जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येतयं. हे मान्य करावचं लागेल. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात तरुण पिढीला ग्लोबल होऊ पाहातेय. अगदी माझ्यासहित. उदाहरणादाखल सांगायचचं झालं तर, इयत्ता पाचवीला असताना मला सर्वप्रथम इंग्रजी हा विषय अभ्यासाला अमलात आणला गेला तर इयत्ता आठवीला नसताना सर्वप्रथम कॉम्प्युटर हाताळता आला.
मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.
सध्या पावसाळा सुरू आहे. डॉक्टर मंडळींच्या भरभराटीचा हा मोसम असल्याचे गंमतीने म्हटले जाते. अर्थात ते सत्यही आहे.
काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.
सरकारला या देशातील शेतकर्यांचे, गरिबांचे खरोखर हित साधायचे असेल, तर या लोकांकरिता सरकारी तिजोरीतून खर्च होणारा प्रत्येक रुपया या लोकांच्या दारापर्यंत कसा जाईल, याचा विचार करावा लागेल. त्यासाठी आधी सरकारने सगळ्या फुकटछाप योजना तातडीने बंद करायला हव्यात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती तरी व्हायला हवी किंवा एखादी क्रांती तरी!
समाजाच्या रक्षणाकरता शिक्षा देणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला निश्चितपणे त्याची आदर्श शिक्षापद्धती पाहिजे. आता भारताचा नवीन दृष्टिकोन ‘गुन्हेगारास कडक शिक्षा न देता सुधारणे’ हे धोरण आहे.
सरकारकृपेने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि त्याच प्रमाणात उत्पन्न कमी झाले आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला. आता सरकारने शेती फायद्याची कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारने तसे लक्ष दिले तर शेतीसोबतच इतर अनेक प्रश्न आपोआप सुटतील.
पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.
आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.
या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.
मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.
भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.
इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.
काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.
काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.
असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.
-- विजय लिमये
प्रकाशन दिनांक :- 05/06/2005
मोफत वीजप्रश्नी विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना, आपण राज्यातील जनतेचा विश्वासघात केला, असे म्हणता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार आपण शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविण्याचा प्रयत्न केला. 10 महिने मोफत वीज दिल्यानंतर सध्याच्या वीजटंचाईच्या पृष्ठभूमीवर, मोफत विजेच्या निर्णयावर आपल्याला पुनर्विचार करावा लागला.
‘आर्य प्रचारकांनी लोकसमूहांतील निवडक व्यक्तींना संस्कृत शिकवलें असणार’ ही मांडणीच बरोबर नाहीं.
• वैदिक काळापासून संथा देऊन , योग्य पद्धतीनें वेदपठण शिकवत असत, व त्यासाठी तिथें गुरु-शिष्य परंपरा होती. (तशी संथा घेतली नाहीं तर, उच्चारात कुठे व कसे आघात द्यायचे हें कळणार नाहीं, व अर्थभिन्नता येऊं शकेल, असें म्हणतात ). आजही कांहीं पाठशाला तशी संथा देत आहेत. उदा. वाईची प्राज्ञ पाठशाला, सातार्यालाही असलेली एक पाठशाला, व उज्जैनलाही असलेली, असें माझ्या वाचनात आलेलें आहे.
• एक बाब आपण ध्यानात घ्यायला हवी, आणि ती ही की, भारतात पहिल्यापासूनच बहुभाषिकत्व होतें. त्यामुळे,( नंतरच्या काळात ), ज्यांना संस्कृत येत असे, त्यांची ‘मातृभाषा’ वेगळी असणें अर्थातच शक्य आहे. अशा व्यक्ती रोजच्या व्यवहारात त्यांची मातृभाषा; आणि सांस्कृतिक, धार्मिक, ज्ञानविषयक इत्यादी कार्यांसाठी संस्कृत वापरत असत. वैदिक-काळानंतरच्या कालखंडात जरी शूद्र व स्त्रिया यांना संस्कृत शिकायला बंदी होती (जें अर्थातच योग्य नव्हतें), तरी समाजाच्या मोठ्या भागाला ती शिकण्याची अनुमती होती. म्हणून, ‘मुद्दामच कांहीं निवडक व्यक्तीनाच संस्कृत शिकवलें गेलें’, असें म्हणणें अयोग्य आहे.
• चामु कृष्ण शास्त्री सांगतात की, पुरातन काळात संस्कृत ही सर्वसाधारण लोकांची बोली-भाषा होती. संस्कृतमध्ये शेतीविषयक विपुल शब्दसंपदा आहे. पाणिनी हा, जुगारी, चलाखीबाज, आणि गुंड लोकांच्या वापरात असलेले शब्दही देतो.
• पाणिनी (संस्कृत) भाषेबद्दल दोन कॅटेगरीज् देतो : ‘छंद’ (छांदस् ) म्हणजे वैदिक भाषा , आणि ‘भाषा’ म्हणजे लोकांच्या रोजच्या बोलचालीतील भाषा. ‘भाषा’ या शब्दाचा उगमच ‘भाष्’ म्हणजे ‘बोलणें’ हा आहे . (भाषण, संभाषण वगैरे शब्द आठवावेत ).
( संदर्भ : राजीव मलहोत्रा यांचा संस्कृतवरील ग्रंथ ; त्याचें डीटेल्स नंतर दिलेले आहेत ).
याचा अर्थ असा की, ‘देववाणी (आर्ष-संस्कृत ) ही ‘देव’ या गटाची (Clan) भाषा होती ; व पुरातन काळीं ती सर्व-लोकांची बोली-भाषा होती.
• पण , कांहीं शतकांनतर, किंवा सहस्त्रकांनंतर ती प्रामुख्यानें ज्ञानभाषा झाली, संपर्क-भाषा (Link-Language) झाली, जसें युरोपमध्ये लॅटिन. त्यामुळे, ‘संस्कृत ही ज्ञानभाषा बनली ’, हें मोरे यांचे विधान योग्य आहे. मात्र, ‘बोलीभाषा या परस्पराच्या भगिनी , संस्कृत ही सर्वांची जननी अशी भावनिकताही निर्माण करण्यात आली ; ... ती देववाणी असल्याचेंही सांगण्यात आलें ’, ही मोरे यांची मांडणी अयोग्य आहे. या त्यांच्या शब्दांमधून असें ध्वनित होतें की, ‘असें खरोखर नव्हतेंच, मात्र असा (खोटा) प्रचार केला गेला’.
• मात्र, आपण भाषिक इतिहास पाहिला तर, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री , शौरसेनी या ‘पाउड’ (‘प्राकृत’) भाषांतील शब्द म्हणजे संस्कृत शब्दांचे (किंवा , आर्ष-संस्कृत म्हणा हवें तर) सौकर्यीकरण (simplification) आहे, उदा. कृष्णचें कण्ण , कन्ह ; पुत्रचें पूत्त, मध्यमचें मज्झिम, मार्गचें मग्ग, धर्मचें ‘धम्म’, भिक्षुचें भिक्खु, अर्हंतचें अरिहंत, नमोचें णमो, वगैरे. त्या ( प्राकृत ) भाषांचे व्याकरणही सोपें झालेलें आहे. आणि, त्या भाषांमधूनच बदल होत-होत हल्लीच्या, आधुनिक-कालीन भाषा उद्भवल्या आहेत. म्हणजेच, आर्ष-संस्कृत ही भारतीय भाषांची जननीच आहे, (किंवा, आजी, पणजी म्हणा हवें तर) , व या प्रादेशिक-भाषा परस्परांच्या भगिनीच आहेत ; हें वस्तुत: सत्यच आहे , मुद्दाम प्रचार केली गेलेली एखादी खोटी गोष्ट नव्हे.
• हाल सातवाहन याच्या ‘गाथा सप्तशती’ या, इ.स. च्या पहिल्या शतकाच्या सुमारास लिहिलेल्या, महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथाचें उदाहरण पहा. ही बघा त्यातील एका गाथेची एक ओळ :
‘सुह-उच्छअं जणं दुल्लहं पि दूराहि अहम आणन्त ’
महाराष्ट्री ही मराठीची ‘आजी’ असली तरी, तिचें संस्कृतशी साम्य आहे की आजच्या मराठीशी साम्य आहे, हें कुणीही सहज सांगूं शकेल
• एक साधी गोष्ट ध्यानात घेऊं या. आर्ष-संस्कृत साहित्य हें ऋग्वेदापासून उपलब्ध आहे ; आणि तें, काळाच्या संदर्भात, unbroken, continuous उपलब्ध आहे. कुठल्याही भाषेत साहित्य निर्माण होण्यासाठी ती भाषा आधीची कांहीं शतकें तरी ( ‘बोली’ म्हणून तरी ) अस्तित्वात असावी लागते, व तिच्यात परिपक्वता आल्यानंतरच तिच्यात साहित्य निर्माण होतें. (हल्लीचें उदाहरण म्हणून, कोंकणी भाषा पहा, म्हणजे वरील म्हणणें पटेल). पाली, अर्धमागधी, महाराष्टी इत्यादी प्राकृत भाषांमधील साहित्य बुद्ध-महावीर-कालोत्तर आहे. म्हणजेच, ज्या भाषांना आपण ‘प्राकृत’ असें म्हणतो, त्या भाषा बर्याच नंतरच्या आहेत.
