आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही .
एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.
पाप – पुण्याच्या, स्वर्ग – नरकाच्या संकल्पना तशा सगळ्याच धर्मात आढळून येतात. स्वरूप थोडेफार वेगळे असले तरी वैचारिक बैठकीत काही फारसे अंतर नसते. समाजात अनाचार माजू नये, ‘बळी तो कान पिळी’ या जंगल न्यायाने सुसंस्कृत माणसाच्या राज्यात धुमाकूळ घालू नये, या उद्देशाने कदाचित या संकल्पनांना धार्मिक आधार देऊन त्या अधिक बळकट करण्यात आल्या असाव्यात.
जीवनानंतर हा मनावर अवलंबून असतो हे सगळ्यांना कळतं पण वळत नाही.रतीब घातल्यासारखं माणसं उठल्यापासून दुसऱ्यांना कसा धडा शिकवायचा याच्या नियोजनात व्यस्त असतात मग आनंद मिळणार कुठून? अतिरेकी विचार आनंदाला ठार करतात.
सध्या अचानक महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. सगळीकडे सुबत्ता आली आहे. विजेचा प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त झाला आहे. शेतकर्यांना पाहिजे तितके पाणी उपलब्ध आहे. तीन तीन पिके वर्षभरात घेतली जातायत. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्यात , त्यांच्या घरात एसीपासुन मायक्रोवेवपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. कुपोषणाचा प्रश्न सुटलाय , सगळी लहान मुले एकजात निरोगी दिसतायत . सरकारी नोकरांचे पगार वाढलेत , महागाई कमी झालीये , सर्व वस्तु अत्यंत स्वस्त किमतींना उपलब्ध आहेत. सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार थांबलाय , सरकारी कार्यालयातली कामे कशी पटापटा आटोपतायत . सकाळी जा , एक तासात कुठलेही काम करुन परत या . जिकडेतिकडे मुबलक धान्य आहे , सगळीकडील झोपडपट्टया अचानक नाहीशा झाल्यायत , त्याजागी पक्की घरे आहेत , सर्वांना हाताला काम आहे, खायला धान्य आहे , आणि झोपायला निवारा आहे . खुन ,दरोडे , बलात्कार पुर्णपणे बंद झालेत , पोलिसमंडळींना काम उरले नाहिये .सगळीकडे एवढा आनंदीआनंद ,सुखसंपदा नांदत असताना संपुर्ण महाराष्ट्रापुढील एकच प्रश्न मात्र अजुनही सुटला नाहिये , तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री अमिताभसोबत साहित्य संमेलनात एकत्र जाणार का ?
आता सगळीकडे एवढा आनंदी आनंद असताना केवळ एकच प्रश्न न सुटलेला असणे यात मोठेसे ते काय ? पण हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही . आता महाराष्ट्रात हे सर्व प्रश्न असले असते तर त्या प्रश्नांपुढे हा प्रश्न खुपच क्षुल्लक वाटला असता . पण परिस्थिती तशी नाही . हे सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळे हल्ली “ मुख्यमंत्री आणि अमिताभ “ हा एकच प्रश्न आम्हाला मोठा दिसतो. जिकडेतिकडे चॅनलवर एकच चर्चा. वर्तमानपत्रात त्याच बातम्या. पण चॅनलवाल्यांचे काय चुकले ? सगळे प्रश्न सुटल्यामुळे वागळेसाहेब आणि खांडेकरसाहेब यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहीलाय. आपण चॅनलवर काय दाखवायचे ? शेवटी त्यांना हा प्रश्न मिळालाय आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.
आता वागळेसाहेबांचा प्रश्न जरी सुटला असला तरी सामान्य जनता ही विभागली गेली आहे. कुणाला वाटते , हो जायला पाहिजे .कुणाला वाटते नको जायला . चॅनलवर ओपिनियन पोल्स सुध्दा चालु झालेत. ज्यांना मुख्यमंत्र्यांनी जावे वाटते त्यांनी Y टाइप करुन पाठवावे .ज्यांना नाही जावे वाटत त्यांनी N टाईप करुन पाठवावे. ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जावे असे वाटते. तर उरलेल्यांना नाही जावे असे वाटते. पुन्हा चर्चा चालु. गेले तर काय होणार , नाही गेले तर काय होणार , यावर वेगवेगळ्या तज्ञांची खलबते चालु आहेत. ऊभा महाराष्ट्र आपापली कामे सोडुन चॅनलवर बघतोय. ( सगळीकडे सुबत्ता असल्यामुळे कामे सोडली तरी दुसरे काम लगेच मिळते ) अर्ध्या तासानी पुन्हा ओपिनियन पोल आला. मुख्यमंत्र्यांनी जावे की न जावे ? पुन्हा एसेमेस पाठवा . ( ते पण फ्री . कारण सुबत्ता ) .बघा बघा आता ओपिनियन पोल बदलला . आता ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जाउ नये असे वाटते. हा आमच्या चर्चेचा परिणाम . खरोखरच आहे , एवढी परिणामकारक चर्चा जनतेनी कधीही ऐकली नाहीये .
मुख्यमंत्र्याच्या जाण्याचा दिवस अखेर उजाडला. आमचे वार्ताहर मुख्यमंत्र्याच्या मागावरच आहेत. चढले चढले ते बघा मुख्यमंत्री विमानात चढले .आता विमान कुठल्या दिशेला जातेय याच्याकडे आपण लक्ष ठेवु या .पुण्याकडे जाणार की दिल्लीकडे ? पुण्याकडे गेले तर आपल्याला एक विषय मिळेल . मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ? ते दिल्लीकडे गेले तरीही एक विषय मिळेल . हायकमांडचा दबाव की अजुन काय ? त्यामुळे एकाच विषयातुन आपल्याला अनेक विषय मिळतील . चर्चा होतील , तज्ञ मंडळी आपली मते मांडतील , आपण अजुन ओपिनियन पोल्स ठेवु.
गुलाबपाकळ्यांनी सजवलेल्या गालिचावरुन चालत असताना अचानक चुकुन राहिलेला काटा पायाला बोचावा ,त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला बोचणारा एकमेव प्रश्न समोर आणल्याबद्दल जनता आपणाला अत्यंत धन्यवाद देते आहे.
-- निखिल मुदगलकर
म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्यदेश, कधीकाळी भारतीय महाखंडाचा एक भाग असलेला हा देश आज प्रचंड असंतोषाने धुमसत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून लष्करी शासकांच्या ताब्यात असलेल्या या देशात बौद्ध भिक्षुंनी प्रस्थापित लष्करी शासनाविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे. लष्करी दडपशाहीला तिथली जनता कंटाळली आहे.
राखेतून फिनिक्स पक्ष्याचा जन्म होतो, असे म्हणतात. मात्र कचऱ्यातून एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते किंवा एखाद्या राष्ट्राचा उकीरडाही होऊ शकतो. आज भारतात अशीच परिस्थिती आहे.
इमारत मजबूत व्हायची असेल तर पाया मजबुत हवा, त्याच्या विटा कणखर पाहिजेत, त्या खरपूस भाजल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. आतापर्यंत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या विटा खरपूस भाजण्याचे काम करायच्या, आता सगळ्या विटा चांगल्या भाजल्या जात असतीलच असे म्हणता येणार नाही. बऱ्याच विटा कच्च्या राहतील, परिणामी त्यांच्या आधारे उभ्या झालेल्या इमारती केव्हाही ढासळू शकतील.

भारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या. एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण.
बुद्ध आत्मिक, अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे. बुद्ध एक उदाहरण देत असत. मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो. शांत असतो.
ह्ा देश प्रजासत्ताक आहे, याचा अर्थ देशावर कुण्या एका व्यत्त*ीचे नव्हे तर देशातील संपूर्ण जनतेचे राज्य आहे. या देशाची मालक सामान्य जनता आहे. याचा एक अर्थ असाही आहे की सरकारची म्हणून जी तिजोरी आहे ती सरकारची किंवा मंत्रिमंडळाची नसून त्या तिजोरीवर कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti