नागपूर अधिवेशन आले, की ठराविक प्रश्नावर शेतकर्यांचे मोर्चे, विधिमंडळातील ठराविक गोंधळ, सरकारची तीच तात्पुरती मलमपट्टी आणि पुन्हा जैसे थे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून हेच चित्र दिसत आहे. त्यात कुठलाही बदल नाही कारण सरकार आणि विरोधातील राजकीय मंडळींना शेतकर्यांचे प्रश्न मुळातून सोडवायचेच नाहीत.
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!
मंडळी नमस्कार ....
आम्ही सांगितल्या प्रमाणे एक नविन ऊपक्रम सुरु करत आहोत... या ऊपक्रमात प्रत्येक परिवाराचा व परिवारातील प्रत्येकजणांचा सहभाग व्हावा हीच आमची मनापासुन नम्रपणे विनंती....
या ऊपक्रमाचे नाव आहे....
" एक बाटलीभर पाणी.... एका झाडासाठी...."
" One Bottle Water..... For one Tree ......"
मंडळींनौ... या ऊपक्रमात तुम्हाला तुमच्या घराच्या आजुबाजुला .... कार्यालयाच्या आजुबाजुला... व जाता... येता.... असलेल्या कोणत्याही लहान मोठ्या झाडांना किमान 2.5 लिटर च्या बाटलीने पाणी घालायचे आहे... थोड अजबच वाटेल... पण पहाना... आपल्या अवती भवती असलेल्या झाडांना जर भरपुर पाणी या ऊन्हाळ्यात मिळालच तर ही नामशेष होत चाललेली वृक्ष संपदा टीकुन राहीलच आणि आपल्या मार्फत होणाऱ्या प्रदुषणाच्या मोबदल्यात प्रत्येक झाड किमान बाटलीभर मिळालेल्या पाण्याने नक्कीच आपले प्रदुषण सोसुन भरभरून आपल्याला अगदी मोठ्या प्रमाणावर "स्वच्छ प्राणवायु" नक्कीच देईल... आपल्या सहकार्याने जर प्रत्येक वृक्षाला दररोज पाणी मिळाले तर येणाऱ्या पावसाळ्यात नक्कीच भरपुर पाऊस पडुन आपल्याच शेतकरी बांधवांना याचा मोबदला मिळेलच...
आपण आता हा ऊपक्रम हळुहळु वाढवण्यास प्रारंभ करुच.... व तुम्ही ईतरांनाही या ऊपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे... हीच मनापासुन नम्र व कळकळीची विनंती...... बळजबरी अजिबात नाहीच... पण हक्काची हाक....
आपले वृक्षमित्र.....
-- विवेक जोशी
अवधुत कुलकर्णी
“प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.”
एक नागरिक म्हणून सरकारने पुरविलेल्या सगळ्या सुविधांचा उपभोग तुम्ही घेत असाल तर या देशाने स्वीकारलेल्या न्यायव्यवस्थेचा, शासनव्यवस्थेचा आदर करणे तुमची जबाबदारी ठरते. एक आदर्श नागरिक म्हणून आपण आपल्या हक्कांबाबत जितके जागृत असायला हवे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा थोडे अधिक जागृत आपल्या कर्तव्यांबाबतही असणे गरजेचे आहे. आपले हित साधताना इतरांच्या हिताला बाधा पोहचत तर नाही ना, आपल्यासाठी ज्यांचा काहीही दोष नाही असे इतर अनेक लोक विनाकारण फरफटले तर जात नाहीत ना, याची खातरजमा आपणच करायला हवी.
या देशाचा प्रत्येक माणुस, प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. सैनिक जसा देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन उभा असतो, तसे नागरिकांनी देखील डोळ्यात तेल घालुन जागे असले पाहिजे. तेव्हा कुठे बंदोबस्तातले हे स्वातंत्र्य मोकळा श्वास घेऊ शकेल… नाही का…
लहानपणी अध्यात्म वगैरे इतकं काही माहित नव्हतं. पण एक मात्र खरं आहे की, संध्याकाळी देवापुढे दिवे लागणं झाली की, शुभंकरोतीचे स्वर घरात निनादु लागायचे. आजीच्या मागोमाग एकएक श्र्लोक म्हणत म्हणत केव्हा दासबोधातील चरणं संपली हे कळायचंही नाही.
समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.
आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?
Copyright © 2025 | Marathisrushti