• यासाठी आणखी एक पुरावा पाहूं या. तो म्हणजे अवतारांचा. (संदर्भ : नरहर कुरुंदकर, ‘व्यासांचें शिल्प’). अवतारांची मूळ कल्पना ‘ब्राह्मण’ ग्रंथांमध्ये येते. त्यांत प्रजापतीचे अवतार आहेत, आणि ते आहेत २४. त्यानंतर आलेल्या बौद्ध-जैन साहित्याचें पहा. तथागत बुद्धाचे ‘अवतार’ ही २४ . जैनांचे ‘तीर्थंकर’ही २४. अर्थातच, ही चोविसांची कल्पना त्यांनी आधीच्या ‘ब्राह्मण’ ग्रंथांवरून घेतलेली आहे, हें उघड आहे.
• गौतम बुद्धानेंही आधीच्या उपलब्ध ग्रंथांचें अध्ययन केलें होतें, त्यानें चारही वेद वाचलेले होते, असा उल्लेख आहे. म्हणजेच ते (संस्कृत) ग्रंथ आधीचे, व बुद्धोत्तर काळात बुद्धाचें तत्वज्ञान सांगणारें बौद्ध साहित्य नंतरचें आहे. जैनधर्म जरी बौद्ध धर्माहून प्राचीन असला तरी, त्याचें साहित्य लिखित स्वरूपात यायला आणखी कांहीं शतकें जावी लागली. (संदर्भ : नरहर कुरुंदकर).
• याचा अर्थ असा की ‘संस्कृत’ (म्हणजे, छांदस किंवा आर्ष-संकृत) ही भाषा ऋग्वेदाच्या किमान कांहीं शतकें तरी आधी बोलली जात होती. पाणिनीनें फक्त तिचें व्याकरण व्यवस्थितरीत्या मांडलें.
• पाणिनीच्या काळात, आणि उत्तर-पाणिनी काळात ‘संस्कृत’चें स्वरूप बदललें. उदा. वैदिक आर्ष-संकृतमध्ये ‘ळ’ हें व्यंजन आहे ( जसें की, ऋग्वातील ‘ अग्निम् ईळे पुरोहितम् ) ; पण नंतरच्या काळात, संस्कृतमधूण ‘ळ’ लुप्त झाला. ( पण, ‘ळ’ कांहीं प्राकृत भाषांमध्ये वापरात राहिला) .
• कोणीही वैयाकरणी भाषा ‘निर्माण’ करत नाहीं, मग तो इंद्र ऋषि असो, यास्क असो, पाणिनी असो, कात्यायन असो, तोळकप्पयन असो, वा कुणीही असो. कोणीही कुठलीही भाषा vacuum मधून मुद्दाम निर्माण करूंच शकत नाहीं. एखादा जनसमूह एकमेकांशी communicate करतांना, संवाद साधतांना, शब्द व वाक्यांचा वापर करतो व त्यातून भाषा निर्माण होत जाते. वैयाकरणी फक्त तिचें व्याकरण लिहितात.
• आणखी एक गोष्ट अशी की, विविध भाषा एकमेकींकडून शब्दांची वगैरे देवाणघेवाण करतात, ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, त्यानें भाषा समृद्धच होतात. मध्य युगातलें उदाहरण पहायचें तर, मराठीनें फारसीकडून घेतलेले शब्द पहा. त्यांतील अनेक शब्द मराठीत इतके रुळले आहेत, की ते परभाषेतून आले आहेत हें आपल्याला अनेकदा कळतही नाहीं. तेंच इंग्रजीनेंही इतर भाषांकडून शब्द घेऊन केलेलें आहे. आज मराठी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषा इंग्रजीकडून शब्द घेऊन तेंच साधत आहेत.
• वैदिक काळच्या किंवा नंतरच्या अन्य भाषांमधून आर्ष-संस्कृतनें कांहीं शब्द वगैरे घेतले असले तरी, त्यांच्यापासून आर्ष-संस्कृत किंवा संस्कृत भाषा तयार झालेली नाहीं. त्या इतर भाषा mostly आतां लुप्तही झालेल्या आहेत. मुंडा परिवारातील आजच्या भाषा पाहिल्या तर, त्यांचें रूपही पूर्णपणें बदललें आहे; त्यांनी संस्कृत, फारसी, हिंदी वगैरे भाषांमधून बरेंच कांहीं घेतलेले आहे. ( संदर्भ : ‘हो’ भाषा और साहित्य का इतिहास ; लेखक : डॉ. आदित्य प्रसाद सिन्हा ). (टीप : ‘हो’ ही मुंडा भाषा-परिवारातील एक भाषा आहे).
• प्राकृत साहित्य पहाल तर, तें गौतम बुद्ध व महावीर वर्धमान यांच्या काळानंतरचें आहे. आणि, हे दोघेही वैदिक काळाच्या बरेच नंतरचे आहेत, हें सर्वमान्य आहे, आणि आपण तें आधी पाहिलेंच आहे. प्राकृतमधील पैशाची भाषा, खरोष्ठी लिपी आतां लुप्त आलेल्या आहेत. महाराष्ट्री, शौरसेनी, पाली, अर्धमागधी या भाषांमध्येच बदल झालेले आहेत, व आजच्या प्रादेशिक भाषा तयार झालेल्या आहेत. ‘संस्कृत’ म्हणजे संस्करण झालेली, किंवा सुसंस्कृत असा कांहींही अर्थ घेतला तरी, ही भाषा, आधीच्या ‘छांदस’ (तसेंच, देववाणी व अन्य नांवानीही ओळखल्या जाणार्या) भाषेवर संस्करण होऊन, बदल घडून, रूपांतर झालेली भाषा आहे ; प्राकृत अथवा बोलीभाषांपासून ‘तयार’ झालेली भाषा नव्हे. त्यामुळे, मोरे यांची ही मांडणी मान्य करतां येत नाहीं.
• म्हणजे, निष्कर्ष असा की, संस्कृतला ‘देववाणी’ असें संबोधत, हा प्रचार नव्हे, तर वस्तुस्थिती आहे.
तसेंच, ‘आधीच्या ‘प्राकृत’ भाषांपासून नंतर संस्कृत तयार झाली’, या मोरे यांच्या वाक्याचेंही (statement) वैफल्यही आपोआपच दिसून येतें.
हिंदी ही संस्कृतनिष्ठ कशी बनली ? -
भारतात फारसी भाषाभाषी परक्यांची बराच काळ राज्यें होती. मुघलांचें तर प्रचंड साम्राज्य होतें. त्यांचीही राजभाषा फारसीच होती. आपण पाहिलें आहे की, या कारणामुळे मराठीसारख्या भाषेनेंही बरेच फारसी शब्द आपलेसे केले आहेत. हिंदीचें तर आणखी पुढचें पाऊल आहे. उर्दूचा उगम कोठे झाला या प्रश्नाचा ऊहापोह करण्याची ही जागा नव्हे. मात्र एक गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की उर्दूमध्ये मुख्य व्याकरण हिंदीचें आहे, व शब्दांचा भरणा फारसीचा आहे. हिंदी व उर्दू या दोन्ही जरी अस्तित्वात होत्या , तरी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत दैनंदिन वापरात ‘हिंदुस्तानी’ भाषा होती, जी या दोन्ही भाषांचें मिश्रण आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कांहीं दशकांमध्ये बंगालमध्ये भाषाशुद्धीची चळवळ सुरूं झाली ; तिच्यापासून स्फूर्ती घेऊन, १९ व्या शतकाच्या मध्यावर हिदी शुद्धीकरणाची चळवळ सुरूं झाली. बनारस-अलाहाबाद भागात संस्कृताधारित हिंदी बोलली जात होतीच. म्हणून मग, हिंदीचें उर्दू व हिंदुस्तानीपासूनचें भिन्नत्व प्रस्थापित करण्यासाठी संस्कृताधारित-हिंदी ‘प्रमाण भाषा’ म्हणून स्वीकारली गेली. (मराठीच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न एकतर शिवकाळातला ; व नंतर २० व्या शतकाच्या प्रारंभीचा, मुख्यत्वें स्वातंत्र्यवीर सावरकर , व कवि माधव ज्यूलियन यांचा. परंतु, तो एक वेगळाच विषय आहे).
संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान आहे की नाहीं, व असल्यास काय, याची चर्चा पुढे येईलच. ती आपण हेतुत: नंतर करणार आहोत.
( पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti