(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • तेरवी गोडजेवण बंद करा

    काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्धिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुत्त* असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुत्त* असते, आज त्या गोष्टीची उपयुत्त*ता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात.

    पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्धिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
    जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्ध समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही.

    आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकाळात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैर प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्यत्त*ीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्यत्त*ीच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली.

    मृत शरीर जाळताना शेणाच्या गोवऱ्या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे. अनेक प्रकारच्या घातक विषाणूंचा फैलाव रोखण्याचे सामर्थ्य गाईच्या शेणात व मुत्रात तसेच कडुलिंबाच्या पाल्यात आहे. त्याचमुळे स्मशानातून आल्यानंतर कडुलिंबाची पाने खाण्याचा किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्याची पद्धत होती. तसेच घरात गोमुत्र शिंपडले जायचे. मृतकाच्या नातेवाईकांनी मुंडन करण्यामागेही जंतूप्रसाराला अटकाव करणे हाच उद्देश असायचा. हे सगळे प्रकार किंवा या सगळ्या रूढी त्याकाळी योग्यच होत्या. परंतु आज तेवढ्याच कर्मठपणे या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज नाही. कारण दुर्धर आजारी माणसे आजकाल रुग्णालयातच जीव सोडतात व अनेकदा रुग्णालयातुनच त्यांना स्मशानात नेले जाते. त्यामुळे जंतु घरात शिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे हे नसेल व रोगाचा प्रादुर्भाव असेल तेथे हे पाळणे समजण्यासारखे आहे. दळणवळणाची, संवादाची अतिशय वेगवान साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे मृत्यु झाल्याबरोबर काही मिनिटात ती बातमी सर्वांना समजते. तसेच विमानाने सातासमुद्रापारचे नातेवाईक अगदी 24 तासात येऊ शकतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. शिवाय तेरा दिवस शोक करण्याइतका वेळही आज नाही. इतर समाजांनी हे सत्य स्वीकारून आपली मृत्युपरांत कर्मकांडे दोन-तीन दिवसात आटोपण्याचा मार्ग स्वीकारला. मराठी समाज तो केव्हा स्वीकारणार? बरेचदा केवळ लोक काय म्हणतील या विचारानेही 'शोक' लांबविला जातो. खरेतर आजच्या या आधुनिक युगात लोक काय म्हणतील याचा विचार करण्याइतकीही सवड लोकांकडे नाही किंवा घरातील वृद्ध व्यत्त*ीनेच त्या संदर्भात सविस्तर लिहून ठेवले तर प्रश्न आपोआपच सुटतो. कालबाह्य रूढींचा सगळ्यांनीच त्याग करायला हवा. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेत काही विचार निश्चित असतो. तो विचार समजून घेणे आणि आजच्या युगात तो कितपत समर्थनीय आहे हे पाहून त्या रूढी आणि परंपरा सुरू ठेवायच्या, त्यचे स्वरूप बदलायचे की त्या बंदच करायच्या हे आपण ठरवायला हवे. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते आणि त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल स्वीकारावेच लागतात. विचार हे नहमीच प्रवाही असतात, उगाच त्यांचे डबके बनविण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमिवर आपल्या कृतीतून नव्या विचारांना जन्म दणार किंवा जुन्या विचारांना नवे वळण देणारे लोक समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतात.

    असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. समाजप्रबोधनाचे कार्य ते आपल्या परिने करीतच असतात. फत्त* काही लोक प्रकाशात येतात तर काही कायम पडद्याआड असतात; परंतु त्याने काही फरक पडत नाही. दिवा खोलीत कुठे आहे यावरून त्याची अंधार दूर करण्याची क्षमता मोजली जात नाही. आमच्या आजोबांचा सत्यशोधक समाजाचा वारसा चालविणाऱ्या आमच्या वडिलांनी तर स्पष्टच सांगून ठेवले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर तेरवी, गोडजेवण वगैरे प्रकार अजिबात करायचे नाही. त्यासाठी एरवी जो काही खर्च आला असता तो एखाद्या सामाजिक संस्थेला दान करा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही गरज नाही. मी तसे मृत्युपत्रच करून ठेवतो. बाबांसारखी अशी साधी माणसंही बरेचदा आपल्या कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातात. खरेतर अशाच लोकांची आज समाजाला नितांत गरज आहे. बरेचदा कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या पायातील बेड्या ठरत असतात. त्या बेड्या तोडण्याची हिंमत कुणीतरी आधी दाखवायला पाहिजे, मग त्याचे अनुकरण करायला इतर अनेक लोक पुढे येतील. गेल्या शे-दोनशे वर्षांत संपूर्ण जग झपाट्याने बदलले आहे. युरोपीय देशांनी हा बदल चटकन आत्मसात केला आणि ते विकासाच्या दौडीत खूप पुढे गेले. एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश अजूनही कालबाह्य रूढी, परंपरांच्या जाळ्यातून म्हणावा तेवढा मोकळा झाला नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विकासावर झाला. याचा अर्थ सगळ्याच रूढी किंवा परंपरा कालबाह्य झाल्या आहेत असा होत नसला तरी बदलत्या परिस्थितीत त्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे ठरले आहे.

    -- प्रकाश पोहरे

  • जीवनानंद

    जीवनानंतर हा मनावर अवलंबून असतो हे सगळ्यांना कळतं पण वळत नाही.रतीब घातल्यासारखं माणसं उठल्यापासून दुसऱ्यांना कसा धडा शिकवायचा याच्या नियोजनात व्यस्त असतात मग आनंद मिळणार कुठून? अतिरेकी विचार आनंदाला ठार करतात.

  • रामनाम जपावरची शाळा

    आता मुलगी सासरी गेली की चैन पडत नाही. पूर्वी पत्र यायची. प्रिय सौ आईस. आणि शेवटी तुझीच.. आणि आईच्या हृदयात कालवाकालव होते. आता तर फोन वर हॅलो आई असा आवाज ऐकला की डोळ्यासमोर लेक उभी राहते आणि डोळ्यातून पाणी येतं..

  • आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट…!!!

    विश्वास नांगरे पाटील म्हणतात,

    परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , "मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ." चहा कडवट लागला .

    नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे . काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार.
    सैराट करमणूक म्हणून पहा पण आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .
    योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .

    केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत 1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले.

    आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!

  • शिवाजी शेजारच्या घरात

    नुकतेच घरी मंगलकार्य झाले. मुलाच्या लग्नाला आणि स्वागत समारंभाला लोकांची खूप गर्दी झाली होती. आनंद झाला, समाधान वाटले.

  • धक्काविद्यार्थ्यांना आणि पालकांना!

    इमारत मजबूत व्हायची असेल तर पाया मजबुत हवा, त्याच्या विटा कणखर पाहिजेत, त्या खरपूस भाजल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. आतापर्यंत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या विटा खरपूस भाजण्याचे काम करायच्या, आता सगळ्या विटा चांगल्या भाजल्या जात असतीलच असे म्हणता येणार नाही. बऱ्याच विटा कच्च्या राहतील, परिणामी त्यांच्या आधारे उभ्या झालेल्या इमारती केव्हाही ढासळू शकतील.

  • मार्कांचा महापूर…!

    दहावीच्या परीक्षेत 83000+ विद्यार्थ्यांना मिळालेल्या 90% पेक्षा अधिक मार्कांची कारणमीमांसा आणि त्याचे असंभाव्य परिणाम…!

  • बोध कथा – उंदीर आणि बिल्ली मौसी

    स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर येऊन कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे.

    असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली.
    नंदन वन के सब जानवर
    शेर-बकरी, चूहा बिल्ली
    एक घाटपर पिए पानी.
    चूहों का म्होरक्या मुर्दाबाद
    बिल्ली मौसी जिंदाबाद.
    माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही. मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील. म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा. उन्दिरांनो बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.
    आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले. पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला. त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली. आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि अतिशहाणे उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित राहो. त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली मौसीच्या जवळ येऊन आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, मूर्ख उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

    स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले. मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

    -- विवेक पटाईत

  • पुस्तक वाचून भटकंती

    आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
    “मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे ”
    पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा.
    पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.

  • वाचवा रें वाचवा ….!!!!! या आण्णा पासुन…… भारत सरकारचा टाहो.

    राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.