कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.
आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न...
सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये कि, माध्यमे हे साफ विसरून गेलीयेत देशात दुसर्याही घटना घडतायत, आणि या आप वाल्यानाही माध्यमात, चर्चेत कसे राहायचे हे कळून चुकलाय, कधी कोणत्या घोषणा, कधी बतावण्या आणि काहीच नाही तर कधी वादळी वक्तव्य करून हे लोक चर्चेत माध्यमात राहतात. त्याचं प्रत्येक वाक्य किंबहुना त्याची प्रत्येक हालचाल हि ब्रेकिग न्यूज होऊन बसलीये. त्यामुळे देशातील इतर नागरिकांना आता काही प्रश्न नक्की पडत असतील कि, आपण भारतातच राहतो का? देशात दिल्ली सोडून दुसरी राज्य आहेत का? आपल्या देशात टीम केजरीवाल शिवाय इतर हि नेते आहेत का? आणि आप शिवाय दुसरे कोणते पक्ष आहेत का?
दोन व्यक्तींमधील संभाषण वा व्यवहार दोघांच्या मर्यादां दरम्यान होत असतील तर ते ठीक असते. पण अशी मर्यादा ओलांडली गेली की एकाचे दुसर्याविषयीचे मत बदलते. कारण त्या एकाला धक्का बसलेला असतो. योग्य कारण जाणण्यात जर तो कमी पडला तर गैरसमज वाढतो. धक्का बसल्यानंतर त्यामागचे खरे कारण समजून घेणे म्हणूनच आवश्यक असते. यासाठी मन खुले असावे लागते.
रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधल्या गेली आहे. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीचा उत्पादन खर्च अतोनात वाढवीत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा उत्पादनखर्च भागविण्यासाठी उचललेल्या कर्जाचे व्याजही फिटत नाही.
काही खेडेगाव कायमस्वरूपी स्वच्छ झालेली आहेत, तर आजही काही खेडेगावात 20% च्या आसपास लोक उगड्यावर संडासला बसत आहेत. ज्या खेड्यातले थोडेही लोक रस्त्यावर संडासला बसतात, हा तेथील सुशिक्षित लोकांचाच अपमान आहे, असे मला वाटते कारण उगड्यावर बसणाऱ्यांंना मानपान, ज्ञान मुळातच नसते, त्यामुळेच हा अपमान अशिक्षीतांचा नसून सुशिक्षितांंचाच आहे असे वाटते.
फ्रेंच नौदलाच्या क्लेमेंस्यु या जहाजाची उपयुत्त*ता संपल्यामुळे हे जहाज तोडण्यासाठी गुजरातमधील अलंग शिप ब्रेकिंग यार्डमध्ये पाठविण्यात आले होते. या जहाजात मोठ्या प्रमाणात अॅस्बेस्टॉस असल्यामुळे प्रदुषणाचा मोठा धोका निर्माण झाला असता. हा धोका लक्षात घेऊनच क्लेमेंस्युला भारतीय सागरी हद्दीत प्रवेश देऊ नये अशी जोरदार मागणी पर्यावरणवाद्यांनी केली.
पण अशाच परिस्थितीत जर एखादा व्यक्ती शांत राहिला तर शाब्दिक वाद होत नाही आणि समोरचा व्यक्ती चा राग पण लवकर शांत होतो. असे केल्याने बोलणाऱ्याचे मन दुखावल्या जात नाही.
सजीवाच्या उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडताना डार्विनने ‘सर्व्हायवल ऑफ दी फिटेस्ट’ ही संकल्पना लोकांसमोर ठेवली होती. पृथ्वीवरील पर्यावरणीय, जैविक किंवा इतर बदलांना तोंड देण्याची क्षमता असलेले जीवच तग धरून राहू शकतात आणि या बदलांचा सामना करण्याची क्षमता नसलेले जीव कालांतराने नामशेष होतात अशी त्याची एकूण संकल्पना होती. डार्विनचा हा सिद्धान्त आज जगमान्य झाला आहे.
लोकांनी स्वत:च कायदा हातात घेऊन न्याय करण्याच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका खेड्यात गावकऱ्यांनी दहा चोरांना बदडून जिवानिशी मारल्याची घटना ताजीच आहे. या चोरांच्या उपद्रवाची अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आपल्या पद्धतीने न्याय केला.
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti