प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा समाचार घेणाऱ्या मागील ‘प्रहार’ला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खूप एसएमएस आले, बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष फोनवर अभिनंदन केले. काही फोन तर जिथे देशोन्नतीचे अंक पोहचत नाहीत, अशा भागातून आले.
सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर आले आणि त्यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते, ” मी मा्फी मागितली नाहि. फक्त खेद व्यक्त केला. शिवसैनिक किंवा आम्ही माफी मागित नसतो. माफी आणि खेद यातिल फरक समजावुन घेतला पाहिजे. “
आम्ही ही बातमी बघितली आणि विचारात पडलो. अरे खरोखरच की ! माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक आपल्यालाही माहित नाहि. तसे आम्ही स्वतःला मराठीच समजतो. आम्ही मराठी घरात जन्मलो. आमच्याआधी आमच्या किमान दहा पिढ्या मराठी. मराठवाड्यात बालपण आजुबाजुला इतर भाषांचा संबंध नाही . इथुनतिथुन सर्व मराठीच. त्यात आमचे दहावीपर्यंत पुर्ण शिक्शण मराठी शाळेत झाले. त्यानंतर मात्र बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातुन आणि वैद्यकिय शिक्शण ( मनसेचा जन्मच तोपर्यंत झाला नसल्याने ) नाइलाजाने इंग्रजी माध्यमातुन झाले. या गोष्टीमुळे ” आम्ही पक्के मराठी ” असा आम्हाला आत्मविश्वास होता , तो मात्र ढासळायला सुरुवात झाली, आणि आम्ही ” माफी मागणे आणि खेद वाटणे “ यातील फरक शोधायच्या मागे लागलो.
बराच विचार केल्यावर आम्हाला एक आयडीया सुचली. महाराष्टातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत , आपले प्रश्न ते बरोबर सोडवतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राजकारण्यांकडेच सापडेल असा आम्हाला लगेच विश्वास बसला आणि राजकारण्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवले. मराठीचा विषय आल्याबरोबर राजसाहेबांचे नाव लगेच आठवले आणि त्याना भेटण्यासाठी आम्ही आमचे मनसेचे नगरसेवक गंपुशेटना भेटलो. त्यांनी जे सांगितले ते ऐकुन आमची पाचावर धारण बसली. त्यांच्यामते राजसाहेबांशी बोलताना मराठीचा वापर अनिवार्य आहे. कारण राजसाहेबांकडे चाबुक आहे , आणि आपण बोललेल्या वाक्यातील प्रत्येक अमराठी शब्दासोबत तो ते चालवतात. आता आम्ही मराठीवादी असलो तरी आमच्या बोलण्यात काही अमराठी शब्द येतात. उगीचच राजसाहेब आपल्याला विचारायाचे ” कसे आलात ? ” , आपण सांगायचो , ” रेल्वेने आलो . “ आणि “ रेल्वेने ” हा शब्द उच्चरताच सप्पकन चाबकाचा आवाज यायचा , या कल्पनेनीच आम्ही राजसाहेबांना भेटायचा विचार सोडुन दिला.
महाराष्ट्रातील दुसरे अत्यंत हुशार राजकारणी म्हणजे शरदरावजी. आपले क्रुषिमंत्री . राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याने आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत असल्याने मराठी भाषेशी संबंधित आपला प्रश्न ते सहज सोडवु शकतील असा आम्हाला विश्वास वाटला आणि लगेचच आम्ही त्यांची भेट घेतली , आणि आमची शंका विचारली.
“ शरदरावजी , खेद वाटणे आणि माफी मागणे यात नेमका फरक काय हो ? “ शरदरावजी लगेच उत्तरले , ” बाळा , डाळींचे भाव तुला माहित आहेत काय ? साखर काय भाव आहे ? भाज्या काय भाव आहेत ? ” आम्ही सांगितले , “ नाही. कारण किराणा बायकोच आणते. आम्ही फक्त पिशव्या उचलतो. पण हल्ली ती फारच कटकट करायला लागली आहे. महिन्याला पैसे पुरत नाही म्हणते. “ शरदराव म्हणाले, “ मी कारण सांगु ? कारण डाळ शंभर रुपये किलो झाली आहे. साखर चाळिस रुपये आणि भाजी दहा रुपये पाव . मिळते . “ मी विचारले , ” पण माझ्या प्रश्नाचा आणि या उत्तराचा काय संबंध ? मला माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक हवा आहे. “ शरदराव उत्तरले , “ सांगतो. संबंध सांगतो. एवढी महागाई वाढली असताना , घरी पैसे पुरत नसताना , प्रत्येकाला दिवसा नोकरी झाल्यावर रात्री पार्टटाइम नोकरी करणे घर चालवण्यासाठी आवश्यक आहे. ती नोकरी शोधायचे सोडुन तुम्ही अशा फालतु प्रश्नात आपला वेळ फुकट का घालवता , हेच मला कळत नाही. आज प्रत्येक भारतीयाची ही गरज आहे . ”
आमचे डोळे खाडकन उघडले. असल्या फालतु प्रश्नाच्या नादी लागायला आमच्यासारख्या सामान्य माणसांना वेळ नाही. संसारपण चालला पाहिजे. पार्टटाइम नोकरी शोधायच्या आम्ही मागे लागलो. एक गोष्ट मात्र पटली , की महाराष्ट्रातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत. आपले प्रश्न ते बरोबर सोडवितात.
--निखील मुदगलकर
सध्या भारतीय लोकांना कोणत्या प्रश्नाने अस्वस्थ केले आहे, असा प्रश्न कुणी विचारला आणि तुम्ही महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यापैकी एक किंवा हे सगळेच उत्तर पर्याय म्हणून निवडले, तर दोनच गोष्टी सिद्ध होतील आणि त्या म्हणजे एक तर तुम्ही भारतात राहत नसावे किंवा भारतात राहूनही तुम्हाला भारतीय लोकांची अजिबात ओळख पटलेली नसावी.
लोकशाही शासनपद्धती आपण स्वीकारली आहे. त्यामुळे निवडणुका हा अपरिहार्य आणि तेवढाच महत्त्वाचा घटक झाला आहे. अलीकडील काळात या निवडणुकींना आलेले स्वरूप बघून अनेक सुबुद्ध नागरिक निवडणूक पद्धतीवर पर्यायाने लोकशाहीवरच टीका करीत मतदानापासून दूर राहतात.
प्रकाशन दिनांक :- 16/05/2004
चौदाव्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम परिणाम बाहेर आले आणि संसद पुन्हा एकदा त्रिशंकू राहील हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचे एकाच शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास त्याला आपण केवळ ‘विस्कळीत’ एवढेच म्हणू शकतो. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत तर दूरच राहिले निसटत्या बहुमताच्या जवळपासही फिरकू दिले नाही.
ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो.

भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
कबीर म्हणतो,
मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
…मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.
प्रज्ञावंत, बुद्धिवंतांना राजकारणात स्थान मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रज्ञेचा देशाला लाभ मिळू शकणार नाही, हे हेरून, राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारा साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील १२ नामवंतांची नियुक्ती करण्याचे प्रावधान, द्रष्ट्या घटनाकारांनी घटनेत करून ठेवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारबसव्या राजकारण्यांनी घटनेतील या प्रावधानाचाही बाजार मांडला आहे.
आमच्या गुणवत्तेवर नव्हे, तर आमच्या जातीचा गौरव करण्यासाठी आम्हाला मंत्रिपद मिळाले, यात धन्यता मानणारे मंत्री या देशात असतील, तर सगळ्याच प्रकारच्या दुष्काळांचा आपल्याला सामना करावा लागेल. ज्या दिवशी या देशाचे सरकार, या देशाची प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारे लोक आणि या देशातील लोकप्रतिनिधी केवळ गुणवत्तेवर, नैतिक आचरणावर निवडले जातील त्याच दिवशी या देशाचा दुष्काळ खंडीत होईल!
आपल्याला लोकपाल, लोकायुक्त का हवे आहेत, कारण राजकारणी भ्रष्ट आहेत आणि राजकारणी का भ्रष्ट आहेत, कारण लोकांचा त्यांच्यावर अंकुश नाही. हा अंकुश मतपेटीच्या माध्यमातून ठेवता येत असेल तर आधी त्याचाच विचार व्हायला हवा.
Copyright © 2025 | Marathisrushti