तेच झाले. मुंगेरीलालने पाण्यात गटांगळ्या खायला सुरुवात केली. नकातोंडात पाणी गेले. जोरात ठसका लागला. कोचने त्याला काठावर आणले.
मग मुंगेरीलालने एक प्रतिज्ञा केली,
” जोवर मला स्विमिंग येत नाही तोवर मी पाण्यात उतरणार नाही!!”
आज मुंगेरीलाल ८० वर्षांचा आहे. अजूनही त्याला स्विमिंग येत नाही.
आपली अवस्थाही अशीच होते. पाण्यात उतरायची हिंमत होत नाही आणि कोणत्याच लाटेवर स्वार होता येत नाही, कोणतही यश मिळत नाही.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात शास्त्रज्ञांची ,संशोधकांची निर्मिती झपाट्याने होते विज्ञान असो वा तंत्रज्ञान आधि अमेरिकेत निर्माण होतं आणि मग जगात प्रसार होतो. अशी खंत आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा पाश्चात्य देशांचा दृष्टीकोन हा “विकसनशील देश” असाच असला तरी भारतीयांना आपला देश विकसीत आहे असच म्हणावं लागेल
सुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही.
कुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी.
Copyright © 2025 | Marathisrushti