(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्त्रियांवरील वाढते अत्याचार – एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव !

    भारतीय समाजातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक बाब आहे. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण, आर्थिक स्वायत्तता, आणि सामाजिक जागरूकता या सर्वांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.

  • धोतरपुराण…

    काही वर्षापूर्वी दुबईच्या मेट्रोत एका भारतीयाला प्रवासासाठी एका धक्कादायक कारणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्याने धोतर घातले होते. हा माणूस पहिल्यांदा दुबईत धोतराने फिरत नव्हता. यापूर्वीही त्याने दुबईत धोतर नेसून प्रवास केला होता.

    स्वातंत्र्य आंदोलनात भारतीय रेल्वेच्या एका डब्यातून आखूड धोतर घातलेले “बापू” एका स्थानकावर उतरत असल्याचे आपल्या परिचयाचे आहे. हे चित्र डोळ्यांसमोर उभे करा आणि दुबईच्या चकचकीत मेट्रोतून प्रवास करायला मनाई केलेला हा धोतरवाला भारतीयसुद्धा डोळ्यासमोर आणा.

    धोतर हा काही फक्त मराठमोळा वस्त्रप्रकार नाही. संपूर्ण भारतभर धोतर हा पोशाखाचा एक भाग आहे. चिनी प्रवासी युआन च्वांग याने इसवी सन सातव्या शतकातील भारतीय पोशाख पांढरे शुभ्र धोतर हाच होता असे लिहून ठेवले आहे.

    खादीची गांधी टोपी, नेहरू शर्ट त्यावर जाकीट आणि पैजमा किंवा धोतर हा पोशाख स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकप्रिय होता. आजही अनेक नेत्यांच्या अंगावर हा पोशाख दिसतो. राजकारणच काय... आता तर “मोदी जॅकेट”च्या नावाखाली अनेकांनी या पोशाखाला जवळ केलंय.

    स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे तर कायम धोतरातच वावरायचे. महाराष्ट्रातील कित्येक नामवंत धोतर परिधान करत असत. पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण हे तर कायम धोतर घालत.

    भारतीय उपखंडाबाहेरही आग्नेय आशियातील थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या देशांतही धोतर प्रचलित आहे. एकटागी किंवा दुटांगी धोतर घालून तेथील नागरिक फिरतात.

    चित्रपटसृष्टीतही धोतर लोकप्रिय आहे. मनोजकुमारचा 'उपकार' हा चित्रपट आणि त्याचा पेहेराव आठवा. तेव्हापासून पासून अनेक चित्रपटांतून ते पडद्यावर दिसत आले आहे.

    धोतराचाच एक वेगळा अवतार म्हणून लुंगीचा उल्लेख करता येईल. गुढग्याच्या वर नेसलेली लुंगी ही दाक्षिणात्यांची खासियत. काहीजण तर ती आणखी वर नेसतात. चित्रपटांमधूनही लुंगीदर्शन अनेकदा झाले आहे. चेन्नई एक्सप्रेसमधला 'लुंगीडान्स' जगभर प्रसिद्ध झालाय.

    आधुनिकतेची कास धरत जग बदलले. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण केली गेली. मात्र जगाच्या नकाशावर ठिपक्याएवढे दिसणारे काही देश अजूनही पुरातनकाळात जगत आहेत.

    एक काळ असा होता की जगात जिकडेतिकडे भारतीयांना ठेचण्याची संधी सोडली जात नसे. मात्र एक खंबीर पंतप्रधान जगाला आपल्यासमोर वाकवू शकतो हे आता नरेंद्र मोदींच्या जगभरातल्या लोकप्रियतेमुळे सिद्ध होतंय. सोशल मिडियात व्हायरल झालेला एक फोटो इथे आठवतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबरोबर मनमोहन सिंगांचा फोटो आणि नरेंद्र मोदींचा फोटो हे बरंच काही सांगून जातात.

    -- निनाद अरविंद प्रधान

  • क्रौर्य विरुद्ध माणुसकी

    एकीकडे कमालीचे क्रौर्य, अतिशय दुष्टपणा! तर दुसरीकडे मानवतेचा, माणुसकीचा अथांग सागर ! दोन अगदी विरुध्ध टोकांच्या मनोवृत्ती ! आणि त्याचे होणारे नकारात्मक व सकारात्मक परिणाम ! केवळ एक महिन्याच्या अंतराने या दोन्हीचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली पुण्यातील एका महिलेला, एका गृहिणीला. त्या गृहिणीचे नांव आहे सौ.वर्षा जयकुमार परांजपे.

    सप्टेंबर महिन्यात वर्षा ताईना युरुपमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यांची ही युरोप ट्रीप जरा हटके होती . या ट्रीपमध्ये नेहमीची स्थळे न पाहता काही वेगळी स्थळे पाहायला मिळाली . या मध्ये त्यांच्या लक्षात राहिले ते 'क्राकौव ' हे शहर !

    दुसरया महायुध्धामध्ये जर्मनीच्या हिटलरने ज्यू लोकांसाठी ज्या छळ छावण्या किंवा कॉन्संत्रेषण कॅम्पस उभे केले होते त्यातील सर्वात मोठा कॅम्प या शहरात होता . येथे हजोरो ज्यू वंशीय लोकांना धाक दाखवून, कपट मार्गाने, प्रलोभने दाखवून आणले गेले. तिथे त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला . मानवतेला काळिमा फासणारे निर्घृण अत्याचार करण्यात आले . अनेक महिलांच्या , मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले. आणि हे कमी पडले कि काय म्हणून हजारो ज्यूंची ग्यास चेम्बरमध्ये घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या मृत व्यक्तींच्या अनेक वस्तू -जसे ब्यागा, बूट , चप्पल ,कपडे, कागदपत्रे , फोटो, स्त्रियांचे कापलेले केस, अवयव - या वस्तू पुरावे म्हणून जपून ठेवलेले आहेत. हे सगळे बघून, माणूस क्रूरपणा मध्ये , दुष्टपणा मध्ये, निर्दय पणामध्ये किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे बघून वर्षाताई पार हादरून गेल्या. त्यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला. माणूस हा एक क्रूर आणि दुष्ट प्राणी आहे. आणि अशा या दुष्ट प्राणाच्या कुळात आपला जन्म झाला याची त्यांना लाज वाटली आणि त्यांची मान शरमेने खाली गेली.

    त्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांना आनंदवनला भेट देण्याची संधी मिळाली.तेथे त्यांना दिसला तो माणुसकीचा, प्रेमाचा, मानवतेचा अथांग सागर. समाजाने हाकून दिलेल्या, वाळीत टाकलेल्या कुष्ठ रोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे व त्यांच्या परिवाराने जे कष्ट घेतले आहेत व तेथे नंदनवन निर्माण केले आहे ते बघून त्या स्मिमित झाल्या. तिथे त्यांना दिसला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, दया, त्याग आणि आत्मसम्मान ! एक साधी माणुसकी काय चमत्कार करू शकते हे त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळाले. हे बघून मनुष्य हा नुसताच दुष्ट प्राणी नसून तो प्रेमळ व सहृदयी प्राणी पण आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यांचा माणसावरील उडालेला विश्वास परत बसला. आणि अशा या प्रेमळ प्राण्याच्या वंशात आपला जन्म झाला या बद्दल त्यांना अभिमान वाटला. हा एका परीने माणुसकीने कृरपनावर मिळवलेला विजयच आहे असे त्यांचे मत आहे.

    क्रूरपणा आणि माणुसकी यांच्या लढाईत नेहमी मानुसकीचाच विजय होत आला आहे. जर्मनीचा हिटलर सर्व सत्ताधीश होता. त्याच्याकडे सत्ता होती,संपत्ती होती, सैन्य होते. पण आज तो विस्मृतीच्या मागे गेला आहे. आज त्याची आठवण पण होत नाही. आणि झालीच तर त्याच्या दुष्टपणामुळे होते. त्या उलट बाबा आमटे एका सामान्य घरातून आलेले. ना त्याच्याकडे कोठल्या सत्तेचे बळ किंवा संपत्तीचे पाठबळ! ते कुठ्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते कि मंत्री, खासदार, आमदार नव्हते. कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा सहकारी ब्यांकेचे अध्यक्ष नव्हते. उच्च सरकारी अधिकारी नव्हते कि कुठल्या खाजगी उद्योग समूहाचे MD किंवा CEO नव्हते. पण ते दीर्घकाळ लक्षात राहतील ते त्यांच्या कार्यामुळे. वर्षा ताई यांच्या लक्षात नेमकी हीच गोष्ट आली आहे. आपले सर्व साधू संत, सर्व धर्म ग्रंथ, रामायण महाभारतासारख्या कथा, भगवत गीता, बायबल, कुराण पण हेच सांगत आले आहेत.

    माणसांवर दोन मार्गांनी विजय मिळविता येतो! क्रूरपणा करून, दुष्टपणा करून, निर्दयपणे, लांड्या -लबाड्या करून, सत्तेचा दुरुपयोग करून माणसांवर विजय मिळविता येतो. पण हा विजय फार काळ टिकत नसतो. तो अल्पजीवी असतो. या पद्धतीने विजय मिळविणारी माणसे फार काळ लोकांच्या लक्षात राहत नाहीत. अशी माणसे लवकरच विस्मृतीच्या पडद्याआड जातात.लोकांना त्यांची आठवण सुध्धा येत नाही!

    माणुसकीने, मानवतेने, प्रेमाने, आपुलकीने, त्यागाने, इतरांचा सन्मान करून पण माणसे जोडता येतात. या पद्धतीने मिळविलेला विजय हा दीर्घकाळ टिकणारा असतो. लोकांना अशा माणसांची नेहमी आठवण येत असते.

    आपण कसे वागायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवायचे असते. निर्दयपणा करून व दुष्टपणा करून अल्प कालीन टिकणारा विजय मिळवायचा? कि माणुसकीने व प्रेमाने वागून दीर्घकाळ टिकणारा विजय मिळवायचा? आपल्या मृत्युनंतर लोकांनी आपल्याला काही तासातच विसरून जावे? का निदान काही दिवस तरी आपले नाव लोकांनी लक्ष्यात ठेवावे ? तुम्हाला काय हवे हे तुम्हीच ठरवायचे! बिकौस द चोइस इस युअर्स!

    उल्हास हरी जोशी
    May 17, 2011

  • संगीताचा वारसा

    वारसा ही जतन करण्याचीच गोष्ट नव्हे तर संवर्धन करणंही त्यात अपेक्षित आहे. संवर्धनासाठी जतन आवश्यक. वारसा मग तो कोणताही असो सांस्कृतिक, नैसर्गिक त्याची वर्षावर्षाला घसरण होत चाललीय. शास्त्रीय संगीत नामशेष होत चाललं असून “स्त्री” या विषयाभोवती संगीत पिगा घालीत आहे. सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचे भावनिक प्रसंगाच सोनं करणारं संगीत आजही काहींच्या मनावर राज्य करुन आहे म्हणून “जतन” संवर्धनाच्या थोड्या आशा आहेत.

  • विवाहित पुरूषांच्या वाढत्या आत्महत्या…

    मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता. आता प्रश्न हा होता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येच प्रमाण का वाढत असाव ? त्याच मुळ कारण आहे आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती. आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा आपल्या देशातील स्त्रियांना ह्जारो वर्षापूर्वीपासून कसा त्रास होत आलाय यावर चर्चा न झालेलीच बरी... पण आज आपल्या देशातील पुरूषच पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी ठरत आहेत. पण पुरूषांच्या या आत्मह्त्येना कोणी फारसा सहानुभूतीपूर्वक पाह्ताना दिसत नाही. माध्यमेही त्यात मागे नाहीत. आजही आपल्या देशात स्त्री-पुरूष समानतेच वार कितीही जोरात वाह्त असल तरी आपल्या देशात आजही पुरूषप्रधान संस्कृतीच घट्ट पाय रोवून उभी आहे. काही बाबतीत आपल्या देशातील स्त्रियांनी पुरूप्रधान संस्कृतीचा स्वतःच स्विकार केल्याचेही स्पष्टपणे जाणवते.

    आपल्या देशात बलात्कार विनयभंगासारखे प्रकार फक्त पुरूषांकडूनच स्त्रियांच्या बाबतीत घडतात हा विचारही घट्ट रोवला गेलाय. एखाद्या स्त्रिचा पुरूषाला धक्का लागला तर तो ते फारस मनावर घेत नाही. पण तोच धक्का परूषाचा चुकून जरी स्त्रिला लागला तर पुरूष नालायकच ठरतो. देशातील लोकसंख्या दिवसेन दिवस वाढतेय त्याच बरोबर बेकारी आणि महागाईही दिवसेन दिवस वाढतेय ! अशात संपूर्ण कुटूंबाची आर्थिक जबाबदारी उचलण काही पुरूषांना नाही शक्य होत. म्ह्णून ते पुरूष कुचकामी नसतात पण त्यांच्या मनावर सतत होणारा आघात आणि वाढत जाणारा मानसिक दबाव त्यांना आत्मह्त्येस प्रवृत्त करत असावा. तर काही विवाहीत परूषांच्या बाबतीत त्याच्या पत्नीकडून केल्या जाणार्या अवास्तव मागण्या ज्या दागदागिने, घर – मोटर, कपडालत्ता याच्याशी संबंधीत असतात त्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ असणारे पुरूष रोजच्या टोमण्यांचा मारा सह्न न झाल्यामुळेही आत्महत्ते सारख्या मार्गाला जवळ करत असावेत. आज आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरूषच बळी ठरत आहे. आपल्या देशातील विवाहीत पुरूषांच्याच आत्मह्त्येच प्रमाण दिवसेन- दिवस वाढत जाण्याची शक्यताच अधिक दिसतेय. समाजात अनैतिक संबंधाच प्रमाणही भरमसाठ वाढतय. आपल्या पत्नीचे कोणा परक्या पुरूषासोबत अनैतिक सबंध आहेत हे कळल्यावर आपल्या पुरूषत्वाबद्दल लाज वाटल्यानेही काही पुरूष आत्महत्येचा मार्ग स्विकारत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येची ही सखोल चौकशी व्हायला ह्वी...तरच त्या रोखण्यासाठीचा उपाय सापडण्याचा मार्ग सुखकर होईल.

    -- निलेश बामणे

  • करंटेपणाची कमाल!

    प्रकाशन दिनांक :- 09/01/2005

    सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुनामी लाटांनी दक्षिण आशियाई देशांना हादरविले. प्रचंड प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली. सगळ्याच प्रसारमाध्यमात केवळ सुनामीच्या विध्वंसाचीच चर्चा होती.

  • सौ बका, एक लिखा!

    जेजे लोकं इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना भविष्य माफ करत नाही, असे म्हणतात. या म्हणण्यात तथ्य निश्चितच आहे. शेवटी इतिहास म्हणजे तरी काय?

  • बेभान होऊन काम करा!

    जुन्या काळची गोष्ट आहे. एक हौशी पर्यटक होता. गावोगावी फिरणे, दर्शनीय वास्तू पाहणे, हा त्याचा आवडता छंद होता.

  • दाभोळकर.. तेव्हा तुम्ही गप्प का?….

    देवाला फूल चढ़वल जात
    तेव्हा तुम्ही रागवता!
    मग मेणबत्ती पेटवतेवेळी,
    चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का?

    दाभोळकर......
    माझा गणपती घरी येतो
    तेव्हा तुम्ही टिका करता!
    त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा,
    त्याचा मसीहा येतो त्यावेळी
    तुम्ही गप्प का?

    दाभोळकर...
    माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!
    त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी
    त्यांची सुंता होते त्यावेळी
    तुम्ही गप्प का?

    दाभोळकर.......
    आमचे व्रत उपवास सण
    तुम्हाला नकोसे होतात!
    पण त्यांचा रोजाच्या वेळी,
    यांचा गुडफ्रायडे वेळी
    तुम्ही गप्प का?

    दाभोळकर.......
    माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही
    त्यांच मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक
    ख्रिस्ती शाळेत येशु मूर्ती रूपान हज़र, त्यावेळी
    तुम्ही गप्प का?

    दाभोळकर......
    स्री शिक्षणातली हिंदू सावित्री कधी तुम्ही समजूनच घेतली नाही...
    कारण मुस्लिम बुरख्यातुन तुम्हाला पाश्चमात्य नग्नता चांगली वाटली.....

    आमचा एकपत्नी राम व त्याच कुटुंबनियोजन तुम्ही जगासमोर मांडलच नाही...
    कारण एकाच पुरुषाच्या चार बायका व त्याची विस पोर तसेच दर सिजनला बायका बदलनारे पाश्चिमात्य तुमच्या मनाला जास्त भावले........

    विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?.............

    माझी अंधश्रद्धा जगासमोर मांडली जरा चांगल्या गोष्टीपण मांडा!
    म्हणजे देव न मानणारयां मधल देवपण मला कळेल

    Whats Apps वरुन साभार....

    -- विवेक जोशी

  • दलाल नावाचे बोन्साय………

    “बोन्साय” हा शब्द अशासाठी वापरलाय की, दलालांची ही लॉबी छुप्या पद्धतीने कामं करते. जरी या दलालांची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्यातील कामचं नियोजन इतक्या सूक्ष्म स्वरुपात चालतं, की पुढे यांच्या बोन्साय नावाच्या झाडाला खतपाणी घालत गुलामगिरी पत्करण्याची वेळ आपल्यावर येते आणि अशा व्यवस्थेच्या कंगोर्‍यात एकदा आपण सापडलो की, सतत काही ना काही देण्याची जी सवय आपल्याला लागते त्यातुन लवकर सुटणं किंबहुना बाहेर पडणं आपल्या सारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही.