मी सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहे. भारताच्या ईशान्येस असलेला हा देश क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या तुलनेत कुठेच नाही असे म्हटले तरी चालेल. लोकसंख्या दोन ते तीन कोटींच्या आसपास आणि क्षेत्रफळ जास्तीतजास्त विदर्भाएवढे!
January 21, 2007
एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..!
November 21, 2019
सरासरी दिवसाला तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. हे सगळे नियोजन चुकते कशामुळे? उत्तर स्पष्ट आहे.
December 6, 2009
ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घ्यायला साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे; परंतु त्यांनी जाताना आपल्या ज्या काही बऱ्या वाईट स्मृती इथे ठेवल्या त्यांचे ठसठशीत अस्तित्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवते. अशा अनेक स्मृतींपैकी एक म्हणजे त्यांनी या देशात रूढ केलेली प्रशासकीय व्यवस्था. ब्रिटन हा मुळातच भारताच्या तुलनेत एक चिमुकला देश, त्यामुळे खंडप्राय भारतावर हुकूमत गाजवायची असेल तर राज्यकर्त्यांना पूरक ठरणारी, मदत करणारी व्यवस्था इथल्या लोकांनाच हाताशी धरून उभी करणे त्यांना भाग होते.
February 15, 2009
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला वीणा सानेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
March 25, 2022
युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच ‘केजीबी’चा सदस्य.
June 7, 2017
कामगार-मालक, मालक-नोकर, उत्पादक-ठााहक हे संघर्ष टोकाची भूमिका घेऊन कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण वरकरणी संघर्ष दोन बाजूंमध्ये दिसत असला तरी वस्तुत: त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोघांचेही हित परस्परांशी निगडित असते.
June 28, 2009
खाणीतला कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो, हे भौतिक सत्य आहे; परंतु समाजातील वरून पांढरे दिसणारे हे बगळे सत्याच्या कसोटीवर घासले गेले, तर आतून इतके काळे असू शकतात, हे सत्य कोणत्या परिभाषेत मांडायचे?
September 26, 2012
प्रकाशन दिनांक :- 25/07/2004
‘राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा’, सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या महाराष्ट्र भूमीचे हे वर्णन शब्दश: खरे ठरु पाहत आहे. निसर्गाची अवकृपा आणि शासन-प्रशासनाची बेफिकरी अशीच सुरु राहिली तर महाराष्ट्र देश निकट भविष्यातच केवळ दगडांची भूमी म्हणून ओळखल्या जाऊ लागला तर नवल नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राला बसत आहे आणि त्यातही विदर्भ-मराठवाडा या भागाला तर निसर्गासोबतच शासनाच्या बेमुर्वतपणाचाही सामना करावा लागत आहे.
July 25, 2004
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि, “नेमकी दिशा” हा लेख फक्त आणि फक्त तरुण “ब्राह्मण वर्ग आणि त्यांची सध्यस्थिती आणि त्याची संभाव्य दिशा काय असावी” याभोवतीच फिरेल.
July 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti