एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्या पानाच्या टपरीसमोर बर्यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण सिगारेट ओढून झाल्यावर आपल्या उंच टाचेच्या सॅन्डल खाली सिगारेट विजविण्याची कला पाहिल्यावर तर मी स्वतः ही आवाक होतो. एक तरूणी सिगारेट ओढतेय आणि एखादा तरूण लायटरने तिचे सिगारेट पेटवतोय हे चित्रपटात शोभणार दृष्यही हल्ली उगडया डोळ्यांनी पाहताना डोळे अक्षरशः तृप्त होतात खेदाने. आपल्या देशात कॅन्सर रुग्णांच प्रमाण वाढत असतानाही सिगारेट ओढणार्या अधुनिक तरुणी पाहिल्या की मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. चारचौघात आपल्या वडिलधार्यांसमोर सिगारेट ओढताना काही पुरुषांनाही संकोच वाटतो तिथे आजच्या तरुणी चार सिगारेट न ओढणार्या परुषांच्या मधे उभ राहून ऐटीत सिगारेट ओढताना हल्ली सर्रास दिसतात. भर रस्त्यात आरामात सिगारेट ओढणार्या हया तरूणी काही कोणी अशिक्षित तरूणी नसतात त्या असंस्कृत असतील असे ही खात्रीने सांगता येणार नाही. पण बहुदा हया तरुणी नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबापासून दूर राहणार्या असतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी त्या सिगारेट ओढत असाव्यात हे पटण्याजोगे नाही. फक्त एकच प्रश्न पडतो आपल्या देशाचं भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे त्या पिढीला घडविणारी जन्माला घालणारी स्त्रियांची पिढी या पिढीच्या हातात खरंच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे का ?
सिगारेट ओढण्याचे दुषपरिणाम माहित झाल्यावर आपली आई सिगारेट ओढणारी असावी असे कोणत्याही बाळाला वाटणार नाही. तो तर गर्भात असतानाच म्ह्णेल कदाचित अशी आई नको गं बाई ! आमच्या लहानपणी आमच्यावर झोपडपट्टीत राहात असतानाही सिगारेट ओढणे ही वाईट गोष्ट आहे हे आमच्या अशिक्षित आईने आंम्हाला समजावले होते. तिच्या हातात जोपर्यंत होते तिने आमच्यावर कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्याचेच संस्कार केले होते. पण आजची आईच जर व्यसनाधीन असेल तर ती आपल्या मुलांवर काय खाक संस्कार करणार ? पूर्वीच्या स्त्रियांची पुरूषांच्या बरोबरीने कोणतीच व्यसन करण्याची हिंमतच नव्हती. आज स्त्री - पुरुष समानतेमुळे स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने व्यसनही करू लागल्या आहेत. पुरूषांच्या व्यसनाधीनतेचा परिणाम फक्त कुटुंबावर होतो पण स्त्रियांच्या व्यसनाधिनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होतो. अधुनिकता फक्त स्त्रियांच्या अधिकारा पुरती मर्यादित होती तोपर्यंत सारे ठिक होते पण आता स्त्रियांना इतर व्यसनांबरोबर सर्वच बाबतीत पुरुषांची बरोबरी करण्याच एक नवीन व्यसन जडू लागलं आहे जे फारच भयंकर आहे याचे फार भयंकर परिणाम आपल्या देशाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. आजच्या तरूणी उच्चशिक्षित आहेत, पुरुषांच्या तोडीच्या आहेत, सारं जग त्यांनी पादाक्रांतही केलेले आहे, पण आता त्या एक चांगली आई होण्याची क्षमता कदाचित गमावून बसल्यात की काय अशी शंका मनात निर्माण होऊ लागली आहे... स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करण्यात काहीच वावगे नाही पण व्यसनांच्या बाबतीत स्त्रायांनी पुरूषांची बरोबरी करण्याचा मोह टाळायला हवा. फक्त सिगारेट ओढल्यामुळे स्त्रिया असंस्कृत असभ्य अथवा व्यभिचारी ठरत नाही पण जी गोष्ट चुकीच आहे ती गोष्ट स्त्रियां करता आहेत म्ह्णून त्याचे समर्थन नाही ना करता येणार. आजच्या अधुनिक स्त्रियांनीही शक्यतो सिगारेटच्याच नव्हे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून शक्यतो दूरच राहायला हवे. पुरुष कितीही अधुनिक असला तरी त्याला व्यसनी मैत्रिण अथवा प्रेयसी आवडतही असेल पण व्यसनी पत्नी मात्र शक्यतो त्याला नकोच असते हे सत्य बदलणार नाही. व्यसनाने मानसिक ताण कमी होण्याऐवजी हल्ली तो अधिक वाढून काही लोक आत्महत्या करण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत पोहचताना दिसत आहेत. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करता आपल्या देशाला व्यसनी आईची नाही तर निर्व्यसनी आईची जास्त गरज आहे ती गरज आजच्या प्रत्येक तरुणीने ओळखून व्यसनाधिन तरूणींनी आत्मपरिक्षण करायला हवे नाही का ?
लेखक – निलेश बामणे
202, ओमकार, जलधारा एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित, गणेश मंदिरा समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई - 400 065. मो. 8652065375

माहेरी जाऊन राहावसं वाटतंय? तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय? आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर?…स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं महेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के ह्यांनी. बदलापूरमध्ये. ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.
सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला…….
साहित्य, राजकारण, समाजकारण अशा परस्पर भिन्न क्षेत्रामधली समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मतभेद. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात चार वेगवेगळी माणसे एकत्र येऊन काम करतात तिथे मतभिन्नता, मतभेद आलेच. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही गोष्ट अनुभवायला मिळते. आणि त्यात काही गैरही नाही. मतभेद असने हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण मानले जाते. पण गेल्या काही दशकात जे चित्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही समाजकारणात, राजकारणात पहायला मिळते आहे ते चिंताजनक आहे.
पूर्वी एखाद्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीवर, घटनेवर समाजाच्या विविध थरातले मान्यवर मतप्रदर्शन करीत तेव्हा आपली.. भूमिका स्पष्टपणे व ठामपणाने मांडीत. परंतु सध्या हा ठामपणा, स्पष्टपणा अभावानचे आढळतो. परस्परामध्ये गुंतलेल्या हितसंबंधांमुळे सार्वजनिक जीवनात एक प्रकारचा बोटचेपेपणा बोकाळलेला दिसतो. आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी किंवा नविन हितसंबंध जोपासण्यासाठी सावध, वरवरच्या आणि भूमिकाहीन प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. मनातले मतभेद उघडपणे व्यक्त करण्याची जोखीम कोणी पत्करत नाही.
या हिशोबी, गुळमुळीत भूमिकेच्या अगदी विरूद्ध टोकाची भूमिका घेणारा वर्गही समाजात निर्माण झालेला आढळतो. एखाद्याच्या वक्तव्याबद्दलचे, कृत्याबद्दलचे मतभेद तीव्रपणे जाहिररित्या व्यक्त करण्याची नवीन शैली या मंडळीनी विकसीत केली आहे. त्या व्यक्तीचे पुतळे जाळण्यापासून ते त्या व्यक्तीशी संबंधही नसलेल्या जनतेला रास्ता रोको करून वेठीला धरण्यापर्यंत कोणत्याही थराला ही मंडळी जाताना दिसतात. अशा तीव्र मतभेद प्रदर्शनामध्ये अनेकदा आपण मुद्द्यांना उत्तर गुद्द्यांनी ' देतोय याचेही भान संबंधितांना राहत नाही. कार्यशैली वा घेतलेल्या निर्णयाबाबतचे मतभेद व्यक्त करताना त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून, त्याच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाते.
अशा दोन्ही पद्धतीच्या अतिरेकी वृत्तींमुळे समाजाचा तोल ढासळतो आहे. कोणत्याही समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विधायक विरोध किंवा मतभेद आवश्यकच असतात. पण सध्याच्या काळात मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच कोणी मानायला तयार नाही. एखादया विषयावरील मतभेदामुळे उसळलेल्या तात्विक व सात्विक वादाचा धुरळा खाली बसल्यानंतर त्या विषयाचे अधिक नेमके व नेटके रुप लोकांना दिसते. पण आज विरोधाचा लहानसा सूर ही तात्काळ दाबला जात असल्याने, परिस्थितीचे नेमके आकलनच होत नाही. परिणामी, अनेक निर्णय बहुमताने पण आंधळेपणाने घेतले जातात. हे निरोगी समाजाचे लक्षण नव्हे.
मतभेदांमुळे मते दुरावतात आणि मने दुखावतात हे जरी खरे असले तरी हा दुरावा कायमचा नसतो हे ध्यानात घेतले पाहिजे. टिळक आणि आगरकर या महापुरूषांमधील मतभेद याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. सामाजिक सुधारणांना अग्रक्रम द्यावा का स्वातंत्र्याच्या मागणीला यावरून त्यांच्यात मतभेद होते पण वैर नव्हते हे विसरता कामा नये, आज मतभेद असणे म्हणजे वैर असणे असाही गैरसमज करून घेतला जातो. आणि वैर टाळण्यासाठी मतभेद लपविले जातात. या विचारसरणीमुळे समाजात आपोआप एक घातक पायंडा पडत चालला आहे. तो म्हणजे वाईट गोष्टींना (मूक) संमती देणे व चांगल्याला (खुला) पाठिंबा न देणे. केवळ इतरांची मने दुखवली जातील म्हणून समाजविघातक रुढी, परंपरांना विरोध केला जात नाही. आणि अशा गोष्टींचा प्रसार होत रहातो.
राजा नागडा आहे हे सांगणारा मुलगा काय किवा राघोबांना देहांत प्रायश्चित सुनावणारे रामशास्त्री काय, ही मंडळी केवळ कल्पनेच्या जगातच शिल्लक राहिली आहेत. ठाम विचारांनी सौम्यपणे, समोरच्याचा योग्य आदर राखून मतभेद व्यक्त करणारे सुजाण, सुसंस्कृत लोक आज हवे आहेत. विरोधी शेरे- ताशेऱ्यांना न घाबरता, त्यांचे सभ्यपणे खंडन करणारे लोक आज हवे आहेत, समाजातील बुद्धिजीवी वर्गात ही शक्ती सुप्त स्वरूपात आजही आहे. गरज आहे ती त्यांनी आपली जबाबदारी ओळखून, ती धैर्याने पार पाडण्याची. मतभेत असणे आणि ते मोकळेपणाने व्यक्त करता येणे हे समाजाच्या सहिष्णुपणाचे लक्षण आहे. हे लक्षण लोप पावणार नाही याची खबरदारी आपण सर्वानी घेतली पाहिजे.
--चिंतामणी कारखानीस
भारतीय शिक्षण व्यवस्थेत भूतकाळाचा विचार केला असता भारतीय विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण देण्यात येत असे.आयुर्वेद आणि अन्य वेदांगे यांचे शिक्षण उपलब्ध होते अभियांत्रिकी शिक्षण तर उत्तम प्रकारचे होते. याची साक्ष द्यायची झाल्यास ताजमहल, गोल घुमट,तसेच संपूर्ण भारतभर बांधण्यात आलेली अनेक प्रकारची देवतांची देवालये पुरेशी आहेत.तसेच वेगवेगळ्या नद्यांवर बांधण्यातआलेले घाट आणि अनेक ठिकाणी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था बारवा,तळी इत्यादी गोष्टी पाहिल्या म्हणजे तेव्हा जलव्यवस्थापन किती उच्च दर्जाचे होते , याची कल्पना येते . उत्तम प्रकारचे वाड.मय त्या काळात निर्माण होत असे.
आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.
कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.
आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.
साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.
दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.
दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.
-- दीपक गायकवाड
समाजाला आज खर्या गुरूजींची गरज आहे. संस्था चालकांना भरमसाठ पैसे देऊन या पवित्र पेशात घुसलेल्या; भावी पिढी बरबाद करणार्या आणि वरून गुरूजनाचे नकली कातडे पांघरलेल्या कोल्ह्यांना हाकलून शिक्षणाचे हे पवित्र क्षेत्र शुद्ध करायला “श्रीकृष्ण” म्हणून पुढे कुणी येईल का?
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..
मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.
मराठा समाजातील आई आज बर्याaचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणार्यां आपल्या मुलाला उपरोधाने म्ह्णते, ’मराठयाचा बाणा आणि डोईवर व्हाणा...
मराठा समाज अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचेच हे घोतक म्ह्णावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजातील एखादी व्यक्ती आहे म्ह्णून तिला काही विशेष अधिकार, मान – सन्मान वगैरे मिळता आहेत अस कोणतही चित्र महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपर्यावत दिसत नाही. आज महाराष्ट्रात जी मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जाते आहे हे मराठा समाजाच्या अधोगतीचच लक्षण म्ह्णावे लागेल. कोणत्याही प्रगत देशाच लक्षण काय असावं ? की त्या देशातील आरक्षण क्रमाक्रमाणे कमी होत जावं पण आपल्या देशात तर आरक्षण मागणार्याम समाज गटांच प्रमाण दिवसेन – दिवस वाढत आहे. महाराष्ट्रात ब्राम्ह्ण समाजा खालोखाल मराठा समाज मानला जातो. त्यामुळे पुर्वी त्याखालच्या समाजाकडून मराठा समाजाला मान दिला जायचा पण आता तो दिला जातोच याची खात्री देता येत नाही. आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणातही मराठा समाजाचा वरचष्मा आहे असं गृहीत धरल तरी मराठा समाजातील चार डोकी पिढ॑यान - पिढ्या राजकारणात आहेत, चार डोकी श्रीमंत आहेत म्ह्णून संपूर्ण मराठा समाज सदन, श्रीमंत अथवा सुखी आहे असं गृहीत धरता येत नाही ना ! समजा असं गृहीत धरल की एकेकाळी मराठा समाज इतर समाजांपेक्षा सदन होता. पण त्या वेळ्च्या आणि आजच्या परिस्थितीत फारच फरक आहे. पुर्वी मराठा समाज राजा होता आता रामागडी झालेला आहे. राजकारण वगैरे क्षेत्र सोडा आणि उद्यागक्षेत्रात डोकावले तर आज मराठा समाजातील किती लोक मोठे उद्योगपती आहेत ज्यांची नावे जागतीक स्तरावर आदराने घेतली जातात. सद्यस्थितीतील मराठा समाज पुढे जात नाही त्याला मराठा समाजाची एक वृत्ती कारणीभूत आहे ती वृत्ती म्ह्णजे खेकडयाची वृत्ती ! एक वर जात असेल तर दुसरा खालून त्याची टांग खेचतो. त्यासाठी मराठा समाज देशातच नव्हे तर जगभरात विनाकारण बदनाम आहे. सरसकट सर्वच मराठा समाज खेकड्याच्या वृत्तीचा असता तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करूच शकले नसते. मुळात मराठा समाज म्ह्णजे लढवय्या समाज हिंमतीचे धाडसाचे कोणतेही काम त्याला करायला सांगा तो नक्की करणार पण व्यावसाय म्हटला की त्याचे पाय डगमगायला लागतात. कोणी तरी लिहलय,’ मराठी माणूस व्यावसायात उतरत नाही त्याला त्यांच्या बायका कारणीभूत आहेत. मराठा समाज ही दुदैवाने त्याला अपवाद नाही. मराठा समाजातीला बायकांची नवर्याा उद्योगधंद्यापासून दूर ठेवण्याची वृत्तीही काही अंशी मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. मराठा समाजातील मुलींना महिन्याच्या महिन्याला एक रकमी पगार मिळविणारा नवरा हवा असतो. लाखांची उलाधाल करणार्या व्यावसायिक असणार्याग मराठा समाजातील तरूणाला वधू मिळविण्यासाठी वणवण करावी लागते. पुर्वी श्रीमंत असणार्याम मराठा समजाने त्याकाळी बढेजाव पणा करण्यासाठी काही चाली, रूढी आणि परंपरा सुरू केल्या ज्या आजच्या मराठा समाजाला जाचक ठरत आहेत त्यांच नव्याने विचार करायला हवा. आजही मराठा समाजात लग्नकार्यावर अमाप पैसा खर्च केला जातो. प्रसंगी हा खर्च कर्ज काढूनही केला जातो. मराठा समाजाचे सामुहीक विवाह सोहळे क्वचितच पार पाडले जातात. त्यामुळे सद्यस्थितीतील मराठा समाज कर्जबाजारीपणामुळे ग्रस्त झालेला समाजही झालेला आहे. राजे महाराजांचा काळ संपल्यावर मराठा समाजाने ही नाईलाजाने शेती हा व्यावसाय म्ह्णून स्विकारला आणि तेथेच तो फसला. आज ही बराचसा मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्या वाढत गेली तशी प्रत्येकाच्या वाट्याची शेती कमी होत गेली. मग मराठा समाजावर दुसर्याण समाजातील लोकांची चाकरी करणे भाग पडले. तेथे ही कोकणस्थ मराठा समाजाने आपला माराठी बाणा सोडला नाही, होळी गणपतीला गावी जायला सुट्टी नाही दिली तर ते प्रसंगी नोकरीला ही लाथ मारून जातात. मराठा समाजात सारासार विचार करण्याची क्षमताच नष्ट झालेली आहे. मध्यंतरी कोठे तरी वाचनात आले मराठा समाजाचा मुंबईत एक ही हॉल नाही ! खर की खोटं देव जाणे पण जर हे खंर असेल तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. पुर्वी लोकांच्या हिंमतीला, मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला किंमत होती. पण आज तुमच्या जवळ असणार्याी शिक्षणाला, कलागुणांना आणि त्याहून ही अधिक तामच्या जवळ असणार्याा पैशाला अधिक किंमत आहे. मराठा समाजाला आपला वंश पुढे चालावा याचे भारी कौतुक त्यामुळे त्यांना मुलगा हवा असतो याचा अर्थ ते मुलींचा द्वेश करतात असा नाही पण त्यामुळे त्याचा कौटुबिक पसारा वाढतो आणि त्या वाढलेल्या पसार्यातखाली तो घुसमटून दम तोडतो. अखंड मराठा समाज एकत्र असा कधी आलेलाच नाही सद्यस्थितीतील मराठा समाज तुकड्या तुकड्यात विखुरलेला दिसतो. त्या प्रत्येक तुकड्यातील मराठा समाजाची मानसिकता, विचारसरणी भिन्न – भिन्न आहे. मराठा समाजात अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या पण मराठा समाजाचा स्वतंत्रपणे विचार करावा असा विचार त्यापैकी एकाच्याही मनाला कधी शिवला नाही. मराठा समाजानेच समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत म्ह्णून प्रथम पुढाकार घेतला पण आज सर्वांना आरक्षण बहाल करणार्याी माराठा समाजावरच आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील सर्वांनाच एका तराजूत तोलले जात आहे. पण कोणाच्या हे का लक्षात येत नाही मराठा समाज चार भागात विभागला गेलेला आहे. एक राजा- महाराजांच्या थाटात जगणारा मराठा समाज, एक श्रीमंत मराठा समाज, एक मध्यमवर्गीय पांढरपेशा मराठा समाज आणि एक दिन – दलीत गरीब मराठा समाज. एखादा रस्त्यावर राहणारा गरीब मराठा समाजातील आहे म्ह्णून त्याच गरीब असणं आपण अजून किती वर्षे नाकारणार आहोत ? आज मराठा आरक्षणाची मागणी होतेय याचा अर्थ आज मराठा समाजाची सहनशक्ती संपलेली आहे. आता यापुढे होईल तो उद्रेक ! सद्यस्थितीतील मराठा समाज सैरभैर झालेला आहे. त्याला कोणीही वाली उरलेला नाही. खरं म्हणजे मराठा समाजाने स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मरून घेतलेला आहे. मराठा समाज नेहमीच प्रसिध्दी माध्यमांपासून दूर राहिल्यामुळे आज त्यांच्या दुःखाची कोणी दखलच घेत नाही. मराठा आरक्षणाला उचलून धरण्यासाठी प्रसारमाध्यमांनी किती मदत केली हा संशोधनाचा विषय आहे. सद्यस्थितीतील मराठा समाजाचा विकास चारी दिशांनी खुंटला आहे. आजचा मराठा समाज स्वप्ने पाहायचीच विसरून गेलेला आहे. ज्यांच्यात स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे ते परदेशात स्थिरावता आहेत. पुर्वी मराठा समाजातील तरून छाती पुढे काढून सांगत असत मी मराठा आहे ! पण आज त्याला तस करण्याची लाज वाटते कारण आज मराठा समाजातील लोकांच दखल घेण्याजोग कर्तृत्वच दिसत नाही. आज मराठा समाज शिक्षण क्षेत्रातील आरक्षणामुळे बराच मागे पडलेला आहे. व्यक्तीशः मराठा समाजाच्या म्ह्णाव्यात अशा शिक्षणसंस्था महाराष्ट्रात नाहीत. मराठा समाजातील तरूण – तरूणी फक्त पदवीधर होण्यातच धन्यता मानत आहेत. गेल्या काही दशकात फार प्रसिध्दी लाभलेले मराठा समाजातील चेहरे उद्याल येताना दिसले नाहीत. सद्यस्थितीतील मराठा समाजाच्या हितासाठी संपूर्ण मराठा समाजाला एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवशकता आहे. फक्त आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाला चांगले दिवस येतील असे खात्रीने नाही सांगता येणार. सद्यस्थितीतील मराठा समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्येकाला माळेतील एक मनी व्हावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजाची अवस्था बिकट असली तरी मराठा समाजातील तरूणांनी व्यसनांच्या आहारी जाता कामा नये. मराठा समाज हा स्वभवतः सहनशील आहे त्यामुळे आपल्या दुःखाची तो उगडपणे वाच्यता करणार नाही. पण तो भडकला तर त्याला आवरणे शक्य होणार नाही. मराठा समाजातील प्रत्येक घटकाने आता समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला आपल्या परीने काही भरीव कार्य करता येईल का याचा विचार करायला हवा ! जुन्या चाली, रूढी आणि परंपरा ज्या संपूर्ण मराठा समाजात मानल्या जात नाहीत त्या नष्ट कराव्यात. मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.
लेखक – निलेश दत्ताराम बामणे ( कवी, लेखक आणि पत्रकार ( संपादक – मासिक साहित्य उपेक्षितांचे )
…. परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti